Citizen’s of Baner-Balwadi appreciates the Pune Municipal Corporation water supply

Categories
Breaking News PMC social पुणे

Citizen’s of Baner-Balwadi  appreciates the Pune Municipal Corporation water supply

 

Baner-Balewadi Water Issue – (The Karbhari News Service) – There was a huge water problem in Baner, Balewadi and Warje areas of Pune Municipal Corporation (PMC). Due to the work done under the scheme (24*7 equivalent Water Project) the citizens are now getting enough water. Moreover, the complaints of the citizens are also addressed promptly and the problem is resolved. So the citizens are appreciating the municipal water supply department and the L and T company. (PMC Water Supply Department)

The water issue in Baner, Balewadi and Warje areas had reached the High Court. Citizens were shocked as citizens were not getting equal water. Politicians were also following up on this.

Meanwhile, the Municipal Water Supply Department decided to implement the same water supply scheme through L&T in this area in a good manner. Accordingly, the Municipal Corporation provided water to the citizens by laying pipelines at the required places. Also employees of the concerned company were made available to resolve the complaints of the citizens. These employees are supplying according to the demand of citizens. Therefore, the water problem in the area has been solved. The municipal administration and L&T company are being appreciated by the citizens and society in the area. So the municipality is also satisfied now.

Our complaint is promptly attended to by the Municipal Administration and L&T Company. It has also helped to solve the water problem through the same water supply scheme. Many thanks to the Water Supply Department, Administration and L&T Company for taking the water problem of the citizens seriously and starting the water supply after filing a complaint through the Water Supply Department and L&T Company.

Kunal Aspire Co Operative Housing Society Ltd.

Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme | नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme |नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात

| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाणेर-बालेवाडी २४x७ पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

| पुण्याच्या सुनियोजित आणि गतीमान विकासावर भर देणार-उपमुख्यमंत्री

Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme|  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि २४x७ समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बाणेर-बालेवाडी येथील मुख्य दाब नलिकांचे व पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे शहराच्या सुनियोजित आणि गतीमान विकासावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री.फडणवीस यांनी दिली. (Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme)

बालेवाडी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (दूरदृष्यप्रणालीद्वारे), आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते. (Devendra Fadnavis in pune)

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुणे केवळ ऐतिहासिक शहर नसून भविष्यातील शहर आहे. जगाच्या पाठीवर २१ व्या शतकातील ‘नॉलेज सिटी’ म्हणून नोंद असलेले पुणे शहर आहे, ही ज्ञाननगरी आहे. पुणे शहर विज्ञान आणि नाविन्यतेची राजधानी आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचा ‘मॅन्युफॅक्चरिंग हब देखील आहे. देशातील २० टक्के उत्पादन महाराष्ट्र करतो, त्यात पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. इथली वाढती लोकसंख्या लक्षात घेता राहण्यालायक वातावरण निर्माण करणे, शिक्षण, आरोग्य, चांगल्या पर्यावरणाची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.

भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पाण्याचे नियोजन
पुण्यात पाणी मुबलक असताना वितरण प्रणालीतील दोषामुळे २५-३० टक्के पुणे तहानलेले असल्याचा विरोधाभास दिसत होता. म्हणून नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात करण्यात येत आहे. सुस-म्हाळुंगे हा वाढता भाग आहे. भविष्यात हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे. इथे सुनियोजित विकास होत असतांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे महत्वाचे आहे. म्हणून भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

शहरात उत्तम वाहतूक सुविधांवर भर

कोरेगाव रेल्वे उड्डाणपूल आणि सनसिटी ते कर्वेनगर या पूलांमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. वाहतूक नियोजनासाठी अशा सुविधा गरजेच्या आहेत. ५ हजार विद्यार्थ्यांना मुठा नदीवरील पुलाचा फायदा होणार आहे. पुण्याचे रिंगरोडचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पुण्यातील रोजगार आणि उद्योगाची गुरुकिल्ली आहे. पुण्याची मेट्रो वेगाने विकसीत होत आहे, पुढच्या टप्प्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल. उपनगरे मुख्य शहराशी जोडल्यावर पुण्याची वाहतूक सुरळीत होण्यासोबत मेट्रो लाभदायी ठरेल. चांदणी चौकातही महमार्गावरील कामामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. देशातील सर्वाधिक इलेक्ट्रीक बस वाहतूक पुणे शहरात आहे. भविष्यात एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे सामान्य माणसाला चांगली सुविधा देण्याचे काम करण्यात येईल.

