Recruitment | जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती

| पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

लवकरच जलसंपदा विभागात कनिष्ट अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती लवकरच होणार असून त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग ३ व ४ मधील कर्मचारी बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करुन घ्यावेत. असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian minister Chandrakant patil) यांनी दिले. तसेच पाणी वापर संस्थांची ५० टक्के परताव्याची रक्कम प्राधान्याने वितरीत करावी, कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी आदी सूचना श्री. पाटील यांनी केल्या.(Recruitment of 500 posts of Junior Engineers in Water Resources Department)

| नीरा उजव्या कालव्याची १९ जूनपर्यंत सलग दोन आवर्तने

 

नीरा प्रणालीतील भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार १० मार्चपासून १२ मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून दुसरे सलग आवर्तन १३ मे ते १९ जूनपर्यंत देण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Canal advisory committee)

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, दीपक चव्हाण, समाधान आवताडे, भिमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

नीरा प्रकल्पात उपयुक्त साठ्याच्या ४७.५० टक्के म्हणजेच २२.९६ टीएमसी पाणी उपलब्ध असून उन्हाळी हंगामात नीरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी १३.९३ टीएमसी पाणी व बिगर सिंचनासाठी १४.७८ टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यानुसार १९ जूनपर्यंत सलग दोन उन्हाळी आवर्तने देण्यात येणार आहेत. माळशीरस, सांगोला, पंढरपूरपर्यंत कालव्याच्या टेलपर्यंत पुरशा दाबाने पाणी जावे यासाठी पाटबंधारे विभागाने यांत्रिकी विभागाच्या सहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले. (Neera canal)

 

नीरा डाव्या कालव्याची दोन आवर्तने

नीरा डाव्या कालव्याला १ मार्चपासून ३० एप्रिलपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून लगेच १ मेपासून ३० जूनपर्यंत दुसरे आवर्तन देण्यात देण्यात येणार आहे. नीरा डावा कालवा एका ठिकाणी फुटल्याचा प्रकार घडला होता. ती दुरुस्ती पूर्ण झाली असून तेथील उर्वरित चाऱ्यांना प्राधान्याने सोडण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (Neera left canal)

भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवण्यात येते. त्याशिवाय भामा व भीमा नदीत १५ ते २७ मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणात ३.२३ टीएमसी पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले असल्यामुळे १५ जुलैपर्यंत पाणीवापर निश्चित करण्यात आला असला तरी तो पुढील कालावधीतही पुरणार आहे.

चासकमान प्रकल्पाची तीन आवर्तने

चासकमान प्रकल्पातंर्गत चासकमान आणि कलमोडी धरणात मिळून एकूण ३.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. १ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन सुरू आहे. दुसरे आवर्तन ५ मे ते ३ जूनपर्यंत आणि तिसरे आवर्तन ८ मे ते १७ जूनपर्यंत देण्याचे चासकमान कालवा सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Chaskaman dam)

प्रारंभी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी मोसमी पावसाच्या अंदाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. एल निनो सक्रिय होण्याची शक्यता, आयओडी, युरेशियावरील बर्फाचे आवरण यांचा पावसावर होऊ शकणार परिणाम याविषयी माहिती देण्यात आली.

यावेळी बैठकीस विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडके नीरा देवघर डावा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, नीरा देवघरचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता नामदेव करे आदी उपस्थित होते.

Chandrkant Patil | संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

पुणे | यंदाच्या पावसाच्या अंदाज पाहता धरणातील पाणीबचत (water saving) करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Pune district Guardian minister Chandrkant Patil) यांनी जाहीर केले. (Pune city water distribution system)
जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती (canal advisory committee) बैठका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, राहूल कुल, भिमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. चाऱ्याचे नियोजन आत्ताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे. (PMC Pune)
पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो असे लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपायोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे, असेही श्री. पाटील म्हणाले. (Irrigation)

*खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन १ मेपासून*

खडकवासला प्रकल्पातील ४ धरणात मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१  टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार नियोजन करुन नवीन मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. (Pune district irrigation)
बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
000

