Prithviraj Sutar | Water Meter | शहरात बसविण्यात येत असलेल्या पाणी मीटरच्या बील आकारणीला विरोध | समान पाणी पुरवठा योजना झालीय कधी कधी पाणीपुरवठा योजना | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

 शहरात बसविण्यात येत असलेल्या पाणी मीटरच्या बील आकारणीला विरोध

| समान पाणी पुरवठा योजना झालीय कधी कधी पाणीपुरवठा योजना | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा आरोप

पुणे मनपाने (PMC Pune) पालकमंत्री यांच्याकडे पुणे शहरामध्ये घरा-घरांमध्ये बसविण्यात आलेल्या पाणी मीटरच्या (Water Meter) रिडींगनुसार पाण्याचे बील अकारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केल्याचे समजले.  आमच्या ” शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) या पक्षाचा या बील अकारणीला तीव्र विरोध आहे. असे शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) यांनी म्हटले आहे. जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना २४x७ या मूळ योजनेप्रमाणे २४ तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये. जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर “शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरांसह तीव्र आंदोलन करील व त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा ही सुतार यांनी दिला आहे. (Pune Municipal corporation)

सुतार यांनी दिलेल्या निवेदनानुसार २४x७ ही पाणीपुरवठयाची फसवी योजना पुणे शहरामध्ये मनपाने राबविली आहे. याचा डीपीआर मुख्य सभेने जो मान्य केला त्याप्रमाणे या योजनेचे लाभ प्रत्यक्षात सुरू नाही. मनपाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मनपाला आर्थिक भुर्दड बसला असून, सदरचे पैसे हे पुणेकरांच्या कररूपी पैशातून दिले जात आहेत.

२४x७ या पाणीपुरवठा योजनेचा अर्थ होता बाराही महिने, चौवीस तास पाणीपुरवठा पुणेकरांना मिळणार काही दिवसानी योजनेचे नाव झाले समान पाणी पुरवठा आणि आता ही योजना आहे कधी-कधी पाणी पुरवठा.

ही पाणीपुरवठा योजना संपूर्ण फसवी असून पुणेकरांना फसवणारी योजना आहे ही योजना फक्त काही लोकाच्या फायदयासाठी राबविण्यात येत आहे. योजना ही सुरूवातीपासुन वादात अडकली आहे. त्याच्या इस्टिमेटपासुन ते टेंडर प्रक्रियेपर्यंत ही योजना वेगवेगळ्या कारणांमुळे लांबली गेली. या योजनेमध्ये काही तात्रिक बदल करणे आवश्यक आहे. ज्यामुळे या प्रकल्प खर्चामध्ये बचत होऊन मनपाची आर्थिक बचत होणार आहे तसेच जर हे तांत्रिक बदल केले नाहीत तर या योजनेचा पुणेकरांना हवा तसा फायदा होणार नाही आणि पाण्याची समस्या संपूर्णपणे सुटणार नाही, अशा चुकीच्या योजनेमुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. असे सागून मनपाचे हित सांभाळणाऱ्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना या कामातून मुक्त करून त्यांची बदली करण्यात आली.

या योजनेमुळे पुणेकर नागरिकांना काहीही फायदा होत नाही, अजूनही पुणे शहरामध्ये पाण्याचे प्रश्न प्रलबित आहेत. पाणी पुरवठयाचे काम पूर्ण झाले नसताना सुध्दा मीटर बसविण्याचे काम घाई-घाईत करण्यात आले हे फक्त कंपनीच्या फायदयाचा व काही लोकांचा फायदयाचा विचार करून, वेळ कोणती निवडली तर लोकप्रतिनिधी मनपामध्ये नसताना यामुळेच या योजनेबाबत अजून संशय वाढत चाललेला आहे.

जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना २४x७ या मूळ योजनेप्रमाणे २४ तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये. जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर “शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरांसह तीव्र आंदोलन करील व त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी. असे सुतार यांनी म्हटले आहे. (24*7 water project)