Banners in Pune : आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या

:  पुण्यात चंद्रकांत पाटलांचे बॅनर चर्चेत

पुणेकर हे टोमणे मारण्यात जगात प्रसिद्ध असल्याचं बोललं जातं. शिवाय, अनेकदा त्याचा प्रत्यय देखील येतो. किमान शब्दात कमाल अपमान करणे ही पुणेकरांची खासियत असल्याचंही सांगितलं जातं. शिवाय पुणेरी पाट्यांबाबत तर आणखी वेगळं काही सांगायलाच नको. पुणेरी पाट्यांवरील मजकूर तर जगभरात चर्चेत असतो. आता पुणेरी पाट्यांपाठोपाठ पुण्यात झळकणाऱ्या बॅनर्सची देखील चर्चा होताना दिसत आहे. कोथरूडमध्ये लावण्यात आलेले अशाचप्रकारेच एक बॅनर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे, शिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. कारण, हे बॅनर ज्यांच्यासाठी लावलं आहे आणि या बॅनरवर जो मजकूर हे दोन्ही अर्थातच काही सामान्य नाही.

पुण्यातील कोथरुडमध्ये म्हणजेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात हे बॅनर झळकले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचा फोटो असून, त्यासोबत ‘दादा परत’ या असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Chandrakant Patil : Raj Thackeray : चंद्रकांत पाटलांनी केले राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक!  म्हणाले….

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी केले राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक!  म्हणाले….

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याचे भाषण हे सामान्य हिंदूंच्या मनाला सुखावणारे होते. त्यांच्या भाषणामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली, अशी प्रतिक्रिया चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले की, देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता यांचे इतके स्तोम वाढले की हिंदूंना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. हिंदू म्हणजे बुरसटलेले, असे देशात सातत्याने पुस्तके, शिक्षण व भाषणातून मांडले गेले. जातीय तेढ निर्माण होऊ नये हे केवळ हिंदूनी सांभाळले पाहिजे असे झाले. पण सर्वधर्मसमभाव म्हणजे केवळ मुसलमानांचा सन्मान करायचा पण हिंदूंचा सन्मान करायचा नाही, असे चालणार नाही. तुम्ही आमच्या आरतीचा सन्मान करा, आम्ही तुमच्या अजानचा सन्मान करू. आपण एकत्र प्रेमाने राहू. पण सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे.

ते म्हणाले की, कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघर फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदानाच्या वेळी बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हे मनी लाँडरिंग आहे. मनी लाँडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार आहे. शहरातील मतदारांनाही आपले आवाहन आहे की, थोड्या रकमेच्या मोहात पडून आपले बँक खात्याचे तपशील देऊ नये, पुढे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचा धोका आहे.

त्यांनी सांगितले की, अबकारी कर खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील दारू दुकानदारांची बैठक घेऊन काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. काँग्रेसला पराभव दिसू लागल्याने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे. परंतु, आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारू.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला गती आली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार दि. ४ व ५ रोजी प्रचारात भाग घेतील. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे दि. ६ रोजी प्रचार करतील. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दि. ७ रोजी सभांना संबोधित करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे दि. ९ व दि. १० रोजी कोल्हापुरात प्रचारासाठी येतील. याखेरीज पक्षाचे अनेक नेते मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Hemant Rasne Vs Ankush Kakade : शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली  : राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला 

Categories
Breaking News PMC Political पुणे

शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली

: राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला

पुणे : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिका आयुक्तांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. स्थायी समिती बरखास्त होत नाही, असा मुद्दा रासने यांनी मांडला होता. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी रासने यांना टोला लगावला आहे. शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली, असा शाब्दिक टोला काकडे यांनी लगावला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनाही काकडे यांनी टोला लगावला आहे.
काकडे म्हणाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री हेमंत रासने यांनी अट्टाहासाने, स्थायी समिती रद्द होत नाही, यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे विनाकारण महानगरपालिकेला विधी खात्याला जो खर्च झाला त्याला जबाबदार कोण ? शेवटी  रासने यांची आपली हौस फिटली, पण महानगरपालिकेला मात्र आर्थिक बोजा पडला त्याला जबाबदार कोण? पण शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली असेच म्हणावे लागेल. चंद्रकांत दादा अतिशय चांगले अभ्यासू अध्यक्ष आपण पुणे महानगर पालिकेला दिले त्याबद्दल आपले देखील मनःपूर्वक अभिनंदन.

