Ghorpadi Flyover – MLA Sunil Kamble | तब्बल ४० वर्षांनी सुटणार घोरपडी मधील वाहतूक कोंडी | आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नांना यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Ghorpadi Flyover – MLA Sunil Kamble | तब्बल ४० वर्षांनी सुटणार घोरपडी मधील वाहतूक कोंडी!

| आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नांना यश

 

Ghorpadi Flyover – (The Karbhari News Service) – तब्बल ४० वर्षांपासून वाहतुक कोंडीचा सामना करणाऱ्या घोरपडीगाव येथील वाहतूक कोंडीची समस्या अखेर आज सुटणार आहे. महापालिकेकडून घोरपडी गाव येथील पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले जाणार असून पुणे – मिरज मार्गावरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले जाणार आहे. सोलापूर रेल्वे मार्गावरील पुल सेवा रस्त्यासह सुमारे १ किलोमीटर असून मिरज रेल्वे मार्गावरील पुल ७०० मीटर असणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नातून हा पूल उभारण्यात आला आहे.

आमदार होण्या आधी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष असतानाच आमदार कांबळे या दोन्ही पुलासाठी पुढाकार घेताला . तर २०१९ मध्ये या भागाचे आमदार झाल्यानंतर त्यांनी आमदार निधीसह, राज्यशासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला.

४० वर्षाची समस्या सुटली

या दोन्ही रेल्वे मार्गावर उड्डाणपूल व्हावा अशी या भागातील नागरिकांची जवळपास ४० वर्षे जुनी मागणी होती. सोलापूर रेल्वे ट्रॅकवरून दिवसभरात जवळपास १०४ ट्रेन ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी असलेले रेल्वे फाटक हे साधारण पाच तास बंद होते. तर मिरज मार्गावरून सुमारे १०० गाड्या जातात. परिणामी घोरपडी गाव भागात दिवसभर वाहतूक कोंडी होते. हवे कोंडी फोडण्यासाठी दोन्ही पुल महत्वाची भूमिका निभावणार आहेत.

शहरातील तसेच कॅम्प भागातील नागरिकांना मुंढवा-केशवनगर- खराडी या भागात जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता . तसेच गेल्या दोन दशकात मुंढवा, घोरपडी आणि कल्याणीनगरमधील भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढल्याने या नागरिकांना शहरात येताना कोंडीचा सामना करावा लागतो.

तर हे दोन्ही पुल संरक्षण विभागाच्या हद्दीतून जात असल्याने 2016 मध्ये मिरज मार्गासाठी तर मध्येच कॅन्टोन्मेंटची ४ हजार ५६० चौरस मिटर जागाहस्तांतरितासाठी परवानगी दिली होती. तर सोलापूर मार्गावर ७ हजार चौरस फूट जागा हवी होती. मात्र, ही जागा मिळत नसल्याने आमदार कांबळे यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तर मिरज मार्गावरील पुल छावणी परिषदेच्या जागेतून जात असून या पुलाच्या कामासाठी छावणी परिषदेला जागेचा मोबदला म्हणून १० कोटी रुपये तसेच ३४ घरे महापालिका बांधून देणार आहेत. तर मिरज मार्गावर महापालिका ८ घरे बांधून देणार आहे.

असे आहेत पुल 

पुणे – सोलापूर रेल्वे मार्ग पुल
लांबी – १०१० मीटर
खर्च – ४८.५० कोटी
——–
पुणे – मिरज रेल्वे मार्ग पुल
लांबी – ६३६ मीटर
खर्च – ४८ कोटी
—-

याप्रसंगी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे,
आमदार सिद्धार्थ शिरोळे,माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी नागरिक उपस्तिथ होते.

Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार! | चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार!

|  चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Pune – (The Karbhari News Service) – लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एकदिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भांडारी, आ. माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, समन्वय समितीचे प्रमुख तथा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशेलकर, शहर प्रमुख प्रमोदनाना भागगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या सह मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय रहावा. प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत, त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता असावी यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बारामती, शिरुर, आणि पुणे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक झाली. या बैठकीत माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये एनडीएला ४०० पार करुन माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं, यावर सर्वांचच एकमत आहे. आजच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकीनंतर प्रत्येक पक्षाचे नेते विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संपर्क करणार आहेत.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम हटविण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बूथवर मिळणाऱ्या मतांमध्ये ३७० मते अधिक मिळाली पाहिजेत, अशी सूचना पक्ष श्रेष्ठींनी केली आहे. त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची मतांची संख्या काढली, ती देखील ४०० पार करतील, आणि लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री तथा शिवसेना नेते विजयबापू शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, यांच्या सह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम शेतकरी संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे लवकरच बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तालुकानिहाय दौरा करणार असून, याद्वारे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Special Fund for PMC | पूरस्थिती नियंत्रण आणि ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला 200 कोटींचा विशेष निधी

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Special Fund for PMC | पूरस्थिती नियंत्रण आणि ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला 200 कोटींचा विशेष निधी

– ⁠शहरातील नाल्यांच्या सीमा भिंतींचा प्रश्न सुटणार

Pune – (The Karbhari Online) – शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी (Flood in Pune) नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. सरकारने नुकताच याबाबतचा आदेश जारी केला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे शहरातील नाल्यांची कामे आणि सीमा भिंती बांधणे यासाठी महापालिकेचा निधी तांत्रिक अडचणींमुळे खर्च करता येत नव्हता. त्यामुळे सीमा भिंतींची कामे रखडली होती. नाला परिसरातील नागरिकांमध्ये पाऊस काळात चिंतेचे वातावरण होते. म्हणून या कामासाठी राज्य सरकारच्या विशेष निधीची आवश्यकता होती. उपलब्ध झालेल्या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण/सीमा भिंती बांधल्या जाणार असून विशेषतः आंबील ओढा परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे. या सीमा भिंतींमुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार आहे.
दरम्यान या निधीचा अपव्यय होऊ नये, याबाबत जिल्हाधिकारी महापालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहेत. तसे सरकारने आदेशात नमूद केले आहे.
याबाबत माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने २०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली. असा प्रकार टाळण्यासाठी सीमा भिंतींची कामे महत्त्वाची ठरणार होती. त्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला, याचे नक्कीच समाधान आहे. देवेंद्रजींचे पुणे शहराकडे विशेष लक्ष असल्याचे या निधीच्या मंजुरीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे’

Creative Foundation Pune | क्रिएटिव्ह फाउंडेशन व सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने पालकर शाळेस शालोपयोगी साहित्य भेट

Categories
Breaking News cultural Education Political social पुणे

Creative Foundation Pune | क्रिएटिव्ह फाउंडेशन व सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने पालकर शाळेस शालोपयोगी साहित्य भेट

| साधनांची कमतरता नाही गरज संस्कारक्षम पिढी घडविण्याची  | चंद्रकांत  पाटील

 

Creative Foundation Pune | समाजाची गरज ओळखून उपक्रम राबविण्याची गरज असून जेथे जे पाहिजे तेच देता आले पाहिजे आणि तेच समाजकार्य क्रिएटिव्ह फाउंडेशन (Creative Foundation Pune), ग्लोबल ग्रुप (Global Group) आणि सतीश गायकवाड मित्र परिवार (Satish Gaikwad Friend Circle) करत आहे असे ना. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. सध्या साधनांची कमतरता नसून संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज असल्याचे सांगताना हे काम शिक्षकांच्या हातूनच घडू शकते आणि तेच भावी काळातील चांगले नागरिक घडवू शकतात, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास मी तत्पर असल्याचे ही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने कर्वेनगर येथील अभिजात एजयुकेशन सोसायटी च्या ग. रा. पालकर शाळेस शालेय साहित्य व क्रीडा साहित्य भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandip Khardekar Creative Foundation), श्री. सतीश गायकवाड, मा. नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, ग्लोबल ग्रुप चे राहुल बग्गा, मा. नगरसेवक जयंत भावे, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, शहर चिटणीस कुलदीप सावळेकर,प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,श्रीमती पालकर,प्रभाग 13 महिला मोर्चा अध्यक्ष संगीता शेवडे, महिला मोर्चा शहर चिटणीस सुवर्णा काकडे, राजस्थान आघाडीचे जयप्रकाश पुरोहित,विश्वजीत देशपांडे,प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, विठ्ठल मानकर, निलेश गरुडकर, राजेंद्र येडे, समीर ताडे, श्रीकांत गावडे, प्रतीक खर्डेकर इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेला क्रीडा तथा शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. यात हॅन्डबॉल, निशाण, डंबेलस सह चित्रकला वही, स्केच पेन, पट्ट्या, पेन्सिल व इतर साहित्य मुबलक प्रमाणात देण्यात आले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका पूर्वा म्हाळगी, अमला भागवत, नलिनी शेंडकर यांनी त्याचा स्वीकार केला.

संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले, पूर्वा म्हाळगी यांनी सूत्रसंचालन तर भाजप क्रीडा आघाडी संयोजक प्रतीक खर्डेकर यांनी नमो चषक ची माहिती देत आभार प्रदर्शन केले.

Mandar Balkawade | Kothrud MNS | BJP | मनसेला कोथरूडमध्ये खिंडार! | मंदार बलकवडे यांचा भाजपात प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे

Mandar Balkawade | Kothrud MNS | BJP | मनसेला कोथरूडमध्ये खिंडार! | मंदार बलकवडे यांचा भाजपात प्रवेश

| मंदार च्या प्रवेशाने कोथरूडमध्ये पक्षाची ताकद वाढण्यास मदत – चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील

Mandar Balkawade | Kothrud MNS | BJP |  मनसे चे नेते व प्रमुख पदाधिकारी मंदार बलकवडे  (Mandar Balkawade) यांचा प्रवेश ही तर सुरुवात असून येणाऱ्या काळात अनेक मोठे नेते भाजप मधे प्रवेश करतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. तर मंदार बलकवडे यांच्या प्रवेशामुळे कोथरूड मतदारसंघात भाजप (Kothrud Constituency BJP) ची ताकद वाढण्यास मदत होईल आणि मंदार सोबतच्या तरुणांच्या फळीमुळे युवा वर्गात चैतन्य निर्माण होईल असे ना. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil BJP) म्हणाले. (Mandar Balkawade | Kothrud MNS | BJP)
मनसे च्या मंदार बलकवडे यांचा आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,शहराध्यक्ष धीरज घाटे,प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक व इतर मान्यवर उपस्थित होते.
मंदार सह पक्षात येणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना प्रत्येकाला योग्य मान दिला जाईल असे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून येणाऱ्या काळात पक्ष संघटना बळकटी व पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्यक्रम राबविणार असल्याचे मंदार बलकवडे म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी देखील पक्षात प्रवेश केला व भाजप चा जयघोष केला.

Mukta Tilak Death Anniversary | पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात येईल| चंद्रकांत पाटील

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Mukta Tilak Death Anniversary | पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात येईल| चंद्रकांत पाटील

 

Mukta Tilak Death Anniversary |  पुणे शहरात विविध ऐतिहासिक वास्तू (Heritage) असून त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधींच्या माध्यमातून (सीएसआर) जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. (Mukta Tilak Death Anniversary)

नाना वाडा (Nana Wada Pune) येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कला केंद्राच्या उपायुक्त डॉ. चेतना केरुरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, सुनील देवधर, धीरज घाटे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, अभिनेता क्षितिज दाते आदी उपस्थित होते. (Pune News)

 

श्री. पाटील म्हणाले, पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘सीएसआर बँक’ विकसित करण्यात येणार आहे. स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांचे अकाली निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील पुणे शहर अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुणे शहराचा सर्वांगिण विकास हीच स्व. मुक्ताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल,असे श्री. पाटील म्हणाले. (PMC Pune)

स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रुग्णालय येथे कर्करोगांवर उपचार करण्यात आले. या रुग्णालयात सामान्य नागरिकांना कर्करोगांचे मोफत उपचार मिळावेत, याकरीता त्यांच्या नावाने ‘पेटस्कॅन केंद्र’ सुरु करण्यात येणार आहे. रेडिएशन उपचार पद्धतीदेखील उपलब्ध करुन देण्यात येईल, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्करोगावरील महागडे उपचार मोफत मिळण्यास मदत होणार आहे.

श्री. मुळीक म्हणाले, स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांच्या महापौरपदाच्या काळात आधुनिक पुण्याचे नेतृत्व दिसून येते. त्यांच्या काळात पुणे मेट्रो कामांचा पाठपुरावा, ऐतिहासिक वास्तूंमध्ये क्रांतीकांरकाचे संग्रहालय आदी कल्पना त्यांनी मांडल्या. त्या आज पूर्ण होतांना दिसत आहेत.

