Rahul Gandhi | मी गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत – राहुल गांधी.

Categories
Breaking News Political देश/विदेश
Spread the love

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही.

या देशाने मला सगळं दिलं. प्रेम, आदर दिला. म्हणून मी देशासाठी लढणार.

मोदी आणि अदानी यांचे नाते सगळेजण सांगतात.

मोदी माझ्या पुढील भाषणाला भीत होते. कारण मी अदानी बद्दल बोलणार होतो. म्हणून माझी खासदारकी रद्द केली.

मी जे पण प्रश्न उपस्थित करतो, ते खूप विचार करून करतो.

यांनी काहीही करू द्या. मी काम करणे थांबवणार नाही.

अदानी च्या कंपनीत 20 हजार कोटी कुठून आले?

जनतेच्या मनात आता प्रश्न उपस्थित होत आहे कि भ्रष्ट अदानीला का वाचवले जात आहे?

मी लढत राहणार. लोकशाही तंत्र मजबूत करण्यासाठी लढणार.

अदानी मुद्द्यांवरील लक्ष हटवण्यासाठी देशद्रोह, खासदारकी रद्द करणे, ओबीसी असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत.

मी गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत.