Why are you working till the midnight of 13th April to prepare for Ambedkar Jayanti? | Pune Municipal Commissioner’s question to the officials

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

 Why are you working till the midnight of 13th April to prepare for Ambedkar Jayanti? | Pune Municipal Commissioner’s question to the officials

Dr Ambedkar Jayanti 2024 – (The Karbhari News Service) – On the occasion of Bharatratna Dr Babasaheb Ambedkar’s birth anniversary on April 14, a program is being held at Pune Station area on behalf of the Municipal Corporation. But this preparation works till the midnight of April 13. Municipal Commissioner Dr Rajendra Bhosale (IAS) took a good notice of this work method of the officials. He also ordered the officials to complete all the basic facility related works by April 10. (Pune Municipal Corporation (PMC)

On the occasion of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary, the Municipal Commissioner held a review meeting of department heads today. On behalf of the Municipal Corporation, a statue of Dr. Babasaheb has been erected in Pune Station area. Programs are organized at this place on behalf of the municipality. Additional Commissioner Prithviraj BP gave a presentation about how the planning will be this year. (Pune PMC News)

After this, the Municipal Commissioner made various suggestions. Remove the railings around the statue and make arrangements for people to sit there. Find out whether any NGO is ready to provide water instead of tanker water. The toilet is in poor condition. Try to keep it clean. Provide all basic facilities, he said. Also, knowing that this program is taken every year, why are you doing the work till the night before the anniversary, and ordered to complete these works by April 10.

| Action will be taken if mobile phones are switched off – Commissioner

Meanwhile, the municipal commissioner has assigned responsibilities to various officials. They have to perform all the tasks. We will take action if any officer or employee keeps the phone switched off at the right time. Commissioner Dr. Bhosale also gave this warning.

Mahaparinirvan Din | PMC Pune | पुणे महापालिकेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

Categories
Breaking News cultural PMC पुणे

Mahaparinirvan Din | PMC Pune | पुणे महापालिकेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

Mahaparinirvan Din | PMC Pune | भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांना  महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनपा अधिकारी व सेवक यांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (Pune Municipal Corporation)

उपायुक्त सचिन इथापे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळयाला हार घालण्यात आला. या  प्रसंगी उपायुक्त जयंत भोसेकर, योगिता भोसले प्रभारी नगरसचिव राकेश विटकर सुरक्षा अधीकारी,  रुपेश सोनवणे अध्यक्ष मागासवर्गीय युनियन, विष्णू कदम सचिव अध्यक्ष स्थायी समिती, धनंजय खलुले, महेश कड शुभांगी रणपिसे, प्रतीक भोसले, चिंतामण बाबळे,  नितीन एकबोटे इत्यादी अधिकारी व सेवक उपस्थित होते.

Dr. Ambedkar Thoghts | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या चित्रसृष्टीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते

Categories
Breaking News cultural Political social पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या चित्रसृष्टीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते

समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जावे | चंद्रकांतदादा पाटील

आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रसृष्टी’चा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला. आज सकाळी ७.३० वाजता भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पुलाजवळ शंकर शेठ रोड मिरा सोसायटी समोर हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

उद्घाटन प्रसंगी सगळ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी बोलताना माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीदिनी चित्रसृष्टीची कल्पना प्रत्यक्षात उतरविणे कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे योग्य वाटेल त्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्यांना पिण्यासाठी पाणी नव्हते म्हणून त्यांनी सत्याग्रह केला नाही, त्यांनी समाजातील लोकांच्या अडचणी, त्रास समजून घेऊन त्यांच्यासाठी पाण्याचा सत्याग्रह केला. डॉ. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालत राहणं म्हणजे त्यांनी समाज शिकावा यासाठी प्रयत्न केला, समाजाचे प्रबोधन होईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अशा महापुरुषाने लोकांना शिकून संघटित होऊन मग संघर्षाची वाट पाहण्यासाठी प्रोत्साहित केले. आपण एकजुटीने डॉ. आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!’ हा मूलमंत्र आचरणात आणून त्या दिशेने वाटचाल करायला हवी. यावेळी उद्घाटनाला नगरसेवक अजय खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते भारत कांबळे, आरपीआयचे माजी शहर अध्यक्ष अशोकजी शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे दिनेश रासकर, विकी ढोले, मनीषा गायकवाड, नीता गायकवाड, युवराज अडसूळ उपस्थित होते.