Sharad Pawar Vs Chandrkanat Patil : पवारसाहेब मन मोठे करा… पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका!

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पवारसाहेब मन मोठे करा… पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका

:  चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना टोला

पुणे : मुळा-मुठा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुण्याच्या विकासात पाय आडवा घालण्याचे काम केलेले आहे. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देत राज्य सरकारनेही पुण्याच्या विकासाबाबतची उदासिनता कृतीतून दाखवून दिलेली आहे. असा आरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच पवारसाहेब मन मोठे करा… पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका. असा टोलाही शरद पवार यांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवेला हिरवा कंदिल दाखविला. केवळ पाच वर्षांत भूमीपूजन ते उद्घाटन हा वेग भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्षमतेचे उदाहरणच होते. शहरांच्या विकासाचे प्रकल्प भाजपा प्रभावीपणाने आणि वेळेत पूर्ण करतो, हा विश्वास पुणेकरांच्या मनात निर्माण करणारी ही घटना होती. नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमीपूजन करून तोही वेळेत पूर्ण होणार, हे लक्षात आल्यानंतर त्याला अपशकून करण्याचे सूतोवाच गेल्याच आठवड्यात खासदार शरद पवार यांनी केले होते. काल झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय गुणात्मक नसून राजकीय आहे.
पाटील म्हणाले,  नदी पुनरूज्जीवन प्रकल्प किती संवेदनशील आहे, याची भारतीय जनता पार्टीस पूर्ण कल्पना आहे. हा प्रकल्प भाजपाच्या कल्पनाभरारीतून आलेला नाही तर पूर्ण अभ्यासांती होतो आहे. हा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प असल्याची आवई उठवून त्याला विरोध करण्याचा पवार यांचा प्रयत्न त्यांना शोभणारा नाही. नद्या आणि पाणी या संदर्भात शिखर संस्था असलेल्या सीडब्लूपीआरएसने जलसंपदा खात्याच्या शिफारसीनुसार या प्रकल्पाच्या हायड्रॉलॉजी आणि हायड्रॉलिक्स अभ्यासास डिसेंबर २०१७ मध्ये मान्यता दिलेली आहे. जवळपास पाच वर्षांच्या पूर्वाभ्यासानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाच वर्षांच्या कालावधीत जलसंपदा खाते, सीडब्लूपीआरएस, लोकप्रतिनिधी, विविध पर्यावरणविषयक संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमकर्मी, या प्रकल्पाशी निगडित असलेल्या नागरिकांशी संवाद केला गेला आहे. राष्ट्रीय हरित लवादात या प्रकल्पासंदर्भात आलेल्या सर्व रास्त मुद्द्यांचे निराकरण झाल्यावरच या प्रकल्पाच्या निविदा निघाल्या.
नदीत सांडपाण्याचा व दूषित पाण्याचा एक थेंबही जाणार नाही, यासाठी ११ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महापालिकेकडे असलेले मर्यादित आर्थिक स्रोत लक्षात घेउन मोदी सरकारने जायकाकडून ९९० कोटींचे कर्ज घेऊन त्यातील ८४१ कोटी रुपये अनुदानस्वरूपात महापालिकेला देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
माननीय शरद पवार पुण्याचा विकास तुम्ही करू शकता, असा भ्रम तुम्ही गेली पन्नास वर्षे पुणेकरांच्यात जोपासलात. परंतु तुमच्या दुर्देवाने पुण्यात, राज्यात आणि केंद्रात भाजपा सरकार आल्यावर पुणेकरांना विकास वेगाने होऊ शकतो आणि वेळेत होभ शकतो, याचे प्रत्यंतर आले. २०१२ च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात ‘नदीसुधार योजना राबवविणार,’ असे आश्वासन दिलेले होते. त्या कारकिर्दीत तुमच्या पक्षाची निर्विवाद सत्ता होती. परंतु त्या पाच वर्षांत आपल्याकडून त्याबाबत कोणतेही पाऊल पुढे पडले नाही. त्यानंतर २०१७च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पुन्हा नदीसुधार योजनेअंतर्गत काय काम करणार, याचा उल्लेख केलेला आहे.
पाटील पुढे म्हणाले,  पवारसाहेब, पुण्याच्या नदीची झालेली ओंगळवाणी अवस्था आम्हाला पाहवत नव्हती; म्हणूनच या नदीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आम्ही कंबर कसली. केंद्र सरकार आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मदतीचा हात पुढे केला. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यात भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाचा सर्वांगाने अभ्यास करता आला. आणि त्यानंतच या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले आहे. पुण्याचा विकास आपल्या सहभागाशिवाय कसा होऊ शकतो, या अहंकारापोटी आपण नदी पुनरूज्जीवन प्रकल्प रेंगाळण्याचा निर्णय घेतला असेल तर ते आपणास शोभा देणारे नाही. पुण्याच्या पर्यावरणात, आरोग्यात, सौंदर्यात आणि अर्थकारणात भर घालणारा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मन मोठे करा.

