Environment Conservation | अस्थिविसर्जन नदीत न करता वृक्षारोपण करण्याचा विधायक उपक्रम | पर्यावरण संवर्धनाचा दिला गेला संदेश

Categories
cultural social महाराष्ट्र शेती

Environment Conservation | अस्थिविसर्जन नदीत न करता वृक्षारोपण करण्याचा विधायक उपक्रम | पर्यावरण संवर्धनाचा दिला गेला संदेश

Environment Conservation | गोरमाळे ता. बार्शी (Gormale Tal – Barshi) येथील कै. रणजित (आबा) मोरे यांच्या अंत्यविधी नंतर राखेचे विसर्जन नदीमध्ये न करता त्यांचे चिरंजीव सतीश मोरे (Satish More) व दत्ता मोरे (Datta More)  आणि मोरे कुटुंबीय यांनी राखेचे विसर्जन वृक्षारोपण (Tree Plantation) कार्यासाठी करण्याचा संकल्प केला. यातून पर्यावरण संवर्धनाचा चांगला संदेश दिला गेला आहे. (Environment Conservation)
वृक्षसंवर्धन समिती बार्शी (Tree Conservation Committee Barshi) यांनी या संकल्पनेला प्रतिसाद देऊन वृक्षारोपण करण्यास सहकार्य केले. या अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिल्याने आसपासच्या परिसरात आणि समाज माध्यमात देखील मोरे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्र वर्गाचे या कामाबाबत कौतुक होत आहे. या वेळी माणिक हजारे हनुमंत काळेल, सुरज वराळे, अमर शिंदे, प्रवीण काकडे, नितीन मोरे, शेखर भांडवलकर, अमर आगलावे तसेच  गोरमाळे गावातील नागरिक उपस्थित होते.
News Title | Environmental Conservation Constructive initiative to plant trees without disposing of bones in the river A message of environmental conservation was given

Yatra in Gormale | गोरमाळेतील यात्रेच्या सोंगात आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांचा तसेच लहानग्यांचा उस्फुर्त सहभाग!

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र शेती

गोरमाळेतील यात्रेच्या सोंगात आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांचा तसेच लहानग्यांचा उस्फुर्त सहभाग!  

 

| सामाजिक सलोखा जपणारी आणि नात्यांना एकत्र आणणारी यात्रा 

 
 सामाजिक एकोपा राहावा आणि लोकांमध्ये एकीची भावना वाढीस लागण्यासाठी ग्रामीण भागात यात्रा भरवण्याची प्रथा सुरु झाली. सामाजिक सलोख्याचे हेच दर्शन गोरमाळे (ता.बार्शी) गावातही दिसून येते. चैत्र महिन्यात अष्टमीला सुरु होणारी तीन दिवसीय यात्रा पंचक्रोशीत चांगलीच प्रसिद्ध आहे. यात्रेचे विशेष म्हणजे छबिना आणि सोंगे. सोंगे सादर करण्याची प्रथा नेमकी कधीपासून सुरु झाली, हे कुणी सांगू शकणार नाही. मात्र त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. सोंगे सादर करण्याची भुरळ गावातील सर्वसामान्य तरुण किंवा प्रौढ लोकच नाही तर आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांना तसेच लहानग्यांना देखील पडली आहे. त्यामुळे या सर्वांचे आणि गावाचेही सर्व स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे.
 
