Tag: cyber crime
Senior Citizens Day | ज्येष्ठ नागरिकांना जागरुक करण्यासाठी आर्थिक व सायबर फसवणुकीविषयी मार्गदर्शनासाठी परिसंवाद
Senior Citizens Day | Pune | सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे आणि कर्वे समाजकार्य महाविद्यालय, कर्वेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्वे समाजकार्य महाविद्यालय येथे मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ वाजता ज्येष्ठ नागरिक दिन साजरा (Senior Citizens Day Celebration) करण्यात येणार आहे. सायबर गुन्हेगारीद्वारे (Cyber Crime) ज्येष्ठ नागरिकांची (Senior Citizen) आर्थिक फसवणुकीचे (Financial Fraud) वाढते प्रमाण पाहता ज्येष्ठ नागरिकांना जागरुक करण्यासाठी ‘आर्थिक, सायबर गुन्हे मार्गदर्शन व परिसंवाद’ याप्रसंगी आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे व्यतीत करता यावा. समाजामध्ये त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ९ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्याचे सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. (Why is Senior Cititzens Day Celebrated!)
त्याअनुषंगाने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी समाज कल्याण प्रादेशिक उपआयुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे, कर्वे समाज सेवा संस्था संस्थेचे विश्वस्त मधुकर पाठक यांची प्रमुख उपस्थिती असेल. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी केले आहे.
Banking Fraud | बँकिंग फसवणुकीचा नवा मार्ग! | आधी पैसे येतील खात्यात, मग तुमचे कष्टाचे पैसे साफ होतील | जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Juice Jacking| सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनवर मोबाईल फोन किंवा लॅपटॉप चार्ज करणे तुम्हाला महागात पडू शकते | याविषयी सर्व काही जाणून घेऊया | जाणून घ्या काय आहे प्रकरण
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार होणार
| गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई : सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले.
राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, प्रधान सचिव सुरक्षा संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक सायबर व आर्थिक गुन्हे मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक नियोजन व समन्वय संजय वर्मा,विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सायबर गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी राज्यात सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रभावीपणे सायबर कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागाच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात यावा. सायबर गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर करता यावी, आरोपीविरोधातील भक्कम पुरावे गोळा करता यावेत तसेच भविष्यात या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजता यावेत यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याच्या सूचनाही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी यावेळी दिल्या.सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री देण्यात आलेली आहे. या उपलब्ध साधनसामुग्रीचा परिपूर्ण वापर करावा. तसेच या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
धार्मिक भावना भडकावणारे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रकार घडल्यास त्यांना तत्काळ अटकाव करावा लागतो यासाठी सायबर स्पेसवरुन संबंधित मजकूर हटविणे आवश्यक असते. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगाराला कठोर शासन करण्यासाठी विद्यमान कायद्यातील ज्या कलमांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यांचा परिपूर्ण अभ्यास करून त्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही गृहमंत्री यांनी यावेळी दिले. सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांकाची प्रभावी प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच या आव्हानाला तोंड देण्यासाठी शासनामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना, अत्याधुनिक तंत्रप्रणाली आणि व्यवस्थेसंदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीत सायबर विभाग सक्षमीकरण, सद्यस्थितीत सुरु असलेलं प्रकल्प आणि अन्य अनुषंगिक बाबींवर सविस्तर चर्चा झाली.