श्री. ठाकूर म्हणाले, पुणे शहरात विविध क्रांतीकारक होऊन गेलेत. या क्रांतिकारकांची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे बलिदान लक्षात घेता आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. नागरिकांच्या मनात देशप्रेम निर्माण करण्यासाठी अशा वास्तूचे जतन करण्याची गरज आहे, असेही श्री. ठाकूर म्हणाले.

श्री. मोहोळ, श्री. देवधर, श्री. घाटे यांनीही विचार व्यक्त केले.

शैलेश टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रांतीकारकारकाचे संग्रहालय ही मुक्ता टिळक यांची संकल्पना होती; आज त्याचे लोकार्पण होत असल्याचा आनंद होत आहे. पुणे शहरातील वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेकडून नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या देखभालीबाबत करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत श्री. ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

Vikram Kumar IAS | ९३ रजा मुदत शिक्षकांना ३१ डिसेंबर पूर्वीच नियुक्ती पत्र देणार | आयुक्त विक्रम कुमार

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

Vikram Kumar IAS | ९३ रजा मुदत शिक्षकांना ३१ डिसेंबर पूर्वीच नियुक्ती पत्र देणार | आयुक्त विक्रम कुमार

| चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून शिंदेशाही पगडी देऊन आयुक्तांचे विशेष अभिनंदन

 

Vikran Kumar IAS | पुणे महापालिका (PMC Pune) आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी ३१ डिसेंबर पूर्वी सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिल्याने या रजा मुदत शिक्षकांचा (PMC Teachers) दिवाळी प्रमाणे ३१ डिसेंबरचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनीही आयुक्त विक्रम कुमार यांचे शिंदेशाही पगडी देऊन अभिनंदन केले. तसेच सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांचे अभिनंदन करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या. (Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शिक्षण सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी शासन आदेश नुकताच जारी झाला. त्याबद्दल शिक्षण सेवकांच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन घोले रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी आयुक्त विक्रम कुमार डिसेंबर अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिली. (PMC Education Department)

यावेळी आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शिक्षण विभागाचे राजू नंदकर, संतोष वारुळे, चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या सह सर्व ९३ रजा मुदत शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, राज्य सरकार हे सर्व सामान्यांप्रती समर्पित सरकार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ करुन १६ हजार करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ पुणे महापालिकेच्या सर्व रजा मुदत शिक्षकांनाही मिळाला. त्यांना सेवेत कायम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय घेत दिलासा दिला. या सर्वांनाही यापूर्वीच थकबाकी आधीच मिळाली आहे. नियुक्ती पत्र डिसेंबरपूर्वीच मिळणार असल्याने वर्षाखेरचा आनंद देखील द्विगुणित होणार आहे.

शासनाने अतिशय जलदगतीने निर्णय घेऊन आपली भूमिका चोख बजावली आहे. त्यामुळे शिक्षकदेखील आपल्या कर्तव्यात कसूर बाकी न ठेवता, सुशिक्षित आणि सदृढ समाज निर्मितीत आपली मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, शासनाने शिक्षकांचा न्याय देण्यासाठी जलदगतीने निर्णय घेतला. पुणे महापालिका देखील ९३ शिक्षकांप्रती अनुकूल असून, सर्वांना डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, सर्व शिक्षकांनी कायम झाल्यानंतर उत्तम समाजासाठी चांगला व्यक्ती घडविण्यात मोलाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन | महोत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

Categories
Breaking News cultural Political पुणे

Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन | महोत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

| साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

 

Pune Book Festival | पुणे – जागतिक स्तरावरील पुस्तक महोत्सवाची मेजवानी पुणेकरांना मिळाली आहे. सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांनी नटलेला हा पुणे पुस्तक महोत्सव (Pune Pustak Mahotsav) आजपासून सुरू होत आहे. या महोत्सव पुणेकरांनी एकत्र येत यशस्वी करावा, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. (Pune Book Festival)

 

