Tag: Amol balwadkar
Pandharpur Wari| अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वारकरी सेवेची २९ वर्षे!
Pandharpur Wari | दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त (Aashadhi Ekadashi) बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर व अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या (Amol Balwadkar Foundation) वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. (Pandharpur Wari)
विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी या यात्रेत ६५० भाविक सहभागी झाले. माऊलीचे नामस्मरण करून मोठ्या भक्तिभावाने व पवित्र वातावरणात सदर यात्रा १२ बसेसच्या माध्यमातुन पंढरपूर नगरिकडे रवाना झाली. विठ्ठल-रखुमाईच्या गजरात संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमला. (Aashadhi Wari 2023)
याप्रसंगी संजय बा.बालवडकर (अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट बालेवाडी), आशाताई बालवडकर, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, मा. नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, अनिलतात्या बालवडकर, आत्मारामतात्या बालवडकर, शशिकांत बालवडकर, सुभाष भोळ, बालेवाडी भजनी मंडळ व बालेवाडी-बाणेर-सुस-म्हाळुंगे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (Pandharpur Aashadhi Wari)
News Title | Pandharpur Wari| 29 years of Amol Balwadkar Foundation’s service!
Sus, Mhalunge Water Issue | सुस, म्हाळुंगे गावांचा पाणी प्रश्न सुटणार! 26 कोटींचा येणार खर्च
बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता
| अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा
२४ x ७ हा भाजपाचा पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सुरुवातीपासुनच हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मधल्या कोरोना काळामुळे या कामास विलंब झाला असुन आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. तसेच सुस म्हाळुंगे येथेल नवीन पाण्याच्या ट्रान्समिशनचे लाईन व टाकीच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसात होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल.
– अमोल बालवडकर
अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश
७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील ८ पैकी ६ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्या देखील सुरु करण्यात येतील. परंतु या टाक्यांना ट्रान्समिशन लाईन मधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या लाईनचे काम आपण केलेल्या सूचनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे. वारजे ते बाणेर-बालेवाडी पर्यंतच्या भागामध्ये या ट्रान्स्मिशन लाईनचे काम अनेक ठिका अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. तसेच या टाक्यांच्या अंतिम टप्प्यामधील काही कामे देखील प्रलंबित आहेत. या कामांबाबत आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई केल्यास लवकरच या २४ x ७ समान पाणी पुरव योजनेची सुरुवात बाणेर-बालेवाडी भागामध्ये होईल. असे बालवडकर यांनी पालकमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटले होते.
तरी सदर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याकरिता आपण संबंधित खात्यांच्या अधिकार्यांना तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे. पालकमंत्र्यांनी बालवडकर यांच्या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्तांना आदेश देत प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सांगितले आहे.
२. वारजे येथे दिलीप बराजे यांच्या परवानगी अभावी ३६ मी.ची लाईन प्रलंबित.
३. चांदणी चौक – श्री.अजमेर यांच्या जागेमधून जाणार्या ६० मी च्या लींचे काम प्रलंबित.
४. HEMRL येथील रामनदी वरील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे पुढे ट्रान्स्मिशन लाईन चे काम अपूर्ण.
५. पाषाण तलाव नजीकच्या शिव मंदिर येथील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे ४० मी लाईनचे काम प्रलंबित.
६. सुस खिंड ते कुमार पेपीलोन सोसायटी पर्यंतचे सुमारे ८०० मी चे काम पाईप उपलब्ध नसल्याने प्रलंबित
७. सुतारवाडी गावठाण येथे सुमारे १५० मी चे काम अरुंद रस्त्यामुळे प्रलंबित.
८. सुस खिंड पूल ते किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) पर्यंत एकूण १२७५ मी. लांबी पैकी ८७४ मी. लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.
९. किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) ते बालेवाडी डेपो पर्यंतच्या एकूण २१५० मी. पैकी १२३० मी लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.
बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचा जोश-२०२२ (JOSH-2022) कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
काल बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचा जोश-२०२२ (JOSH-2022) हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली ६ वर्षे सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनच्या सर्व सभासदांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये डान्स, फॅशन शो, लहान मुलांसाठीच्या स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या दरम्यान डॉ. जे. एस. महाजन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच जनहितासाठी कायदेशिर कामगिरी बजावत असलेल्या ॲड.सत्येन्द्र मुळे यांचा देखिल विशेष सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आइस स्केटिंग चॅम्पियन प्रियांशू साळवे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच वैद्यकीय क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल डॉ. केदार साठे व डॉ. अर्चना डांगरे यांना असोसिएशनच्या वतीने बीएमए गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनच्या व बाणेर बालेवाडी भागातील प्रत्येक वैद्यकीय संस्था व डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. तसेच त्यांच्या हातून होणारे सामाजिक कार्य आणि रुग्णांप्रती असणारी आपुलकीची भावना याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली होती तसेच मा.नगरसेविका ज्योतीतीई कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, भाजपा नेते गणेशजी कळमकर, भाजपा नेते प्रल्हादजी सायकर, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. बबन साळवे, डॉ. सागर सुपेकर, डॉ. प्रिया देशपांडे, डॉ. दीपाली झंवर, डॉ. रितू लोखंडे, डॉ. सुषमा जाधव, डॉ. सुवर्णा साळवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!
बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे (Baner-Balewadi-Sus-Mhalunge) येथील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी व समस्या जाणुन घेण्यासाठी बालेवाडी येथे मा.नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांच्या मागणी नुसार महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner Vikram Kumar) प्रत्यक्ष पाहणी करुन नागरीकांशी व महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी महापालिका आयुक्तांनी अत्यंत गंभिर असलेल्या पाणी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी नागरीकांनी चार चार दिवस मनपा कडुन कोणत्याच प्रकारचा पाणी पुरवठा बाणेर-बालेवाडी भागाला होत नसल्याने धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा असुन देखिल येथील नागरीकांना पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे असे आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. यावर तातडीने उपाय योजना करुन वारजे येथुन पाणी पुरवठा वाढविण्याचे तसेच बाणेर व बालेवाडी येथे तातडीने वाढीव पंप बसविण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना दिले. तसेच बालेवाडी येथील अंडर ग्राऊंड टाकीमध्ये पंप बसवुन बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले.( Water problem Baner-Balewadi-Sus-Mhalunge )
तसेच २४x७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असुन येत्या १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उर्वरीत पाईप लाईनचे काम पुर्ण करणे, नविन टाक्यांना पंप बसवुन टाक्या कार्यरत कराव्या व त्यातुन या भागाला पाणी पुरवठा करण्याचे आदेश देखिल आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी “बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे भागाला त्यांच्या हक्काचा मुबलक पाणी पुरवठा करुन येथील नागरीकांना व माता-भगिनींना लवकरात लवकर या कृत्रिम टंचाईतुन मुक्तता करावी” अशी मागणी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली. तसेच या भागातील सर्व वॅाल्व्हची पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना योग्यरित्या हताळण्याची आवश्यकता असल्याचे देखिल सांगितले.
यावेळी “या भागाला निर्माण झालेली पाणी समस्या हि पुर्णपणे कृत्रिम असुन या भागातील सर्व वॅाल्वमन ला सक्तिची ताकिद देवुन सर्व वॅाल्व पुर्वरत करत या भागाला लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करण्याची मागणी” यावेळी गणेश कळमकर यांनी केली.
यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, युवा नेते गणेश कळमकर, युवा नेते लहु बालवडकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, शशिकांत बालवडकर, संदिप बालवडकर, अस्मिता करंदिकर व परिसरातील सोसायटींचे नागरीक, ग्रामस्थ व पुणे मनपा पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत महापालिका अधिकारी निष्क्रिय | भाजपा पदाधिकाऱ्यांचे ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील पाणी समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून यावर प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Ex corporator Amol Balwadkar) यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, शिवम बालवडकर, अनिल बापू ससार यांनी नागरिकांसोबत ठिय्या आंदोलन (Agitation) केले. यावेळी या तिघांनी पाण्याचा वॉल फिरवून बाणेर बालेवाडी कडे जाणारे पाणी सोडले. पालिका अधिकारी आंदोलन स्थळी आले असता चर्चेत वास्तविक मागील काही काळापासून पाणी सोडण्याचे तास कमी करण्यात आले आहे हे निदर्शनास आले. लोकसंख्या वाढण्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले पण लोकसंख्या वाढल्याने पाण्याचे तास वाढण्या पेक्षा कमीच झाले. (water problem of Baner Balewadi)
या आंदोलना बद्दल बोलताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, बाणेर बालेवाडी परिसरात अनियोजित पाणीपुरवठा सुरू आहे. वारंवार अधिकाऱ्यांना सांगून देखील काहीच कारवाई होत नाही. अधिकारी नुसतीच हो, पाहतो, करतो, टाकीत पाणी नाही अशी उत्तरे देत आहेत. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर जोपर्यंत पाणी सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तसे आंदोलन सुरू होते, परंतु पालिका अधिकारी यांनी येऊन नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करू असे सांगितले. (Pune Municipal corporation)
भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, जाणुन बुजून केवळ नागरिकांना त्रास व्हावा या यातूनही कृत्रिम प्राणी टंचाई निर्माण केली जात आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, महाळुंगे या सर्वच परिसरात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असून ही समस्या सोडविणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हि कुत्रिम पाणी टंचाई थांबवुन लोकांना मुबलक पाणी देउन हा प्रश्न संपविला पाहिजे. (PMC Pune)
या आंदोलनात प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, त्याचबरोबर निष्क्रिय अधिकाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा व नंदीबैल आणून या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला.
याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शशिकांत बालवडकर, सचिन मानवतकर, शिवम बालवडकर, अनिल बापू ससार आदी उपस्थित होते.
यावेळी चांदणी चौक येथील पाण्याचे टाकीवर महापालिका अधिकारी प्रसन्ना जोशी, योगिता भांबरे, श्रीधर कामत यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु या चर्चेच्या वेळी असे निदर्शनास आले की पालिकेच्या अधिकाऱ्यांना बाणेर बालेवाडी परिसरातील पाणी प्रश्नाची जाणीवच नाही. प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीच उत्तरे व्यवस्थित देता आली नाही. पाण्याची टाकी, पाण्याचे वॉल, पंप, पाणी किती सोडायला पाहिजे याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ जाणवला. एवढा गंभीर असणारा पाणी प्रश्न का उभा राहतो वारंवार लोक का समस्या मांडतात याची गंभीरता ह्या अधिकाऱ्यांना नसल्याने त्यांनी त्या मागचे अडचण निवारण करण्यासाठी कोणते प्रयत्न केलेले दिसून येत नाही. तरी देखील बऱ्याच वेळानंतर त्यांनी आंदोलन कर्त्यांच्या समस्या जाणून उद्यापासून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करून काय समस्या आहे याबाबत सोडवणूक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. जवळपास चार ते पाच तास हे आंदोलन सुरू होते. (water issue in baner balewadi)
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण
| शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे| पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आदी उपस्थित होते.
चांदणी चौकातील सहापदरी पूल झाल्यावर या भागातील बरेचसे प्रश्न मार्गी लागतील असे सांगून श्री. पाटील म्हणाले, या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. पुणे शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. चांगल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, शांतता आदीमुळे सर्वांनाच हे शहर राहण्यासाठी सुरक्षित वाटते.
मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, येत्या काळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहे. मेट्रो, सर्व भागात २४ तास समप्रमाण पाणी पुरवठा, जायका प्रकल्प आदी प्रकल्प गतीने पूर्ण करायचे आहेत. पाषाण- सूस भागातील घनकचरा प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी असून येथील लोकप्रतिनिधींनी नागरी वस्तीपासून दूर असलेली योग्य जागा शोधावी. या जागेचे संपादन करून तेथे हा प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
उद्घाटन करण्यात आलेल्या पूलाला राजमाता जिजाऊ भोसले यांचे नाव देण्यात येईल आणि राजमाता जिजाऊंचा पुतळाही या ठिकाणी उभा केला जाईल, असेही श्री. पाटील म्हणाले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, १९९५ नंतर उड्डाणपूल, तसेच रस्त्यांच्या बाबतीत राज्यात चांगली पाऊले टाकली गेली आहेत. शहरात मोठ्या पावसामुळे सिग्नल व्यवस्था बंद पडू नये यावर उपाययोजना करणे आणि अशावेळी ऐनवेळचे वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे.
माजी महापौर मोहोळ म्हणाले, या भागातील वाहतूक कोंडीवर हा पूल उपयुक्त ठरणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करणारे देशातील ५ व्या क्रमांकावर पुण्याचा समावेश आहे.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी प्रास्ताविकात पुलाबाबत माहिती दिली. हा पूल ४७० मीटरचा असून पुलामुळे कात्रज व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
फेब्रुवारी २०२० पासून काम सुरू झालेल्या या पुलाचे काम कोविडकाळातही गतीने सुरू ठेऊन पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रावणी सतीश गोगुलवार हीचा १२ वी सीबीएसई बोर्डात ९९.४० टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
असा आहे उड्डाणपूल
४१ कोटी रुपये खर्चातून उभारलेला ४७० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पाषाण-सूसला जोडणारा आहे. पाषाण-कात्रज, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क, मुळशीला जोडणारा हा पूल वाहतूकीसाठी मोठा उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी आणि मुळशीकडून येणारी वाहतूक सुकर होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
उड्डाणपुलाचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. तांत्रिक कारणामुळ त्यांना सहभागी होता आले नाही. तथापि, मुख्यमंत्र्यांनी मंत्री श्री. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत या लोकार्पण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प
| अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प अमोल बालवडकर फाऊंडेशन आणि भाजपा सक्रिय महिला यांच्या वतीने केला आहे.
याबाबत अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, आज या अभियानाची सुरुवात योग्य व्यक्तीच्या हाती पहिला तिरंगा देऊन करावी असे मनात होते. या अनुषंगाने आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या मुलाला प्रोत्साहन देणार्या शूरवीराच्या मातोश्री सौ.मित विज यांना पहिला तिरंगा देऊन या अभियानाला सुरुवात झाली. आपल्या प्रभागातील एक युवक लेफ्टनंट गुरप्रितसिंग विज हे भारतीय सैन्य दलात मोलाची कामगिरी बजावत असुन त्यांच्या मातोश्री सौ.मित विज व त्यांचा संपुर्ण परिवार कायमच गुरप्रित सिंग यांना प्रोत्साहन देत असतात. यावेळी गुरप्रित सिंग सैन्य दलात बजावत असलेल्या कर्तव्याबाबत त्यांच्या मातोश्रींकडुन माहिती घेतली.
खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिक, सीमेवरचे सैनिक किंवा देशसेवा करणारे सगळे लोक जेव्हा देशासाठी आपले योगदान देतात तेव्हा फक्त तेच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण परिवाराचे योगदान मोठे असते. त्यामुळे या सर्वांच्या हिमतीने आणि त्यागामुळे आज देश ताठ मानेने उभा आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या-ज्या सैनिकांनी बलिदान दिले आणि आजही आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी व सेवेसाठी जे-जे सैनिक स्वतःचे मौलिक योगदान देत आहेत अशा सर्व सैनिकांना माझा मानाचा मुजरा! असे ही बालवडकर म्हणाले.