Sharad pawar : आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला 

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे…. आम्ही असा नेता पहिला

१२ डिसेंबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज जन्मदिवस. देशाचे लोकनेते असणारे आणि या महाराष्ट्राची संपूर्ण जाण असणारे या राज्यातील,या देशातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची खाती ख्याती आहे असे आदरणीय शरद पवार साहेब हे वयाची ८१ वर्ष  पूर्ण करून अर्थात सहस्रचंद्र दर्शनाचा योग पूर्ण करून  ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा….

आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. मी वयाची ८० वर्षे पूर्ण करणारा परंतु या वयात सुद्धा तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचा अफाट जनसंपर्क असणारा त्याचबरोबर उदंड उत्साह असणारा या वयातील एकमेव नेता पाहिला , हे भाग्य या पुढच्या पिढीला मिळेल की नाही याबाबत भाकीत वर्तवता येणार नाही. परंतु आम्हाला हा योग मिळाला आहे, हे आम्ही आमचं नशीब समजतो. आज देशात विविध राजकीय पक्षांच्या  विविध विचारधारा मानणारे विविध क्षेत्रातील मंडळी असतील या सर्वांशी एकाच वेळेस थेट संपर्क ठेवणाऱ्या पवारसाहेब आपल्याला परिचित आहेत. महाराष्ट्राच्या भूमीतून दिल्लीत जाणारे आणि तब्बल मागची तीन दशकं आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे पवार साहेब हे महाराष्ट्रातील एकमेव नेते ठरले आहेत. महाराष्ट्राने यापूर्वी देशासाठी अनेक नेते दिले परंतु त्यांना काम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर   त्या वेळेपासून देशाच्या, राज्याच्या सर्व राजकीय प्रमुख, राजकीय पक्षांच्या नेत्यांशी  सलोख्याचे संबंध ठेवत असताना आपल्या कारकीर्दीतील खूप जास्तीचा  वेळ विरोधी पक्षात घालवत असताना प्रत्येक सत्ताधारी पक्षाबरोबर दोन हात करण्याची वेळ आदरणीय पवार साहेबांवर आली पण या परिस्थितीमध्ये देखील आपला पक्ष आपली विचारधारा त्याचबरोबर उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका तसेच  आपण ज्या  राज्याला, आपल्या जनतेला, ज्यांच्याशी आपली बांधिलकी आहे त्यांच्याशी आपले उत्तरदायित्व आहे, त्या वर्गाला यांच्याबरोबर पवार साहेबांनी कधीही प्रतारणा केली नाही, सत्ताधाऱ्यांच्या  विरोधात जात केलेला संघर्ष संपूर्ण देशाने ,उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. साहेबांचा हा लढवय्या स्वभाव निश्चितच आम्ह कार्यकर्त्यांना भाऊन जातो. मागच्या सहा दशकांच्या या राजकीय प्रवासात पवार साहेब अभेद्य का राहिले. ते राजकीय असो व आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आलेल्या शारीरिक-मानसिक संकटांमध्ये ते का डगमगू  शकले नाही हा अनुभव माझ्या राजकीय आयुष्यात फार जवळून घेता आला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

