Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा

| भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेने हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशा सूचना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार  चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेली पाणीपुरवठा समस्या निवारण बैठक बाणेर येथील अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर संपन्न झाली.
या बैठकिचे आयोजन मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योतीताई गणेश कळमकर, स्वप्नालीताई प्रल्हाद सायकर यांनी केले होते.

यावेळी पुरेसा पाऊस पडुन धरणांमध्ये पाणी साठा असुनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरणाच्या अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. तसेच वारंवार पाठपुरावा करुन देखिल अधिकारी या गंभिर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना निदर्शनास आणुन दिले.

“जागो-जागी पाईप लाईन मधुन होत असलेली गळती थांबवुन, पंप दुरुस्त करुन तसेच वितरण व्यवस्थेत सातत्य ठेवुन लवकरात लवकर या भागाला पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करावा” अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

यावेळी आयुक्तांनी बाणेर बालेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारे जे पंप आहेत ते पंप लवकरात लवकर दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच वाढीव पंप लावण्यासंदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच नव्याने समाविष्ठ सुस-म्हाळुंगे-बावधन बु. या गावांसाठी पुणे मनपा मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार झाला असुन लवकरच याकरीता निधी उपलब्ध करुन दिला जाईल व या गावांमध्ये देखिल पुणे मनपा मार्फत पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले.

यासोबतच जोपर्यंत या गावांमधील पाणी प्रश्न मार्गी लागत नाही व पाईप लाईन विकसित होत नाहित तोपर्यंत बाणेर-बालेवाडी-पाषाण सहित नविन समाविष्ठ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या मदतीकरीता या भागातील सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन व लोकसहभागातुन विविध भागात टाक्यांची उभारणी करण्यात येईल व सर्वत्र पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले. तसेच २४x७ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ८ टाक्या तातडीने सुरू करण्याचेही आदेश मा.चंद्रकांतदादांनी पुणे मनपा आयुक्त व अधिकारी यांना दिले.

याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, बाणेर बालेवाडी येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, विविध सोसायटीचे चेअरमन-सेक्रेटरी व पदाधिकारी तसेच समस्त नागरिक उपस्थित होते.

DCM Devendra Fadanvis Birthday | राष्ट्र प्रथम, मग पक्ष, शेवटी आपण…हाच देवेंद्रजींचा बाणा | अमोल बालवडकर

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्र प्रथम, मग पक्ष, शेवटी आपण…हाच देवेंद्रजींचा बाणा

| अमोल बालवडकर, नगरसेवक, भारतीय जनता पार्टी

आपण राहतो त्या परिसराचं, आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं भलं करावं अशी सामाजिक ओढ असणारा मी एक कार्यकर्ता आहे. समाजकारण साधण्यासाठी लोकशाहीत राजकारण महत्वाचं असतं. म्हणून मी महापालिकेची निवडणूक लढवली. लोकांनी भरपूर प्रेम करत मला निवडून दिलं. माझ्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांपुढं आदर्श आहेत आपले देवेंद्रजी फडणवीस. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे नगरसेवक बनले. पाच वर्षांनी नागपुरकरांनी त्यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून दिलं. या दुसऱ्या खेपेस तर अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी म्हणजे सन १९९७ मध्ये नागपुरचे महापौर बनले. महापालिकेचं कार्यक्षेत्र त्यांच्या झपाट्याला, कर्तुत्वाला अपुरं पडू लागल्यानं १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर आजतागायत त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. विधानसभेच्या १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग पाच निवडणुका त्यांनी जिंकल्या. विरोधी पक्षात असताना देवेंद्रजींनी त्यांच्या अभ्यासूपणाच्या बळावर सत्ताधाऱ्यांना किती वेळा सळो की पळो करून सोडलं याची गणतीच नाही. देवेंद्रजी विधानसभेत प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिल्यानंतर दहा-दहा वर्षं मंत्री म्हणून काम केलेल्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा घाम फुटायचा. प्रत्यक्षात घेतलेल्या वकिलीच्या शिक्षणाचा सगळा उपयोग देवेंद्रजी जनतेची वकिली करण्यासाठी विधिमंडळात करतात. आमदारकीच्या चौथ्या खेपेस देवेंद्रजींना पक्षानं थेट मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पूर्वपुण्याई, घराणेशाही, धनशक्ती या बळावर भारतीय जनता पक्षात काहीही मिळत नाही. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना महाराष्ट्रासारख्या देशातल्या सर्वात प्रगत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा मान मिळू शकला.