Canal Advisory Committee | सध्या तरी पुण्यात पाणीकपात नाही! मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 सध्या तरी पुण्यात पाणीकपात नाही! मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा

| कालवा समितीच्या बैठकीत झाला निर्णय

पुणे | पाणी कपातीबाबत (Water cut pune) पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या तरी शहरात पाणी कपात लागू होणार नाही. मात्र आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. याबाबत पुढील 8-10 दिवसात परिस्थिती पाहून कपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुपारी झालेल्या कालवा समितीच्या (Canal advisory committee) बैठकीत हा निर्णय झाला. (Pune water issue)
अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार होता. त्यानुसार ही बैठक झाली.  पाणीकपात करण्याबाबत पुणेकरांना दिलासा देण्यात आला आहे. सध्या तरी कुठलीही कपात नसणार आहे. मात्र आगामी 10 दिवसात धरणातील पाण्याची स्थिती पाहून कपाती बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
(Pune city water distribution issue)

| एक दिवस पाणी बंद ठेवण्याला आमदार माधुरी मिसाळ यांचा विरोध

सध्या जरी पाणीकपात केली जाणार नसली तरी आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मात्र याला आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांनी विरोध केला. एक दिवस पाणी बंद ठेवले तरी पुढील तीन दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणी बंद ठेवू नये, अशी मागणी मिसाळांनी केली. त्यावर महापालिका पाणीपुरवठा विभाग कडून सांगण्यात आले कि पूर्ण शहरात अशी समस्या येत नाही. याबाबत योग्य नियोजन केले जाईल. एकंदरीत शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले जाऊ शकते. त्यासाठी पुणेकरांनी तयार राहायला हवे आहे.
दरम्यान उद्या म्हणजे गुरुवारी पूर्ण शहरात पाणी बंद (Water closure) राहणार आहे.

Canal Advisory Committee | पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय  | दुपारी कालवा समितीची बैठक

Categories
Breaking News PMC social पुणे

पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय

| दुपारी कालवा समितीची बैठक

पुणे | अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात (pune water cut) लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत (canal Advisory Committee Meeting)  होणार आहे. (Pune city water distribution issue)
भारतीय हवामान विभागाच्या (Indian weather department) अंदाजानुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अलनिनो” (EL-Nino) या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जुन,२०२३ नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक राहील. तसेच चालु उन्हाळयात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ह्रास विचारात घेता, अचानकरित्या पाणीसाठा खालवू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मंत्री मंडळ सचिव भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी आपत्कालीन पाणी आराखडा बनवण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने हा आराखडा सरकारला सादर केला आहे. (PMC Pune)
असे असले तरी अल निनो च्या बाबतीत सरकार गंभीर आहे. त्यामुळे पाणीकपात होण्याची शक्यता दाट आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील (Khadakwasla Chain) पाण्याची पातळी खाली गेली आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणी मिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय दुपारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune district Guardian minister Chandrkant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. (Canal advisory committee)

EL-Nino | पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार! | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार!

 | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

– ऑगस्ट पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे सरकारचे निर्देश

पुणे | “अल-निनो” वादळ (समुद्र प्रवाह सक्रीयता) च्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरीता विशेष कृती आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य सरकरकडून पुण्यासहीत सर्वच महापालिकांना देण्यात आले आहेत. अल निनो मुळे मान्सूनवर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन ऑगस्ट महिन्यापर्यंत करावे लागणार आहे. त्यासाठी पाणीकपात आवश्यक आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काही काळातच पुणेकरांना पाणीकपात सहन करावी लागणार, हे स्पष्ट होत आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते जून या कालावधीचे टंचाई कृती आराखडे तयार करण्याबाबत व त्या अनुषंगाने टंचाई निवराणाचे उपाययोजना राबविण्याबाबत शासनाच्या स्थायी सुचना आधीच दिल्या आहेत.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या अंदाजा नुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अल- निनो” या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे माहे जुन, २०२३ नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक राहील. तसेच चालु उन्हाळयात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणा-या -हास विचारात घेता, अचानकरित्या पाणीसाठा खालावू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर  मंत्रीमंडळ सचिव (Cabinet Secretary) भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना काही सूचना केल्या  आहेत.