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने फर्ग्युसन मैदानावर आयोजित केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे महापलिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक विशाल चोरडिया, जय काकडे, सुशील जाधव, कृष्णकुमार गोयल, शहीद भगतसिंग यांचे पणतू यागवेंद्र सिंग संधू, प्रकाशक राजीव बर्वे, डीईएसचे डॉ. शरद कुंटे आदी उपस्थित होते. मोहन शेटे लिखित हिंदवी स्वराज्य स्थापना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

 

पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स पुस्तक एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापना हे पुस्तक सुद्धा एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या पुस्तक महोत्सवात कोथरूड मतदार संघातील पुस्तक घेणाऱ्या नागरिकांना सवलत देण्यात येईल. त्यासाठी त्यांनी कोथरूड आणि बाणेर येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे आणि शिक्षणाचे माहेरघर आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुणे शहरात सांस्कृतिक दृष्ट्या मोलाची भर पडली आहे. असेच महोत्सव राज्यातील इतर शहरांमध्ये सुरू व्हावेत. दिल्ली, जयपूर येथील विविध फेस्टीव्हल पाहिले आहेत. हे फेस्टीव्हल ठराविक लोकांपुरता मर्यादित असतो. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला जनतेचा सोहळा करून, सामान्य जनतेला, माध्यम वर्गीय कुटुंबातील लोकांना वाचन संस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. अशा पद्धतीने सामान्य लोकांसाठी परिश्रम केले आहे. त्याबाबत अभिनंदन केले पाहिजे. मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी सर्वांना ज्ञानासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.सोशल मीडियामुळे वाचन संस्कृतीचा फटका बसला आहे. पायरसीमुळे पुस्तकांना फटका बसला आहे. पुस्तक विक्री कमी होते, अशी खंत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. त्याचबरोबर खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद पुढील आठ दिवस देत, महोत्सवातील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मराठे यांनी केले.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी पुस्तक महोत्सव पाहिले मात्र, विश्वविक्रमानी सजलेला पुस्तक महोत्सव पहिल्यांदाच पाहतोय. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. आता, यापुढे आपल्या पुण्याला देशातील पुस्तकांची राजधानी करायचे आहे. त्यासाठी पुणेकरांनी पुढे येऊन, महोत्सवाला पाठिंबा द्यायचा आहे. या पुस्तक महोत्सवाला देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध करायचे आहे, असे मलिक यांनी सांगितले.

पुणे पुस्तक महोत्सवात पुढील आठ दिवस सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने शहीद भगतसिंगांनी जेलमध्ये लिहिलेली डायरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली संविधानाची मूळ प्रत, छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित एतिहासिक कागदपत्रे पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाच्या कालावधीत एकूण १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यातील ३२ पुस्तकांचे प्रकाशन एकाचवेळी होईल. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन पांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.बागेश्री मंठाळकर यांनी आभार मानले.

….
भगतसिंगांनी रचलेल्या मेरा रंग दे बसंती चोला या गाण्यापासून म्हणजे १९३१ पासून महाराष्ट्र आणि भगतसिंग यांचे ऋणानुबंध आहे. भगत सिंग यांनी जेलमध्ये १०० पेक्षा अधिक पुस्तके वाचली. आपण सुद्धा अशाच प्रकारे पुस्तके वाचायची आहे. आगामी काळात आपल्याला देशात अधिकाधिक भगत सिंग घडवायचे आहेत, असे यागवेंद्र सिंग यांनी आवाहन केले.

—-

सलग तिसरा विश्वविक्रम

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या उपक्रमांत सलग तिसऱ्या दिवशी गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी एकत्र येत १८ हजार ७६० पुस्तकांच्या माध्यमातून जयतु भारत हे वाक्य तयार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा वापर करून, बनविण्याचा हा रेकॉर्ड आहे. यापूर्वीचा, रेकॉर्ड हा सौदी अरेबियाच्या नावावर होता. तेथे ११ हजार १११ पुस्तकांच्या माध्यमातून वाक्य तयार करण्यात आले होते. गिनेस बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी विश्वविक्रमाची घोषणा केली. विश्वविक्रम झाल्यानंतर मैदानावर देशभक्तीपर गाण्यांवर जल्लोष साजरा करण्यात आला; तसेच मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

100th Natya Sammelan | सोलापुरात होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

100th Natya Sammelan | सोलापुरात होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील

| सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

| नाट्यसंमेलन दिमाखात करण्याचा निर्धार

 

