Job Fair | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांच्याकडून 5 जूनला नोकरी महोत्सवाचे आयोजन 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Job Fair | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांच्याकडून 5 जूनला नोकरी महोत्सवाचे आयोजन

| 80 कंपन्यांनी नोंदवला सहभाग

Job Fair | MLA Sunil Kamble | महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागा अंतर्गत राज्यभर इयत्ता दहावी व इयत्ता बारावी (10th, 12th students) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी योग्य तो मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचं (Job Guidance) आयोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांमध्ये (Pune cantonment constituency) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नाना पेठ, पुणे येथे सोमवार  ५ जून २०२३ रोजी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेले आहे. त्याचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy chief minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे.  अशी माहिती आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी दिली. (Job Fair | MLA Sunil Kamble)

आमदार कांबळे यांनी सांगितले कि, या शिबिराला जोडूनच पुणे शहर व परिसरातील बेरोजगार युवक व युवतींसाठी नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे. या नोकरी महोत्सवामध्ये जवळपास ८० कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः दहा हजार नोकऱ्यांची उपलब्धता त्यांच्याकडे आहे. या रोजगार मेळाव्यासोबत आम्ही विविध बँकांना सुद्धा आमंत्रित केलेले आहे. (employment)
बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध व्हावे व ते कर्ज कसे उपलब्ध होईल याची माहिती सदर बँका देणार आहेत. याशिवाय आम्ही विविध वर्गांसाठी राज्य शासनाने ज्या संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत उदाहरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), जिल्हा उद्योग केंद्र, वस्त्रोद्योग विभाग, कामगार विभाग यांच्यासाठी आम्ही स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये
लाभार्थ्यांसाठी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व मार्गदर्शन केले जाईल. असे आमदार कांबळे यांनी सांगितले. (Job Fair)
आमदार कांबळे यांनी पुढे सांगितले कि. त्याचप्रमाणे विविध वर्गातील नागरिकांसाठी शासनाने जी महामंडळे स्थापन केलेली आहे.  त्यामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ या महामंडळाच्या ज्या योजना आहेत.  त्या योजना बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कशा उपलब्ध करून दिल्या जातीलयाचे मार्गदर्शनही या मेळाव्यामध्ये होणार आहे. या नोकरी महोत्सवाचे मेळाव्याचे उद्घाटन सोमवार दिनांक पाच जून २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते व  चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री पुणे तसेच  गिरिषजी महाजन, ग्रामविकास, वैदयकिय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सर्व बेरोजगार युवक युवतींना तसेच इयत्ता दहावी व
इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की आपण या व्यवसाय मार्गदर्शनमेळाव्याचा व रोजगारीची संधी उपलब्ध करून घेण्याचा लाभ घ्यावा या मेळाव्यामध्ये जास्तीतजास्त तरुण-तरुणींना नोकऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

सुनील कांबळे, आमदार 
—-
——
News Title | Job fair organized by MLA Sunil Kamble on 5th June| 80 companies registered participation

Employment News | बेरोजगार तरुणांना इथे मिळेल रोजगार

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

Employment News | बेरोजगार तरुणांना इथे मिळेल रोजगार

| कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून बाणेर येथे ९ जून रोजी उद्योग बैठकीचे आयोजन

Employment News | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने  ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या  संकल्पनेतून पुणे विभागातील नामांकित उद्योग, उद्योग संघटना, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याकरिता ९ जून रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उद्योग बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ह. श्री. नलावडे यांनी दिली आहे. (Employment News)
राज्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ हे अधिक प्रभावी माध्यम आहे. या रोजगार मेळाव्यात उद्योजक व नोकरी इच्छूक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांकडील रिक्तपदांसाठी मुलाखती आयोजित करुन तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करुन उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते.
मागील वर्षी सामंजस्य करारनामात सहभागी झालेले उद्योजक, उत्पादन, माध्यमे आणि मनोरंजन, ऑटोमोबाईल, अन्न, गृह उपकरणे, सुरक्षा, किरकोळ, विमा, रिअल इस्टेट, फायर सेफ्टी, बीपीओ, केपीओ, कॅश मॅनेजमेंट, कॉर्पोरेट प्लेसमेंट, स्टाफिंग कंपनी, स्टाफिंग सेवा व प्लेसमेंट एजन्सी इत्यादी विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, विभागाच्यावतीने  मागील वर्षात साधारणता २०० मेळावे आयोजन करण्यात आले. सन २०२२-२३ पासून ६०० रोजगार मेळावे आयोजित करण्याचे उद्दिष्ट आहे. मेळाव्याचे आयोजन प्रभावीरीत्या होण्यासाठी शासनातर्फे भरीव तरतूद करण्यात आली आहे. सन २०२२-२३ अखेर पर्यंत आयुक्तालयामार्फत विविध योजना व ५५७ रोजगार मेळाव्याद्वारे सुमारे २ लाख ८३ हजार उमेदवारांची नोकरीसाठी निवड झालेली आहे.
महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी,  उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी पुणे विभागातील सर्व नामांकित उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांनी  रोजगार मेळाव्यात त्यांच्याकडील  रिक्तपदे उपलब्ध करून द्यावी व बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने  केले आहे.
अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ पुणे येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. ०२०-२६१३३६०६ यावर संपर्क साधावा.
0000
News title | Unemployed youth will get employment here |  Organization of industry meeting on 9th June at Baner under the concept of ‘Skill Centre’