त्यानुसार  जुलै ते ऑगस्ट, २०२३ या  कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाई. निवारणार्थसाठी विशेष कृती आराखडा  तयार करणेमी. या कृती आराखडयामध्ये पिण्याच्या पाण्याच्या तसेच पिण्याखेरीज इतर आवश्यक गरजांकरिता, जनावरांकरिता पाण्याची आवश्यकता विचारात घ्यावी. त्याचप्रमाणे ज्या शहराना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो त्याची पाणी पातळी कमी झाली तर काही अंशी पाणी कपात करणे गरजेचे आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 16.50 टीएमसी हुन अधिक पाणी आहे. महापालिकेने याचे जुलै पर्यंत नियोजन केले आहे. त्यासाठी 7.5 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पाटबंधारेला दोन आवर्तनासाठी 10 टीएमसी पाणी अवश्यक आहे. आगामी काळात म्हणजे अल निनो मुळे पाऊस नाही झाला तर एवढे पाणी पुरणार नाही. त्यासाठी शेतीचे पाणी कमी करावे लागणार आहे. तसेच शहरातही पाणीकपात होऊ शकते. तसा निर्णय राज्याच्या आदेशानुसार घ्यावा लागणार आहे.

Water Distribution planning | उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी महापालिका आणि जलसंपदा खात्याची उद्या बैठक

Categories
Breaking News PMC social पुणे

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी महापालिका आणि जलसंपदा खात्याची उद्या बैठक

| महापालिकेकडून जलसंपदा खात्याला बैठकीचे निमंत्रण

पुणे | तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजनासंदर्भात महापालिकेकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका भवनात ही बैठक होणार असून जलसंपदा खात्यासोबत ही बैठक असणार आहे. सद्यस्थितीत धरणामध्ये 16.95 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यातील पाण्याची मागणी पाहता नियोजन करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (PMC Pune)

या वर्षी मार्च महिन्यापासूनच तीर्व उन्हाळा चालू झाला असून, नागरिकांच्या पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. तसेच, या वर्षी पावसाळा समाधानकारक होईल अगर कसे, याबाबत आत्ताच खात्री देता येणार नाही. या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासंदर्भात महापालिका आयुक्त यांनी गुरुवार रोजी सायंकाळी ४.३० वाजता बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या  अधिनस्त अधिकारी यांनी सदर बैठकीस आवश्यक त्या माहितीसह महापालिका आयुक्त कार्यालय येथे उपस्थित राहावे. असे निमंत्रण आयुक्त कार्यालयाकडून जलसंपदा खात्याला धाडण्यात आले आहे. (Department of water resources) 

दरम्यान खडकवासला साखळीच्या चार धरणामध्ये 16.95 टीएमसी पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात 16.60 टीएमसी पाणी उपलब्ध होते. आगामी काळात म्हणजे जुलै महिन्यापर्यंत महापालिकेला 7 टीएमसी हुन अधिक पाण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे. (Khadakwasla dam chain)
– असा आहे पाणीसाठा
धरण               टीएमसी    टक्केवारी
खडकवासला.    1.0.           50.63
पानशेत             6.8.           57.13
वरसगाव            9.46.         73.74
टेमघर               0.41.          10.97
एकूण               16.95.        58.12
—-

Domestic Water Use | पाणी कोटा १६.५२ TMC करण्याची महापालिकेची पाटबंधारे कडे मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