100th Natya Sammelan |अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात (Solapur)  जानेवारीत होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्वीकारले. यावेळी नाट्यसंमेलन दिमाखात करण्याचा निर्धार सोलापुरातील कलावंतांनी व्यक्त केला. (100th Natya Sammelan)

नाट्यसंमेलनाबाबत सोमवारी हॉटेल सूर्या येथे बैठक झाली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारावे असा आग्रह सर्व सदस्यांनी धरला. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. राजेंद्र राऊत, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, अखिल भारतीय उपनगरीय शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यपरिषद मुंबईचे कार्यकारणी सदस्य विजय दादा साळुंके, नाट्य परिषद चे सहकार्यवाह दिलीप कोरके नियमक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, विश्वनाथ आव्हाड, तेजस्विनी कदम, सोमेश्वर घाणेगावकर उपस्थित होते.

याप्रसंगी स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलापुरात होणारे १०० वे नाट्यसंमेलन अत्यंत दिमाखात पार पडेल. या संमेलनासाठी निधी व अन्य कशाचीही कमतरता भासू देणार नाही. जुळे सोलापूर परिसरात भव्य नाट्यगृह व्हावे अशी सोलापूरकरांची इच्छा आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षांत जुळे सोलापुरात मोठे नाट्यगृह तयार होईल. याकरिता मी स्वतः पाठपुरावा करीन, असे आश्वासनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

प्रास्ताविक करताना विजय दादा साळुंके म्हणाले की नाट्य परिषदेच्या आठ शाखा मिळून विभागीय नाट्य संमेलन पार पाडणार आहोत.सोलापूरमध्ये 88 वे नाट्यसंमेलन तसेच पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन अविस्मरणीय झाले त्याचप्रमाणे विभागीय नाट्यसंमेलन होणार आहे. सदर नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वीकारावं हा एकमताने ठराव झाला. हे संमेलन चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असल्यामुळे सर्वांना मनस्वी आनंद झाला आहे.
यावेळी आ. राजेंद्र राऊत, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, शोभा बोल्ली यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक दत्ता सुरवसे, मोहन डांगरे, शहाजीभाऊ पवार, कृष्णा हिरेमठ, नरेंद्र गंभीरे,पद्माकर कुलकर्णी,शशिकांत पाटील, ज्योतिबा काटे,हरिभाऊ चौगुले, सुहास मार्डीकर,प्रशांत शिंगे,आशुतोष नाटकर, जे.जे कुलकर्णी, पी.पी कुलकर्णी,जगदीश पाटील, राजू राठी, अनिल पाटील यासह नाट्य परिषदेचे पदाधिकारी, रंगकर्मी, नाट्य रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत बडवे यांनी मानले.
———

स्वागताध्यक्षांनी दिली अडीच लाखांची देणगी

१०० व्या नाट्यसंमेलनासाठी स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या पगारातून दोन लाख ५१ हजार रुपयांची देणगी यावेळी दिली. तर आ. राजेंद्र राऊत आणि उद्योजक दत्ता सुरवसे यांनी प्रत्येकी एक लाख रुपये देणगी नाट्य संमेलनासाठी दिली.

जानेवारी सांस्कृतिक मेजवानी या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने वीस ते 26 जानेवारी या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे 27 व 28 जानेवारी रोजी मुख्य नाट्य संमेलन व संमेलनाच्यापूर्वी 20 ते 26 जानेवारी सोलापूरच्या नाट्य परिषदेच्या आठही शाखेच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखा, महानगर शाखा, यासह पंढरपूर, बार्शी मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या शाखांचा सहभाग असणार आहे.