देवेंद्रजींचा आज वाढदिवस आहे. वयाचं अर्धशतक पूर्ण केलेल्या या आपल्या नेत्यानं सार्वजनिक जीवनातली तीस वर्षं पूर्ण करावीत ही फार मोठी गोष्ट आहे. विशेष म्हणजे महापालिकेपासून सुरु झालेली त्यांची वाटचाल आजवर अपराजित राहिलेली आहे. हेवा वाटण्यासारखा हा प्रवास आहे. या प्रवासात देवेंद्रजींची सगळ्यात मोठी कमाई कोणती असेल तर प्रचंड विश्वासार्हता होय. देवेंद्रजींनी एखादा मुद्दा उपस्थित केला, प्रश्न मांडला म्हणजे त्यात शंभर टक्के तथ्य असतेच हे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतून दिसून आलं. व्यक्तिगत आरोप, निंदानालस्ती यांना त्यांनी कधीही स्थान दिलेलं नाही. परंतु, राष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या आड कोणी येत असेल तर त्याची हजेरी घ्यायला ते चुकत नाहीत. त्यांच्या नैतिकतेचा दरारा विरोधकांना असतो. सत्ताधारी म्हणून काम करत असतानाही त्यांनी महाराष्ट्रातील सर्व घटकांचा प्रतिनिधी म्हणून राज्य केलं. त्यामुळं प्रत्येक मराठी माणसाला देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपद आपलं वाटल. ‘जे बोलतो ते करतो,’ ही पारदर्शकता राज्यकर्ता फडणवीस यांनी दाखवली आहे. पुण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा धडाका यापूर्वी खचितच कोणी दाखवला असेल. यापुर्वीच्या राज्यकर्त्यांनी मेट्रोच्या पोकळ घोषणा करत वर्षानुवर्षे काढली. परंतु, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढणारी, घरी किंवा ऑफिसमध्ये जलद वेळेत पोहोचवणारी आणि पुण्याची हवा शुद्ध ठेवणारी पुणे मेट्रो ही फडणवीसांच्याच काळात आली. देवेंद्रजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने आता तर काही भागात ती धावूसुद्धा लागली आहे. वाढत्या पुणेकरांची तहान भागवणाऱ्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचंही असंच आहे. विरोधकांनी चर्चेत वेळ घालवला. फडणवीसांनी ती योजना विक्रमी वेळेत पूर्णत्वास नेऊन दाखवली. या शिवाय पुरंदर विमानतळ, चांदणी चौकातील उड्डाणपूल, कात्रज-कोंढवा रस्ता, बाणेर-बालेवाडीला स्मार्ट करण्याचा विषय, समान पाणीपुरवठा योजना, माण- म्हाळुंगे हायटेक सिटी, माण- हिंजवडी- बाणेर- बालेवाडी- शिवाजीनगर मेट्रो व मुळा-मुठा नद्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसन अशा पुण्याला अत्याधुनिक करणाऱ्या कितीतरी योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरु झाल्या. महापालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट २३ गावांचा निर्णय देवेंद्र फडणवीस असते तर केवळ राजकीय हेतु साठी झाला नसता , देवेंद्रजींनी भरघोस निधी या गावांना मनपा हद्दीत समाविष्ट करताना त्यांनी नक्कीच दिला असता .मात्र मधल्या काळात मराठी माणसांचा विश्वासघात करून मविआ सरकार सत्तेत आलं. मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारी आणि ढिसाळ कारभारामुळं पुण्याची प्रगती ठेचकाळली. मला पूर्ण विश्वास आहे की गतीमान कार्यकुशलता असणारे देवेंद्रजी आता पुन्हा सत्तेत आल्यानं या सर्व योजनांना वेग देतील. पुणेकरांचं जीवन सुखमय करतील.

