Mahavikas Aghadi | Sinet Election | विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार | अजित पवार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार

| महाविकास आघाडी प्रणित “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल” च्या मुख्य प्रचार कचेरीचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या मुख्य निवडणूक कचेरीचा शुभारंभ आज महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या शुभहस्ते तर महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादासजी दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या माध्यमातून निवडणूक लढवत असून सर्व दहा ते दहा ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तरुण युवक व उच्च विद्याविभूषित उमेदवारांना संधी देण्यात आली असून पॅनलच्या जाहीरनाम्याचा जाहीरनामाचे प्रकाशन देखील या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की , पुणे विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही राज्याच्या शैक्षणिकदृष्ट्या एक महत्त्वाची निवडणूक मानली जाते. पुणे विद्यापीठाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा व समाजातील सर्वसामान्य बहुजन वर्गातील मुला-मुलींना तेथे उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे हीच सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलची माफक अपेक्षा आहे. विद्यापीठाच्या संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणे, विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या प्रमुख मुद्द्यांसह सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचे उमेदवार ही निवडणूक लढवित असून या पॅनलमधील सर्व उमेदवार हे उच्चविद्याविभूषित असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत त्यांना आपले पसंती क्रमांक ०१ चे मत देऊन त्यांना आपले प्रश्न सिनेट मध्ये मांडण्याची संधी नक्की द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड , कमलनानी ढोले पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, दिपाली धुमाळ,नगरसेवक विशाल तांबे, महेंद्र पठारे, रत्नप्रभा जगताप,नंदा लोणकर,सायली वांजळे, प्रदीप देशमुख,डॉक्टर सुनील जगताप,रुपाली ठोंबरे पाटील यांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Senate Election | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक | भाजप समर्थक विद्यापीठ विकास मंचचे ५  उमेदवार बिनविरोध | महाविकास आघाडीला धक्का मानला जातोय

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक | भाजप समर्थक विद्यापीठ विकास मंचचे ५  उमेदवार बिनविरोध

| महाविकास आघाडीला धक्का मानला जातोय

| विद्यापीठाच्या निवडणुकीत पहिलीच घटना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशातील विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटातून अधीसभेवर विद्यापीठ विकास मंचाच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

संस्थाचालकांच्या खुल्या गटातून डॉ. राजेंद्र विखे-पाटील, डॉ.अपूर्व हिरे, प्रा. विनायक आंबेकर, श्री. अशोक सावंत यांची आणि महिला गटात डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांचा बिनविरोध उमेदवारांत समावेश आहे.

विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

पांडे म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक झाली आहे. ही बिनविरोध होण्यासाठी विद्यापीठ विकास मंचच्या प्रयत्नांना यश आले आहे. डॉ गजानन एकबोटे,
डॉ. राजेंद्र विखे पाटील, डॉ अपूर्व हिरे, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. नितीन ठाकरे, डॉ संदीप कदम, अभाविप चेप्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले.

दरम्यान हा महाविकास आघाडी साठी धक्का मानला जातोय. कारण महाविकास आघाडी यासाठी जोरदार प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्यभर दौरे देखील होत आहेत. असे असताना विद्यापीठ विकास मंचने जोरदार धक्का दिला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस पहिल्यापासूनच या निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहे. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्याला हवे ते उमेदवार उभे करू दिले नाहीत, अशी कॉंग्रेस ची भावना आहे. त्यामुळे प्रचारात देखील कॉंग्रेस ने हिरीरीने भाग घेतलेला दिसत नाही.

दरम्यान विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल” च्या मुख्य निवडणूक कचेरीचा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादी भवन येथे करणार आहेत.

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

Categories
Breaking News Education Political पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक प्रक्रियेसाठी महाविकास आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले असून महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकतीनीशी लढविणार आहे. अशी माहिती महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका विशिष्ट विचाराच्या लोकांची सत्ता आहे. विद्यापीठाचा कारभार लोकाभिमुख होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना मदत होणारी मदत केंद्र त्यांच्या सोयी सुविधा पुणे विद्यापीठासह नगर व नाशिक या केंद्रांवर विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय या सर्व बाबी लक्षात घेता महाविकास आघाडीने ही निवडणूक लढविण्याचे ठरवले असून , त्यानुसार या सर्व जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत.

कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,युवासेना, एन. एस. यु.आय या विद्यार्थी संघटनांनी केलेली मदत. ऑफलाइन परीक्षा बाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय, कोविड काळात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, कोवीड काळात ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावले त्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी नोकर भरतीस आलेला वेग असे अनेक चांगले निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले असल्याने पुणे विद्यापीठातील मतदान महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि हेच मुद्दे घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी यास निवडणुकीत उतरली असून या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे” , असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविकांत वर्पे ,सुनील गव्हाणे, गजानन थरकुडे, राजेश पळसकर, शरद लाड, प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, मनोज पाचपुते यांसह पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

Pune congress | पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातही काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. शहर काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीत स्वबळाचा नारा देत एकमताने तसा निर्णय घेण्यात आला. आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील आणि काँग्रेस संपूर्ण शहरात पोहोचण्यास मदत होईल, असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याने महाविकास आघाडी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

शहर जिल्हा काँग्रेसच्या सुकाणू समितीची (कोअर कमिटी) बैठक काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातील रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत सर्व नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला.आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान होईल, असे मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत मदत होत नाही, अनेकदा काँग्रेसच्या विरोधातही काम केले जाते. त्यामुळे आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नाही, अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली. यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात नव्हते, तर बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले होते, ही बाबही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली.निवडणुकीत उमेदवारी देताना काटेकोर विचार व्हावा, अशी सूचना माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली. अनेक जण निवडणुकीतील उमेदवारीपुरते पक्षाकडे येतात. यामुळे पक्षाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अशांना उमेदवारी देण्यात येऊ नये, पाच वर्षे पक्षाच्या झेंड्याखाली नियमित कार्यक्रम घेणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी प्राधान्याने विचार व्हावा, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीत सर्व नेते मंडळीं व कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी केली. या मागणीनुसार निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे यावर चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणी नुसार येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेस पक्ष स्वबळावर लाढणार आहे.  आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी असा निर्णय चर्चाअंती सर्वांच्या समंतीने घेण्यात आला.

अरविंद शिंदे, प्र. अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

12 MLAs appointed to Legislative Council | राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

विधान परिषदेवर नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न

महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नावे रद्दबातल करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांना केली होती. यामध्ये साहित्य, शैक्षणिक, संशोधन, कलाकार अशा विविध क्षेत्रांतील गुणी व्यक्तींचा समावेश होता. मात्र राज्यपालांनी वर्ष होऊनही यावर निर्णय घेतला नाही. तसेच संबंधित यादी प्रलंबित ठेवली. आता राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. अशा वेळी पुन्हा नव्याने ही यादी तयार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेला ॲड. नितीन सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

राज्यपालांनी पहिल्या बारा जणांची यादी पूर्ववत ठेवावी, नवीन यादी करण्यासाठी शिंदे सरकारला मनाई करावी, इत्यादी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत याचिका प्रलंबित आहेत, तसेच घटनापीठाकडे संबंधित मुद्यांवर सुनावणी प्रलंबित आहे. अशावेळी अन्य कोणतेही निर्णय घेण्यासाठी शिंदे सरकारला मनाई करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Prashant Jagtap Vs Jagdish Mulik | जगदीश मुळीकांची कर कपातीबाबत केलेली टीका म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारला घरचा आहेर | प्रशांत जगताप यांनी केली आलोचना

Categories
Breaking News PMC Political पुणे

जगदीश मुळीकांची कर कपातीबाबत केलेली टीका म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारला घरचा आहेर

| प्रशांत जगताप यांनी केली आलोचना

पुणे शहर भाजपचे अध्यक्ष मा.जगदीशजी मुळीक यांनी पुणेकरांची मिळकत कराची सवलत ही महाविकास आघाडी सरकारमुळे गेली,अश्या प्रकारचा खोटा आरोप केला. हा आरोपच खोटा व हास्यास्पद आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आलोचना केली आहे.

