Pune Municipal Corporation Latest News | औद्योगिक दराच्या पाणी बिलाबाबत पुणे महापालिकेला दिलासा नाहीच! 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Municipal Corporation Latest News | औद्योगिक दराच्या पाणी बिलाबाबत पुणे महापालिकेला दिलासा नाहीच!

| थकबाकी अदा करण्याचे कालवा समितीच्या बैठकीत पालिकेला आदेश 

 
 
पाटबंधारे विभागाने (Department of Water Resources) डोमेस्टिक आणि वाणिज्यिक दराऐवजी  औद्योगिक दराने पुणे महानगरपालिकेस बिले सादर केलेले आहेत. थकबाकी सहित 736 कोटी देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे केली आहे. महापालिका मात्र आम्ही फक्त पिण्यासाठी पाणी देत असून औद्योगिक बिल आकारण्याचे कारण नाही, असा दावा करत आहे. मात्र या बिलांबाबत महापालिकेला कुठलाही दिलासा मिळाला नाही. सगळी थकबाकी भरण्याचे कालवा समितीच्या बैठकीत महापालिकेला देण्यात आले आहेत. दरम्यान याबाबत आता महापालिका आयुक्तांनी मंगळवारी पाणीपुरवठा विभागाची बैठक बोलावली आहे. 
पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) पेयजल योजनाद्वारे (Water Treatment Plant) होणारा पाणीपुरवठा हा प्रतीमाणसी करण्यात येत असून औद्योगिक घटकामधील प्रक्रिया उद्योग व कच्चा माल यासाठी होत नाही. म्हणजेच महापालिका फक्त पिण्यासाठी (Domestic use) पाणी देते. असे असतानाही पाटबंधारे विभागाने (Department of Water Resources) डोमेस्टिक आणि वाणिज्यिक दराऐवजी  औद्योगिक दराने पुणे महानगरपालिकेस बिले सादर केलेले आहेत. थकबाकी सहित 736 कोटी देण्याची मागणी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे केली आहे. औद्योगिक दराने बिलाबाबतचा मुद्दा निकाली काढण्यात आला होता. शिवाय औद्योगिक दराने बिल आकारले जाणार नाही. असे आश्वासन सप्टेंबर 2003 च्या बैठकीत पाटबंधारे ने दिले होते. असे असतानाही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याची बिले औद्योगिक दराने काढून एकूण थकबाकी सहित 736 कोटी देण्याची मागणी पाटबंधारे ने केली आहे.

 उद्योगाला पाणी देत नसल्याचा महापालिकेचा दावा

औद्योगिक दराबाबत पुणे महानगरपालिकेकडून पाटबंधारे विभागाला दिलेल्या पत्रानुसार CPHEEO मॅन्युअल नुसार रेसिडेन्शिअल व नॉन रेसिडेन्शिअल बिल्डींग साठी प्रतिमाणसी आवश्यक LPCD गृहीत धरून पाण्याची मागणी नोंदविलेली आहे. यामध्ये औद्योगिक घटकासाठी प्रक्रिया उद्योग व औद्योगिक रॉ मटेरीअल करिता पाणी मागणी प्रस्तावित केलेली नाही. विविध प्रकारचे पाणी वापराचे प्रयोजनासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी जून २०२२” अखेर ठोक जलदर जाहीर केले असून त्यामध्ये घरगुती पाणीवापर व औद्योगिक पाणी वापर (प्रक्रिया उद्योग व कच्चा माल) याचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या पेयजल योजनाद्वारे (Water Treatment Plant) होणारा पाणीपुरवठा हा प्रतीमाणसी करण्यात येत असून औद्योगिक घटकामधील प्रक्रिया उद्योग व कच्चा माल यासाठी
होत नाही. असे महापालिकेने म्हटले होते.
यावर पाटबंधारे विभाग आणि महापालिका प्रशासन यांची एकत्रित सुनावणी झाली होती. यामध्ये औद्योगिक दराचा मुद्दा निकाली काढण्यात आला होता. पाटबंधारे विभागाकडून आश्वासन देण्यात आले होते कि यापुढील बिले ही घरगुती आणि वाणिज्यिक दराने पाठवण्यात येतील. 
 
मात्र कालवा समितीच्या बैठकीत देखील पाटबंधारे विभागाने आपलाच मुद्दा लावून सगळी थकबाकी देण्याची मागणी केली. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील महापालिकेला थकबाकी देण्याचे आदेश दिले. यामुळे महापालिकेची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. 
 
दरम्यान या बिलाच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. 

Pune Water Crisis | पुणे महापालिकेला दररोज किमान 50 MLD पाणी बचत करावी लागणार!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Crisis | पुणे महापालिकेला दररोज किमान 50 MLD पाणी बचत करावी लागणार!

| कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Pune Water Crisis | पुणे | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) पुणे शहरासाठी सद्यस्थितीत 1450 MLD पाणी उचलते. खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain) प्रकल्पातील 4 धरणातून हे पाणी घेतले जाते. मात्र यात आता 50 MLD कपात करण्याचा सूचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत (Can Advisory Committee Meeting) महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेला नियोजन करावे लागणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (PMC Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी दिली.
उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू याबाबत निर्णय घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Water Cut News)
मुख्य अभियंता जगताप यांनी सांगितले कि, बैठकीत धरणातील पाण्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या कि महापालिकेने 31 जुलै पर्यंत अर्धा ते एक टीएमसी पाण्याची बचत करावी. त्यासाठी दररोज उचलल्या जाणाऱ्या पाण्यात कपात करा. महापालिका सध्या शहरा साठी 1450 MLD पाणी उचलते. यात बचत करून हे पाणी 1400 MLD इतके घ्यावे. अशी सूचना महापालिकेला करण्यात आली. त्यानुसार महापालिका पाण्याचे नियोजन करणार आहे. असे जगताप यांनी सांगितले.

Khadakwasla Canal Advisory Committee | आज कालवा सल्लागार समितीची बैठक | पाणीकपात होण्याची शक्यता कमी

Categories
Breaking News PMC social पुणे

Khadakwasla Canal Advisory Committee | आज कालवा सल्लागार समितीची बैठक | पाणीकपात होण्याची शक्यता कमी

Khadakwasla Canal Advisory Committee |  पुणे | पालकमंत्री अजित पवार (Pune Guardian Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षते खाली आज शनिवारी (24 फेब्रु) रोजी खडकवासला (Khadakwasla Dam) आणि भामा आसखेड प्रकल्पाच्या (Bhama Askhed Project) कालवा सल्लागार समितीची बैठक (Khadakwasla Canal Advisory Committee) होणार आहे. पाणी नियोजनाबाबत ही बैठक होणार असून यात शहरात पाणीकपात (Water Cut in Pune) होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळेल. असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. (PMC Water Supply Department)
पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमधून आणि भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. पुणे वगळता राज्यात यंदा खूप कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणे शहरांसोबत ग्रामीण भागाला देखील पाणी द्यावे लागणार आहे. याचा भार पुण्यातील धरणांवर येईल असे बोलले जात होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने देखील महापालिकेला पाणीकपात करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने पाणीवापर कमी केला आहे.
दरम्यान खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये जवळपास 16 टीएमसी हुन अधिक पाणी शिल्लक आहे. पुणे शहराला ऑगस्ट महिन्यापर्यंत 8 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बाकी पाणी आवर्तनच्या माध्यमातून ग्रामीण भागात दिले जाऊ शकते. त्यामुळे पुणे शहरात पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही. असे प्रशासनाला वाटते. तरीही हा निर्णय सर्वस्वी कालवा सल्लागार समितीचा आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे. पुणे महापालिका आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.