शत्रुसुद्धा बोट दाखवणार नाही इतके निष्कलंक चारित्र्य देवेंद्रजींनी राजकारणाच्या बजबजपुरीत राहून जपलं आहे. स्वच्छ हात, सही दिशा, स्पष्ट निती ही देवेंद्रजींच्या राजकारणाची त्रिसूत्री आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिलेली राष्ट्र प्रथम, मग संघटना आणि शेवटी स्वतः ही शिकवण हाच देवेंद्रजींचा बाणा आहे. म्हणूनच सत्तेत सहभागी होणार नसल्याचे सांगून एकनाथजी शिंदे यांच्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट ठेवून देवेंद्रजी निर्लेपपणे बाजूला झाले होते. मात्र केवळ पक्षाचा आदेश म्हणून ज्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषविलं त्याच ठिकाणी ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास तयार झाले. व्यक्तिगत अहंकार, इच्छा त्यांनी बाजूला ठेवली. पक्षाचा आदेश सर्वोच्च मानला. असा त्याग राजकारणात दुर्मिळ असतो. केवळ गुणवत्ता, प्रामाणिकपणा, जनतेप्रती असणारी बांधिलकी, निस्सिम राष्ट्रभक्ती आणि पक्षावरची अतूट निष्ठा या गुणांच्या बळावर राजकारणातली शिखरं कशी चढत जावीत, याचं उदाहरण म्हणून माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता देवेंद्रजींकडं पाहतो. ‘क्या करेगा अकेला देवेंद्र’ असं म्हणून कधी कोणी खिजवण्याचा प्रयत्न केला. कधी जवळच्या नातेवाईंकावर हल्ला करून त्यांना डिवचलं गेलं. ‘मी पुन्हा येईन’, या राजकीय सभेतील वक्तव्यावरून देवेंद्रजींना कमी लेखलं गेलं. कधी ज्येष्ठ म्हणवणाऱ्या नेत्यांनी जातीवरून त्यांच्यावर हल्ले केले. मात्र यातल्या कशाबद्दलच सूडाची भावना न ठेवता देवेंद्रजींनी सर्वांना माफ केलं आणि शांतपणे काम करीत राहिले. पुरेसं संख्याबळ नसतानाही त्यांनी पक्षाला राज्यसभा आणि विधानसभेत अशक्यप्राय वाटणारं यश मिळवून दिलं. सुसंस्कृत, सज्जन तरूणांना राजकारणात भवितव्य असल्याची आशा देवेंद्रजींमुळे जिवंत राहिली आहे. राजकीय डावपेचात आणि बेरजेच्या राजकारणातही महारथी असणाऱ्या देवेंद्रजींनी भल्याभल्यांचे अंदाज धुळीस मिळवले. महाराष्ट्राचा हा लाडका चतुर, चतुरस्त्र नेता आज ना उद्या राष्ट्राच्या सेवेत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. महाराष्ट्राच्या या सुपूत्रास पुणेकरांच्यावतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उदंड, निरामय आयुष्य देवो.

अमोल बालवडकर
भाजपा नगरसेवक पुणे मनपा
(२०१७-२०२२)

Amol Balwadkar Vs Baburao Chandere | बाबूराव चांदेरेंच्या भावनेचा विचार करून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी द्यावी  : अमोल बालवडकर यांची प्रतिक्रिया 

Categories
Breaking News Political पुणे

बाबूराव चांदेरेंच्या भावनेचा विचार करून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी द्यावी

: अमोल बालवडकर यांची प्रतिक्रिया

पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील कलगीतुरा नेहमीच पाहायला मिळतो. महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीला वेग आला आहे. त्यामुळे सगळे कंबर कसून कामाला लागले आहेत. अशातच औंध बालेवाडी प्रभागावर sc चे आरक्षण पडले आहे. राष्ट्रवादीकडून बाबूराव चांदेरे यांनी उमेदवारी मागितली आहे. यावर भाजपचे अमोल बालवडकर यांनी उपहासात्मक टीका केली आहे. बालवडकर यांनी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष्याना विनंती केली आहे कि, चांदेरे यांच्या भावनेचा आदर करून त्यांना प्रभागातून उमेदवारी द्यावी.
बालवडकर म्हणाले, आधी  बाणेर – बालेवाडी प्रभाग स्वतःच्या राजकिय सुरक्षिततेसाठी चुकिच्या पद्धतीने तोडायचा ! परत वर म्हणायचं ‘ मी बालेवाडी -औंध प्रभागातुन इच्छुक आहे. वाह !
एव्हढा कॅान्फिडन्स आणता तरी कुठुन? माझी शहर अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांना विनंती आहे कि आपण माजी नगरसेवक चांदेरे यांच्या भावनेचा विचार करावा व त्यांना बालेवाडी – औंध मधुन उमेदवारीवर द्यावी.
यावर चांदेरे काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. याच अनुषंगाने  पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि बाबुराव चांदेरे साहेबांच्या उपस्थिती मध्ये प्रभाग क्रमांक १२ औंध-बाणेर-बालेवाडी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक पार पडली.  यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधून माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी देखील आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे भावना शहराध्यक्ष  प्रशांतदादा जगताप यांना बोलून दाखवली.

Water wasted : ऐन उन्हाळ्यात करोडो लिटर पाणी जातेय वाया!  :  अमोल बालवडकर यांनी उघडकीस आणला प्रकार 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

ऐन उन्हाळ्यात करोडो लिटर पाणी जातेय वाया!

