Chief Minister Eknath Shinde inaugurates the online Admissions Regulating Authority Module

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Chief Minister Eknath Shinde inaugurates the online Admissions Regulating Authority Module

 

 

Chief Minister Eknath Shinde and Higher and Technical Education Minister Chandrakant Patil today jointly inaugurated the online Admissions Regulating Authority module in Mantralaya. This module is prepared by the State Common Admission Entrance Examination Cell and Admissions Regulating Authority.

On this occasion Chief Secretary Manoj Saunik, Principal Secretary of Higher and Technical Education Vikaschandra Rastogi, Commissioner of State Common Admission Entrance Examination Cell Mahendra Warbhuvan, Secretary of General Administration Department Sumant Bhange, Secretary of Textile Department Virendra Singh, Principal Secretary of Industry Department Dr. Harshdeep Kamble, former bureaucrat J. P. Dange and other officers were present.

The State CET Cell provides admissions to nearly 2.75 to 3 lakh students seeking admission in private professional educational institutions for the first year through the centralized admission system. The Admissions Regulating Authority gives approval to admissions of the students thus admitted. To accelerate and simplify the process of approval for such proposals submitted to the Admissions Regulating Authority, this online module is developed.

Through this system, the candidates and colleges can submit the review petitions easily as the process is greatly simplified. Thus, this online system will prove greatly beneficial to colleges, candidates, and their guardians.
0000

Ajit Pawar | Guardian Minister | अजित पवार पुण्याचे पालकमंत्री | राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Ajit Pawar | Guardian Minister | अजित पवार पुण्याचे पालकमंत्री | राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

| चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती ची जबाबदारी

    राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- डॉ.विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदुरबार- अनिल पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
0000

Pune Water Cut | पुणे शहरात सध्या पाणीकपातीचा विचार नाही | कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | पुणे शहरात सध्या पाणीकपातीचा विचार नाही | कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Pune Water Cut | सध्या खडकवासला प्रकल्पात (Khadakwasla Project) पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर (Pune Water Supply) कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाचा परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत (Canal Advisory Committee Meeting) स्पष्ट केले. (Pune Water Cut)
 खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राहूल कुल, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,  पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणाची स्थिती चांगली आहे. पुढील महिन्याभरात पावसाचे प्रमाण कसे राहते त्यावर लक्ष ठेऊन ऑक्टोबरमध्ये पुढील नियोजन ठरविण्यात येईल.
पवना व चासकमान मध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

नीरा प्रणालीत समाधानकारक पाणी

नीरा प्रणालीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४ टीएमसी ने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा ९१ टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. तथापि, लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
कालव्याच्या टेलच्या भागातील शेतीला योग्य दाबाने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी कालवेक्षेत्रातील पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यकता भासल्यास ठराविक वेळेतच वीजपुरवठा करा. अवैध पाणीवापरावर नियंत्रण आणण्यासाठी मनुष्यबळाचे फेरनियोजन करत इतर ठिकाणचे मनुष्यबळ सिंचन व्यवस्थापनावर वापरात आणावे. बाह्य स्रोताद्वारे तात्पुरते मनुष्यबळ घेण्यात यावे, अशा सूचना महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी केल्या.
नीरा डाव्या कालव्याद्वारे संरक्षित सिंचन पूर्ण होताच शेटफळ तलाव ५० टक्के भरण्याचे नियोजन आहे. सध्या नीरा उजवा कालवा आणि डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून ते नियोजनाप्रमाणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस आमदार समाधान अवताडे, शहाजीबापू पाटील आदी उपस्थित होते.
000
News Title |

Pune Ganesh Utsav | गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन नाही | गणेश उत्सवात वाहतुकीला अडथळा आणू नका | उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Pune Ganesh Utsav | गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन नाही | गणेश उत्सवात वाहतुकीला अडथळा आणू नका | उपमुख्यमंत्री अजित पवार