– वाढीव बिलांबाबत चर्चा शक्य

दरम्यान पाटबंधारे विभागाकडून पाणीवापराच्या बदल्यात वाढीव बिल आकारले जात आहे. असा पुणे महापालिकेने केला आहे. डोमेस्टिक दराने पाणीबिल न आकारता औद्योगिक दराने पाणी बिल आकारले जात असल्याने पाणी बिल कमी करण्याची मागणी पालिका प्रशासनाने केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने बिल कमी केलेले नाही. याबाबत देखील आजच्या कालवा समितीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Pune Water Cut | पुणे शहरात सध्या पाणीकपातीचा विचार नाही | कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | पुणे शहरात सध्या पाणीकपातीचा विचार नाही | कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Pune Water Cut | सध्या खडकवासला प्रकल्पात (Khadakwasla Project) पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर (Pune Water Supply) कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाचा परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत (Canal Advisory Committee Meeting) स्पष्ट केले. (Pune Water Cut)
 खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राहूल कुल, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,  पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणाची स्थिती चांगली आहे. पुढील महिन्याभरात पावसाचे प्रमाण कसे राहते त्यावर लक्ष ठेऊन ऑक्टोबरमध्ये पुढील नियोजन ठरविण्यात येईल.
पवना व चासकमान मध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

नीरा प्रणालीत समाधानकारक पाणी

नीरा प्रणालीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४ टीएमसी ने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा ९१ टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. तथापि, लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
कालव्याच्या टेलच्या भागातील शेतीला योग्य दाबाने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी कालवेक्षेत्रातील पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यकता भासल्यास ठराविक वेळेतच वीजपुरवठा करा. अवैध पाणीवापरावर नियंत्रण आणण्यासाठी मनुष्यबळाचे फेरनियोजन करत इतर ठिकाणचे मनुष्यबळ सिंचन व्यवस्थापनावर वापरात आणावे. बाह्य स्रोताद्वारे तात्पुरते मनुष्यबळ घेण्यात यावे, अशा सूचना महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी केल्या.
नीरा डाव्या कालव्याद्वारे संरक्षित सिंचन पूर्ण होताच शेटफळ तलाव ५० टक्के भरण्याचे नियोजन आहे. सध्या नीरा उजवा कालवा आणि डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून ते नियोजनाप्रमाणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस आमदार समाधान अवताडे, शहाजीबापू पाटील आदी उपस्थित होते.
000
News Title |

Pune | Canal Advisory Committee meeting on Saturday! | will discussion about water planning

Categories
Breaking News Political social पुणे

Pune | Canal Advisory Committee meeting on Saturday! | will discussion about water planning

 

Pune | Canal Advisory Committee The Canal Advisory Committee meeting for Khadakwasla Project will be held on Saturday. The meeting will be held under the chairmanship of Guardian Minister Chandrakant Patil.

The four dams of Khadakwasla project have 27.60 TMC i.e. almost 95% water storage. But it has been raining heavily for the past few days. Therefore, the water level of Ujani Dam, which is dependent on this dam, has not increased. Also, since there is no rain in Pune district, water has to be provided for the agriculture which depends on these dams. Now how will this water cycle be given. This will be discussed in the canal committee meeting. Also, if there is no rain in September, drinking water will have to be given priority in terms of summer. Therefore, water planning will be important. This will be discussed in this meeting.

Pune | Canal Advisory committee | शनिवारी कालवा सल्लागार समितीची बैठक! | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा

Categories
Breaking News Political social पुणे

Pune | Canal Advisory committee | शनिवारी कालवा सल्लागार समितीची बैठक! | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा

Pune | Canal Advisory committee | खडकवासला प्रकल्पाची (Khadakwasla Project) खरीप हंगाम साठीची कालवा सल्लागार समितीची बैठक (Canal Advisory committee) शनिवारी होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
खडकवासला प्रकल्पातील चार धरणात 27.60 टीएमसी म्हणजे जवळपास 95% पाणीसाठा आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी वाढलेली नाही. तसेच पुणे जिल्ह्यात देखील पाऊस नसल्याने या धरणांवर अवलंबून असलेल्या शेतीसाठी पाणी द्यावे लागणार आहे. आता हे पाण्याचे आवर्तन कसे दिले जाईल. याबाबत कालवा समितीच्या बैठकीत चर्चा होईल. तसेच सप्टेंबर मध्ये देखील पाऊस नाही पडला तर उन्हाळ्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी नियोजन करणे महत्वाचे ठरणार आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होईल.