:  अमोल बालवडकर यांनी उघडकीस आणला प्रकार

पुणे : बाणेर आणि बालेवाडी परिसरात पाणी समस्या निर्माण झाली आहे. याकडे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी गंभीरपणे लक्ष वेधले आहे. पाषाण पंपिंग स्टेशन प्रत्यक्ष जाऊन पाणी टंचाई बाबत अमोल बालवडकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी करोडो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

https://youtube.com/shorts/1kESO8wMEaE

याबाबत अमोल बालवडकर म्हणाले, मी पाषाण पंपिंग स्टेशन येथील टाकी गेल्या ३ महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याची माहिती मिळाली, जवळपास २४ तास दररोज हे पाणी वाहत असुन सुमारे १ करोड लिटर पिण्याचे पाणी रामनदीला जाऊन मिळत आहे. यामुळेच बाणेर-बालेवाडी भागाला दैनंदिन सुमारे १ करोड लिटर पाणी पुरवठा कमी होत असल्याचे निदर्शनास आले. हि समस्या पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अधिकार्यांना माहिती असुन सुद्धा जाणीव पुर्वक का सोडवण्यात आली नाही..?

गेली ३ महिन्यांपासुन बाणेर-बालेवाडीचे हजारो नागरीक या पाणी समस्येमुळे त्रस्त आहेत. प्रशासन कोणत्याही प्रकारे स्वतःची जबाबदारी स्विकारत नसुन जाणीवपुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना जर हि समस्या दिसत आहे तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हि समस्या का दिसत नाही..? झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे खरच कठीण आहे.

बालवडकर पुढे म्हणाले, येत्या ४ दिवसात जर बाणेर-बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर माझ्या समस्त बाणेर-बालेवाडीतील नागरीकांना आवाहन आहे की आपण पुणे महानगरपालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी जबाबदारीने काम करत नसुन जाणीव पुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारची तक्रार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे फोन किंवा मेसेज द्वारे करावी हि विनंती.

सर्वप्रथम मी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन ना.मा.श्री.अजितदादा पवार तसेच स्थानिक आमदार प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील व पुणे शहराचे खासदार मा.श्री.गिरीषजी बापट साहेब यांच्याकडे या विषयाबाबत तक्रार करणार असुन या सर्वांनी बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न सोडविण्याकरीता लक्ष घालावे अशी विनंती करणार आहे.

Amol Balwadkar Vs Baburao Chandre : राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय  : अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप 

Categories
Breaking News Political social पुणे

राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय

: अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप

पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात गेली चार पाच वर्ष पाणीटंचाई नव्हती. मग आताच का? असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. शिवाय बालवडकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे कि हा प्रश्न राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, परिसरातील व शहरातील त्यांचे पदाधिकारी पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी मिळून केला आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता फोन करो आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारावा, असे आवाहन बालवडकर यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे.
बालवडकर म्हणाले महापालिकेत आता प्रशासक आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या प्रश्नांची जबाबदारी राज्य सरकारची आहे.  बाणेर बालवाडीत 2017 साली पाण्याची वितरण व्यवस्था नव्हती. प्रश्न गंभीर होता. मी नगरसेवक झाल्यानंतर नियोजन केले. समान पाणीपुरवठा योजने चे काम सुरु केले.  मात्र आता प्रशासनाने तोच पाणीपुरवठा विस्कळीत केला आहे. बालवडकर म्हणाले, पाणी प्रश्न मिटवणार भाजप कुठे आणि पाणी प्रश्न निर्माण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस कुठे? एवढा फरक आहे. पाण्यासाठी झगडणारा भाजप कुठे आणि नागरिकांची मजा पाहणारा राष्ट्रवादी कुठे?
बालवडकर पुढे म्हणाले, चांदणी चौक पाणी टाकी मधून 47mld बाणेर बालवाडीत पाषाण ला पाणीपुरवठा होत होता. गेल्या तीन महिन्यापासून या पाण्यात कपात करण्यात आली. 10 mld पेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे टँकर पाठवण्याची सोसायट्यांची मागणी आहे. असे नीच पातळीवरील राजकारण राष्ट्रवादी  करते.
बालवडकर म्हणाले पाणी प्रश्न निर्माण करण्यात  आला आहे. राजकीय सूडासाठी हा प्रश्न उभा केलाय. राष्ट्रवादीने हा प्रश्न निर्माण केलाय. बाबुराव चांदेरे, पदाधिकारी,मनपा अधिकारी असे सर्वानी मिळून हा प्रश्न निर्माण केलाय. महापालिका अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. याला सरकार जबाबदार आहे. बाबुराव चांदेरे यांनी याबाबत कधी निवेदन दिले नाही. चांदेरे चार वर्ष झोपले होते. आता निवडणुकीसाठी प्रयत्न करताहेत.