Labor Law | कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे

पुणे:- कामगार कायद्यातील बदलांमुळे रोजगारामध्ये वाढ होईल, असे केंद्रीय कामगार मंत्री यांनी पुणे येथे जाहीर केले. हा त्यांचा दावा पूर्णपणे हास्यास्पद आहे. असे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले वास्तविक पाहता नवीन रोजगार निर्मिती होईल व त्यांना कायम काम मिळेल. असे कोणतेही धोरण व तरतूद कामगार कायद्यामध्ये नाही. याउलट कामगारांना कायम न करता, कोणतेही लाभ न देता, कसे काम करून घेता येईल असे “फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट” सारखा काळा कायदा करण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. यामुळे यापुढे कायम कामगार ही संज्ञा संपुष्टात येईल. अशी भीती कामगार वर्गात निर्माण झाली आहे. आठ वर्षांमध्ये किती कामगारांना कायम रोजगार मिळाला. ते कामगार मंत्र्यांनी जाहीर करावे. जर आकडेवारी आपण पाहिली तर असे निदर्शनास येते की, कायम कामगारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असून, त्याठिकाणी कंत्राटी कामगार व तात्पुरत्या स्वरूपाचे कामगार, रोजंदार कामगार, असंघटित कामगार ही संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आपल्या देशात काम करत असणाऱ्या कामगारांपैकी 95 ते 97 टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रांमध्ये आलेले असून 3 ते 5 टक्के कामगार हे फक्त संघटित क्षेत्रामध्ये राहिले आहेत. परंतु कामगार कायद्यातील नवीन होऊ घातलेल्या धोरणामुळे कायम कामगार संख्या संपुष्टात येऊन, फक्त रोजंदारी, कंत्राटी आणि असंघटित कामगार हेच त्या ठिकाणी राहतील. त्यामुळे कामगारांना कोणताही फायदा मिळणार नाही.

दुसऱ्या बाजूला असंघटित कामगारांची नोंदणी केली. अशा बढाया कामगार मंत्री मारत आहेत. कोरोना महामारी च्या, लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देशांमध्ये असंघटित कामगारांची अवस्था काय आहे. हे जगाने पाहिले आहे. त्या वेळेला सामाजिक संस्था, कामगार संघटना, न्यायालय यांनी सरकारला जाब विचारल्यावर, मग या कामगारांची नोंदणी करण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केलं. आणि म्हणून ईश्रम पोर्टल या नावाखाली अनेक कामगारांची नोंदणी केली, परंतु या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना सरकारने काय दिले? तेही कामगार मंत्र्यांनी जाहीर करावे. या सर्व कामगारांना कोणताही फायदा आतापर्यंत देण्यात आलेले नाही. किंबहुना आहे ते कामगार कायदे शिथिल करायचे, कामगार संघटना कमजोर करायच्या आणि उद्योग धारजिने धोरण स्वीकारायचे. असे धोरण केंद्र सरकारने अवलंबलेले आहे. त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो.

असंघटित कामगारांमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर सामील झाला आहे. त्याच्यामध्ये स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर यासारख्या कंपन्या कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत आहेत. त्यांच्यासाठी कोणताही कायदा करायचं काम कोठेही कामगारमंत्री करीत नाहीत. आणि म्हणून नवीन कामगार धोरणामुळे व कामगार कायद्यामध्ये होऊ घातलेल्या सुधारणांमुळे देशांमध्ये रोजगार निर्मिती होईल, हे केंद्रीय कामगार मंत्री यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. आता तरी त्यांनी जागे होऊन या सर्व कामगारांना, कामगार संघटना ना भेट देऊन, चर्चा करून, त्यावर अपेक्षित बदल ते सर्वसमावेशक करावेत. असे कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.