Chandrakant Patil appreciated the work of the ruling corporators : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सत्ताधारी नगरसेवकांच्या कामांचे कौतुक

Categories
Breaking News PMC Political पुणे

 प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सत्ताधारी नगरसेवकांच्या कामांचे कौतुक

: मधुकर बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण संपन्न

पुणे : महानगपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ रस्ते, ड्रेनेज, कचरा यामध्ये अडकून न राहता मेट्रो, नदी सुधार प्रकल्प, स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असे प्रकल्प करण्यावर भर दिला. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेला रक्तपेढीचा महत्वकांक्षी प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या कामांचे कौतुक केले.

पुणे महानगपालिकेच्या वतीने मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये मध्ये उभारण्यात आलेल्या मधुकर सखाराम बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, नंदिनी मधुकर बिडकर, निलेश आल्हाट, बाळासाहेब पाटोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

पाटील पुढे म्हणाले की, पालिकेकडे स्वतःची अशी रक्तपेढी नव्हती. रक्ताची निर्मिती कृत्रिम पद्धतीने करता येत नाही. त्यामुळे रक्त संकलन आणि रक्तसाठा करण्यासाठी रक्तपेढीची गरज होती. ही बाब लक्षात घेत पालिकेची स्वतःची पहिली रक्तपेढी सुरू होत आहे, याबद्दल बिडकर यांचे विशेष कौतुक केले पाहिजे. पालिकेत नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडताना भाजपच्या नगरसेवकांनी सतत पुणेकरांच्या हिताचे प्रकल्प राबविले आहेत. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, नदी सुधारणा, सांडपाणी प्रकल्प याबरोबरच विविध भागात उड्डाणपूल, अर्बन स्ट्रीट डिझाईनचे रस्ते यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी करोनाच्या काळात पालिकेने आपली आरोग्य व्यवस्था सक्षम केली. पालिकेकडे आज काही हजार ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. पालिका स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करत आहे. यासाठी स्वतःची रक्तपेढी असणे आवश्यक होते. ती जबाबदारी बिडकर यांनी घेतली आणि यशस्वीपणे पूर्ण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बिडकर यांनी ही रक्तपेढी उभारण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. जगात प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासते. पालिकेची स्वतःची अशी एकही रक्तपेढी नव्हती. परिणामी रक्ताची गरज भासल्यास प्रत्येकवेळी इतर रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. ही गरज ओळखून गेल्या वर्षीच्या पालिकेच्या अंदाजपत्रकात रक्तपेढीसाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार गेले वर्षभर काम करून पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ‘मधुकर बिडकर रक्तपेढी’ची निर्मिती करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा निश्चितपणे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेल्याने विशेष आनंद वाटत आहे. शहरातील सर्वात अद्यावत अशी ही रक्तपेढी असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पवार यांनी केले. तर आभार उद्धव मराठे यांनी मानले.

 

कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गणेश बिडकर यांच्या विकास निधीतून अत्याधुनिक लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयाच्या सर्व मजल्यांवर नवीन एलईडी लाईट, पंखे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला २५ किलोवॅट विजेची बचत होत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

Local Body Election : OBC reservation : BJP : भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत

Categories
Political social महाराष्ट्र

भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले.