पाणी कोटा १६.५२ TMC करण्याची महापालिकेची पाटबंधारे कडे मागणी

| औद्योगिक पाणी वापराचे बिल महापालिका देणार नाही

पुणे महापालिका प्रशासनाने (PMC Pune) जलसंपदा विभागाला (Dept of water resources) पाण्याचे अंदाजपत्रक (Water Budget) सादर करत २०.३४ TMC पाण्याची मागणी केली होती. त्यावर जलसंपदा विभागाने महापालिकेला फक्त १२.४१ TMC पाण्याचा कोटा (reservation) मंजूर केला होता. यामुळे महापालिकेची चांगलीच अडचण झाली होती. दरम्यान महापालिकेने औद्योगिक पाणी वापर (Industrial water use) होत नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे. शिवाय त्याचे बिल देखील न देण्याचा इरादा जाहीर केला आहे. त्यामुळे आता पाणी कोटा १२.४१ TMC ऐवजी १६.५२ TMC करण्याची मागणी पुणे महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. शिवाय इथून पुढे औद्योगिक पाणी वापराचे बिल न पाठवता फक्त अशुद्ध पाण्याचे बिल पाठवावे, असे देखील महापालिकेने म्हटले आहे. (Pune municipal corporation)

पुणे महापालिका हद्दीत 34 गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता भासेल म्हणून पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट सादर करत मागणी केली होती. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी आरक्षित केले गेले आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार जलसंपदाविभागाने महापालिकेला पत्र पाठवत 2022-23 वर्षासाठी फक्त 12.41 TMC पाणी मंजूर केले होते. महापालिकेला वर्षाला 20 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. जास्तीचे पाणी हवे असेल तर त्यासाठी तीन पट दर द्यावा लागेल, असे ही जलसंपदा विभागाने म्हटले आहे. मात्र जलसंपदा विभागाच्या या भूमिकेने आता पुणे महापालिकेची चांगलीच अडचण वाढली होती. त्यावर महापालिकेने पाणी वापराचा व्यवस्थित अभ्यास करून नवीन मागणी केली आहे. (Department of water resources)

काय आहे महापालिकेची मागणी?

पुणे महानगरपालिकेस खडकवासला इरिगेशन डिव्हिजन, पुणे मार्फत प्राप्त झालेल्या बिलांमध्ये १२.४१ TMC पाणी कोटा ग्राह्य धरून बिल आकरण्यात आले आहे. महापलिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पाटबंधारे विभागाकडून पुणे महानगरपालिकेचा पाणी कोटा १२.४१ TMC ऐवजी १६.५२ TMC करणेबाबत पाटबंधारे विभागास अवगत केले आहे. MWRRA व CPHEEO मॅन्युअल नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात पुणे मनपासाठी मान्य करावयाचा सन २०२२-२३ चा कोटामध्ये पाटबंधारे विभागाने  दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार १६.५२ TMC पाणीकोटा मान्य करून बिलाची आकारणी करणेत यावी. (Pune municipal corporation)

पुणे महानगरपालिकेचा वाणिज्य व ओद्योगिक पाणी वापराबाबत तपासणी केली असता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १९६ अनु.क्र. २ नुसार केवळ घरगुती वापराकरीताच पाणी उपलब्द करून दिले जात असून धंद्याच्या किंवा विक्रीच्या प्रयोजनासाठी शहरातील कोणत्याही रहिवाश्यास पुणे महानगरपालिकेमार्फत पाणी पुरविले जात नाही. पुणे मनपाने यापूर्वीही पाणी वापराची विगतवारी सादर केली असून सन २०२२-२३ साठी पाणी वापराची त्यानुसार पुणे महानगरपालिकेस अशुद्ध पाण्याचे बिल आकरण्यात यावे. (PMC Pune)

महापालिकेने मागितलेला दुरुस्त पाणी कोटा असा आहे

घरगुती वापर                     १०.६९ TMC

समाविष्ट गावे                    ०.९९ TMC

फ्लोटिंग लोकसंख्या             ०.१२ TMC

Tanker द्वारे पाणी            ०.०३ TMC

शैक्षणिक, व्यावसायिक व        १.३९ TMC

औद्योगिक (घरगुती)

वहन घट २०%                 ३.३१ TMC

एकूण                           १६.५२ TMC

Canal Advisory Committee meeting | कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा

पुणे | खडकवासला प्रकल्पाची रबी हंगामासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला होणार आहे. यामध्ये पाण्याच्या योग्य वापराबाबत चर्चा अपेक्षित आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सिंचन प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. माजी पालकमंत्री अजित पवार हे तत्काळ निर्णय घेण्याबाबत प्रसिद्ध होते. त्यामुळे बैठकीत वादळी चर्चा होत असत. भाजपचा अर्थात चंद्रकांत पाटील यांचा तसाच प्रयत्न असणार आहे.