 
चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची तीन दिवसीय यात्रा असते. पहिल्या दिवशी देवाला ‘आंबील’ चा नैवेद्य असतो. यात्रेच्या माध्यमातून गेल्या शेकडो वर्षांपासून गावाने ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा जपली जातेय. आधुनिक  जमान्यातही अशा परंपरा जपत असल्यामुळे गाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच भक्तिभाव जपत मनोरंजन होतेच शिवाय ग्रामस्थांना वर्षभराचा उत्साह आणि प्रेरणा देखील या माध्यमातून मिळते.
 सोंग म्हणजे नाट्याविष्कार मानला जातो. हे नाट्याविष्कार अर्थात सोंग यात्रेत वठवली जातात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे छबिना ची पालखी निघताना ही सोंगे केली जातात. ज्या माध्यमातून पौराणिक देखावे सादर केले जातात. महाभारत, रामायणातील निवडक पात्रे निवडून या भूमिका वठवल्या जातात. ज्यासाठी बैलगाड्याचा उपयोग केला जातो. चालत्या बैलगाड्यामध्ये एकमेकासमोर उभे ठाकत अभिनय केला जातो. या माध्यमातून पौराणिक पात्रे जिवंत असल्याचा अनुभव यात्रा बघायला आलेल्या भाविकांना मिळतो. हातात कुठलाही माईक नसताना आपल्या भारदार आवाजाच्या जोरावर ‘प्रधानजी..! आपल्या कचेरीचा बंदोबस्त कैशा प्रकारे ठेविला आहे?’ ही ललकारी ऐकू येते तेंव्हा उपस्थित लोकांच्या अंगावर देखील रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत. विशेष म्हणजे बायकांची पात्रे देखील पुरुषच वठवतात. गावातील ही सर्व मंडळी आपल्या अंगातील कला किंवा सुप्त गुण अशा पद्धतीने दर्शवतात. त्यामुळे साहजिकच मनोरंजन तर होतेच शिवाय परंपरा टिकण्यास देखील मदत होते.

 बैलांची संख्या कमी झाली म्हणून काय झाले?
ग्रामीण भागात आता चांगली आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. पारंपरिक अवजारांवर भर न देता नवीन सामग्रीचा वापर केला जातो. यामुळे साहजिकच शेतीसाठी बैलांचा वापर कमी प्रमाणात होताना दिसतो. याचे पडसाद यात्रेत उमटताना दिसतात. कारण सोंगे सादर करताना राक्षस पार्टी आणि देव पार्टी हे एकमेकासमोर शत्रू म्हणून उभे राहून भाषणाच्या माध्यमातून आव्हान देत असतात. ही गोष्ट बैलगाडीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सादर करता येते. मात्र बैलांची संख्या कमी झाल्याने या कलाकारांची ऐन वेळेला पंचाईत होते. यावर देखील याच कलाकारांनी उपाय शोधून काढला आहे. छोटे पिकअप किंवा ट्रॅक्टर च्या माध्यमातून देखील आता आपली कला सादर करण्यास सुरुवात झाली आहे. आणि यात आघाडीवर लहानगे असतात. या ‘मार्ग’ शोधण्याचे प्रयत्नाचे देखील विशेष कौतुक होत राहते. पूर्वी सोंगे सादर करणारी ठराविकच मंडळी होती. मात्र आता त्याचे सर्वांना आकर्षण वाढू लागले आहे. सोंगे सादर करण्याची भुरळ गावातील सर्वसामान्य तरुण किंवा प्रौढ लोकच नाही तर आयटी, मेडिकल, इंजिनियरिंग क्षेत्रातील युवकांना तसेच लहानग्यांना देखील पडली आहे. या सहभागामुळे मात्र यात्रेतील हा पारंपारिकपणा जपण्यास मदत होणार हे नक्की आहे.
 गावात पैलवान घडणे गरजेचे!
तीन दिवसीय यात्रेत शेवटच्या दिवशी कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाते. यासाठी आसपासच्या गावातून बरेच पैलवान आपली ताकद आजमावायला येतात. त्यासाठी यात्रा कमिटीच्या माध्यमातून तात्काळ रोख बक्षिसे देखील दिली जातात. पूर्वी गावातील पैलवान बरीच बक्षिसे पटकावत असत. पण आता मात्र गावात तुरळकच पैलवान दिसून येतात. त्यामुळे बाहेरच जास्त बक्षिसे जातात. यावर उपाय म्हणजे गावातच जास्तीत जास्त पैलवान घडणे आवश्यक आहे. तसे बळ युवकांना द्यायला हवंय. त्यांनीही तशी तयारी दाखवायला हवीय. जेणेकरून कुस्ती स्पर्धेत अजून व्यावसायिकता आणता येईल आणि गावाची यात्रा अजून प्रसिद्ध होईल.