Recruitment | जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती

| पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

लवकरच जलसंपदा विभागात कनिष्ट अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती लवकरच होणार असून त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग ३ व ४ मधील कर्मचारी बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करुन घ्यावेत. असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian minister Chandrakant patil) यांनी दिले. तसेच पाणी वापर संस्थांची ५० टक्के परताव्याची रक्कम प्राधान्याने वितरीत करावी, कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी आदी सूचना श्री. पाटील यांनी केल्या.(Recruitment of 500 posts of Junior Engineers in Water Resources Department)

| नीरा उजव्या कालव्याची १९ जूनपर्यंत सलग दोन आवर्तने

 

नीरा प्रणालीतील भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार १० मार्चपासून १२ मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून दुसरे सलग आवर्तन १३ मे ते १९ जूनपर्यंत देण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Canal advisory committee)

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, दीपक चव्हाण, समाधान आवताडे, भिमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

नीरा प्रकल्पात उपयुक्त साठ्याच्या ४७.५० टक्के म्हणजेच २२.९६ टीएमसी पाणी उपलब्ध असून उन्हाळी हंगामात नीरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी १३.९३ टीएमसी पाणी व बिगर सिंचनासाठी १४.७८ टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यानुसार १९ जूनपर्यंत सलग दोन उन्हाळी आवर्तने देण्यात येणार आहेत. माळशीरस, सांगोला, पंढरपूरपर्यंत कालव्याच्या टेलपर्यंत पुरशा दाबाने पाणी जावे यासाठी पाटबंधारे विभागाने यांत्रिकी विभागाच्या सहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले. (Neera canal)

 

नीरा डाव्या कालव्याची दोन आवर्तने

नीरा डाव्या कालव्याला १ मार्चपासून ३० एप्रिलपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून लगेच १ मेपासून ३० जूनपर्यंत दुसरे आवर्तन देण्यात देण्यात येणार आहे. नीरा डावा कालवा एका ठिकाणी फुटल्याचा प्रकार घडला होता. ती दुरुस्ती पूर्ण झाली असून तेथील उर्वरित चाऱ्यांना प्राधान्याने सोडण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (Neera left canal)

भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवण्यात येते. त्याशिवाय भामा व भीमा नदीत १५ ते २७ मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणात ३.२३ टीएमसी पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले असल्यामुळे १५ जुलैपर्यंत पाणीवापर निश्चित करण्यात आला असला तरी तो पुढील कालावधीतही पुरणार आहे.

चासकमान प्रकल्पाची तीन आवर्तने

चासकमान प्रकल्पातंर्गत चासकमान आणि कलमोडी धरणात मिळून एकूण ३.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. १ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन सुरू आहे. दुसरे आवर्तन ५ मे ते ३ जूनपर्यंत आणि तिसरे आवर्तन ८ मे ते १७ जूनपर्यंत देण्याचे चासकमान कालवा सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Chaskaman dam)

प्रारंभी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी मोसमी पावसाच्या अंदाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. एल निनो सक्रिय होण्याची शक्यता, आयओडी, युरेशियावरील बर्फाचे आवरण यांचा पावसावर होऊ शकणार परिणाम याविषयी माहिती देण्यात आली.

यावेळी बैठकीस विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडके नीरा देवघर डावा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, नीरा देवघरचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता नामदेव करे आदी उपस्थित होते.

Chandrkant Patil | संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

पुणे | यंदाच्या पावसाच्या अंदाज पाहता धरणातील पाणीबचत (water saving) करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Pune district Guardian minister Chandrkant Patil) यांनी जाहीर केले. (Pune city water distribution system)
जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती (canal advisory committee) बैठका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, राहूल कुल, भिमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. चाऱ्याचे नियोजन आत्ताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे. (PMC Pune)
पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो असे लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपायोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे, असेही श्री. पाटील म्हणाले. (Irrigation)

*खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन १ मेपासून*

खडकवासला प्रकल्पातील ४ धरणात मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१  टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार नियोजन करुन नवीन मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. (Pune district irrigation)
बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
000