: फोन करो आंदोलन सुरु करा

बालवडकर पुढे म्हणाले, चांदेरे उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही जबाबदारी अजित दादांची देखील आहे. पवार देखील याचे समर्थन करताहेत का? चुकीच्या पद्धतीने काम सुरु आहे. राजकारण करणाऱ्या पक्षाला यश मिळणार नाही. तुम्ही कितीही काही जरा. पाणी हेच जीवन आहे. मात्र भाजपचे लोक नाराज होणार नाहीत. नागरिकांची तुम्ही मजा पाहत आहात. आम्ही तो प्रश्न सोडवू. अधिकाऱ्यावर कुणाचा दबाव आहे? पाणी कपात नसताना पाणी का कमी केले?
नागरिकांना आवाहन आता तुम्ही फोन करो आंदोलन सुरु करा. आयुक्त आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्याचे नंबर आम्ही देतोय. त्यावरून प्रशासनाला जाब विचारा. असे बालवडकर म्हणाले.

Mahalunge TP Scheme : प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार  : पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political social पुणे

प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार

: पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन

पुणे :  म्हाळुंगे येथे पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे  यांच्या उपस्थितीत ग्रामस्तांसोबत टीपी स्किम बाबत समस्या व सूचनां करिता बैठक संपन्न झाली. टीपी स्किम बऱ्यापैकी प्रगती पथावर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला या टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा आहे आणि टिपी स्किमच्या ध्येय-धोरणाबाबत नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये कुठलीही शंका नाहीये. निश्चितपणे काही शेतकरी असमाधानी आहेत पण त्यांच्या बाबतीतदेखील विचार केला जाईल असे मत, असा विश्वास आयुक्तांनी यावेळी नागरिकांना दिला.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिली टीपी स्किम २०१७ मध्ये म्हाळुंगे येथे साकारण्यास सुरुवात झाली. तेव्हा २०१७ साली पालकमंत्री गिरीशजी बापट साहेबGirish Bapat यांच्या उपस्थितीमध्ये पहिली मिटींग येथील ग्रामस्थांसोबत मी मिटकॉन कॅालेज बालेवाडी येथे आयोजित केली होती. त्याच्या नंतर टीपी स्किम बऱ्यापैकी प्रगती पथावर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला या टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा आहे आणि टिपी स्किमच्या ध्येय-धोरणाबाबत नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये कुठलीही शंका नाहीये. निश्चितपणे काही शेतकरी असमाधानी आहेत पण त्यांच्या बाबतीतदेखील विचार केला जाईल असे मत असा विश्वास सुद्धा आयुक्तांनी यावेळी नागरिकांना दिला. या टीपी स्किम मुळे निश्चितपणे म्हाळुंगे गावचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हाळुंगे गाव हे इतर गावांपेक्षा निश्चितपणे विकासामध्ये मागे राहिलेले आहे. पण टीपी स्किम मुळे निश्चितपणे हे गाव इतर गावांप्रमाणे विकासाची गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाही.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, पीएमआरडीए चे आयुक्त यांना जमीन मालक व शेतकऱ्यांच्यासोबत भेटून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची विनंती मी व माझे सहकारी गणेशजी कळमकर यांनी केली होती, तेव्हा त्यांनी आज ही वेळ दिली होती. यावेळी पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे, विवेक खरवडकर, नगरसेविका ज्योती  कळमकर व पीएमआरडीए चे इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी पीएमआरडीए च्या माध्यमातून सुमारे शंभर कोटी पेक्षा अधिक तरतूद या टिपी स्किमकरीता उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन आयुक्त साहेबांनी दिले. तसेच म्हाळुंगे गावांमधील महत्त्वाचे डीपी रस्ते प्राथमिकतेणे विकसित करण्यावरती लक्ष केंद्रित केले जाईल” असेही यावेळी दिवसे साहेब यांनी सांगितले. म्हाळुंगे गावामध्ये १२ मी, ३० मी, ३६ मी रस्ते विकसित करण्याला प्राधान्य दिले जाईल.