पर्यावरण आणि गतीमान विकासात समन्वय साधणार

पुणे शहराला विकसित करण्यासाठी १५ स्मार्ट सिटीचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग पुण्यात सुरू करण्यात येत आहे. पाण्याच्या पुनर्वापरही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापरता येईल. मुळा-मुळा शुद्धीकरणासाठी १ हजार ९०० कोटींची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नदी निर्मळ होण्यास मदत होईल. पर्यावरण आणि गतीमान विकासात समन्वय साधत पुणेकरांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, बाणेर-बालेवाडी पाणी पुरवठा योजना हा शहरासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. शहरात अधिक वापर होत असतांना शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नसल्याने २४x७ समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ८५ टाक्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी ६० टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. योजना पूर्ण झाल्यावर वाया जाणारे ४ टीएमसी पाणी उपयोगात आणता येणार आहे. त्यासोबत २ हजार कोटींच्या जायका प्रकल्पाद्वारे १८ सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प तयार करून प्रक्रीया केलेले पाणी इतर कामांसाठी उपयोगात आणता येणार आहे. शिवाय उद्योगासाठी हे पाणी वापरल्याने तेथे उपयोगात आणले जाणारे शुद्ध पाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. असे महत्वाचे प्रकल्प मुख्यमंत्री असतांना शहरासाठी दिल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना धन्यवाद दिले.

विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, उन्हाळ्यात महिलांना पाण्याची टंचाई जाणवते. पुण्यात इतर शहरातील नागरिकही पुण्यात येतात. पुण्यात चांगले पर्यावरण आणि पाणी आहे. शाश्वत विकासाच्या उद्दीष्टाला समोर ठेवून शहरात कामे सुरू आहेत. साधू वासवानी पूलाच्या कामामुळे वाहतूकीची समस्या सुटणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रकल्पांना चालना मिळत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पुण्यातल्या पर्यावरणविषयक समस्यांबाबत सामाजिक संघटनांसोबत बैठक घेण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, पुण्याची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नागरिकांना महानगरपालिकेच्यावतीने सोई-सुविधा पुरविण्यात येत आहेत. भूमीपूजन करण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. ‘मेरा लाईफ मेरा स्वच्छ शहर ‘ हे राष्ट्रीय अभियान मे १५ ते ५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरामध्ये नागरिकांच्या सहभागातून विकेंद्रित पद्धतीने थ्री आर (रिङ्युस-रियूज- रिसायकल) केंद्र उभारली जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धेतून संकलित करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बॉटल्सपासून बनविण्यात आलेल्या टी-शर्टचे अनावरणही करण्यात आले.

बाणेर-बालेवाडी पाणी पुरवठा योजना

समान पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत बाणेर-पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या तीन टाक्या उभारण्यात आल्या आहेत. वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बालेवाडीपर्यंत ५ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या पाणी पुरवठा योजनेमुळे बाणेर बालेवाडी भागतील नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण होणार आहे.

सुस व म्हाळुंगे गावातील पाणी पुरवठा योजना

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे गावासाठी समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे व पाण्याच्या टाक्या बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. पुढील ३० वर्षाची लोकसंख्या लक्षात घेऊन सुस गावात २ व म्हाळुंगे गावात ४ टाक्या बांधण्याचे आणि ६५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे नियोजन आहे. या कामांसाठी सुमारे ७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक ते बालेवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

मुठा नदीवरील पूल बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन

मुठा नदीवर सनसीटी सिंहगड रोड ते दुधाने लॉन कर्वेनगर या सहापदरी पूल बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा पूल ३४५ मीटर लांब आणि ३० मीटर रुंदीचा असेल. या पूलामुळे सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगर, डेक्कन, कोथरूड भागात जाण्याची सोय होणार असून या भागातील वाहतूककोंडी कमी होण्यासोबत इतर रस्त्यावरील वाहतूकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.

कोरेगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन

कोरेगाव येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल पाडून नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पूलाच्या कामासाठी सुमारे ८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पूलाची लांबी ६४० मीटर असून बंडगार्डनकडून कॅम्प भागाकडे जाण्याकरिता चार लेनचा मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे कोरेगाव पार्क व येरवडा भागातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

News Title | 24×7 uniform water supply scheme on the lines of Nagpur started for the first time in Baner-Balewadi area | Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme inaugurated by Deputy Chief Minister Devendra Fadnavis

BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | भाजपचे पुण्यातही  घर चलो संपर्क अभियान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | भाजपचे पुण्यातही  घर चलो संपर्क अभियान

| १५ मे ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 

BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Deputy Chief minister Devendra Fadnvis)  सोमवारी (१५ मे) पुणे दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, घर चलो संपर्क अभियानाचा (Ghar Ghar Chalo sampark abhiyan) शुभारंभ आणि शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. (BJPs Ghar Ghar chalo sampark abhiyan)

शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आणि घर चलो संपर्क अभियान शुभारंभ देवेंद्र जी यांच्या शुभहस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णा भाऊ साठे हॉल, येरवडा येथे दुपारी साडेचार करण्यात येणार आहे.

| विविध विकासकामाचे लोकार्पण 

बाणेर बालेवाडी येथे 24×7 पाणी पुरवठा योजना फेज 1 चे लोकार्पण तसेच सूस महाळूंगे 70 कोटींच्या योजनेचे भूमिपूजन तसेच गंगाजल पूजन सायंकाळी 6 वाजता, बालेवाडी हाय स्ट्रीट मैदान, कमिन्स कंपनी समोर केले जाणार आहे.

कर्वेनगर सनसिटी येथे 37 कोटी 4 लाख खर्चाचे मुठा नदीवर पूल चे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमांना पक्षाचे शहरातील सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

—–

BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | BJP’s Ghar Chalo Sampark campaign in Pune too| Launched by Deputy Chief Minister Devendra Fadnavis on May 15

Water Issue | बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता | अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता

|  अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा

| बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, म्हाळुंगे ची २४x७ समान पाणी पुरवठा योजना आढावा बैठक संपन्न
२४x७ अंतर्गत असणाऱ्या या प्रकल्पाचे ट्रान्समिशन लाईन्स चे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होऊन, वारजे येथील पंपांचे काम मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होऊन सर्वांना २४ तास ७ दिवस पाणी पुरवठा मिळेल. असे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आश्वस्त केले.
२४×७ समान पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील आणि पुणे मनपाचे आयुक्त   विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सफा बँक्वेट हॉल, लक्ष्मण नगर, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी जवळ, बालेवाडी हाय स्ट्रीट-२ येथे संपन्न झालेल्या या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर साहेबांनी सदरील २४x७ पाणी पुरवठा योजनेचा आढावा व बाणेर-बालेवाडी येथे विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यावरील उपाय योजना बाबत सादरीकरण केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
२४ x ७ समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांबाबत वारंवार आढावा घेत असुन पुढील दोन महिन्यांमध्ये हे काम पुर्ण करण्यात येईल. तसेच तो पर्यंत ज्या सोसायट्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यांना माझ्या स्वःखर्चातुन टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठीची उपाय योजना करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरीकांना सागितले.
 यावेळी २४ x ७ हा भाजपाचा पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सुरुवातीपासुनच हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मधल्या कोरोना काळामुळे या कामास विलंब झाला असुन आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. तसेच सुस म्हाळुंगे येथेल नवीन पाण्याच्या ट्रान्समिशनचे लाईन व टाकीच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसात होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल. असे मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, कोथरुड वि. भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर,  प्रकाशतात्या बालवडकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, सचिन दळवी, उमाताई गाडगिळ, मा.सरपंच नारायण चांदेरे, मा.सरपंच काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे, अस्मिता करंदिकर, सुभाष भोळ, मंदार राराविकर, रोहित पाटील, मीना पारगावकर तसेच पुणे मनपा पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, परिसरातील सोसायटींचे सभासद  यावेळी उपस्थित होते.
—-
२४ x ७ हा भाजपाचा पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सुरुवातीपासुनच हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मधल्या कोरोना काळामुळे या कामास विलंब झाला असुन आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. तसेच सुस म्हाळुंगे येथेल नवीन पाण्याच्या ट्रान्समिशनचे लाईन व टाकीच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसात होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल.
– अमोल बालवडकर 