Education Fee | ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार

Categories
Breaking News cultural Education social महाराष्ट्र

Education Fee | ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार

| उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

| अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय सुरु करावे

 

Education Fee | मुंबई | आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग (OBC) तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (Economically Backward) मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षात प्रलंबित राहिलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची 100 टक्के परतफेड करण्यासाठी येत्या अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच सारथी महामंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक नरेंद्र पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते तसेच, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, उमाकांत दांगट मधुकरराव कोकाटे, डॉ. नवनाथ पासलकर यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मराठा समाजाला स्वतःचे स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी सर्व्हे करण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) उच्च न्यायालय अलाहाबाद, न्यायमूर्ती मारोती गायकवाड (निवृत्त), न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) या तीन सदस्यीय समितीचे कामकाज प्रत्यक्ष सुरू झाले असून त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. ही समिती टाटा सामाजिक विज्ञान संस्था, गोखले शैक्षणिक संस्था आणि ऑल इंडिया पॉप्युलेशन सायन्स या तीन नामांकित संस्थाच्या माध्यामातून सर्वेक्षणाचे काम करणार आहे. तसेच आतापर्यंत सुरू असलेल्या नोंदीच्या कामात मराठवाड्यात 22 हजार कुणबी नोंदी नव्याने आढळल्या असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील लाभार्थींना उद्योग व्यवसायासाठीच्या कर्जाचा व्याज परतावा करण्याची सुविधा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या जिल्हास्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात सुरु आहे, सर्व जिल्ह्यात महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करावे, त्याचसोबत महामंडळाच्या विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून मराठा समाजातील रोजगार इच्छुकांसाठी रोजगार नोंदणी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या जिल्हास्तरीय तसेच विभागीय यंत्रणांचा आढावा घेऊन सर्व जिल्ह्यात महामंडळांच्या स्वतंत्र कार्यालयांची व्यवस्था करण्याचे सूचित केले. यासाठी प्राधान्याने महसूल, कौशल्य विकास तसेच सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांच्या अखत्यारीतील जागेत महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याचे सूचित केले ज्या ठिकाणी अशी जागा उपलब्ध नसेल त्याठिकाणी भाडयाने खाजगी जागेत तातडीने जिल्हा कार्यालयाची व्यवस्था कार्यान्वित करण्याचे सूचित केले. तसेच विभागीय स्तरावर महामंडळाने त्यांच्या विभागीय समन्वयकांच्या माध्यमातून रोजगार नोंदणी सुविधा सुरु करुन इच्छुकांचे रोजगार मेळावे आयोजन, संबंधित कंपन्यासोबत समन्वय साधावा. नोकरी इच्छुकांना मुलाखत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे या माध्यमातून जास्तीत जास्त संख्यने रोजगार संधीची निर्मिती करावी. त्याचसोबत कर्ज इच्छुक लाभार्थींना व्यवसाय सुरु करण्यासाठीचे प्रशिक्षण प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने सारथी संस्थेसोबत समन्वय करण्याचे सूचित केले.

महामंडळाच्या योजनेमुळे व्यापक प्रमाणात लाभार्थींना सहाय्य मिळत आहे, त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नवी मुंबई येथे महामंडळाच्या भवन उभारण्यासाठी सिडकोकडे पाच एकर जमीन ग्रहण करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. महामंडळाने कर्ज दिलेल्या 71 हजार 376 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या रोजगाराची माहिती संकलित करावी. तसेच महामंडळाच्या पाच हजार कर्ज लाभार्थी यांची कर्ज परतफेड पूर्ण झाली आहे, त्यांचे सर्वेक्षण करावे अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी संबंधितांना दिल्या. दहा हजार ते दोन लाख पर्यंतच्या बँकेतून घेतलेल्या कर्जाच्या 100 टक्के व्याज प्रतिपूर्तीचा निर्णय उपसमितीने घेतला आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत शिक्षणासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाच्या 100 टक्के व्याज प्रतिपूर्तीचाही निर्णय उपसमितीने घेतला असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

सारथीच्या पीएचडी फेलोशिपसाठीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा तातडीने घ्यावी

या बैठकीत मंत्री श्री.पाटील यांनी सारथीच्या पीएच.डी फेलोशिपसाठीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परिक्षा तातडीने घेण्याचे सूचित केले. यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थांना गुणवत्ता यादीनुसार फेलोशिप देण्याची प्रक्रिया राबवण्याचे सूचित केले. तसेच सारथी संस्थेच्या योजना अमंलबजावणीचा आढावा घेऊन त्यांनी मराठा समाजातील तरुण तरुणींना उच्च शिक्षण, स्पर्धा परिक्षा यासह शेतकरी वर्गासाठीच्या सर्व योजनांची प्रवेश प्रक्रिया तसेच प्रशिक्षण संस्था यांची निवड प्रक्रीया पारदर्शकपणे करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

०००००