Chikharde-Gormale road | चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार  | 8 दिवसांत रस्ता नियमानुसार न केल्यास आंदोलनाचा इशारा 

Categories
Breaking News social महाराष्ट्र शेती

चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार

| 8 दिवसांत रस्ता नियमानुसार न केल्यास आंदोलनाचा इशारा

बार्शी | तालुक्यातील ग्रामीण भागात (Barshi Rural Area) विविध ठिकाणी रस्त्यांची कामे (Road works) चालू आहेत. मात्र याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या (Chikharde-Gormale Road) कामाच्या दर्जाबाबत देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोरमाळेचे शेतकरी दत्तात्रय शिंदे (Farmer Dattatray Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. 8 दिवसात नियमानुसार रस्ता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा (Warning of Agitation) निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेण्यात येत नव्हती. याने अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे. उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराकडून मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली वरवरची मलमपट्टी केली जात असल्याचे उघडकीस येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत.
चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत गोरमाळेचे शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले कि, माझ्या शेताच्या जवळून चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. जवळपास 3 किमी पर्यंत रस्त्याची डागडुजी केली आहे. मात्र कामाचा दर्जा हा निकृष्ट प्रकारचा आहे. त्यामुळे मी काही दिवस हे काम अडवून देखील धरले होते. कारण आतापर्यंत झालेले काम व्यवस्थित करण्यात आले नाही. याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांनी आश्वस्त केले कि इथून पुढे चांगले काम केले जाईल. मात्र माझी मागणी मागील रस्त्याबाबत देखील आहे. त्यामुळे रस्ता उकरून नियमाप्रमाणे काम करण्याची मागणी मी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देखील देण्यात आले आहे. यामध्ये 8 दिवसांत रस्ता व्यवस्थित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. याची तक्रार मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. आतापर्यंत झालेला रस्ता उकरून व्यवस्थित करून देण्याची आणि या पुढील रस्ता देखील नियमानुसार करण्याची मागणी केली आहे. अन्यथा 8 दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दत्तात्रय शिंदे, शेतकरी, गोरमाळे 

Tuljabhavani | Gormale | सुमारे २०० वर्षानंतर तुळजाभवानी मातेची पालखी आणि पलंग गोरमाळेच्या प्रांगणात अवतरली! | वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांचे विशेष प्रयत्न

Categories
Breaking News cultural social देश/विदेश महाराष्ट्र

सुमारे २०० वर्षानंतर तुळजाभवानी मातेची पालखी आणि पलंग गोरमाळेच्या प्रांगणात अवतरली!

| वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांचे विशेष प्रयत्न

 

ऑक्टोबर महिन्यातली प्रसन्न सकाळ उजाडली… सूर्याची कोवळी सूर्यकिरणे त्या छोट्याश्या गावावर पसरली… वातावरणात आपसूकच मनमोहकता आली… लुसलुशीत किरणे त्या गावावर पसरताना त्या ‘भास्कराला’ देखील विशेष आनंद वाटला असेल… तसे तर त्या गावची सकाळ दररोजच उजाडते.! मात्र मंगळवारची सकाळ विशेष होती … 200 वर्षानंतर उगवलेली ही सकाळ होती…त्यामुळे सूर्यकिरणासारखीच प्रसन्नता गावातील प्रत्येकाच्या मनात होती…! कारण सकाळी लवकर उठून आणि सडा संमार्जन करून, घरासमोर छान रांगोळी काढून आतुरतेनं फक्त वाट पाहायची होती…!

निमित्त होते बार्शी तालुक्यातील गोरमाळे गावात सुमारे 200 वर्षानंतर आगमन झालेल्या तुळजाभवानी मातेच्या पालखीचे आणि पलंगाचे…! ‘दार उघड बये, दार उघड’ अशी मनाच्या अंतःकरणातून साद कैक वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याची जननी जिजाऊ मातेनं तुळजाभवानी मातेला घातली होती. तुळजाभवानी मातेने त्या आर्त सादेला प्रतिसाद दिला होता. स्वराज्य फळाला आलं होतं. अशीच मनःपूर्वक हाक गोरमाळे गावच्या लोकांनी  200 वर्षांपूर्वीची प्रथा पुन्हा सुरु करण्यासाठी घातली. गावकरी आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने त्या हाकेला प्रतिसाद मिळाला आणि तुळजाभवानी मातेची पालखी आणि पलंगाचा गावात प्रवेश झाला…!