Baner-Balewadi Water issue | अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश 

Categories
Breaking News PMC Political पुणे

अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश

पुणे | बाणेर-बालेवाडी (Baner-Balewadi) भागात पाण्याची समस्या (Water issue) मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या भागात  २४x७ समान पाणी पुरवठा योजनेची कामे प्रलंबित आहेत. यावरून महापालिकेच्या कारभाराची तक्रार माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Ex corporator Amol Balwadkar) यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian minister Chandrakat patil) यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत पालमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. (PMC pune)
अमोल बालवडकर यांच्या पत्रानुसार  बाणेर-बालेवाडी- -पाषाण भागामध्ये २
७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील ८ पैकी ६ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्या देखील सुरु करण्यात येतील. परंतु या टाक्यांना ट्रान्समिशन लाईन मधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या लाईनचे काम आपण केलेल्या सूचनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे. वारजे ते बाणेर-बालेवाडी पर्यंतच्या भागामध्ये या ट्रान्स्मिशन लाईनचे काम अनेक ठिका अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. तसेच या टाक्यांच्या अंतिम टप्प्यामधील काही कामे देखील प्रलंबित आहेत. या कामांबाबत आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई केल्यास लवकरच या २४ x ७ समान पाणी पुरव योजनेची सुरुवात बाणेर-बालेवाडी भागामध्ये होईल. असे बालवडकर यांनी पालकमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटले होते.
 बालेवाडी व बाणेर येथील टाक्यांना पाणी पुरवठा करण्याकरिता जोडण्यात येणाऱ्या पाईप लाईनच्या कामामध्ये काही जागा मालकांच्या परवानग्या प्रलंबित आहेत. परवानग्या मिळविण्याकरिता पुणे म.न.पा.च्या अधिकार्यांना कृपया आपण योग्य त्या सूचना करून तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे. या सर्व प्रलंबित कामांमुळे २४ x ७ समान पाणी पुरवठा योजना या प्रकल्पास विलंब होत आहे. बाणेर-बालेवाडीचा गंभीर पाणी प्रश्न आपल्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. तरी पुढील काळात अशी पाणी टंचाई भासू नये या करिता हा प्रकल्प या भागामध्ये लवकरात लवकर सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. जर हि सर्व कामे लवकर पूर्ण झाली तर येत्या उन्हाळ्याच्या सुरवातीला एप्रिल – मे पर्यंत या प्रकल्पाचे उद्घाटन करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल.
तरी सदर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याकरिता आपण संबंधित खात्यांच्या अधिकार्यांना तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे. पालकमंत्र्यांनी बालवडकर यांच्या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्तांना आदेश देत प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सांगितले आहे.
| ही आहेत प्रलंबित कामे 
१. डुक्कर खिंड वारजे – NHAI च्या उर्वरित परवानगी करिता २५० मी. चे काम प्रलंबित आहे.
२. वारजे येथे दिलीप बराजे यांच्या परवानगी अभावी ३६ मी.ची लाईन प्रलंबित.
३. चांदणी चौक – श्री.अजमेर यांच्या जागेमधून जाणार्या ६० मी च्या लींचे काम प्रलंबित.
४. HEMRL येथील रामनदी वरील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे पुढे ट्रान्स्मिशन लाईन चे काम अपूर्ण.
५. पाषाण तलाव नजीकच्या शिव मंदिर येथील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे ४० मी लाईनचे काम प्रलंबित.
६. सुस खिंड ते कुमार पेपीलोन सोसायटी पर्यंतचे सुमारे ८०० मी चे काम पाईप उपलब्ध नसल्याने प्रलंबित
७. सुतारवाडी गावठाण येथे सुमारे १५० मी चे काम अरुंद रस्त्यामुळे प्रलंबित.
८. सुस खिंड पूल ते किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) पर्यंत एकूण १२७५ मी. लांबी पैकी ८७४ मी. लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.
९. किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) ते बालेवाडी डेपो पर्यंतच्या एकूण २१५० मी. पैकी १२३० मी लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.