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव नियोजन बैठक

Pune Ganesh Utsav | राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केले. उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, गणेशोत्सव साजरा करताना वाहतुकीला अडथळा येणार नाही याची गणेश मंडळांनी (Ganesh Mandal)  दक्षता घ्यावी. मेट्रो प्रशासनाने उत्सव काळात मेट्रो सेवा (Pune Metro Service) रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबत विचार करावा. गणेश मूर्तीच्या उंचीवर (Ganesh idol Height) शासनाने कोणतीही मर्यादा घातलेली नाही, मात्र गणेश मूर्ती विसर्जन करताना प्रदूषण होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल याची दक्षता घ्यावी. गणेश मूर्ती संकलनात जनतेच्या भावनांना धक्का लागणार नाही याकडेही लक्ष द्यावे. (Pune Ganesh Utsav)
उपमुख्यमंत्री श्री.पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. (Pune News)
धनकवडी भागातील मंडळांनी एकत्रितरित्या विसर्जन मिरवणूक काढण्याचा सुरू केलेला उपक्रम अनुकरणीय असून इतरही मंडळांनी तसा प्रयत्न करावा. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रस्त्यावरील उघडे चेंबर्स बंद करण्याची कारवाई त्वरित करावी. मिरवणूक मार्गावरील रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे कामही उत्सवापूर्वी करण्यात यावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही भागातील मार्गावर असलेली एकतर्फी वाहतूक शक्य असल्यास दुतर्फा सुरू करण्यात यावी. मानाच्या गणपतींसोबत इतरही मंडळांसोबतही खेळीमेळीचे वातावरण ठेवत त्यांच्या समस्या प्रशासनाने दूर कराव्यात. पुण्यातील गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव समजून सर्वांनी यात सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. (Ganesh Utsav Meeting)
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, गणेश मंडळांकडून महानगरपालिकेने कमानीसाठी कोणताही कर आकारू नये. महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वय साधून त्यांच्या समस्या दूर कराव्यात.  प्रशासनाने नियंत्रण मनोरे स्थापित करून त्या माध्यमातून नियोजनावर लक्ष ठेवावे. पोलीस मित्रांना प्रशिक्षित करून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करावा.गणेश मंडळाने स्वतः नियमावली तयार करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच सर्वांनी मिळून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले,  गणेशोत्सवासाठी वाहतूक नियमन, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे याबाबत योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी व्हाट्सअँप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी काळजी  घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
श्री.चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.
आयुक्त विक्रमकुमार यांनी गणेश मंडळांना ५ वर्षासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. उत्सवादरम्यान वाहनतळासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने २३, २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ध्वनिक्षेपक, वापरासाठी रात्री १२ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. मागील वर्षी ३ हजार ५६६ गणेश मंडळांची नोंदणी झाली होती. यावर्षीही तेवढ्याच प्रमाणात गणेश मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बैठकीला विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

*अशी आहे गणेशोत्सव स्पर्धा*

सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येईल. १० निकषांसाठी एकूण १५० गुणांक आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनीप्रदुषणविरहीत वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट/देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट/देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य,  शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येणार आहेत.
 अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. ८  सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५  हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.
0000

Meri Mati Mera Desh | PMC | पुणे शहरात रविवारी ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता

Categories
Breaking News PMC social पुणे

Meri Mati Mera Desh | PMC | पुणे शहरात रविवारी ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता

Meri Mati Mera Desh | PMC | पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation) ‘माझी माती माझा देश’ (Meri Mati Mera Desh) अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Cabinet Minister Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या आयोजनाने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून (PMC Pune) देण्यात आली आहे. (Meri Mati Mera Desh | PMC)
केंद्र शासन व राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेच्यावतीने (PMC Pune) ‘माझी माती माझा देश’ हे अभियान पुणे शहरात (Pune City) मोठ्या उत्साहाने राबवण्यात आले. या अभियानाच्या समारोपाच्या अनुषंगाने  हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय शिवाजीनगर पोलीस वसाहती जवळ शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation News)
0000
News Title | Meri Mati Mera Desh | PMC | ‘Majhi Mati Maja Desh’ initiative concluded in Pune city on Sunday

Medha Kulkarni | Chandni Chowk Flyover | कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत मेधा कुलकर्णी यांचा भाजपला घरचा आहेर!

Categories
Breaking News Political पुणे

Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover | कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत मेधा कुलकर्णी यांचा भाजपला घरचा आहेर!

| माझ्या कामावर बोळा फिरवला जातोय | कुलकर्णींचा आरोप

Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover |  भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी भाजपला (BJP) घरचा आहेर दिला आहे. आपल्याला डावलले जात असल्याची तक्रार त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. तसेच कोथरूडचे आधुनिक नेते असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांच्यासाठी माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना सोडावा लागला. त्यानंतर त्यांना अनेक संधीसाठी भाजपकडून डावलण्यात आले. त्यांनी याबाबत वेळोवेळी आपली नाराजी उघडपणे नाही तर, अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. त्यात उद्या (दि. 12) चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी फेसबुक पोस्ट लिहीत मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. (Medha Kulkarni |  Chandni Chowk Flyover)

मेधा कुलकर्णीं यांची फेसबुक पोस्ट काय आहे? 

मेधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पोस्टला त्यांनी ” असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे ” असे शिर्षक दिले आहे. यात त्या म्हणतात की, माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी.

चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?

मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.

गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. कारण माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे.

एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.

——

Savarkar Gaurav Yatra | भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

देशभक्तो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान! | कोथरुडकरांचा निर्धार

| भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सततच्या होणाऱ्या अपमानाविरोधात कोथरुड मधील सर्व सावरकर प्रेमींनी आज सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त केला. भर पावसात ही या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सावरकर प्रेमी नागरीक सावरकरांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरले होते. या गौरव यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी सावरकरजी के सम्मान में कोथरुडकर मैदान में, मैं भी सावरकर अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व भारतीयांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, आशा भावना यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.


पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे ब्रिटिशांना भारतातून जावं लागलं. कॉंग्रेसचे नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहे. त्यामुळे विरोधकांचं महापुरुषांप्रतीचं प्रेम बेगडी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान देशातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Chandrakant Patil | गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News cultural Political social पुणे

गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प

| नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

पूर्वीच्या काळी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी आजीच्या गोष्टी हे अतिशय महत्त्वाचं माध्यम होतं. पण कालांतराने त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सकारात्मक बाबी गोष्टींच्या माध्यमातून सांगून, संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मध्ये आईची गोष्ट ऐकायला आणि संस्काराचे मोती या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी स्पर्धेच्या संयोजिका माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अयक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस अनुराधा एडके, मिताली सावळेकर,माजी नगरसेविका डॉ.‌श्रद्धा प्रभुणे पाठक, सौ.वासंती जाधव,सौ. हर्षाली माथवड, पर्यवेक्षिका मोनिका जोशी , डॉ.केशव क्षीरसागर, मनिष तथा बंटीशेट निकुडे, गणेश भोसले, राज तांबोळी, नवनाथ जाधव, योगेश राजापूरकर, शंतनू खिलारे, रामदास गावडे, आकाश कातुरे,सौ.कल्याणी खर्डेकर, सौ.प्रणेती लवंगे,प्रतीक खर्डेकर, सतीश कोंडाळकर, दत्तात्रय देशपांडे,यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे लहान मुलांवर उत्तम संस्कार होत होते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजी किंवा आजोबा लहान मुलांवर गोष्टींच्या माध्यमातून चांगले संस्कार करायचे. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे प्रमाण घटले आहे. आता ही जबाबदारी आईंवर आली आहे. त्यामुळे सकारात्मक बाबी गोष्टींच्या माध्यमातून सांगून, संस्कारक्षम पिढी निर्माण करणे आणि समाजातील वाईट प्रवृत्ती मोडीत काढण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,‌ लहान मुलांसाठी उन्हाळ्यात मामाच्या गावाला जाणं हा वेगळाच आनंदाचा विषय असतो. याकाळात मुलांना आपले छंद मनसोक्तपणे पूर्ण करता येतात. सहलींसोबत भारतीय मैदानी खेळ कमी झाल्यामुळे, मामाच्या गावाला जाऊया उपक्रम कोल्हापूरला सुरू केला. तसाच उपक्रम पुण्यातही सुरू करणार आहे. या माध्यमातून मुलांमध्ये सहलीच्या माध्यमातून आसपासच्या परिसराविषयी माहिती देणं आणि भारतीय मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका मंजुश्री खर्डेकर यांनी केले. त्या म्हणाल्या की, माननीय चंद्रकांतदादांचे कार्य म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असते. त्यामुळे माननीय दादा असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित असतात. नवीन पिढी संस्कारक्षम होण्यासाठी लहान मुलांना गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असे सांगतानाच स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व ही अभिनव स्पर्धा आयोजित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आम्हाला मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी ह्या उपक्रमाची मोठीच मदत झाल्याची भावना ही अनेक मातांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्त केल्याचे अनुभव ही मंजुश्री खर्डेकर यांनी कथन केले.कानडी महिलेने मोडक्या तोडक्या मराठीत कथा सांगण्याचे धाडस असेल किंवा हिंदीत गोष्ट सांगणारी आई, मावळ्याच्या वेशात जीवा महाले यांची कथा सांगणारी आई असेल किंवा दर आठवड्याला मुलांना गोष्टी सांगण्याचा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्यात यावा असे सांगणाऱ्या माता सर्वांचे अनुभव समृद्ध करणारे होते असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. स्पर्धेचे परीक्षण मोनिका जोशी आणि स्वप्ना शिर्के यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले.

प्रथम पुरस्कार 25000 रोख व मानपत्र सौ. मनीषा गढरी यांना , द्वितीय पुरस्कार 15000 रुपये व मानपत्र प्रीती लांडे यांना संस्कारांचे मोती ह्या गोष्टी साठी तर तृतीय पुरस्कार नम्रता पाटील यांना शूर शिवराय या कथेसाठी रुपये 10000 रोख व मानपत्र,तसेच उत्तेजनार्थ प्रथम प्रिया लांजेवार , द्वितीय पुरस्कार अनघा दीक्षित यांना रुपये 2000/ देण्यात आले.तसेच अंतिम फेरीतील सर्व स्पर्धक भगिनींना 1000 रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

Chandrkant Patil | BJP | सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागा! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपा कार्यकर्त्यांना सूचना

Categories
Breaking News Political पुणे

सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागा!