ते म्हणाले की, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुरुवातीपासून बेपर्वाई व ढिलाई केली. मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करणारा निकाल दिल्यानंतरही हे सरकार जागे झाले नाही. त्यानंतर जरी तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई केली असती व एंपिरिकल डेटा गोळा केला असता तर ओबीसींना आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण परत मिळाले असते. महाविकास आघाडी सरकार सदैव टाळाटाळ करत राहिले. आताही सर्वोच्च न्यायालयात दाद मागताना सादर केलेला अहवाल कच्चा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यांनी सांगितले की, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार ढिलाई आणि वेळकाढूपणा करत राहिले आहे. भाजपा हे मान्य करणार नाही. आघाडी सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार कारवाई करून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले पाहिजे. हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.

BJP Pune : Rajesh Pande : PMC election : राजेश पांडे हे ‘निवडणूक संचालन समिती’ चे प्रमुख : भाजपकडून खुलासा 

Categories
Breaking News Political पुणे

राजेश पांडे हे ‘निवडणूक संचालन समिती’ चे प्रमुख

: भाजपकडून खुलासा

पुणे : गेले दोन दिवस पुणे शहरातील विविध प्रसिद्धी माध्यमांमध्ये पुणे शहर भाजपच्या निवडणूक संचालन समिती प्रमुख पदाच्या नियुक्ती बाबत वृत्त प्रसारित झाले आहे. यापैकी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत  भाजपने खुलासा केला आहे.

त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहर भाजपचे संघटन सरचिटणीसराजेश पांडे यांना पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ‘निवडणूक संचालन समिती’चे प्रमुख म्हणून अधिकृत नियुक्ती पत्र दिले आहे.  राजेश पांडे हे आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘निवडणूक संचालन समिती’चे प्रमुख म्हणून काम पाहातील.

भाजपने नुकतीच घोषणा केली होती कि शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका निवडणुका लढल्या जातील. त्या अगोदर भाजपने घोषणा केली होती कि महापालिका निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे राहतील. यामुळे भाजप मधेच संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आता भाजपला हा खुलासा करावा लागला आहे.

MLA Sunil Kamble’s work report : Chandrakant Patil : आमदार सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ हा मजबूत बालेकिल्ला

Categories
Breaking News Political पुणे

आमदार सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ हा मजबूत बालेकिल्ला

: पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये या महानगरपालिका निवडणुकीत चमत्कार घडेल – चंद्रकांत  पाटील

पुणे : “भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ (Pune cantonment constituency) हा मजबूत बालेकिल्ला आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांच्या नेतृत्वाखाली बनतो आहे,.  येत्या महानगरपालिका निवडणुकीत (PMC election) या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी शंभर टक्के यश मिळवेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी आज व्यक्त केला.

आमदार सुनील कांबळे यांच्या कार्य अहवालाचे उद्घाटन व भारतीय जनता पार्टीचे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील बुथ केंद्र प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांचा निवडणूक पूर्वतयारीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात  पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुनील कांबळे, शहर उपाध्यक्ष डॉक्टर श्रीपाद ढेकणे, मंडल अध्यक्ष महेश मुंडे, कुलदीप साळवेकर नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पन्नास वर्षात पुण्याच्या विकासासाठी केलेल्या कामांची चर्चा व भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची चर्चा खुलेपणाने करण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. पुणे शहराचा चेहरामोहरा बदलण्यात भारतीय जनता पार्टी अग्रेसर राहिली. त्याच प्रमाणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला बनला आहे. हा बालेकिल्ला बनवण्यात आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

आज झालेल्या कोरेगाव पार्क येथील मेळाव्यात  पाटील उपस्थित होते.  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सुरुवातीला आयोजन करण्यात आले होते. या मन की बात कार्यक्रमाचा कार्यकर्त्यांच्या समवेत दादांनीही लाभ घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना याची माहिती देणारे प्रदर्शनी कार्यकर्त्यांसाठी लावण्यात आली होती.

यावेळी बोलताना पुणे शहर उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉक्टर श्रीपाद ढेकणे यांनी बुथ प्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुख हीच पार्टीची खरी संपत्ती आहे आणि यात संपत्तीच्या आधारावर भारतीय जनता पार्टी पुण्याचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास व्यक्त केला.