Water problem of Baner Balewadi | बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत महापालिका अधिकारी निष्क्रिय | अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे  ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत महापालिका अधिकारी निष्क्रिय | भाजपा पदाधिकाऱ्यांचे  ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील पाणी समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून यावर प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Ex corporator Amol Balwadkar) यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, शिवम बालवडकर, अनिल बापू ससार यांनी नागरिकांसोबत ठिय्या आंदोलन (Agitation) केले. यावेळी या तिघांनी पाण्याचा वॉल फिरवून बाणेर बालेवाडी कडे जाणारे पाणी सोडले. पालिका अधिकारी आंदोलन स्थळी आले असता चर्चेत वास्तविक मागील काही काळापासून पाणी सोडण्याचे तास कमी करण्यात आले आहे हे निदर्शनास आले. लोकसंख्या वाढण्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले पण लोकसंख्या वाढल्याने पाण्याचे तास वाढण्या पेक्षा कमीच झाले. (water problem of Baner Balewadi)

या आंदोलना बद्दल बोलताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, बाणेर बालेवाडी परिसरात अनियोजित पाणीपुरवठा सुरू आहे. वारंवार अधिकाऱ्यांना सांगून देखील काहीच कारवाई होत नाही. अधिकारी नुसतीच हो, पाहतो, करतो, टाकीत पाणी नाही अशी उत्तरे देत आहेत. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर जोपर्यंत पाणी सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तसे आंदोलन सुरू होते, परंतु पालिका अधिकारी यांनी येऊन नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करू असे सांगितले. (Pune Municipal corporation)

भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, जाणुन बुजून केवळ नागरिकांना त्रास व्हावा या यातूनही कृत्रिम प्राणी टंचाई निर्माण केली जात आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, महाळुंगे या सर्वच परिसरात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असून ही समस्या सोडविणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हि कुत्रिम पाणी टंचाई थांबवुन लोकांना मुबलक पाणी देउन हा प्रश्न संपविला पाहिजे. (PMC Pune)

या आंदोलनात प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, त्याचबरोबर निष्क्रिय अधिकाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा व नंदीबैल आणून या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला.

याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शशिकांत बालवडकर, सचिन मानवतकर, शिवम बालवडकर, अनिल बापू ससार आदी उपस्थित होते.

यावेळी चांदणी चौक येथील पाण्याचे टाकीवर महापालिका अधिकारी प्रसन्ना जोशी, योगिता भांबरे, श्रीधर कामत यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु या चर्चेच्या वेळी असे निदर्शनास आले की पालिकेच्या अधिकाऱ्यांना बाणेर बालेवाडी परिसरातील पाणी प्रश्नाची जाणीवच नाही. प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीच उत्तरे व्यवस्थित देता आली नाही. पाण्याची टाकी, पाण्याचे वॉल, पंप, पाणी किती सोडायला पाहिजे याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ जाणवला. एवढा गंभीर असणारा पाणी प्रश्न का उभा राहतो वारंवार लोक का समस्या मांडतात याची गंभीरता ह्या अधिकाऱ्यांना नसल्याने त्यांनी त्या मागचे अडचण निवारण करण्यासाठी कोणते प्रयत्न केलेले दिसून येत नाही. तरी देखील बऱ्याच वेळानंतर त्यांनी आंदोलन कर्त्यांच्या समस्या जाणून उद्यापासून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करून काय समस्या आहे याबाबत सोडवणूक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. जवळपास चार ते पाच तास हे आंदोलन सुरू होते. (water issue in baner balewadi)