Canal Advisory Committee | सध्या तरी पुण्यात पाणीकपात नाही! मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 सध्या तरी पुण्यात पाणीकपात नाही! मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा

| कालवा समितीच्या बैठकीत झाला निर्णय

पुणे | पाणी कपातीबाबत (Water cut pune) पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या तरी शहरात पाणी कपात लागू होणार नाही. मात्र आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. याबाबत पुढील 8-10 दिवसात परिस्थिती पाहून कपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुपारी झालेल्या कालवा समितीच्या (Canal advisory committee) बैठकीत हा निर्णय झाला. (Pune water issue)
अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार होता. त्यानुसार ही बैठक झाली.  पाणीकपात करण्याबाबत पुणेकरांना दिलासा देण्यात आला आहे. सध्या तरी कुठलीही कपात नसणार आहे. मात्र आगामी 10 दिवसात धरणातील पाण्याची स्थिती पाहून कपाती बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
(Pune city water distribution issue)

| एक दिवस पाणी बंद ठेवण्याला आमदार माधुरी मिसाळ यांचा विरोध

सध्या जरी पाणीकपात केली जाणार नसली तरी आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मात्र याला आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांनी विरोध केला. एक दिवस पाणी बंद ठेवले तरी पुढील तीन दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणी बंद ठेवू नये, अशी मागणी मिसाळांनी केली. त्यावर महापालिका पाणीपुरवठा विभाग कडून सांगण्यात आले कि पूर्ण शहरात अशी समस्या येत नाही. याबाबत योग्य नियोजन केले जाईल. एकंदरीत शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले जाऊ शकते. त्यासाठी पुणेकरांनी तयार राहायला हवे आहे.
दरम्यान उद्या म्हणजे गुरुवारी पूर्ण शहरात पाणी बंद (Water closure) राहणार आहे.

Ujani Dam | Solapur Municipal corporation | उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून | सोलापूर महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून | सोलापूर महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक

| पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक संपन्न

पुणे| उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती (Ujani Dam Canal Advisory Committee)  बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (solapur Guardian minister Radhakrishna vikhe patil)  यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सोडण्याचे बैठकीत ठरले.

बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सुभाष देशमुख, संजय शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, माजी आमदार कल्याणराव काळे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.

प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्यावरील पाणी पट्टी वसुली तसेच त्याबाबतचे व्यवस्थापन करणे वाढत्या सिंचन क्षेत्रामुळे व मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे पाटबंधारे विभागाला कठीण जात आहे. त्यामुळे ते व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याचा पर्याय अवलंबवावा, असे निर्देश मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिले. त्यानुसार दहिगाव उपसा सिंचन योजना आणि सीना माढा उपसा सिंचन योजना या दोन योजना तसेच भीमा, सीना आणि माण नदीवरील ५० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे संपूर्ण व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यात येईल असे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेला (Solapur Municipal Corporation) पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीत पाणी सोडावे लागते. महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

३० जून २०२३ पर्यंत ४ अवर्तने सोडण्याचे नियोजन केले असल्याचे यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर विभागाने योग्य नियोजन करून कालव्याची ४ ऐवजी ५ आवर्तने द्यावीत अशा सूचना पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या वेळी काही दिवसांसाठी नदीकाठच्या गावांचा कृषीपंपांचा वीजपुरवठा बंद करावा जेणेकरून अवैध पाणी उपसा बंद होऊन पाणी बचत होईल, असेही ते म्हणाले.

पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा तसेच सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलाशयातील बाष्पीभवन कमी करण्याच्यादृष्टीने शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या.

उजनी (भीमा) प्रकल्प उजवा कालवा आणि डावा कालवा या दोन्ही कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्याचे बैठकीत ठरले. तसेच भीमा सीना जोड कालव्यातून २० डिसेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात यावे, धरणातून भीमा नदीत १० जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे. हे पाणी सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका व भीमा नदी तीरावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी हेळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडण्यात यावे. सीना माढा उपसा सिंचन योजना तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ५ जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे असे या बैठकीत निश्चित झाले.