Balbharati to Paud Fata road | बालभारती ते पौड फाटा रस्ता | महापालिकेला सल्लागाराने दिले तीन पर्याय

Categories
Breaking News PMC पुणे

बालभारती ते पौड फाटा रस्ता | महापालिकेला सल्लागाराने दिले तीन पर्याय

पुणे – बालभारती ते पौड फाटा रस्ता तीन प्रकारे करण्याचे पर्याय सल्लागाराकडून देण्यात आले आहेत. यामध्ये १.८ किलोमीटरचा बोगदा करणे, उन्नत मार्ग (इलोव्हेटेड) किंवा थेट डोंगरातून रस्ता करणे या तीन पर्यायांचा समावेश आहे. यावर आता पथ विभाग यापैकी एका मार्ग अंतिम करून तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी यांनी दिली.
 सेनापती बापट रोड ते कोथरूड तसेच शहराच्या आग्नेय भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही.  त्यामुळे सेनापती बापट रोडसह लॉ कॉलेज रोडवर सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे.  येथे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी बालभारती ते पौड फाटा हा रस्ता महापालिका प्रशासनाने हनुमान डोंगरापासून शहराच्या विकास प्रारूपात प्रस्तावित केला होता.  विकास मॉडेलला मंजुरी मिळाल्याने आता या रस्त्याच्या कामाची तयारी मनपा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.  यापूर्वी त्याचे कामही महापालिकेने सुरू केले होते.  मात्र मनपाच्या विरोधात अनेक पर्यावरणप्रेमी न्यायालयात गेले होते.  त्यामुळे या रस्त्याचे काम बंद पडले.  दरम्यान, या रस्त्याच्या वरच्या भागात एचसीएमटीआरही होत आहे.  यामुळे आता या भागात दोन रस्त्यांऐवजी एकाच ठिकाणी हा रस्ता करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.  त्यामुळे पर्यावरणाचीही हानी होणार नाही.  त्यामुळे मैदानावरील रस्त्याऐवजी एलिव्हेटेड रोडबाबतही पालिकेचे लक्ष आहे.
या रस्त्याचे काम करण्याचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला होता, या सल्लागाराचे काम पूर्ण झाले असून. त्याचा अहवाल येत्या आठवड्याभरात सादर केला जाणार आहे. दरम्यान या बालभारती ते पौड रस्ता हा रस्ता तीन प्रकारे केला जाऊ शकतो, पण पर्यावरणाचे रक्षण व खर्चाचा विचार करून यातील एक पर्याय निश्‍चीत केला जाणार आहेत. बालभारती ते पौड फाटा रस्ता करताना तो थेट जसा डोंगर आहे तसा रस्ता केला जाईल. त्यामुळे चढ, उतार याचा समावेश असेल. आवश्‍यक तेथे नाले किंवा डोंगरावरील पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यासाठी छोटे पूल असतील. पण यामुळे या टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी अडथळा होऊ शकतो. या रस्त्यासाठी ८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.  १.८ किलोमीटरचा रस्ता मेट्रोप्रमाणे उन्नत मार्ग करावा. साधारणपणे तीन मीटरचे पिलर उभारून त्यावरून हा रस्ता केला जाईल. त्यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांना अडथळा होणार नाही. या मार्गासाठी १७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.  या दरम्यान टेकडीच्या खालून बोगद्याचा पर्याय सल्लागाराने दिला असून, त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. पण बोगदा केल्याने पाण्याचे झरे खंडित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शहरातील कोणत्याही टेकडीच्या खालून बोगदा करण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला आहे. खर्चाचा विचार करता महापालिका या पर्यायाचा विचार करण्याची शक्यता कमी आहे.
 एक किंवा पर्याय दोन निवडला या टेकडीवरील १ हजार ४०० झाडे तोडावे लागणार आहेत. त्याबदल्यात शासनाच्या नियमानुसार वृक्षारोपण केले जाईल.

Katraj-Kondhva Road | भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा आराखडा बदलणार 

Categories
Breaking News PMC पुणे

भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा आराखडा बदलणार

| सल्लागारास सुधारीत रचनेचा आराखडा करण्याच्या सूचना

पुणे : कात्रज कोंढवा रस्त्यासाठी करोडो रुपयाचा खर्च होणार आहे. हा यातील ज्यादा खर्च हा भूसंपादन साठी होणार आहे. त्यामुळे भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा आराखडा बदलला जाणार आहे. त्यासाठी, या रस्त्याचा सुधारीत आराखडा तयार करण्यात येणार असून त्याबाबतच्या सूचना या रस्त्याचे काम देण्यात आलेल्या सल्लागारास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यासाठी आता पर्यंत केलेला कोटयावधीचा खर्च मात्र वाया जाणार आहे. अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

 

हडपसरकडून नवीन पुणे-बेंगलोर महामार्गाकडे जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. सध्याच्या स्थितीत हा रस्ता अवघा 18 मीटर रूंद असल्याने तसेच रस्त्याच्या कडेला अनेक भागात अतिक्रमणे झाल्याने या रस्त्यांवर मोठया प्रमाणात अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेडून हा रस्ता तब्बल 84 मीटर रूंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर या चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी करावे लागणार भूसंपादनासाठी तब्बल 650 कोटींचा खर्च अपेक्षित होता तर या रस्त्याचे काम करण्यासाठी पालिकेने 31 ऑक्‍टोबर 2018 रोजी तब्बल 149 कोटींच्या खर्चास मान्यता दिली तर हे काम भूसंपादनासह तीन वर्षात करण्यात येणार होता. मात्र, भूसंपादनासाठी नागरिक रोख मोबदला मागत असल्याने तीन वर्षांच्या मुदतीनंतरही या रस्त्याचे 20 टक्केच काम झाले आहे. तर आता पर्यंत भूसंपादन झालेल्या रस्त्यावर 39 कोटींचा खर्च करण्यात आला असून या कामास दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मात्र, आता पालिकेकडे सर्व जागामालक रोख मोबदला मागत असल्याने पालिकेची भूसंपादनाची क्षमताच नाही. तर रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने अपघात थांबण्यास तयार नाहीत. त्यामुळे, हा रस्ता अर्धवटच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने या रस्त्याची रूंदीच कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, महापालिकेचा भूसंपादनाचा खर्च निम्म्या पेक्षा अधिक वाचणार आहे. तसेच प्रकल्पाचा खर्चही कमी होणार असून रस्ता तातडीनं पूर्ण करता येणार आहे. महापालिका आयुक्तांसह, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केल्यानंतर याबाबत चर्चा झाली असून त्यानुसार, रस्त्याची रूंदी 40 मीटर केल्यानंतर भूसंपादनाचा खर्च किती वाचेल, किती ठिकाणी 40 मीटर रस्त्याचे भू संपादन पूर्ण झाले असून उर्वरीत ठिकाणी भूसंपादन करावे लागेल का ? प्रकल्पाचा खर्च किती कमी होईल याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना सल्लागारांना देण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली.
——————