Baburao Chandere : बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे सुस-महाळुंगे चा  नियोजनबद्ध विकास करणार  : नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे आश्वासन 

Categories
PMC Political पुणे

बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे सुस-महाळुंगे चा  नियोजनबद्ध विकास करणार

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे आश्वासन

पुणे : पीएमआरडीए’वर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ रहिवाशी संघ आणि सूस ग्रामस्थ यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल बाबुराव चांदेरे यांनी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. या आपुलकीच्या सत्कारामुळे अधिकाधिक काम करण्यासाठी मला नेहमीच प्रेरणा मिळत राहील. अशी ग्वाही देखील माजी  स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दिली. यावेळी चांदेरे म्हणाले, सूस-म्हाळुंगे या गावांचा समावेश जरी महापालिकेत झाला असला तरी बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे या भागाचाही नियोजनबद्धपणे विकास करण्यात येईल.

चांदेरे पुढे  म्हणाले, वास्तविक गेल्या १५-२० वर्षांपासून या भागातील नागरिकांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याच जिव्हाळ्यातून आणि या मंडळींच्या विश्वासातून त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळतेय हे एक प्रकारे माझे भाग्यच आहे. आजवर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे. आपलं हक्काचं घर असावं म्हणून या भागात अनेकजणांनी आपापल्या कुवतीप्रमाणे थोड्या-थोड्या जागा घेऊन घर बांधले आहे. ते भलेही आज अनधिकृत असले तरी यामध्ये या नागरीकांची काहीही चूक नाही. त्यामुळे तुमच्या बांधकामाची एकही वीट हलनार नाही, यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील. काही नागरिकांच्या राहत्या घरावर रस्त्याचे आरक्षण पडले आहे. घर जाऊन तेथील रहिवाशी रस्त्यावर येणार असतील तर मी तेही होऊ देणार नाही. या घरांवर पडलेले आरक्षण पर्यायी जागेवर हलविण्याचा माझा प्रयत्न आहे. सूस-म्हाळुंगे या गावांचा समावेश जरी महापालिकेत झाला असला तरी बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे या भागाचाही नियोजनबद्धपणे विकास करण्यात येईल. त्यासाठी या भागातील नागरिक हे माझ्यासोबत आहेत याचा मला नेहमीच अभिमान वाटतो असे मत चांदेरे यांनी व्यक्त केले.

चांदेरे  म्हणाले,  पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना महापालिकाने जो निधी मंजूर केला आहे त्या मधूनच सूस-म्हाळुंगे गावांना पिण्याच्या पाण्याच्या करिता निधी उपलब्ध करून या गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. या भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी सिंटेक्स टाक्या बांधण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करुन आणले आणि या कामाचा शुभारंभ केला. तसेच टँकरने तातडीचा पाणीपुरवठा करण्यासाठीही ४० लाख रुपये निधी मंजूर करुन आणला असून हे काम सुरु झाले आहे. येथील नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे काम करता आले. भविष्यातही या भागात अधिकाधिक नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत राहण्याचा शब्द बाबुराव चांदेरे यांनी यावेळी दिला. यावेळी स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी सूस मधील ‘हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या विकास सोसायटी’मधील बिनविरोध निवडून आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा तसेच बिनविरोध निवडीसाठी मदत करणाऱ्या सर्व सभासद बांधवांचा सत्कार बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आला.