गावात सुरुवातीला पलंगाचे आगमन झाले. त्यानंतर दुपारी पालखीचे आगमन झाले. हा पलंग तुळजाभवानी देवीच्या निद्रेसाठी तयार केला जातो. नगर जिल्ह्यातील गणेश पलंगे आणि त्यांचा परिवार हा पलंग तयार करतात. नगर जिल्ह्यातून हा पलंग वेगवेगळ्या गावात थांबत तुळजापूरला येतो. तशाच पद्धतीने पालखी देखील वेगवेगळ्या टप्प्यावर थांबत तुळजापूरला जाते. ही पालखी नगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर मधील सागर भगत आणि त्यांचे कुटुंबीय तयार करतात. असे सांगितले जाते कि पालखी आणि पलंग एकत्र जात नाहीत. नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी त्यांची भेट होते, त्यांनतर तुळजापूरातच भेटतात. त्यामुळेच गोरमाळ्यात देखील आधी पलंग आणि त्यानंतर पालखीचा प्रवेश झाला. पलंग 2 तासपर्यंत गावात होता. पलंग गेल्यांनतर पालखीचे आगमन झाले.
याबाबत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वित्त व लेखा अधिकारी आणि गोरमाळे गावचे सुपुत्र सिद्धेश्वर शिंदे यांनी ‘कारभारी’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले कि, 200 वर्षांपूर्वी पालखी आणि पलंगाचे गोरमाळे गावात आगमन होत होते. मात्र ती प्रथा कालांतराने बंद झाली. याचे नेमके कारण कोणी सांगू शकत नाही. मात्र गोरमाळ्याचा तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघनाचा मान कायम आहे. त्यामुळे ही प्रथा पुन्हा चालू करण्याबाबत प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यानुसार मी ही कल्पना सचिन भगत यांना सांगितली. भगत यांनी देखील तात्काळ माझ्या विनंतीला मान दिला आणि पालखी आणि पलंग गावात आणण्याचे निश्चित झाले. शिंदे पुढे म्हणाले, पालखी जरी गावात आली आणि ती एका ठिकाणी ठेवली तर जास्त लोकांना आणि विशेष म्हणजे महिलाना दर्शनाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पालखीची गावातून मिरवणूक काढण्याची कल्पना मी सुचवली. यालाही भगत यांनी होकार दर्शवला. त्यानुसार गावात पालखीची चांगल्या पद्धतींने मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान पालखी आणि पलंगाचे गावात आगमन झाल्यामुळे गावात सकाळपासूनच लगबग होती. एका अर्थाने गावकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. गावातील सगळे लोक काम धाम सोडून फक्त दर्शनासाठी गावात थांबले होते. आसपासच्या गावातील लोकांना देखील याचा लाभ घेता आला. दरम्यान आता ही प्रथा अशीच सुरु राहणार आहे. तशी मान्यता देखील भगत आणि पलंगे परिवाराने दिली आहे. मात्र कुठेही गालबोट लागू नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहन देखील या परिवारांनी केले आहे.

पुरातन काळापासून गोरमाळे गावाला पालखी प्रदक्षिणेचा ‘मान’