येत्या निवडणुकीत कमळ कॅन्टोन्मेंट मध्ये फुलवू  : आमदार सुनील कांबळे

माझा कार्य अहवाल हा भारतीय जनता पार्टीच्या परंपरेला साजेसा व सामान्य माणसाला केंद्रित ठेवून केलेल्या कामाचा लेखाजोखा आहे, असे मनोगत यावेळी आमदार सुनील कांबळे यांनी केले. भारतीय जनता पार्टी ही जगातली एकमेव व्यक्तीच्या नाहीतर कार्यकर्त्यांच्या आधारे ओळखली जाणारी पार्टी आहे आणि तिला बळकट करण्याची जबाबदारी ही आपणास सर्व कार्यकर्त्यांची आहे. येत्या निवडणुकीत सामान्य माणसाच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीचे कमळ कॅन्टोन्मेंट मध्ये फुलवू या, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाची कन्टोनमेंट मतदार संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आगामी काळात कॅन्टोन्मेंट मतदारसंघांमध्ये होणाऱ्या महिला मेळावा, युवक मेळावा व विविध कार्यक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली.

मंडल अध्यक्ष महेश पुंडे यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक उमेश गायकवाड, लताताई धायरकर, मंगलाताई मंत्री, अर्चना पाटील, मनीषा लडकत, कालिंदाताई पुंडे, धनराज घोगरे, दिलीप गिरमकर जेष्ठ पदाधिकारी पोपटराव गायकवाड, पिल्ले आण्णा यावेळी उपस्थित होते

Mohan Joshi Vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील ५ वर्षात पुणेकरांसाठी काय केले सांगा ?

Categories
Breaking News PMC Political पुणे

चंद्रकांत पाटील ५ वर्षात पुणेकरांसाठी काय केले सांगा ?

: माजी आमदार मोहन जोशी यांचा आ. चंद्रकांत पाटील यांना सवाल

पुणे : काँग्रेस पक्षाने (Congress party) ५० वर्षात काय केले ? हे सांगण्याची उठाठेव करण्यापेक्षा भाजपने (BJP) गेल्या पाच वर्षात पुणेकरांना (punekar) काय दिले याचे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil)  यांनी द्यावे, असा सवाल माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi)  यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना मोहन जोशी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला. काँग्रेसची ५० वर्ष आणि भाजपची ५ वर्ष असे सूत्र प्रचारात मांडणार आहोत असे पाटील म्हणाले. काँग्रेस पक्षाने पुण्यासाठी खूप कामे केली आणि पुणेकरांना त्याची माहिती आहे. काँग्रेसचा आढावा घेण्यात वेळ घालविण्यापेक्षा भाजपने पाच वर्षात काय दिले ?ज्या पुणेकरांनी भाजपचे खासदार, आठ आमदार आणि १०० नगरसेवक निवडून दिले, त्या पुणेकरांसाठी परतफेड काय केली ? एकही मोठा प्रकल्प भाजपला कार्यान्वित करता आलेला नाही. साबरमतीच्या धर्तीवर मुळा मुठा नद्यांची सुधारणा करू असे आश्वासन दिले. नदी सुधारणा प्रकल्पाला विलंब लागला, जायका प्रकल्प महागला, गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना फसली, पाच वर्ष भाजपने अपयशी कारभार केला. शहरातील रस्त्यांची दूरवस्था करून पुणेकरांना मनस्ताप सोसावा लागला, अशी टीका मोहन जोशी यांनी केली.

महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी पुणेकरांपुढे विकास कामे मांडू शकणार नाहीत असे सांगून मेट्रो रेल्वे प्रकल्प हा कॉंग्रेस पक्षाने पुण्यात आणला याची आठवण भाजपने ठेवावी, असाही टोला मोहन जोशी यांनी लगावला. गेल्या पन्नास वर्षात भाजपच्या लोकांनी महापालिकेत पदे मिळविली, त्यांचाही हिशेब मांडा, असे मोहन जोशी म्हणाले.

BJP : PMC Election : महापालिका निवडणूक मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढणार भाजप

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका निवडणूक मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढणार भाजप

पुणे : पुणे महापालिकेची आगामी निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढविल्या जातील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, शुक्रवारी (ता.२५) प्रचारप्रमुख म्हणून राजेश पांडे यांची घोषणा केल्यानंतर आज हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल पक्ष कार्यालयात आयोजित केली होती. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे हे यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आपली निवडणुकीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. बूथ स्तरापर्यंतच्या रचना पूर्ण झाल्या आहेत. शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय निवडणूक व्यवस्थापन समितीची रचना लवकरच पूर्ण होईल. जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत भाजपचे शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील.