PMPML : Hemant Rasane : Standing Commitee : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा

: दर माह दिले जाणार 6 कोटी

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे सुरु झाले आहे. मात्र पीएमपी च्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. याबाबत वारंवार मागणी देखील केली गेली. याची दखल घेत स्थायी समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा केला आहे. वाढीव वेतनासाठी संचलन तुटीमधून 6 कोटी रुपये दरमहा अग्रीम स्वरूपात देण्यात येणार आहेत. शिवाय पुढील पाच वर्ष बजेट मध्ये प्रति वर्ष 52 कोटींची तरतूद देखील जाणार आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

: स्थायी समितीने ही उपसूचना मान्य केली

पी.एम.पी.एम.एल.ची सद्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, सातवा वेतन आयोग धर्तीवर सुधारीत वेतन अदा करणेकामी र.रू.६.०० कोटी प्रतिमहा पुढील वर्षी देण्यात येणा-या संचलन तूटीमधून अग्रिम स्वरूपात देणेस त्याचप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणीची थकबाकी देणेकामी पुणे मनपा हिश्याची रक्कम अंदाजे र.रु.२६१.७६ कोटी होत आहेत. सदरची थकबाकी ७ हफ्त्यात देणेकामी पुढील ५ वर्षाच्या
अंदाजपत्रकात र.रू.७२.३६ कोटी प्रतिवर्ष इतकी तरतूद करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
 पुणे महानगर परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस, पी.एम.पी.एल कामगार युनियन च्या वतीने पुणे महानगरपालिकेस घेराव घालण्यात आला होता. पुणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या प्रमाणे पीएमपीएल कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा ही ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीमधील सदस्यांनी ठराव दिला होता, त्यानुसार स्थायी समितीने कामगारांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी ६  कोटी रुपये दिले.
: दिपाली प्रदीप धुमाळ  विरोधीपक्ष नेत्या, पुणे मनपा.

Deepali Dhumal : सल्लागार आणि इन्शुरन्स कंपन्याचे पोट भरण्यासाठी योजना बंद पाडण्याचा  उद्योग : विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

सल्लागार आणि इन्शुरन्स कंपन्याचे पोट भरण्यासाठी योजना बंद पाडण्याचा  उद्योग

: विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा आरोप

 

पुणे : गोरगरिबांची शहरी गरीब योजना बंद करून सल्लागार आणि इन्शुरन्स कंपन्या यांचे पोट भरण्यासाठी ही योजना बंद पाडण्याचा हा उद्योग सुरू आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. असा आरोप विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

धुमाळ यांनी सांगितले, शहरी गरीब योजनेत एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले नागरिक व झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक हे याचा लाभ घेतातकोरोना काळ आल्यापासून मागील एक वर्ष लॉकडाऊन मुळे सर्व धंदे दुकाने जवळपास बंद होती. दुकाने उघडली तरीदेखील व्यवसाय जसा हवा तसा कोणालाही करता आला नाही त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.

आर्थिक उत्पन्न हे दरवर्षी नागरिकांचे बदलत असते एक नागरिक सोसायटीमध्ये राहतो म्हणून त्यांनी शहरी गरीब योजनेचा लाभ घ्यावयाचा नाही असे म्हणणे चुकीचे आहे. सोसायटी मध्ये दोन खोल्यांचे फ्लॅट मध्ये राहणारा नागरिक देखील आजच्या काळात नोकरी गमावून बसला आहे किंवा त्याचा व्यवसाय पूर्वी जसा होता, तसा आता होत नाही ही परिस्थिती सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत पुणे महापालिकेचे दवाखाने सक्षम होत नाहीत तोपर्यंत शहरी गरीब योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे व तिचा विस्तार केला पाहिजे असे माझे मत आहे. असे धुमाळ म्हणाल्या.

शहरी गरीब योजनेचा लाभ काही सोसायटीमध्ये राहणारे नागरिक घेत आहेत म्हणून ही योजनाच बंद करा हे चुकीचे आहे. शहरी गरीब योजनेची आजपर्यंत हजारो खऱ्या खुऱ्या गरजवंतांना मदत झाली आहे. पुणे महापालिकेची एकंदरीत आरोग्य यंत्रणा, प्रथमिक आरोग्य केंद्र व दवाखान्याची स्थिती सक्षम नाही. पुणे महापालिकेची सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेली आणि यशस्वी ठरलेली शहरी गरीब ही एकमेव योजना आहे. आरोग्यावर एकूण बजेटच्या 6 टक्के खर्च करणे बंधनकारक आहे, ते पुणे महापालिका करत नाही. शहरी गरीब योजनेसाठी केलेला अत्यावश्यक खर्च पुणे महापालिकेने केला पाहिजे पुणेकरांचे कररूपी पैसे पुणेकरांसाठी वापरले जावेत.  या योजनेतील अटी, नियम यांचे पालन झाले पाहिजेच ते प्रशासनाने सक्षमपणे करावे. असे ही धुमाळ यांनी सांगितले.