नुकतेच पाटबंधारे विभागाने महापालिकेला दोन महिन्याचे १११ कोटींचे बिल दिले आहे. या वाढीव बिलावर आणि पाणी वापरावर या बैठकीत चर्चा होईल. कारण पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांचा वाद जुना आहे. दोन्ही संस्था आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे या बैठकीत कशी चर्चा होईल. याकडे लक्ष लागले आहे. शिवाय सिंचनासाठी पाणी कसे उपलब्ध करून द्यायचे याबाबत देखील बैठकीत चर्चा होईल.

Residential irrigation area | निवासी करण्यात आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी पुणे महानगरपालिकेस उपलब्ध करून द्या  | महापालिका जलसंपदा विभागाला करणार मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

निवासी करण्यात आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी पुणे महानगरपालिकेस उपलब्ध करून द्या

| महापालिका जलसंपदा विभागाला करणार मागणी

पुणे | पुणे महानगरपालिकेस २०.३४ टी.एम.सी पाणी आवश्यक असून पुढील कालावधीत शहर व नव्याने समाविष्ट ३४ गावांचे क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाणात पाण्याचे मागणीमध्ये वाढ होणार आहे. तरी पुणे महानगरपालिकेची  पाण्याची निकड विचारात घेऊन पुणे पाटबंधारे मंडळाचे अखत्यारीतील खडकवासला प्रकल्पाचे लाभक्षेत्रामध्ये निवासी करणेत आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी पुणे महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका जलसंपदा विभागाला करणार आहे. याबाबतचे पत्र पाणीपुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांकडे पाठवले आहे. आयुक्तांकडून लवकरच हे पत्र जलसंपदा विभागाला पाठवले जाणार आहे.
पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार पुणे पाटबंधारे विभागाचे अखत्यारीत खडकवासला प्रणालीमधील प्रकल्पीय (पाणीसाठा) क्षमता २९.१५ टी.एम.सी. आहे. जलसंपदा विभागाकडून प्रकल्पाचे अखत्यारीतील लाभक्षेत्रामध्ये यापूर्वी सिंचन क्षेत्र (शेती) व बिगर सिंचन क्षेत्र या पद्धतीने पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. प्रकल्पावर अवलंबित सिंचन (शेती) क्षेत्र भागात मागील काही वर्षाच्या कालावधीत निवासी क्षेत्र बदलले आहे. त्याबाबत पूर्वीची व सद्य स्थितीची आकडेवारी विचारात घेता निवासी क्षेत्रात बदल करून झालेल्या सिंचन क्षेत्राचा पाणी वापर कमी होणार असल्याने, सदरचे पाणी शिल्लक राहणार आहे. खडकवासला लाभक्षेत्र पुन्हा नव्याने dcliniate करून निवासी क्षेत्र व बिगर निवासी (शेती) क्षेत्र दर्शविणे आवश्यक आहे व कमी झालेल्या बिगर निवासी क्षेत्राचा पाण्याचा कोटा अस्तित्वातील निवासी क्षेत्रासाठी वाढवून मिळणे गरजेचे आहे. पाणी कोटा तपासून सदर कोटा निवासी क्षेत्रासाठी उपलब्ध करून देण्याबाबतचा सूचना मा.जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी दि. २८/०९/२०२२ चे सुनावणी वेळी जलसंपदा विभागास दिलेल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेने सन २०२२-२३ ची लोकसंख्या ६९,४१,४६० नमूद करून पुणे महानगरपालिकेसाठी सन २०२२-२३ चे वार्षिक पाण्याचे अंदाजपत्रक यापूर्वी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांनी जलसंपदा  विभागाकडे सादर केले आहे. पुणे महानगरपालिकेस २०.३४ टी.एम.सी पाणी आवश्यक असून पुढील कालावधीत शहर व नव्याने समाविष्ट ३४ गावांचे क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाणात पाण्याचे मागणीमध्ये वाढ होणार आहे. तरी या बाबींचे अवलोकन करून व पुणे महानगरपालीकेचे पाण्याची निकड विचारात घेऊन पुणे पाटबंधारे मंडळाचे अखत्यारीतील खडकवासला प्रकल्पाचे लाभक्षेत्रामध्ये निवासी करणेत आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी पुणे महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात यावे. असे पत्रात म्हटले आहे.