जगताप म्हणाले, मुळात जगदीश मुळीक हे २०१४ ते १९ या काळात पुणे शहरातील वडगांव शेरी विधानसभेचे आमदार होते.सध्या ते पुणे शहर भाजपचे अध्यक्ष आहेत.यांच्या अध्यक्ष पदाच्या काळातच भाजप पुणे महानगरपालिकेत सत्तेत होती.परंतु पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत जगदीश मुळीक यांना फारसे महत्व दिले जात नव्हते त्यामुळेच कुठले निर्णय कधी झाले याबाबतचे ज्ञान जगदीश मुळीक यांना नसेल हे मी समजू शकतो.२०१४ ते १९ या पाच वर्षात जगदीश मुळीक हे आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट २०१९ रोजी पुणे शहरातील मालमत्ताधारकांना मिळणारी सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला.ही सवलत १९७० सालापासून ते २०१९ पर्यंत पुणेकरांना मिळत होती,ही वस्तुस्थिती माहीत असूनही २०१९ ला हा निर्णय घेण्यात आला अर्थात त्यावेळेस राज्यात फडणवीस सरकार सत्तेत होते.हा निर्णय झाल्यानंतर स्वतःआमदार जगदीश मुळीक व पुणेकरांच्या जीवावर निवडून आलेले भाजपचे १०० नगरसेवक यांनी कुठलीही तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली नाही.त्याचा भुर्दंड आज प्रत्येक पुणेकरास सहन करावा लागत आहे. जर यांना पुणेकरांची काळजी असती तर जगदीश मुळीक यांनी त्याच वेळी तत्कालीन राज्य सरकारकडे तक्रार केली असती ,किंबहुना राज्यातील नेतृत्वाकडे याबाबतची विचारणा मुळीक यांनी केली नाही अर्थात त्यांच्यात ती धमक ही नाही.ही वस्तुस्थिती जगदीश मुळीक लपवून ठेवत आहेत.

जगताप पुढे म्हणाले, मागच्या २ महिन्यापूर्वी राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर जगदीश मुळीक अथवा पुणे भाजप मधील कुणीही अश्या प्रकारची मागणी केली नाही.किंबहुना आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रभाग रचना बदलावी अशी मागणी करण्यासाठी जगदीश मुळीक यांना वेळ आहे.परंतु पुणेकरांना कर सवलत मिळावी ही मागणी करायला मुळीक यांच्याकडे वेळ नाही. मला खात्री आहे की ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर पुणेकर येणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच या गोष्टीसाठी धडा शिकवतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांना ही करसवलत मिळवण्यासाठी मोठे जनआंदोलन येत्या काळात उभारणार असून,पुणेकरांची करसवलत जरी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी रद्द केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांना पुन्हा ही कर सवलत मिळवून देणार हा शब्द मी या निमित्ताने देऊ इच्छितो. असे ही जगताप म्हणाले.

Assembly Speaker | विधानसभा अध्यक्ष पद | महाविकास आघाडीकडून राजन साळवी तर भाजप कडून राहूल नार्वेकर 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्ष पद | महाविकास आघाडीकडून राजन साळवी तर भाजप कडून राहूल नार्वेकर

महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर राजकीय घडामोडींनी आणखी वेग धरला आहे. शिंदेंनी सत्तेत येताच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावली. मविआ सरकार असताना नाना पटोले यांच्याकडे हे पद होतं. मात्र, त्यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळताच अध्यपदाची जागा रिक्त आहे. मागील सरकारची तीन अधिवेशनं उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात पार पडली. मात्र आता नव्याने सरकार आल्यानंतर बहुमत चाचणी घेण्याआधीच ही निवडणूक लावण्यात आली आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर, तर मविआकडून राजापूरचे आमदार राजन साळवींना उमेदवारी देण्यात आली आहे.

CM Uddhav Thackeray | आपल्या राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे म्हणाले…

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

आपल्या राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे म्हणाले…

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही आडचणीत सापडले आहे. दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्या गोटात सामिल झाले आहेत. यादरम्यान शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
 मी कुणाला भेटत नाही हे म्हणणं बरोबर आहे. माझं काम आता अव्याहतपणे सुरु आहे. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. शिवसेना प्रमुख सांगायचे की, शिवसेनेपासून हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. 2014 साली जी शिवसेना लढली त्यातून 63 आमदार निवडुन आली ती बाळासाहेबांची शिवसेना होती. शिवसेना कुणाची, बाळासाहेबांची शिवसेना नाही का, हा प्रश्न महत्वाचा नाही.या पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं आहे, मला समोर येऊन सांगा त्याक्षणी मी मुख्यमंत्री पद सोडतो, तसेच तर आज संध्याकाळपासून माझा मुक्काम वर्षावरुन ‘मातोश्री’वर घेऊन जातो असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नकोय तर काय करायचं, गुजरातला जाऊन बोलायची काय गरज होती. मी त्यांना आपलं मानतो ते मानतात का नाही ते मला माहित नाही असेही ते म्हणाले. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर चालली आहे असे काहीजण म्हणत आहेत, मी काय वेगळं केलं. प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आले, ती शिवसेना देखील बाळासाहेबांच्या नंतरची आहे हे लक्षात ठेवा असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारले. मी शस्त्रक्रियेमुळे, आजारी असताना सर्वांशी संवाद ठेवणं शक्य नव्हते असे देखील त्यांनी यावेळी मान्य केलं.

| संजय राऊत यांचे ट्विट 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे, या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे, यादरम्यान शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी होय संघर्ष करणार!! असे ट्वीट केले आहे.