बालवडकर पुढे म्हणाले, यावेळी मी म्हाळुंगे येथील स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या त्यातील काही मुद्दे या बैठकी दरम्यान मी सर्वांसमोर मांडले ते मुद्दे खालील प्रमाणे :-
१)Property card चे वाटप केव्हा होणार..?
२)रस्ते डेव्हलपमेंट
३)प्लॉटला चिरा लावणे
४)प्रत्यक्ष जागेवर रस्ते आखणी व रस्ते विकसित करणे.
५)रस्ते संपूर्ण कधीपर्यंत विकसित होणार..?
६)ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बाबत समाधानी नाहीत त्याबाबत आपण काय करणार..?
७)जर तुम्ही प्रॉपर्टी कार्ड दिले तर शेतकरी बांधकाम नकाशा मंजूर करू शकतो का..?
८)बांधकाम नकाशा मंजूर करायला जर शेतकरी गेला तर त्याला हेलपाटे घालावे लागतील का..?
९) संपूर्ण टीपी स्किम मध्ये ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन, एम एस सी डी सी एल लाईन वॉटर लाईन पीएमआरडीए मार्फत विकसित होणार का..?
१०)नवीन आर्थिक वर्षात २०२२-२०२३ मध्ये पीएमआरडीए म्हाळुंगे
गावासाठी किती आर्थिक तरतूद करणार आहे..?
११)पाणीप्रश्न – पाण्याच्या नियोजनाबाबत पीएमआडीए ची
भूमिका काय आहे..?
१२)म्हाळुंगे गावामध्ये एक गार्डन एक मैदान लवकरात लवकर
तयार करा.
यावेळी बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने सर्व ग्रामस्थ बांधवांनी समाधान व्यक्त केले. तसेच म्हाळुंगे गावामध्ये विकासाच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सर्व ग्रामस्थांनी पीएमआरडीए ला दिले.

Video : 24*7 Water Project : Girish Bapat : समान पाणी पुरवठा योजना : अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी सोपवणार  : गिरीश बापट आणि शिष्टमंडळला मनपा आयुक्तांचे आश्वासन 

Categories
Breaking News PMC Political पुणे

समान पाणी पुरवठा योजना : अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी सोपवणार

: गिरीश बापट आणि शिष्टमंडळला मनपा आयुक्तांचे आश्वासन

पुणे : महापालिका हद्दीत पाणी प्रश्न भेडसावत आहे. याबाबत कालच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. यावेळी खासदार गिरीश बापट यांनी यावरून सभात्याग केला होता. समान पाणी पुरवठा योजनेमुळे शहराच्या वितरण व्यवस्थेत विस्कळीत पण आला आहे. त्यावर आज खासदार बापट आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळ ने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिले कि समान पाणी पुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी  अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी सोपवली जाणार आहे.

वितरण व्यवस्था आणि तांत्रिक बाबींमुळे शहराच्या विविध भागात निर्माण झालेली पाणीपुरवठ्याची समस्या दोन-चार दिवसांत मार्गी लागेल असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

शहरात निर्माण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज बापट यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माधुरी सहस्रबुद्धे, ज्योत्स्ना एकबोटे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, उज्ज्वल केसकर, स्वरदा बापट, सुनील माने उपस्थित होते.

बापट म्हणाले, आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या पाच विभागांसाठी तंत्रज्ञांचा समावेश असणारी समिती उद्या नियुक्त केली जाईल. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांवर जबाबदारी टाकण्यात येईल. पाणीपुरवठ्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात येईल.

बापट पुढे म्हणाले, तांत्रिक बाबींमुळे काही भागात कमी आणि कमी वेळा पाणी येते. याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. शहरात समान पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्व माजी नगरसेवकांना आपआपल्या भागात पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी योजनेचे काम सुरू झालेले नाही त्या ठिकाणी मी व्यक्तिश: पाठपुरावा करणार आहे. योजनेच्या प्रगतीचा अहवाल मागवला आहे.