 तुळजाभवानी मातेच्या दरबारात विशेष मान असल्याने गोरमाळे ची ओळख सर्वदूर आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मातेच्या पालखीच्या शिडाला खांदा देण्याचा मान गोरमाळे गावातील लोकांना मिळतो. गावातील लोक देखील मिळालेल्या या संधीचे ‘सोनं’ करतात. वर्षानुवर्ष पासून हा ‘मान’ टिकवून गावातील लोकांनी आपली ‘शान’ जपली आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानीमातेच्या पालखी प्रदक्षिणेचा मान बार्शी तालुक्यातील आगळगाव व गोरमाळे गावाला मिळाला आहे. या दोन्ही गावांतील गावकऱ्यांना तुळजाभवानीमातेच्या दरबारात विशेष मान आहे. या दोन गावांना विशेष महत्त्व  आहे. अहमदनगरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या मानाच्या पालखीचे या गावांतील मानकरी उत्साहात स्वागत  करतात. नवरात्र महोत्सवादरम्यान दसऱ्याच्या दिवशी पहाटेच तुळजापूर  येथील तुळजाभवानीमातेच्या मूर्तीची मंदिराभोवती पालखीमधून प्रदक्षिणा घालण्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. या पालखीच्या पुढच्या शिडाला खांदा देण्याचा मान आगळगाव या गावाचा तर मागच्या शिडाला खांदा देण्याचा मान गोरमाळे गावाला मिळतो.
——–
200 वर्षांपूर्वी पालखी आणि पलंगाचे गोरमाळे गावात आगमन होत होते. मात्र ती प्रथा कालांतराने बंद झाली. याचे नेमके कारण कोणी सांगू शकत नाही. मात्र गोरमाळ्याचा तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघनाचा मान कायम आहे. त्यामुळे ही प्रथा पुन्हा चालू करण्याबाबत प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यानुसार मी ही कल्पना सचिन भगत यांना सांगितली. भगत यांनी देखील तात्काळ माझ्या विनंतीला मान दिला आणि पालखी आणि पलंग गावात आणण्याचे निश्चित झाले.
| सिद्धेश्वर शिंदे, वित्त व लेखा अधिकारी, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर

Shree Siddheshwar Yatra : Gormale : आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा 

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र

आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा 

 :श्री सिद्धेश्वराच्या तीन दिवसीय यात्रेतून मिळवला जातो वर्षभराचा उत्साह 

 
 
संस्कृती, परंपरा टिकवून ठेवतात ती खेडीच. ही उक्ती सार्थ करण्याचे काम सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील गोरमाळे गाव करताना दिसून येते. चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची तीन दिवसीय यात्रा असते. या यात्रेच्या माध्यमातून गेल्या शेकडो वर्षांपासून गावाने ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा जपलीय. आधुनिक आणि डीजे च्या जमान्यातही अशा परंपरा जपत असल्यामुळे गाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच भक्तिभाव जपत मनोरंजन होतेच शिवाय ग्रामस्थांना वर्षभराचा उत्साह आणि प्रेरणा देखील या माध्यमातून मिळते.
सोंग या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे नाटकांत घेतलेली भूमिका, वेष, पार्ट. तसेच ढोंग, मिष, बनावट वेष, नक्कल, आवि- र्भाव असा ही अर्थ घेतला जातो. सोंग म्हणजे नाट्याविष्कार मानला जातो. हे नाट्यविषकर अर्थात सोंग हे गोरमाळ्याच्या यात्रेत वठवली जातात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे छबिना ची पालखी निघताना ही सोंगे केली जातात. ज्या माध्यमातून पौराणिक देखावे सादर केले जातात. महाभारत, रामायणातील निवडक पात्रे निवडून या भूमिका वठवल्या जातात. ज्यासाठी बैलगाड्याचा उपयोग केला जातो. चालत्या बैलगाड्यामध्ये एकमेकासमोर उभे ठाकत अभिनय केला जातो. या माध्यमातून पौराणिक पात्रे जिवंत असल्याचा अनुभव यात्रा बघायला आलेल्या भाविकांना मिळतो. विशेष म्हणजे बायकांची पात्रे देखील पुरुषच वठवतात. गावातील ही सर्व मंडळी आपल्या अंगातील कला किंवा सुप्त गुण अशा पद्धतीने दर्शवतात. त्यामुळे साहजिकच मनोरंजन तर होतेच शिवाय परंपरा टिकण्यास देखील मदत होते.
सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील यात्रेत छबिना असतोच. मात्र सगळीकडे सोंगे असत नाहीत. मात्र गोरमाळे गावाने ही पद्धत टिकवून ठेवलीय. डीजे च्या तालावर नाचणाऱ्या युवकांना देखील याच सोंगाचे अप्रूप आहे. त्यामुळे त्यांचा सहभाग वाढलेला दिसून येतो. त्यामुळे गावाच्या या उपक्रमाबाबत गावाचे कौतुक होते. 
 