Supriya Sule | कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो

| सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी पराभव मान्य करत भाजपाचं अभिनंदन केलंय. “आमच्याकडे संख्याबळ नसतानाही आम्ही ही संधी घेतली होती. कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. भारतीय जनता पार्टीला शुभेच्छा. शरद पवार म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती, परंतू त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते अखंड राहिली. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा जे अपक्ष आमच्यासोबत होते ते जागेवरच आहेत.”

“आम्ही राष्ट्रवादीला पाठिंब्याची अपेक्षा असणाऱ्या संजय शिंदे यांचे मत मिळाले नाही याबाबत बसून चर्चा करणार आहोत. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, मात्र ‘अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है’. आमचे नेते ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करते आहे. जास्त बोललात तर ईडीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. एकादा अपयश येत तेव्हा लोकांना असे वाटते की यांची स्ट्रॅटेजी चुकली,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

Rajya sabha Election Analysis | Sharad Pawar | राज्यसभा निवडणूक निकालाचे शरद पवारांनी असे केले विश्लेषण 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

राज्यसभा निवडणूक निकालाचे शरद पवारांनी असे केले विश्लेषण 

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. भाजप आणि सत्ताधारी यांनी केलेल्या मागण्यांमुळे ऐनवेळी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. मध्यरात्री निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. यामध्ये पहिला फटका शिवसेनेला बसला. सेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं. एकूण 284 मतांवर दिल्लीचा रस्ता ठरवण्यात आला.मात्र, संपूर्ण निकाल लागल्यानंतर मविआची 10 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. आणि धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी पवारांची पुण्यात भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांना लोकांना आपलेसं करण्यात यश आलं. मात्र, अपक्षांच्या मतांमध्ये गंमती झालेल्या आहेत, असं शरद पवार म्हणाले. आघाडीची मतं फुटली नाही, तर ती फडणवीसांनी वेगवेगळ्या मार्गांनी वळवल्याचं वक्तव्य पवारांनी केलंय. यानंतर त्यांनी आणखी एक वक्तव्य केल्याने आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. पटेल यांचा मतांचा कोटा पूर्ण झाल्याने त्यांचा राज्यसभेचा रस्ता सुकर झाला आहे. मात्र, शिवसेनेचा सहावा उमेदवार पडल्याने महाविकास आघाडीत नाराजीचा सूर आहे. यावर बोलताना पवारांनी पटेल यांना एक ज्यादाचं मत मिळाल्याचं सांगितलं. हे मत मविआतील नसून अन्य बाजूचं असल्याचं पवारांनी सांगितलं, आणि आता चर्चा वाढू लागल्या आहेत. राष्ट्रवादीला आलेलं ज्यादा मत हे शिवसेना जाणार नव्हतं. आमच्या विरोधकांच्या कोट्यातील एक मत राष्ट्रवादीला आलं, असं पवार म्हणाले. भाजपचा हा रडीचा डाव असल्याचं पवारांनी म्हटलंय.
याचा मविआ सरकारवर काही फरक पडणार नाही. एखादं मतं इकडे तिकडे ज्यादा घेतलं. फार काही फरक पडला नाहीस असं पवार म्हणाले. त्यांच्यातील अनेक लोक आहेत ज्यांनी कधी काळी माझ्याबरोबर काम केलं आहे. मी शब्द टाकला तर ते नाही म्हणत नाही. पण मी त्यात पडलो नाही. एकाने मला स्वतः हून सांगितलं. आणि स्वत:हून मत दिलं.मला या निकालाने धक्का बसलेला नाहीधक्का बसेल असा हा निकाल नाही. आम्ही रिस्क घेतली. मतांची संख्या पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांनाही फरक पडलेला नाही. आम्ही धाडस केलं आणि प्रयत्न केला.
भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या अपक्षांवर योग्य खेळी केली. याचा त्यांना फायदा झाला. जो चमत्कार झाला आहे. पण तो मान्य केला पाहिजे.  असं पवार म्हणाले.विविध  मार्गांनी माणसं स्वतकडे वळवणं हे फडणवीसांचं जमलंय. यामध्ये फडणवीसांना यश आलं आहे, असं म्हणत पवारांनी त्यांचं कौतुक केलंय.