Sus Mahalunge Water Supply : Amol Balwadkar : सूस म्हाळूंगे वासियांच्या पाणी पुरवठा प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सूस म्हाळूंगे वासियांच्या पाणी पुरवठा प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुणे : सूस आणि म्हाळुगे परिसरात शेकडो गृहनिर्माण संस्था आणि
निवासी संकुले आहेत. त्यापैकी कोणालाही पीएमसी किंवा पीएमआरडीएकडून अद्याप पाणीपुरवठा होत नाही. यासाठी या गृहनिर्माण संस्थांनी पीएमसी, पीएमआरडीएकडे संपर्क साधूनही, दोन्ही शासकीय संस्थांनी पाणी पुरवठ्यासारख्या गंभीर व निकडीच्या समस्येवर कोणताही तोडगा अद्याप काढलेला नाही. त्यामुळे अमोल बालवडकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी ही दोन गावे पीएमआरडीएच्या अखत्यारीत होती. जुलै २०२१ पासून सूस आणि म्हाळुगे (अन्य २१ गावांसह) आता पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेली आहेत. या निवासी इमारतींमधील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतेही नियोजन किंवा तरतूद केलेली नसतानाही पीएमआरडीए यांचेकडून या गावांमध्ये नवीन बांधकामांना सर्रासपणे परवानगी देण्यात येत आहे. या गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या परिसरातील पाणी पुरवठ्याच्या गंभीर व निकडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी  भाजपचे माजी नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यानुसार अमोल  बालवडकर यांनी पीएमसी आणि पीएमआरडीए या दोन्ही प्राधिकरणातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. परंतु दोन्ही सरकारी संस्थांनी संदिग्ध प्रतिसाद दिला असून सदरची समस्या सोडवण्यासाठी कोणीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे या गावांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ते खासगी टँकरवर अवलंबून आहेत.
या विषयावर बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की,
१. सूस आणि म्हाळुगे गावांना पाणीपुरवठा होत नसल्याच्या समस्येचे गांभीर्य ओळखण्यात पीएमआरडीए आणि पीएमसी दोन्ही अपयशी ठरले आहेत.
२. पीएमआरडीए आणि पीएमसीने या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी कोणताही कृती आराखडा राबविण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
३. सूस आणि म्हाळुगे येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कोणाची आहे ? याचा स्पष्टपणे खुलासा करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी दोघेही पुढे येत नाहीत.
४. पीएमआरडीएने या प्रदेशाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणताही आराखडा तयार न करता किंवा कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकास न करता निवासी इमारतींच्या नविन बांधकामाना परवानगी दिली जात आहे. जर पीएमआरडीए पाणीपुरवठ्यासाठी तरतूद करू शकत नसेल तर पीएमआरडीएने या गावांतील नवीन बांधकामांना परवानग्या देणे बंद करावे.
५. या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी यांच्यात कोणताही संयुक्त विभाग कार्यरत नाही. यावेळी, श्री अमोल रतन बालवडकर असेही म्हणाले की – सूस आणि म्हाळुगे येथील रहिवाशांच्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व ती समस्या सोडवण्याची जबाबदारी कोणत्या प्राधिकरणाची आहे हे निश्चित करण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी जनहित याचिका दाखल केलेली आहे.
अॅड. सत्या मुळे यांनी अशी माहिती दिली की, नव्याने बांधलेल्या इमारतींना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांची असेल, असे पीएमआरडीए आणि पीएमसी यांचेकडून सांगण्यात येते व त्याआधारे बिल्डरांकडून शपथपत्र किंवा हमीपत्र घेण्याची पद्धत पीएमआरडीए आणि
पीएमसीने लागू केलेली आहे. अशा प्रकारचे हमीपत्र (पाण्याचे हमीपत्र) दाखल केल्याशिवाय पीएमआरडीए नवीन बांधकामांना प्रारंभ प्रमाणपत्र देत नाही. हे एक बेकायदेशीर कृत्य आहे, कारण भारतीय राज्यघटनेनुसार पाणी पुरवठा करणे हे पीएमआरडीए आणि पीएमसी चे मूलभूत कर्तव्य आहे आणि अये मूलभूत कर्तवय ते बिल्डरला देऊ शकत नाहीत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डर निघून जातो आणि रहिवाशांना स्वत:चा त्रास सहन करावा लागतो आणि ते टँकर माफियांच्या ताब्यात येतात. पाण्याचे हमीपत्र घेण्याच्या या पद्धतीला देखील प्रस्तुत जनहित याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. सूस आणि म्हाळुगे गावांतील रहिवाशांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पीएमसी किंवा पीएमआरडीएने तातडीने पुढे यावे. पाणी हे जीवनावश्यक मूलभूत गरजांपैकी एक आहे आणि भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २१ अंतर्गत संरक्षित प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ अंतर्गत पाणी पुरवठा करणे हे पीएमसी किंवा पीएमआरडीए यांचे मूलभूत कर्तव्य आहे. या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी बालवडकर यांनी याचिका दाखल केली आहे. 