 
गावाची यात्रा आणि उत्सवाबाबत माहिती देताना मंदिराचे पुजारी हनुमंत माळी यांनी सांगितले कि, चैत्र कृष्ण प्रतिपदेपासून पासून उत्सवाची सुरुवात होते. पहिल्या सप्ताहात नवनाथ कथा ठेवली जाते. ज्या माध्यमातून दर दिवशी कीर्तन ठेवले जाते. मुख्य उत्सव अष्टमीला सुरु होतो. 
अष्टमी ला रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत दंडवत असतात. वेशी पासून ते सिद्धेश्वराच्या मंदिरापर्यंत दंडवत घेतला जातो. या काळात साधारणतः 1500-2000 लोक दंडवत घेतात. गावचे शिवाय बाहेर गावचे लोक देखील यात सहभाग घेतात. माळी पुढे म्हणाले, याच दिवशी देवाला आंबील चा नैवेद्य दिला जातो. तर दुसरा दिवस हा छबिन्याचा असतो. रात्री पालखीची मिरवणूक निघते. त्याआधी महाप्रसाद दिला जातो. देवाचे वाहन हत्ती म्हणून त्याला सजवले जाते. त्यावर राजा आणि दोन राण्यांना अंबारीत बसवून मंदिरापासून गावात मिरवणूक आणली जाते. त्याच्या मागोमाग सोंगाच्या गाड्या लावल्या जातात. पहाटे पर्यंत हा कार्यक्रम चालतो. तिसरा दिवस हा कुस्त्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला असतो. माळी पुढे म्हणाले, 500 वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. तेव्हापासून या परंपरा चालत आल्या आहेत. ज्या आधुनिक युगातही टिकून आहेत. शिवाय गाव आणि मंदिराबाबत वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जाताना गोरमाळे गावाहून जात असत. याबाबत वेगवेगळे प्रवाद असू शकतात. मात्र अशी आख्यायिका सांगितली जाते.
 

: एकीचे दर्शन आणि व्यवस्थापनाचे धडे 

 
सर्वसामान्यपणे शहर, राज्य आणि देशात आज काल राजकारणाचा मोठा बोलबाला आहे. सर्व थरात ते पसरले आहे. गोरमाळे गाव तरी त्यापासून दूर कसे असू शकेल. मात्र या  दिवसांत राजकारण बाजूला ठेवून सर्व एक झालेले दिसून येतात. शिवाय कुणाला हे काम कर म्हणून सांगण्याची गरज पडत नाही. कसलाही भांडण तंटा होत नाही. हे एकीचे दर्शन म्हणजे एक आदर्शच झाला आहे. 
 
शिवाय प्रत्येक कामासाठी कमिट्या देखील बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सप्ताह कमिटी, यात्रा कमिटी, अन्नदान कमिटी चा समावेश आहे. यातला प्रत्येकजण आपले काम चोखपणे बजावत असतो. ज्यामुळे यात्रा निर्विघ्नपणे पार पडते. आधुनिक व्यवस्थापन सुद्धा जिथे थिटे पडेल, असे काम ग्रामस्थ करताना दिसतात. 
https://youtube.com/shorts/V84vmAj4xWM?feature=share
 

: गुणवंतांचा सत्कार आणि होतकरूंना प्रेरणा 

 
गावात आता युवक वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करताना दिसून येत आहेत. स्पर्धा परीक्षा मध्ये देखील तरुणांनी आघाडी घेतली आहे. यावर्षी नुकतीच दयानंद शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक अर्थात PSI पदी निवड झाली. तसेच राजकुमार दळवी यांची पोलीस या पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे यात्रेत त्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे होतकरू तरुणांना प्रेरणा मिळवी, या हेतूने हे सन्मान करण्यात आले. या अगोदर देखील बऱ्याच युवकांनी स्पर्धा परीक्षांत बाजी मारली आहे. 
 
कोरोनामुळे गेली दोन वर्ष यात्रा होऊ शकली नव्हती. यंदाची यात्रा मात्र ग्रामस्थांना निखळ आनंद देऊन गेली. 