सप्टेंबर २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि महाराष्ट्रातील भाजप विरोधी पक्षांचा संघर्षाचा काळ होता. या संघर्षाच्या काळात मोदी शहा या जोडीने या देशात भाजपेतर पक्ष्यांच्या सत्ता येणारच नाही अशा प्रकारच्या खोट्या कारवाया सुरू केल्या होत्या.  अर्थात वेगळ्या प्रकारच्या गळचेपीचे राजकारण सुरू केले होते. पण  ६० वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या व्यक्तिगत आयुष्यावर वा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर राजकीय पक्षांनी काही जरी बेछूट आरोप केले तरी  ते आरोप एखाद्या सभेपुरते मर्यादित असायचे आरोपांना लेखी तक्रारीचे स्वरूप कधीही प्राप्त झाले नव्हते.  त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेलाही हे कळून चुकलं होतं की पवार साहेबांसारखे  नेतृत्व हे कायम महाराष्ट्राच्या जडण घडणीसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे ,परंतु साहेबांचा राजकीय प्रवास थांबवावा किंवा अडचणीत घ्यावा यासाठी हे आरोप होत आले आहेत  आणि त्यासंदर्भात निवडणुका झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या हालचाली होत नसायच्या असे असताना महाराष्ट्रातील २०१९ची निवडणूक जिंकायची या वैर भावनेने केंद्रातील मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली मुळातच पवार साहेब हे राज्यातील कुठल्याही साखर कारखान्याचे किंवा राज्य सहकारी बँकेचे सभासद नसताना त्या कारखान्यांमधील व्यवहारांमध्ये किंवा राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांना देण्यात येणारे कर्जाच्या  कुठल्याही प्रक्रियेमध्ये साहेबांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आलेला नसताना फक्त विरोधी  पक्षातील सर्वात  दिग्गज नेता आम्ही कसा अडचणीत आणला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल कशी थांबवयाची  या हेतू पोटी ही नोटीस पाठवली होती. ८० वर्षाच्या योद्ध्याला आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कायदेशीर नोटीशीला सामोरे जावे लागले होते. ही नोटीस मिळाल्यानंतर इतर कुठलीही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विपरीत आदरणीय पवार साहेबांनी भूमिका घेतली आणि थेट ईडीला आव्हान  दिले  की, मी तुमच्या कार्यालयांमध्ये तुमच्या भेटीला येत आहे . अशा या अनपेक्षित उत्तराने भांबावलेले मोदी सरकार यांना एकूणच बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आणि एकूणच भारतात आणि महाराष्ट्रात एक वेगळा संदेश गेला जाणून-बुजून पवार साहेबांना अशाप्रकारे टार्गेट केले जात आहे आणि खुद्द पवार साहेब येत आहेत असं म्हटल्यानंतर ईडीची आणि या एकूणच कट-कारस्थानाची हवाच निघून गेली होती.  त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी अगदी टोकाची भूमिका सार्वजनिक माध्यमांमध्ये जाहीर केल्यामुळे यासंदर्भात आपण अडचणीत येतोय याची जाणीव मोदी सरकारला झाली होती.  मला आठवतंय ज्या दिवशी ईडीच्या कार्यालयांमध्ये पवार साहेब भेट देण्यास जाणार होते. त्या दिवशी पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझे मित्र नगरसेवक विशाल तांबे आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो मुंबईचा प्रवास चालू असताना या संपूर्ण प्रवासात आम्ही विविध माध्यमांमध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होतो याच वेळी माध्यमांमध्ये एक माहिती अशी मिळाली की,मुंबईच्या कमिशनरने  स्वतः साहेबांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात साहेबांना विनंती केली की, आपण ईडीच्या कार्यालयात भेट द्यायला जाणे टाळावे. या गोष्टीतून एक जाणवले की ईडीचे नोटीसमुळे अडचणीत आलेले फडणवीस सरकार आणि एकूणच मोदी सरकार यांनी पवार साहेबांना समोर सपशेल गुडघे टेकले होते आणि हे संपूर्ण चित्र उभ्या महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातील जनतेने बघितले होते. असे  असताना आम्ही ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले  व  थेट साहेबांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेलो. आमची गाडी सिल्वर ओक  निवासस्थानी पोहोचे पर्यंत पवार साहेबांची पत्रकार परिषद संपत आली होती तेवढ्यात आम्हाला समजले की पवार साहेब दोन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यासाठी जाणार आहेत म्हणून, पवार साहेब पुण्याला जाणार असणाऱ्या ताफ्याजवळ आम्ही थांबलो.  साहेब सिल्वर ओकच्या पायऱ्या उतरून खाली येत असताना तेवढ्यात त्यांचे लक्ष माझ्याकडे गेलं आणि तेव्हा त्यांनी तेवढ्यात मला विचारलं की कधी आलात? मी त्यांना सांगितलं की, साहेब सकाळीच आलोय त्यानंतर आता पुढे कुठे जाणार ? मी म्हटलं साहेब पुण्याला निघणार आहोत ते म्हणाले गाडी कुठे आहे ? मी म्हटलं गाडी सोबतच आहे साहेब . ते म्हणाले ठीक आहे गाडी माझ्या ताफ्यासोबत ठेवा असं म्हटल्यानंतर आम्ही साहेबांच्या ताफ्याच्यामागे गाडी ठेवली हा ताफा वाशीजवळ आल्यानंतर जिल्हा पोलीस बदलासाठी थांबला.

