Buddhism | अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीतून बौद्ध धम्म जगभर पोचेल | डॉ. सिद्धार्थ धेंडे

Categories
Breaking News cultural Political social पुणे

अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीतून बौद्ध धम्म जगभर पोचेल | डॉ. सिद्धार्थ धेंडे

| येरवडा पोस्ट येथील सम्राट अशोक चौकात अशोकस्तंभाचे अनावरण

– सुशोभीकरणासाठी डॉ. धेंडे यांचा पुढाकार

14 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत येरवडा पोस्ट येथील सम्राट अशोक चौकात अशोकस्तंभाचे अनावरण करण्यात येत आहे. पुण्यात जी-20 परिषदेला देखील आजपासूनच सुरूवात होणार आहे. त्यामुळे सम्राट अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीतून जगभरातील प्रतिनिधींना बौद्ध धम्माचा विचार समजेल, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

येरवडा पोस्ट येथील सम्राट अशोक चौकात अशोकस्तंभाचे अनावरण बौद्ध भंते नागघोष आणि सर्व भंतेगण संघाच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. सिद्धार्थ धेंडे बोलत होते.

या वेळी भाजपाचे पुणे शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक, आरपीआयचे राज्य कार्याध्यक्ष परशुराम वाडेकर, सरचिटणीस बाळासाहेब जानराव, उपाध्यक्ष अतित गांगुर्डे, अल्पसंख्यांक अध्यक्ष आयुब शेख, राज्य सचिव अशोक कांबळे, पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, राज्य संघटन सचिव ऍड. मंदार जोशी, भदत्न आनंद मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वावरे, वैभव कडलक, जेल ट्रेनिंगचे प्राचार्य ईंदुलकर, दिनेश गंगावणे, बापु सरवदे, विजय कांबळे यांच्यासह पुरोगामी चळवळीतील मान्यवर आणि पुणे महापालिका प्रभाग 2 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रास्ताविक प्रतीचे वाचन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

डॉ. धेंडे म्हणाले की, आरपीआयचे ज्येष्ठ नेते व पुणे महापालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते उद्धव वावरे यांनी येरवडा पोस्ट येथील चौकाला सम्राट अशोक चौक असे नामकरण करण्यासाठी ठराव केला. तो मंजूर करून घेतला. त्याला साजेशी प्रतिकृती तयार करण्यासाठी मी पुढाकार घेतला. त्यानुसार अशोकस्तंभाचे अनावरण करण्यात आले. सम्राट अशोक चौक परिसराला देखील ऐतिहासिक वारसा आहे. या चौकाच्या पाठीमागे असणाऱ्या येरवडा जेलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला पुणे करार या गाजलेला आहे. सध्या पुण्यात जी 20 परिषदेसाठी जगभरातील विद्वान दाखल होणार आहेत. बौद्ध धम्माचा वारसा या जगभरातील विचारवंतांना समजावा, फुले-शाहु-आंबेडकर विचारांची चळवळ जगभर पोचावी, यासाठी या अशोकस्तंभाचे अनावरण करण्यात आले असल्याचे धेंडे म्हणाले.

भंते नागघोष म्हणाले की, सम्राट अशोक यांनी बुद्धांनी मैत्रीच्या भावनेतून जग जिंकले आहे. त्यांनी समता, बंधुता व न्याय ही मुल्य अंगीकारले.

भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक म्हणाले की, सम्राट अशोक हे चक्रवर्ती होते. कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी युद्ध नको बुद्ध स्विकारला. जगभर त्याचा प्रचार प्रसार केला.