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपा कार्यकर्त्यांना सूचना

| खासदार गिरीश बापट आणि भाजपाचे हेमंत रासने यांची भेट

कसबा विधानसभा पोटनिवडणुक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा खासदार गिरीश बापट आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली. यावेळी हेमंत रासने यांच्या भेटीत कार्यकर्त्यांना संवाद साधून पुन्हा जोमाने कामाला लागण्याची सूचना केली.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा अनपेक्षित पराभव झाला. या पराभवानंतर काही कार्यकर्ते निराश झाले होते. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी रासने यांच्या घरी कसबा मंडलाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीत पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोट निवडणुकीत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. संघर्ष हा भाजपाचा स्थायीभाव आहे. संघर्षाच्या बळावरच आपण अनेक आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना करुन परतवून लावली. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे,” असा विश्वास दिला. यानंतर सर्वांनी आता जिंकेपर्यंत लढायचं, असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबियांशी ही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संवाद साधला. त्यांनाही कामाला लागण्याची सूचना केली. त्यावर हेमंत रासने यांच्या पत्नी सौ. मृणाली रासने यांनी ‘निवडणुकीच्या काळात सर्वांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. यातून सर्वांचे रासने कुटुंबासोबत अतूट नाते निर्माण झाले आहे. हे नाते जपण्यासोबतच अजून पुढे वाढविणार’ असल्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, रासने यांच्या भेटीपूर्वी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी खा. गिरीश बापट यांचीही सदिच्छा भेट घेतली‌. यावेळी श्री. पाटील यांनी खा. बापट तब्येची विचारपूस केली. ‘बापट साहेब आपण काळजी घ्या, आणि लवकर बरे व्हा!’ अशी सदिच्छा व्यक्त केली.

Balasahebanchi Shivsena | कसबा पोटनिवडणूक | महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण ताकद लावणार 

Categories
Breaking News Political पुणे

कसबा पोटनिवडणूक | महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण ताकद लावणार

| शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांचे बैठकीत आश्वासन

पुणे | कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा अजेंडा हा हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचा पक्ष पूर्ण ताकद लावणार आहे. असे आश्वासन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी महायुतीच्या बैठकीत दिले. तसेच निवडणुकीत आपण स्वतः उभे आहोत, असे समजून काम करा, असा सल्ला देखील त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. (city president Nana Bhangire)
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. निवडणुकीतील प्रचाराचे या बैठकीत नियोजन करण्यात आले. यावेळी आपले मत व्यक्त करताना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी पक्षाची पूर्ण ताकद लावणार असल्याचा निर्धार केला. यावेळी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, किरण साळी आदी नेते उपस्थित होते. (Balasahebanchi Shivsena)
भानगिरे पुढे म्हणाले, या निवडणुकीत आपण स्वतः उमेदवार आहोत, असे समजून सर्वांनी काम करायचे आहे. त्यासाठी कुठलाही मानपान न ठेवता आणि कुणाच्या मेसेजची वाट न पाहता उत्साहाने काम करायचे आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. आम्ही आमच्या स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. त्या माध्यमातून आम्ही तळागाळापर्यंत पोचतो आहोत. तसेच पदयात्रा, पत्रक वाटप अशी कामे करत घरोघरी पोचतो आहोत. पुढे ही जाणार आहोत. भानगिरे म्हणाले, कालच मुख्यमंत्र्यांनी मला प्रचाराच्या नियोजनाबाबत फोन करून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पक्षाने ताकद लावून काम करायचे आहे. कारण आपला हिंदुत्वाचा अजेंडा आहे. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. कसबा मतदारसंघ हा गिरीश बापट, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा आहे. तो तसाच भाजपच्या हातात ठेवण्यासाठी आपल्या सर्वाना उत्साहाने काम करायचे आहे.
नाना भानगिरे पुढे म्हणाले, समन्वय ठेऊन आम्ही कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहोत. तसेच पीएमपी कर्मचाऱ्याच्या सातव्या वेतन आयोगासाठी आपण प्रयत्न केले होते. ते मतदार देखील आपल्याला सहकार्य करणार आहेत. अशा सर्वच घटकांशी आम्ही संपर्क ठेऊन आहोत. आमचे सर्वच कार्यकर्ते मन लावून आणि पूर्ण ताकदीने काम करतील, असा विश्वास यावेळी भानगिरे यांनी दिला. (Balasahebanchi Shivsena)