Shri Siddheshwar Yatra : Gormale : आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा 

Categories
cultural महाराष्ट्र

आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा 

 

:श्री सिद्धेश्वराच्या तीन दिवसीय यात्रेतून मिळवला जातो वर्षभराचा उत्साह 

 
 
संस्कृती, परंपरा टिकवून ठेवतात ती खेडीच. ही उक्ती सार्थ करण्याचे काम सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील गोरमाळे गाव करताना दिसून येते. चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची तीन दिवसीय यात्रा असते. या यात्रेच्या माध्यमातून गेल्या शेकडो वर्षांपासून गावाने ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा जपली जातेय. आधुनिक आणि डीजे च्या जमान्यातही अशा परंपरा जपत असल्यामुळे गाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच भक्तिभाव जपत मनोरंजन होतेच शिवाय ग्रामस्थांना वर्षभराचा उत्साह आणि प्रेरणा देखील या माध्यमातून मिळते.
सोंग या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे नाटकांत घेतलेली भूमिका, वेष, पार्ट. तसेच ढोंग, मिष, बनावट वेष, नक्कल, आवि- र्भाव असा ही अर्थ घेतला जातो. सोंग म्हणजे नाट्याविष्कार मानला जातो. हे नाट्यविषकर अर्थात सोंग हे गोरमाळ्याच्या यात्रेत वठवली जातात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे छबिना ची पालखी निघताना ही सोंगे केली जातात. ज्या माध्यमातून पौराणिक देखावे सादर केले जातात. महाभारत, रामायणातील निवडक पात्रे निवडून या भूमिका वठवल्या जातात. ज्यासाठी बैलगाड्याचा उपयोग केला जातो. चालत्या बैलगाड्यामध्ये एकमेकासमोर उभे ठाकत अभिनय केला जातो. या माध्यमातून पौराणिक पात्रे जिवंत असल्याचा अनुभव यात्रा बघायला आलेल्या भाविकांना मिळतो. विशेष म्हणजे बायकांची पात्रे देखील पुरुषच वठवतात. गावातील ही सर्व मंडळी आपल्या अंगातील कला किंवा सुप्त गुण अशा पद्धतीने दर्शवतात. त्यामुळे साहजिकच मनोरंजन तर होतेच शिवाय परंपरा टिकण्यास देखील मदत होते.
https://youtu.be/t-ICTseTPVc
सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील यात्रेत छबिना असतोच. मात्र सगळीकडे सोंगे असत नाहीत. मात्र गोरमाळे गावाने ही पद्धत टिकवून ठेवलीय. डीजे च्या तालावर नाचणाऱ्या युवकांना देखील याच सोंगाचे अप्रूप आहे. त्यामुळे त्यांचा सहभाग वाढलेला दिसून येतो. त्यामुळे गावाच्या या उपक्रमाबाबत गावाचे कौतुक होते. 
 
 
गावाची यात्रा आणि उत्सवाबाबत माहिती देताना मंदिराचे पुजारी हनुमंत माळी यांनी सांगितले कि, चैत्र कृष्ण प्रतिपदेपासून पासून उत्सवाची सुरुवात होते. पहिल्या सप्ताहात नवनाथ कथा ठेवली जाते. ज्या माध्यमातून दर दिवशी कीर्तन ठेवले जाते. मुख्य उत्सव अष्टमीला सुरु होतो. 
अष्टमी ला रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत दंडवत असतात. वेशी पासून ते सिद्धेश्वराच्या मंदिरापर्यंत दंडवत घेतला जातो. या काळात साधारणतः 1500-2000 लोक दंडवत घेतात. गावचे शिवाय बाहेर गावचे लोक देखील यात सहभाग घेतात. माळी पुढे म्हणाले, याच दिवशी देवाला आंबील चा नैवेद्य दिला जातो. तर दुसरा दिवस हा छबिन्याचा असतो. रात्री पालखीची मिरवणूक निघते. त्याआधी महाप्रसाद दिला जातो. देवाचे वाहन हत्ती म्हणून त्याला सजवले जाते. त्यावर राजा आणि दोन राण्यांना अंबारीत बसवून मंदिरापासून गावात मिरवणूक आणली जाते. त्याच्या मागोमाग सोंगाच्या गाड्या लावल्या जातात. पहाटे पर्यंत हा कार्यक्रम चालतो. तिसरा दिवस हा कुस्त्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला असतो. माळी पुढे म्हणाले, 500 वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. तेव्हापासून या परंपरा चालत आल्या आहेत. ज्या आधुनिक युगातही टिकून आहेत. शिवाय गाव आणि मंदिराबाबत वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जाताना गोरमाळे गावाहून जात असत. याबाबत वेगवेगळे प्रवाद असू शकतात. मात्र अशी आख्यायिका सांगितली जाते.
 