Deepali Dhumal : PMC election : माझी खात्री आहे; महापौर राष्ट्रवादीचाच होणार : विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांचा दावा

Categories
Breaking News PMC Political पुणे

माझी खात्री आहे; महापौर राष्ट्रवादीचाच होणार

: विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांचा दावा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना आज जाहीर झाली असून संपूर्ण शहरात याची चर्चा जोरदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर पुणे महानगरपालिकेत बसेल असे आज मी खात्रीने सांगते. असा दावा महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्या आणि राष्ट्रवादी नेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे.
धुमाळ यांनी सांगितले, भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच वर्षात केलेला भ्रष्ट कारभार, जलपर्णी साठी 23 कोटी खर्च, नदी प्रदूषण, वाहतूक समस्या, अशा अनेक समस्या व घोटाळे बघता पुणे महानगरपालिकेतील भाजपची सत्ता नक्कीच जाईल. राष्ट्रवादी स्वबळावर लढली तरी महापौर राष्ट्रवादीचाच असेल असा विश्वास वाटतो कारण प्रभाग रचना जाहीर झाल्या आणि भाजपच्या गोटात खळबळ उडाली.
भाजपच्या नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्न देखील सोडवले नाही म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही

Deepali Dhumal : Honor : सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सुनील भागवत यांचा सन्मान !

Categories
PMC social पुणे

सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सुनील भागवत यांचा सन्मान !

 

पुणे: विरोधी पक्षनेत्या तथा नगरसेविका  दिपाली प्रदीप धुमाळ ( Deepali Dhumal) यांच्या शिफारशीनुसार सुनील मोरेश्वर भागवत यांना सामाजिक क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांचा नगरसेविका  दिपालीताई धुमाळ व मा. शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ(Baba Dhumal)  यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सुनिल भागवत हे तिस वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छतेबाबत शिबीर आयोजित करून परिसराची भुमातेची स्वच्छता कशी राहील याची जनजागृती प्रचार व प्रसार करीत आहे रोज सकाळी सहा ते नऊ यावेळेत श्रीराम सोसायटी ते शनिमंदीर हा परिसर स्वच्छ करित आहै.

स्वच्छतेत जगुया सारे, मन शुध्द करूया सारे
हे बोध वाक्य त्यांनी स्वतः तयार करून या उक्तीनुसार कार्य करीत आहे हे कार्य पाहूनच विरोधीपक्ष नेत्या दिपालीताई प्रदिप धुमाळ यांनी पुणे महानगर पालिकेच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो.  सुनिल भागवत यांचा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मनपा च्या वतीने सन्मान विरोधी पक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते अशी माहिती प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांनी दिली.

Deepali Dhumal : Road Works : रस्ते खोदाईस परवानगी देताना रस्ते पूर्ववत करण्याची अट घाला  : विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

Categories
PMC Political पुणे

रस्ते खोदाईस परवानगी देताना रस्ते पूर्ववत करण्याची अट घाला

: विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची आयुक्तांना मागणी

पुणे : शहरातील रस्ते, पाण्याची पाईप लाईन, विद्युत, ड्रेनेज, भूमिगत केबल आदि कामांसाठी खोदाई केली जाते. या सर्व कामांमध्ये अनेकदा पाण्याची पाईप लाईन ,ड्रेनेज लाईन ,तुटतात किंवा फुटतात परंतु त्या योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्या जात नाही,अथवा त्या दुरुस्त न करताच तश्याच ठेवल्या जातात. यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे विविध कारणासाठी रस्त्यांची खोदाईस परवानगी देतांना व खोदाई नंतर रस्ते पूर्ववत वदुरुस्ती करताना रस्ते पूर्वी होते तसेच करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात यावी. अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

