Tag: Delhi
Jantar Mantar Protest | जंतर मंतर येथे आंदोलनासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे २५० पदाधिकारी रवाना
Jantar Mantar Protest |दिल्ली येथील आंदोलनासाठी (Delhi Protest) पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP Pune Sharad Pawar Group) टिम रवाना झाली आहे. मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) विरोधात दिल्लीतील जंतर मंतर येथे होणाऱ्या निषेध प्रदर्शनात (Jantar Mantar Protest) पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सहभागी होत आहेत.आज सकाळी रेल्वेने सुमारे १०० पदाधिकारी रवाना झाले असून उर्वरित १५० पदाधिकारी विमानाने रवाना होणार आहेत.आदरणीय पवारसाहेबां समवेत संवाद कार्यक्रम , राजभवन व नवीन संसद भवन वास्तूला देखील या दौऱ्यादरम्यान भेट देणार आहेत. (Jantar Mantar Protest)
आज पुणे स्टेशन येथून रवाना होत असताना प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहता गल्ली पासून दिल्ली पर्यंत संघर्ष करण्याची तयारी हीच पक्षाची खरी संपत्ती असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले. (Jantar Mantar Protest News)
News Title |Jantar Mantar Protest | 250 office bearers of Pune city NCP left for agitation at Jantar Mantar
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण
दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली.
आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच आग्रही असतात. त्याचीच प्रचिती कालही दिल्लीमध्ये आली. अल्पोपहाराच्या निमित्ताने देशाच्या राष्ट्रापतींना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्याशी चर्चा करताना खासदार सुळे यांनी दौंड आणि इंदापूर तालुक्यांचा विशेष उल्लेख केला. दौंड येथील रेल्वे जंक्शन तसेच भिगवण येथे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारे परदेशी फ्लेमिंगो पक्षी हे इंदापूरचे खास वैशिष्ट्य आहे. या दोन्ही तालुक्यांना भेट देण्यासाठी राष्ट्रपतींनी जरूर यावे, अशी विनंती त्यांनी केली.
पुणे शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले
| महापालिकेस 135 कोटींचा निधी
पुणे : पुणे शहर आता प्रदूषणाच्या (Pollution In Pune) बाबतीत देशात दिल्ली (Delhi) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आता केंद्र सरकार (Central government) सरसावले आहे. प्रदूषण मुक्त पुण्यासाठी केंद्रशासनाकडून पुणे महापालिकेस 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत तब्बल 135 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
या निधीतून महापालिकेकडून प्रदूषण मुक्त पुण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी दिल्लीत त्याचे सादरीकरण केले. केंद्र शासनाच्या नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम उपक्रमात देशभरातील 131 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 19 शहरांचा समावेश आहे. तसेच हा उपक्रम 2025-26 पर्यंत पुढील तीन वर्षे राबविल जाणार आहे. या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या कामाचा फायदा प्रदूषण कमी करण्यास झाल्यास महापालिकेस पुढील दोन वर्षात आणखी निधी मिळणार आहे.
——–
80 टक्के निधी ई-मोबिलिटीसाठी
याबाबत माहिती देताना महापालिका आयुक्त कुमार म्हणाले की, या निधीतील 80 टक्के निधी हा ई-मोबिलिटाला चालणा देण्यासाठी खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये, प्रामुख्याने नवीन ई-बस खरेदी करणे, चार्जिंग स्टेशन उभारणे, ई- बस डेपो विकसन, शहरात चार्जिंग पॉईंट्सची निमिर्ती, नागरिकांना ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून देणे, या कामासाठी केला जाणार आहे. तर 20 टक्के निधी शहराच्या प्रदूषणात वाढ झालेल्या पीएम 10 धूळीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. रस्त्यावरची धूळ कमी करण्यासाठी मॅकेनिकल स्वीपिंग, काही चौकांत मिस्ट बेस्ड फाऊंटन, विद्युतदाहिनी धूर कमी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणे अशा कामांचा समावेश असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिची निवड…
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिची प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्रातून ११६ कॅडेटची या संचलनासाठी निवड झाली आहे. त्यात पुणे ग्रुप मधून ३५ कॅडेटची निवड झाली असून त्यामध्ये २ महाराष्ट्र बटालियनचे १३ कॅडेटची निवड झाली आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपुर, मुंबई अ, मुंबई ब आणि पुणे यांचा समावेश असतो. यात कु.पाणिनी सुनील तिबिले ही बाबुरावजी घोलप महाविद्यालयाची व २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी ची छात्र आहे. तिने तीन महिन्यांच्या मेहनतीत दहा दिवसांचे एक शिबीर असे दहा शिबिरे पूर्ण केले आहे. सदर कॅम्पमध्ये मेहनत, परिश्रम व नियमित सराव करून दिल्लीला पोहचली असून पुणे एनसीसी ग्रुप, २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी पुणे, बाबुरावजी घोलप महाविद्याय तसेच पुणे-पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचविले आहे.
राष्ट्रीय पथसंचलनासाठी निवड होणे महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मत प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी व्यक्त केले. कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होणार्याप संचलनासाठी मला संधी मिळणे हे माझ्यासह कुटुंबीयांसाठी गौरवाची बाब आहे, खूप सरावानंतर ही संधी मला मिळाली आहे, असे छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिने सांगितले.
एनसीसी युनिट महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०१६ मध्ये सुरू झाले असून अनेक छात्रांची सैन्यदलात व पोलीसदलात निवड झाली आहे. तसेच आतापर्यंत चार छात्रांची कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होत असलेल्या पथसंचलनासाठी निवड झालेली असून आमच्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे, अशी माहिती एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, २ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल फरहाद अहमद तसेच एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांच्याकडून छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिला प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.अजितदादा पवार साहेब, उपाध्यक्ष मा.राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा.अॅड.संदीप कदम, खजिनदार मा.मोहनराव देशमुख, उपसचिव मा. एल.एम.पवार, सहसचिव मा.ए.एम.जाधव, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांनी निवड झालेल्या कॅडेटचे कौतुक करून दिल्लीच्या संचलनास सुभेच्छा दिल्या.
महंगाई पे हल्ला बोल काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली
| महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार
– माजी आमदार मोहन जोशी
केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती , प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची 6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 ,लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.