: एकीचे दर्शन आणि व्यवस्थापनाचे धडे 

 
सर्वसामान्यपणे शहर, राज्य आणि देशात आज काल राजकारणाचा मोठा बोलबाला आहे. सर्व थरात ते पसरले आहे. गोरमाळे गाव तरी त्यापासून दूर कसे असू शकेल. मात्र या  दिवसांत राजकारण बाजूला ठेवून सर्व एक झालेले दिसून येतात. शिवाय कुणाला हे काम कर म्हणून सांगण्याची गरज पडत नाही. कसलाही भांडण तंटा होत नाही. हे एकीचे दर्शन म्हणजे एक आदर्शच झाला आहे. 
 
शिवाय प्रत्येक कामासाठी कमिट्या देखील बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सप्ताह कमिटी, यात्रा कमिटी, अन्नदान कमिटी चा समावेश आहे. यातला प्रत्येकजण आपले काम चोखपणे बजावत असतो. ज्यामुळे यात्रा निर्विघ्नपणे पार पडते. आधुनिक व्यवस्थापन सुद्धा जिथे थिटे पडेल, असे काम ग्रामस्थ करताना दिसतात. 
 

: गुणवंतांचा सत्कार आणि होतकरूंना प्रेरणा 

 
गावात आता युवक वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करताना दिसून येत आहेत. स्पर्धा परीक्षा मध्ये देखील तरुणांनी आघाडी घेतली आहे. यावर्षी नुकतीच दयानंद शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक अर्थात PSI पदी निवड झाली. तसेच राजकुमार दळवी यांची पोलीस या पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे यात्रेत त्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे होतकरू तरुणांना प्रेरणा मिळवी, या हेतूने हे सन्मान करण्यात आले. या अगोदर देखील बऱ्याच युवकांनी स्पर्धा परीक्षांत बाजी मारली आहे. 
 
कोरोनामुळे गेली दोन वर्ष यात्रा होऊ शकली नव्हती. यंदाची यात्रा मात्र ग्रामस्थांना निखळ आनंद देऊन गेली. 

Vairag-Ukkadgaon road : Rajendra Raut : वैराग-उक्कडगांव रस्ता दुरुस्तीसाठी ५ कोटीचा निधी 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

वैराग-उक्कडगांव रस्ता दुरुस्तीसाठी ५ कोटीचा निधी

: आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती

बार्शी :  बार्शी तालुक्यातील वैराग-हिंगणी-मळेगांव-चिखर्डे-गोरमाळा-पांगरी-उक्कडगांव ते जिल्हा हद्द, हा ३० किमी. रस्ता दुरुस्ती करणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
राऊत म्हणाले, ५ कोटी रुपयांचा निधी हा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व पूल परिक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२१ – २०२२ अंतर्गत योजनेतर तरतूदी मधून रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमानुसार मंजूर करण्यात आला आहे.

: रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य

दरम्यान सद्य स्थितीत या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक ठरते आहे. कारण रस्त्यावर जागोजागी खड्डे तयार झाले आहेत. लोकांना कसरत करूनच गाड्या चालवाव्या लागतात. नागरिकांची ओरड झाल्याने या अगोदर बऱ्याच वेळा रस्ता दुरुस्ती केली गेली, मात्र ती मलमपट्टी कुचकामी ठरली. नागरिकांचा त्रास काही कमी झाला नव्हता. कारण पाऊस पडून गेल्यावर पुन्हा खड्डे तयार होत गेले. आता ५ कोटी निधी मंजूर झाल्याने आता तरी रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त होईल. अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.