: नागरिकांना नाहक त्रास

याबाबत धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांना एक पत्र दिले आहे. त्यानुसार  शहरातील रस्ते, पाण्याची पाईप लाईन, विद्युत, ड्रेनेज, भूमिगत केबल आदि कामांसाठी खोदाई केली जाते.सदर कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी अनेकदा सिमेंट कोन्क्रीटचा वापर केला जातो परंतु जे रस्ते डांबरी करण केलेले आहेत असे रस्तेही कॉंक्रीट द्वारेच पूर्ववत केले जातात त्यामुळे सदर रस्त्यान मध्ये उंचवटा किंवा खोलगट भाग निर्माण होतो व अनेकदा सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. तसेच फुटपाथ व ब्लॉक बसविलेल्या ठिकाणी रस्ते खोदाई नंतर अशाच प्रकारे कॉंक्रीट द्वारेच पूर्ववत केले जाते. त्यामुळे फुटपाथही नागरिकांना वापरास सुलभ राहत नाही. या सर्व कामांमध्ये अनेकदा पाण्याची पाईप लाईन ,ड्रेनेज लाईन ,तुटतात किंवा फुटतात परंतु त्या योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्या जात नाही,अथवा त्या दुरुस्त न करताच तश्याच ठेवल्या जातात. पत्रात पुढे म्हटले आहे कि विविध कामांसाठी रस्ते खोदाई परवानगी देताना ठराविक मुदतीची अट घातली जाते ; परंतु मुदत संपल्यानंतर ही सदर काम चालू ठेवले जाते. तसेच कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका होणार नाही नया साठी आवश्यक खबरदारी घेतली जात नाही.या सर्व बाबतीत संबधीत ठेकेदार व अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.
या रस्ते खोदाई परवानगी देताना नियम व अटींमध्ये खोदाई नंतर रस्ते पूर्ववत करताना डांबरी रस्ते डांबरीकरण करून व सिमेंट रस्ते कॉंक्रीटीकरण करून तसेच फुटपाथ व पेविंग ब्लॉकचे रस्ते पेविंग ब्लॉकनेच दुरुस्त करणे बाबत समावेश करणे आवश्यक आहे.
तरी विविध कारणासाठी रस्त्यांची खोदाई केल्यानंतर रस्ते पूर्ववत व दुरुस्ती करताना ठेकेदारास रस्ते पूर्ववत करतांना पूर्वी होते तसेच करण्याची अट घालण्यात यावी. अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Deepali Dhumal : संजीवन वन उद्यानामध्ये मुख्य प्रवेशद्वार व मियावाकी गार्डनचे भूमिपूजन !

Categories
cultural PMC Political पुणे

संजीवन वन उद्यानामध्ये मुख्य प्रवेशद्वार व मियावाकी गार्डनचे भूमिपूजन !

पुणे : वारजे येथे ३५ एकर जागेवर पुणे महानगरपालिका व वनविभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून साकारल्या जात असलेल्या संजीवन वनोद्यानातील मियावाकी गार्डनचे व मुख्य प्रवेशद्वारचे भूमिपूजन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर खटके, डॉ. महेश ठाकूर,  वनविभागाचे अधिकारी प्रदीप संकपाळ व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी वंदना चव्हाण यांनी संजीवन वनोद्याना कशाप्रकारे साकारले जात आहे याची माहिती घेतली. वारजेकरांसाठी हे वनोद्याना पर्वणी असून यामुळे वारजेतील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळणार आहे. वनोद्यानाच्या वेगाने सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व वनोद्याना लवकर पूर्ण होऊन ते नागरिकांना खुले व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

वारजे येथे डुक्कर खिंडीजवळ वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये वन विभाग व पुणे महापालिका यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या या वानोद्यानाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर चार महिन्यात आतापर्यंत अनेक देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. झाडांना पाणी देण्यासाठी टाक्या बसवण्यात आल्या आहेत. वनोद्यानाच्या विकासाचे काम अविरत सुरू असल्याचे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.

PMC : Education Board employee : Bonus : शिक्षण मंडळाकडील रोजंदारी सेवकांना  मिळणार बोनस 

Categories
Breaking News PMC पुणे

शिक्षण मंडळाकडील रोजंदारी सेवकांना  मिळणार बोनस

: स्थायी समितीची मान्यता

पुणे : प्रशासकीय अडचणींमुळे यंदाच्या आर्थिक वर्षात शिक्षण मंडळाकडील रोजंदारीतील ९६ सेवकांना सानुग्रह अनुदान व बोनस व र.रू.३ हजार बक्षीस रक्कम याचा लाभ देण्यात आलेला नाही. तरी शिक्षण मंडळाकडील रोजंदारी सेवकांना सानुग्रह अनुदान व बोनस हजर दिवसाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात यावी. असा प्रस्ताव महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यास समितीने मंजुरी दिली आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