दोन ते तीन मिनिट झाले तरी ताफा हलला नाही म्हणून आम्ही विचारात असतानाच तेवढ्यात साहेबांचे चालक श्री. गामा  मामा आमच्या गाडीजवळ आले आणि त्यांनी सांगितले की पवार साहेबांनी तुम्हाला गाडी जवळ बोलवले आहे त्याचबरोबर मी आणि विशाल दोघेही साहेबांच्या  गाडी जवळ गेलो, साहेबांनी आम्हाला सांगितले की तुम्ही दोघे गाडीत बसा, मी पुढे बसतो तुम्ही दोघे मागे बसा.  त्याचबरोबर मी, विशाल आणि आमदार रोहित पवार आम्ही तिघेही गाडीत मागे बसलो, असा आमचा प्रवास वाशी पासून सुरू झाला.  या प्रवासामध्ये साहेबांनी इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.  मला आठवतंय जसा खोपोलीचा घाट क्रॉस  करून आम्ही वर आलो,तशी साहेबांची तेथील पवनचक्क्यांवर  नजर पडली तसं या पवनचक्क्यांकडे  बोट करून साहेब म्हणाले की या पवनचक्क्यांचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का? आम्ही म्हंटलं  नाही साहेब? मग साहेबांनी सांगितलेकी ९०च्या दशकामध्ये मी राज्याचा मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी परदेशात  गेलो होतो,लोक तिथेj असणाऱ्या पवनचक्क्यांच्या माध्यमातून विद्युत निर्मिती आणि स्थानिकांना मिळणारा रोजगार याची माहिती घेत ही संकल्पना आपल्या महाराष्ट्रात प्रत्यक्षात उतरेल की नाही याचा अभ्यास घेतला त्यानंतर महाराष्ट्रात एकदा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तेथील स्थानिक आमदार श्री. विक्रमसिंह पाटणकर यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला,तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पवार साहेबांना आजूबाजूच्या परिसरात सर्व पठार दिसले आणि पवार साहेबांनी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पाटणकर यांना दिल्या.  थोड्याच वेळात हेलिकॉप्टर आले . हेलिकॉप्टरच्या माध्यमातुन आदरणीय पवार साहेबांनी आजूबाजूच्या डोंगरांची पाहणी केली व या पठारावर  पवनचक्क्या बसवणे शक्य होईल का ?याबाबत चाचपणी केली . त्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याकाळी कमी असणारे विजेची गरज भागवता येईल तसेच या पठारी भागातील नागरिकांना यातून उत्पन्न सुद्धा सुरू होईल अशी दूरदृष्टी त्या वेळेस साहेबांची होती.  याबाबतची कल्पना त्यांनी स्थानिक लोकांसमोर मांडली त्यावेळी ही कल्पना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी त्या परिसरातील नागरिकांसाठी थोडी शंकास्पद होती की, ही योजना यशस्वी होईल की नाही परंतु पवार साहेबांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांनी तयार होत  हा बदल स्वीकारला आणि त्यानंतर सुरुवातीला सातारा आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात  अशाप्रकारे पवनचक्क्यांच्या जाळं उभं राहिलं. त्यानंतर या तंत्रज्ञानाने राज्याभर खूप मोठा विस्तार केला.  एका नव्या व्यवसायाची सुरुवात महाराष्ट्रात झाली ही सगळी माहिती घेत असताना आम्ही पुण्यात कधी पोहोचलो,हे  आम्हाला समजलं नाही.  या प्रवासात लोणावळा पासुनच ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांनी साहेबांच्या समर्थनार्थ तसेच स्वागतासाठी उभे राहून मोठ्या मोठ्या मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या, तसेच अनेक  ठिकाणी  साहेबांचा स्वागत करण्यात आले .

या सर्व काळात साहेबांनी एकदा देखील असे म्हटले नाही की केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने माझ्यावरती सूडबुद्धीने  कार्यवाही केली किंवा मला त्यांचा राग आहे असं साहेब बोलले देखील नाही.  खूप साऱ्या  लोकांना अशा प्रकारची काही घटना घडल्यानंतर एकमेकांना फोन करून शेखी  मिरवण्याची सवय असते अशा प्रकारचे चित्र मी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो परंतु या संपूर्ण दोन तासाचा प्रवासामध्ये साहेबांनी एकदाही मोबाईलला हात लावला नाही किंबहुना मी आज मोदी अथवा फडणवीस सरकारला कसा धडा शिकवला अशा प्रकारचा एकही वाक्य वापरलेले नाही त्याही पलीकडे जाऊन आपल्या साठ वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आली, इतर सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील काही मंडळींच्या आठवणी आम्हाला सांगितल्या  हा आमच्यासाठी निश्चितच एक वेगळा अनुभव होता.  मी पुन्हा एकदा सांगेल आयुष्यामध्ये एवढी मोठी घडामोडी घटना दिवस ज्याने त्याच्या आयुष्यात आला त्याच दिवशी पवार साहेबांचा सोबत प्रवास करण्याचा योग पवार साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिला ही माझ्या आयुष्यातील सुवर्णमय घटना आहे.  आयुष्यात कितीही वादळ आली,संकट  आली तरी ङगमगायचे  नसतं ,त्याला जायचं असत आणि त्याला सामोरे जात असताना त्याची शेखी मिळून घ्यायची नसते तर या वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा जमिनीवर पाय घट्ट रोवून त्या परिस्थितीची सामना कसा करावयाचा हे पवार साहेबांनी सांगितले हा एक पुढच्या काळात राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना संकटांशी दोन हात करण्याचा वेगळा विचार पवार साहेबांच्या कृतीतून आम्हाला आम्ही शिकलो आदरणीय पवार साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिला हे ऋण  कधीच न फिटणारे आहे या हिमालयाएवढ्या उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या नेतृत्वाला मी मनापासून सलाम करतो वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.  साहेब आपण शतायुषी व्हा..  शतायुषी होत असताना या देशाचं पंतप्रधानपद भूषवावे ,  ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची निश्चितच अपेक्षा राहील.  पंतप्रधानपद हे कुठल्याही वयाच्या चौकटीत मोजले जाणारे नाही ते या देशात सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या हातात यावे , यासाठीचा काळ असून येत्या काळात आपण हे पद भूषवाल,  अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे.  पुन्हा एकदा आपणांस  वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

 

श्री. प्रशांत सुदाम जगताप

शहराध्यक्ष. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Leave a Reply