Tag: Ganesh mandal
Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे कोथरूड मध्ये जल्लोषात स्वागत
Jayant Patil | Kothrud | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कोथरूड मधील प्रमुख गणेश मंडळांना भेट दिली. रात्री ९ वाजता एरंडवने मित्र मंडळाची गणपतीची आरती करून त्यांनी कोथरूड मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कोथरूड मतदारसंघच्यावतीने (NCP Kothrud) भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
पौड फाटा ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक,आझाद नगर,गुजरात कॉलनी, वनाज कॉर्नर,जय भवानी नगर,या भागातील अनेक मंडळांना प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भेट दिल्या .राष्ट्रवादी काँग्रेस चे कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने व युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी रॅली चे व कोथरूड मंडळ भेटीचे नियोजन केले होते.
कोथरूड मध्ये सर्व भागात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.अनेख नागरिकांनी फोटो काढले.लहान मुलां-मुलींनी सेल्फी घेतल्या.
या वेळी सिध्दार्थ मित्र मंडळाच्या वतीने जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते शिव सन्मान पुरस्कार डॉ मेजर विपुल पाटील यांना देण्यात आला.
या वेळी शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप ,सचिन भाऊ तावरे,किशोर भाऊ कांबळे,ज्योती ताई सूर्यवंशी,नंदिनी पाणेकर,स्वप्नील खवले,ऋषिकेश शिंदे,अमोल गायकवाड,प्रमित गोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते….
Pune Ganesh Utsav | गणेश मंडळांसाठी पुणे महानगरपालिकेची नियमावली
Pune Ganesh Utsav | गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन नाही | गणेश उत्सवात वाहतुकीला अडथळा आणू नका | उपमुख्यमंत्री अजित पवार
| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव नियोजन बैठक
*अशी आहे गणेशोत्सव स्पर्धा*
Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत संयुक्त बैठक 28 ऑगस्ट ऐवजी 8 सप्टेंबरला
Ganesh Utsav Meeting | PMC Pune | यावर्षीचा पुणे शहरातील गणेशोत्सव (Pune Ganesh Utsav) 19 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यानुषंगाने नियोजनाकरिता शहरातील गणेशोत्सव मंडळे (Ganesh Mandal), पोलीस विभाग (Pune Police) यांची संयुक्त बैठक 28 ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) आयोजित केली होती. मात्र काही कारणाने ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून ही बैठक आता 8 सप्टेंबर ला होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Ganesh Utsav Meeting | PMC Pune)
स्तरावर पुणे शहरात केली जाईल. (Ganesh Utsav Meeting)
Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत 28 ऑगस्ट ला संयुक्त बैठक
स्तरावर पुणे शहरात केली जाईल. (Ganesh Utsav Meeting)
Ganesh Utsav Contest | गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हा आणि 5 लाख जिंका
| उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार
गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती हेमंत रासने यांची कृतज्ञता
| गणपती मंडळाना वंदन करणार
कसबा विधानसभा मतदार संघामध्ये भाजप शिवसेना बाळासाहेबांची महायुतीच्या वतीने मला मिळालेली उमेदवारी हा गणपती मंडळाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे असे मी मानतो म्हणून पुढील दोन दिवसात मतदारसंघातील सर्व गणपती मंडळांना भेट देणार असून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार असल्याची भावना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली. (Hemant Rasane)
भाजपच्या वतीने रासने यांना उमेदवारी मिळाल्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि ग्रामदैवत कसबा गणपतीचे आरती करून या मोहिमेला आज प्रारंभ केला. पुढील दोन दिवसात ते मतदार संघातील सर्व गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. रासने यांच्या सामाजिक राजकीय कारकीर्दीची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे कार्यकर्ता म्हणून झाली होती.
•गेली ३० वर्षे प्रामाणिकपणे काम केलं त्याचं फळ मला पक्षानी उमेदवारी देऊन दिलं. पक्षाने दिलेल्या संधीचं मी नक्की सोनं करेन. कसबा हा भाजपाचा अनेक वर्षांपासूनचा असलेला गढ आहे.
पक्षातील सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने हि निवडणूक विक्रमी मतांनी जिंकू असा विश्वास आहे. सर्वांना मान्य, सर्व सामान्य, गणेश मंडळाचा कार्यकर्ता, ही आमची टॅगलाईन आहे. नागरिकांचा आशीर्वाद हिच आमची संपत्ती आहे.कोरोनाकाळात पुणे महापालिकेचं उत्पन्न मी वाढवून दाखवलं होतं. पुणे शहरात विविध उपक्रम राबवून शहराचा विकास करण्याचा मी प्रयत्न केला होता. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्याला प्रमोशन व्हावं हि अपेक्षा असते, नगरसेवक म्हणून काम करत असतांना राज्याच्या विकासात आपला हातभार असावा हि स्वाभाविक इच्छा असते.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रासने यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयाला भेट दिली त्यानंतर मामलेदार कचेरी येथे जाऊन उमाजी नाईक यांना अभिवादन केले रासने यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या कुटुंबीयांची टिळक वाड्यात जाऊन भेट घेतली. मुक्ताताईंच्या प्रतिमेला अभिवादन केले.
सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन
सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजातील गरजू व्यक्तींना मदत करावी आणि सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सूचवाव्यात असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित आदर्श गणेशोत्सव स्पर्धा-२०२२ बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, रामनाथ पोकळे, नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे घाडगे आदी उपस्थित होते
पुरस्कारप्राप्त गणेश मंडळाचे अभिनंदन करुन पाटील म्हणाले, कोरोना संकटानंतर सार्वजनिक उत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. गणेशोत्सव उत्साहाने आणि शांततेत साजरा करण्यात पोलीसांसोबत मंडळांची भूमिका महत्वाची आहे. गणेशोत्सवाप्रमाणे दिपावलीच्या काळात सर्वांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण असल्यामुळे नागरिकांना निर्भयपणे संचार करता येतो, बेरोजगारांना रोजगार मिळतो. त्यामुळेच हे शहर कायमस्वरुपी स्थायिक होण्यासाठीचे उत्तम शहर म्हणून ओळखले जाते.
पुणे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत पोलिस आस्थापना पायाभूत सुविधा योजनेतून पोलीसांसाठी वाहने खरेदीसाठी २ कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सण-उत्सव साजरे करताना नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्बंध होते. यावर्षीचा गणेशोत्सव गणेश मंडळांच्या सहकार्यामुळे उत्साहात साजरा केला. पुण्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आदर्श गणेशोत्सव स्पर्धा-२०२२ अंतर्गत पाच पोलीस परिमंडळातील विविध गणेशमंडळांना सजावट व मिरवणूकीचे मार्ग या गटात बक्षीस वितरित करण्यात आले.
पुणे पोलिसाचा कामगिरीवर आधारित मांडणारा ‘@ पुणे’ या कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेश मंडळाच्या मांडवाने वाहतूक कोंडी | कारवाई करण्याबाबत अतिक्रमण विभाग उदासीन
| मंडळांना 14 सप्टेंबर ची दिली होती मुदत
पुणे – गणेशोत्सव संपल्यानंतरही रस्त्यावर मंडळांचे मांडव, कमानी, रनिंग मांडव काढले न गेल्याने नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होत आहे. १४ सप्टेंबर पर्यंत सर्व मांडव काढून घ्यावेत, मांडवामुळे पडलेले खड्डे मंडळांनी बुजविले आहेत की नाहीत ते पाहून त्याचा अहवाल क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण कार्यालयाकडे सादर करावा. जर मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नसल्यास त्यास पुढील वर्षी गणेशोत्सवासाठी परवागनी देऊ नये असे स्पष्ट प्रस्ताव सादर करा असे आदेश अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले होते. मात्र या आदेशाला गणेश मंडळ आणि क्षेत्रीय कार्यालयांनी देखील हरताळ फासला आहे. गणेश मंडळांनी मांडव काढले नाहीत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई नसल्याने त्याचा अहवाल देखील दिलेला नाही.
यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेने परवाना शुल्क माफ केल्याने व पुढील पाच वर्षांसाठी एकच परवाना ग्राह्य धरला जाणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला. गणेशोत्सवानंतर मंडळांनी, खासगी कंपन्यांनी रस्ते व पादचारी मार्गावरील देखावे साहित्य, मिरवणूक साहित्य, बोर्ड, बॅनर, जाहिराती तीन दिवसात काढून घेणे बंधनकारक आहे. पण मंडळांनी व खासगी व्यक्तींनी मुदतीत साहित्य व बोर्ड काढलेले नाहीत. त्याच प्रमाणे मांडव काढल्यानंतर खड्डेही बुजविले नाहीत. त्यामुळे पादचारी व वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या हद्दीतील मंडळांनी मांडव काढला की नाही, रस्ते स्वखर्चातून दुरुस्त केले की नाही याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांचा अहवाल १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण विभागाकडे सादर करावा. ज्या मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नाही, त्यांना पुढील वर्षी परवानगी देऊ नये असा प्रस्तावही सादर करावा असे आदेशात नमूद केले होते.
मात्र या आदेशाला गणेश मंडळ आणि क्षेत्रीय कार्यालयांनी देखील हरताळ फासला आहे. गणेश मंडळांनी मांडव काढले नाहीत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई नसल्याने त्याचा अहवाल देखील दिलेला नाही. याबाबत अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांना विचारले असता, ते म्हणाले, याबाबत आधीच आदेश देण्यात आले आहेत. आमच्याकडे अहवाल नाही आले तर आम्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई करू. तसेच मांडव देखील काढून घेतले जातील.