: दीपाली धुमाळ यांनी दिला होता प्रस्ताव

धुमाळ यांच्या प्रस्तावानुसार शिक्षण मंडळाकडील ९६ रोजंदारी सेवकांना दरवर्षी बोनस दिला जातो. बोनस देताना १७४ दिवस पूर्ण असणे आवश्यक आहे. अशी मुख्य सभेने मान्यता दिलेली आहे. शिक्षण मंडळाकडील ९६ रोजंदारी सेवकांना कोरोना काळ चालू झालेपासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत विविध कामांसाठी नेमणूक केली असून या सेवकांकडून नित्य नियमाने सदर कामे जबाबदारीने पार पाडण्यात आलेली आहेत. कोरोना काळात शाळा बंद असल्याने प्रशासनाकडून रोजंदारीतील सेवकांना कामावर रूजू करून घेण्यात विलंब झाल्याने सदर सेवकांचे १७४ दिवस पूर्ण होवू शकले नाहीत. म्हणून या ९६ रोजंदारी सेवकांना बोनस व सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. परंतू कोरोना काळात आणीबाणीची परिस्थितीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत काम करणारे सेवकांना आर्थिक लाभ देण्यासाठी सकारात्मक भूमिका असणे आवश्यक आहे. सबब प्रशासकीय अडचणींमुळे यंदाच्या आर्थिक वर्षात शिक्षण मंडळाकडील रोजंदारीतील ९६ सेवकांना सानुग्रह अनुदान व बोनस व र.रू.३ हजार बक्षीस रक्कम याचा लाभ देण्यात आलेला नाही. तरी शिक्षण मंडळाकडील रोजंदारी सेवकांना सानुग्रह अनुदान व बोनस हजर दिवसाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात यावी. या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Deepali Dhumal : महापालिका अधिकारी आणि एल एंड टी कंपनीत काय साटेलोटे? : विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा सवाल 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका अधिकारी आणि एल एंड टी कंपनीत काय साटेलोटे?

विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा सवाल

पुणे : पुणे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे त्यामध्य यामध्ये २४ X 7 या पाणी पुरवठा योजने अंतर्गत एल .ॲन्ड.टी च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचे लाईनचे काम सुरू आहे. या कामांमध्ये महापालिकेचे संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही.शहरातील चांगले चांगले रस्ते त्या ठिकाणी खोदले जातात. या मध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन, पावसाळी लाईट, ड्रेनजच्या लाईने तोडफोड केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी होत आहे.अशाप्रकारचे वारजे भागामध्ये एल अँड टी च्या माध्यमातून पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. संबंधित अधिकारी व एल अँड टी च्या अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष ते करत आहेत. महापालिकेचे संबंधित अधिकारी व एल अँड टी चे कर्मचारी यांच्यामध्ये काय साटेलोटे असल्याचे नागरिकांमध्ये संशय निर्माण होत आहे. असा आरोप विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र देखील दिले आहे.

आंदोलनाचा इशारा

धुमाळ यांच्या पत्रानुसार वारजे भागामध्ये अनेक ठिकाणी जुन्या पाईपलाइनची तोडफोड करुन दूषित पाणीपुरवठा नागरिकांना होत आहे. हा पाणीपुरवठा लाईन फुटल्यानंतर त्वरित याची दुरुस्ती केली जात नाही. दोन ते चार दिवस पिण्याचे पाणी दूषित होऊन नागरिकांना पुरवठा होत आहे. आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा दुरुस्ती होत नाही व याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे महापालिकेच्या वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करुन सुध्दा दुर्लक्ष करीत आहेत . त्यामुळे आपणास विनंती की एल अँड टी चे अधिकारी व महापालिकेचे संबंधित कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर पोलीस कारवाई व कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व नागरिकांना आंदोलन करण्या शिवाय गत्यंतर नाही. अन्यथा आम्ही नागरिकांसमवेत एल अँड टी अधिकारी व संबंधित महापालिका कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात स्थानिक पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे धुमाळ यांनी पत्रात म्हटले आहे.

Shivshahir : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे: पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज 15 नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपूर्ण शासकीय इतमामात स्व. पुरंदरे यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर तिरंगा लपेटल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.