Jayant Patil : Prashant Jagtap : “खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती : प्रशांत जगताप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

“खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे : जलसंपदा विभागाच्या एका कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याचा पत्राचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाण्याचे राजकारण करू पाहत आहेत. पुण्यात कुठलीही पाणी कपात करण्यात आलेली नाही. जलसंपदामंत्री  जयंतराव पाटील यांच्या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील. असा टोला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

: पाणी कपात नाही : जयंत पाटील

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहरातील प्रतिनिधींसोबत जलसंपदा मंत्री .जयंत पाटील  यांनी सिंचन भवन येथे आज ४.०० वाजता बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान राष्ट्रवादी  शिष्टमंडळाने  बाबतचे निवेदन जलसंपदा मंत्र्यांना दिले असता .पाटील  म्हणाले की, “अश्या प्रकारची कुठलीही पाणी कपात करण्यात आलेले नाही किंवा राज्य सरकार अश्या प्रकारच्या विचाराधीन नाही. गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारच्या काळात देखील तब्बल ११ वेळा अश्या प्रकारचे पत्र जलसंपदा विभागाकडून महानगरपालिकेला पाठवण्यात आली होती तसेच फडणवीस सरकारने एक महिना 180 mld क्षमतेचा एक पंप बंद ठेवत पुणेकरांवर पाणी कपात लादली होती. आम्ही मात्र कुठल्याही प्रकारच्या पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नसून पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरांच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता भविष्यात रिसायकलिंगद्वारे तसेच पश्चिम घाटातील पाणी या महानगरांकडे वळवण्याच्या विचाराधीन आहोत.”

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेतली : जगताप

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष .प्रशांत जगताप म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या १७ वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या काळात कधीही पाणी कमी पडू दिले नाही, परंतु केवळ अधिकारी स्तरावरील एका पत्राचा आधार घेत देवेंद्र फडणवीस पाण्याचे राजकारण करू पाहत आहे. या शहराच्या पाणी व्यवस्थापनात नेहमीच आदरणीयअजितदादांनी पुणे शहराचा नव्याने होणारा विस्तार विचारात घेत पाणी व्यवस्थापन करण्यात आले.एवढेच नाही तर या पाण्याव्यतिरिक्त भामा-आसखेड प्रकल्पातील २.५ TMC पाणी अजितदादांमुळे पुणे शहरास मिळाले. गेल्या ५ वर्षांच्या काळात पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हातात महानगरपालिकेची सत्ता दिली मात्र देशात,राज्यात सत्ता असूनही फडणवीसांना पुणे शहरासाठी काहीही करता न आल्याने पाणी प्रश्नाआडून महापालिकेचे राजकारण फडणवीस करू पाहत आहेत.विशेष म्हणजे यात देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या एक दिवस अगोदर अश्या प्रकारचे पत्र बाहेर येणे हे सुद्धा संशयास्पद आहे.  जलसंपदामंत्री नामदार जयंतराव पाटील साहेबांच्या या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील.
या शिष्टमंडळात आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे,विरोधीपक्षनेत्या दिपालीताई धुमाळ,  जयदेवराव गायकवाड,  रविंद्र माळवदकर, देशमुख आदी उपस्थित होते.