International Women’s Day : Amol Balwadkar : जागतिक महिला दिन : बाणेर बालेवाडीकरांसाठी हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमाचे आयोजन  : अमोल बालवडकर व आशाताई रतन बालवडकर यांचा उपक्रम 

Categories
cultural Political social पुणे

जागतिक महिला दिन : बाणेर बालेवाडीकरांसाठी हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमाचे आयोजन

: अमोल बालवडकर व आशाताई रतन बालवडकर यांचा उपक्रम

पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन खास औंध बाणेर बालेवाडीकरांसाठी हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अमोल बालवडकर व आशाताई रतन बालवडकर यांच्या वतीने औंध येथे करण्यात आले होते. परिसरातील नागरीकांनी देखिल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात या हॅप्पी स्ट्रिट कार्यक्रमामध्ये सहभागी होत मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमात मराठी सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि श्रुती मराठे यांनी उपस्थित नागरिकांसोबत धमाल करत कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला.
यावेळी सहभागी नागरीकांना लकी ड्रॅाद्वारे ५ सायकल, ५ टॅब्स व १० पैठणी अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

या हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमात डान्स, झुंबा, योगा, करमणूक, सर्व प्रकारचे खेळ, केक कटिंग, टॅटू, लाईव्ह म्युझिक, लाठी काठी, ड्रमसेट म्युझिक, स्केटिंग, मर्दानी खेळ, बालजत्रा, फोटो बूथ, बॉल डान्स, मलखांब, चार्लीन, जादूगार, जलगर, जोकर असे विविध प्रकारचे खेळ व करमणुकीचे उपक्रम राबविण्यात आले. आपले ताणतणाव विसरून सर्वांनी मनसोक्तपणे या कार्यक्रमाचा आनंद घेतला व आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी आयोजक नगरसेवक अमोल बालवडकर व आशाताई रतन बालवडकर यांच्या समवेत महापौर दत्तात्रयजी गायकवाड, नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, शिवाजीनगर मतदार संघ भाजपा अध्यक्ष रविजी साळेगावकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, शहर उपाध्यक्ष गणेशजी कळमकर, ओ.बी.सी.सेल महा.प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हादजी सायकर, प्रभाग अध्यक्षा उमाताई गाडगिळ, मा.नगरसेविका संगिताताई गायकवाड, बाळासाहेब रानवडे, युवा नेते लहुशेठ बालवडकर, युवा नेते नाना वाळके, आरपीआय पुणे शहर उपाध्यक्ष रमेशजी ठोसर, निलेशजी जुनवणे, नितिनजी रणवरे, राजेश भोसले, निलेश कदम, औंध विश्वस्त मंडळाचे सल्लागार गणेशजी कलापुरे, हेरंबजी कलापुरे, विलासजी रानवडे, सागरजी गायकवाड, अमितजी वायदंडे, विशालजी शिंदे, विकी सिद्धु, रिना सोमैया, अस्मिता करंदिकर, वैदेही बापट, मिरा ओक, स्मरणिका जुनेकर, मिना पारगावकर, उज्वला साबळे व सर्व सक्रिय भाजपा महिला पदाधिकारी तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

Balewadi Ground : Amol Balwadkar : बालेवाडीत 7 एकरवर उभारणार खुले मैदान  : नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कामाला केली सुरुवात 

Categories
Breaking News PMC Political Sport पुणे

बालेवाडीत 7 एकरवर उभारणार खुले मैदान

: नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कामाला केली सुरुवात

पुणे : बालेवाडी हाय स्ट्रिट येथील स.नं.१७ मध्ये मुलांसाठी व नागरीकांकरीता लवकरच बाणेर-बालेवाडी परिसरातील सर्वात मोठे खुले मैदान उपलब्ध होणार आहे. 7 एकर जागेवर हे भव्य मैदान उभारले जाईल. मैदान विकसित करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.

: महापालिका बजेट मध्ये करून घेणार तरतूद

     याबाबत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, बालेवाडी हायस्ट्रिट येथील स.नं.१७ मधील  आरक्षित जागेवर खेळाडु, मुले व नागरीकांकरीता खुले मैदान विकसित करण्याच्या कामाला प्रत्यक्षात आम्ही सुरुवात केली आहे. माझ्याच मार्गदर्शनाखाली सदर जागा मोकळी करुन सपाट करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे मैदान 7 एकर जागेवर उभारले जाणार आहे. त्यासाठीची 90% जमीन महापालिकेच्या ताब्यात आली आहे. बालवडकर यांनी सांगितले कि जमीन ताब्यात घेण्यासाठी जागा मालकासोबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. यासाठी आता महापालिका बजेट मध्ये योग्य ती तरतूद करून घेतली जाणार आहे. जेणेकरून या कामास गती मिळेल.
प्रामाणिक काम, विकासावर ठाम..!
हे मैदान 7 एकर जागेवर उभारले जाणार आहे. त्यासाठीची 90% जमीन महापालिकेच्या ताब्यात आली आहे. जमीन ताब्यात घेण्यासाठी जागा मालकासोबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. यासाठी आता महापालिका बजेट मध्ये योग्य ती तरतूद करून घेतली जाणार आहे.
अमोल बालवडकर, नगरसेवक, पुणे मनपा