  स्वर्गीय पुरंदरे यांना श्रद्धांजली देण्यासाठी कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते

त्याबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची अनन्य भक्ती केली. त्यांच्या लेखणीचा, व्याख्यानांचा, महानाट्याचा आणि एकूणच जगण्याचा विषय शिवरायच होते. त्यांनी लेखन, वक्तृत्त्व, नाटके, गडकोट मोहिमा या सर्व माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरात शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास साध्या आणि सोप्या भाषेत घराघरात पोहोचवला, मनामनात रुजवला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे शिवरायांच्या पालखुणा आहेत त्या साऱ्या गडकोटांवर आणि ऐतिहासिक स्थानांना भेटी देऊन आणि तिथला इतिहास जागवून ते नतमस्तक झाले.

बाबासाहेबांच्या जाण्याने इतिहास आणि साहित्य क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. आज ते देहरुपाने आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कार्यारूपाने ते भावी पिढ्यांना शिवरायांचा इतिहास सांगत कायमच प्रेरणा देत राहतील. पुणे महानगरपालिकाही वंदनीय बाबासाहेबांच्या स्मृती यथोचित जपण्याचे काम नक्कीच करेल. त्यांना समस्त पुणेकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली’.

मुरलीधर मोहोळ,
महापौर, पुणे

——–

शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आपल्या लेखणीतून मराठी मनामनात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी निधन झाले. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. भावपूर्ण श्रद्धांजली!

दिपाली प्रदीप धुमाळ.
विरोधीपक्ष नेत्या पुणे मनपा.

—–

‘शिवचरित्र’ घरोघरी पोहचविण्यासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. शिवप्रेम म्हणजे काय, हे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनमाणसात पोहचविले. शिवरायांच्या संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी अनेक गडकिल्ले पालथे घातले. महाराजांची माहिती, संदर्भ, याचा अभ्यास तसेच संशोधन करून शिवशाहिरांनी केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगामध्ये शिवाजी महाराजांची किर्ती पोहचविली. असा शिवभक्त पुन्हा होणे नाही.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका


महाराष्ट्र भूषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे इतिहासाचे एक पर्व संपले. जाणता राजाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र पोहचवले. बाबासाहेबांनी महाराष्ट्रात दोन पिढ्या घडवल्या संपूर्ण जीवन त्यांनी शिवचरित्राच्या प्रसारासाठीच व्यतिथ केले. मी आयोजित करत असलेल्या पुणे नवरात्रौ महोत्सव या गेली 27 वर्षे साजरे करीत असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात ते अनेक वर्षे अनेक कार्यक्रमांना ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तसेच पुणे नवरात्रौ महोत्सवातही त्यांचा महर्षी पुरस्कार देऊन गौरव केला होता. आपल्या विषयातून सर्वच काही चांगले घडत राहावे ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे या त्यांच्या उदगारामुळे सगळेच अंतर्मुख झाले होते. त्यांच्या सारखा व्यासंगी पुन्हा निर्माण होणे शक्य नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील एक मोठा दुवा निखळला ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

आबा बागुल
गटनेता, काँग्रेस पक्ष पुणे मनपा.

Deepali Dhumal : समाविष्ट 23 गावातील कर्मचारी 4 महिन्यापासून वेतनाविना

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट 23 गावातील कर्मचारी 4 महिन्यापासून वेतनाविना

: कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ

पुणे : महापालिका हद्दीत जून महिन्यात नवीन 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तेव्हापासून ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या असून तेथील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र त्यांना अजूनही महापालिकेकडून वेतन देण्यात आले नाही. असा आरोप महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. शिवाय ग्रामपंचायतीकडे कार्यरत असताना जे वेतन होते तेच वेतन या कर्मचाऱ्यांना दिले जावे. अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

: विरोधी पक्ष नेत्या धुमाळ यांचे आयुक्तांना पत्र

धुमाळ यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार दि.३०/०६/२०२१ रोजी तत्कालीन २३ ग्रामपंचायती पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर २३ ग्रामपंचायतीकडील कर्मचारी वर्गाचे वेतन गेली चार महिन्यापासुन प्रलंबित  आहे. त्यामुळे सदर कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कोरोना काळातील त्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सदर कर्मचारी यांच्या मुलांची शिक्षणाची फी, लाईट बिले, घराचे हफ्ते देणे प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत दिवाळी चालु आहे. त्यामुळे कर्मचारी यांना सन साजरा करण्यास व दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची आहे. तरी सदर कर्मचारी यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना सद्यस्थितीतमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीकडे कार्यरत असताना जे वेतन होते तेच वेतन दि.३०/०६/२०२१ रोजी पासुन चालू करावे. अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.