Book Distribution | “भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २५ हजार पुस्तके वाटप “

Categories
Breaking News Education Political social पुणे

“भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २५ हजार पुस्तके वाटप “

पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार मोहन जोशी व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानोपासक होते “ज्ञान ही शक्ती” आहे. यावर त्यांचा विश्वास होता यासाठी त्यांनी समाजाला शिका व *संघटित व्हा … वाचाल तर वाचाल…असा संदेश दिला. तरी आजची तरुण पिढी ही* *बाबासाहेबांच्या कार्याबद्दल अनभिद्य दिसून येते म्हणून तरुण वर्गाला या थोर समासुधारकांचे समाजासाठी केलेले त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या जयंती निमित्त आज या ठिकाणी 25000 पुस्तकांचा वाटप करीत आहोत “असे उदगार आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.

 

“भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन समतेची दिशा दिली. डॉ. बाबासाहब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते ते संबंध राष्ट्राचे नेते होते, *ते युगकर्ते होते त्यांनी निर्माण केलेले युग हे सामान्य माणसाला लोकशाहीच्या क्षितिजावर उभे करणारे युग होते. असे प्रतिपादन मोहन जोशी यांनी केले*

यावेळी अनेक थोर समाज सुधारक ज्यांनी महाराष्ट्र राज्याला दिशा देणारे धोरण दिले यांच्या जीवनावरील २५ हजार पुस्तकाचे वाटप आमदार रवींद्र धंगेकर व मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मा. महापौर कमल व्यवहारे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, विशाल धनवडे, लता राजगुरू, मा नगरसेविका सुशिला ताई नेटके, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, बाळासाहेब अमराळे,काँग्रेस ओ.बी.सी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे,स वाल्मिकी जगताप, प्रियांका रणपिसे,चेतन आगरवाल, डॉ अनुपकुमार बेगी, चंद्रकांत चव्हाण, अस्लम बागवान, वाहिद बियाबनी, अविनाश अडसूळ, गेहलोत ताई, गोरख पळसकर, शिवानी माने, नरेश नलवडे , रुपेश पवार , राजेंद्र खेडेकर, किरण जगताप, अमित देवरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मा गणेश नवथरे यांनी केले.

Howard Scholar Dr. Suraj Engde | गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करा – हॉवर्ड स्कॉलर डॉ. सुरज एंगडे

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करा – हॉवर्ड स्कॉलर डॉ. सुरज एंगडे

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संगत आणि पंगत ही चांगल्या विचारांची असणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी चांगल्या विचारांची संगत धरावी आणि विवेकी विचारांची सोबत ठेवावी. जाती-धर्माच्या चक्रव्यूहात न अडकता स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असा कानमंत्र हॉवर्ड विद्यापीठातील स्कॉलर आणि समाज कल्याण विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी डॉ. सूरज एंगडे (Howard Scholar Dr. Suraj Engde) यांनी विद्यार्थ्यांना दिला.

समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘समता पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आज पुणे येथे शासकीय वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी श्री. एंगडे यांनी संवाद साधला. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे उपस्थित होते

श्री.एंगडे म्हणाले, विद्यार्थीदशेत संशोधन वृत्ती जोपासत शिक्षण आणि संशोधनाची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कला, कृती, विचार व प्रश्न विचारण्याची सवय या गोष्टींनादेखील तितकेच महत्व द्यावे.

तंत्रज्ञानाचा उपयोग कौशल्य विकसित करण्यासाठी करावा, स्वतः उन्नती साधून इतरांनाही प्रगतीसाठी सहकार्य केल्यास कुटुंब व समाज घडेल. त्यातून विवेकवादी आदर्श निर्माण होतील असेही डॉ. एंगडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय पर्व अंतर्गत राबविण्यात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचा परिपूर्ण वापर करून त्यातून नवसमाज घडवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, उपायुक्त विजयकुमार गायकवाड, सहायक आयुक्त निशादेवी बंडगर यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी, गृहपाल, कर्मचारी तसेच पुणे शहरातील सर्व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परदेशातील विद्यार्थ्यांशी डॉ. एंगडे यांचा संवाद

समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत असलेल्या जगातील विविध शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशीदेखील डॉ. सूरज एंगडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन व ज्या सामाजिक परिस्थितीतून आपण आलो त्या परिस्थितीची जाणीव ठेवून समाजाचे व देशाचे नाव कसे उज्वल होईल यासाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेले आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाला, शहराला, राज्याला व देशाला अभिमान वाटेल असे कार्य करावे व आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार येणाऱ्या काळात निश्चितच शिष्यवृत्ती योजनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार असल्याचे सांगितले.

या संवाद कार्यक्रमात चाळीस देशांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.