CM Uddhav Thackeray | आपल्या राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे म्हणाले…

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

आपल्या राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे म्हणाले…

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही आडचणीत सापडले आहे. दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्या गोटात सामिल झाले आहेत. यादरम्यान शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
 मी कुणाला भेटत नाही हे म्हणणं बरोबर आहे. माझं काम आता अव्याहतपणे सुरु आहे. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. शिवसेना प्रमुख सांगायचे की, शिवसेनेपासून हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. 2014 साली जी शिवसेना लढली त्यातून 63 आमदार निवडुन आली ती बाळासाहेबांची शिवसेना होती. शिवसेना कुणाची, बाळासाहेबांची शिवसेना नाही का, हा प्रश्न महत्वाचा नाही.या पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं आहे, मला समोर येऊन सांगा त्याक्षणी मी मुख्यमंत्री पद सोडतो, तसेच तर आज संध्याकाळपासून माझा मुक्काम वर्षावरुन ‘मातोश्री’वर घेऊन जातो असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नकोय तर काय करायचं, गुजरातला जाऊन बोलायची काय गरज होती. मी त्यांना आपलं मानतो ते मानतात का नाही ते मला माहित नाही असेही ते म्हणाले. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर चालली आहे असे काहीजण म्हणत आहेत, मी काय वेगळं केलं. प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आले, ती शिवसेना देखील बाळासाहेबांच्या नंतरची आहे हे लक्षात ठेवा असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारले. मी शस्त्रक्रियेमुळे, आजारी असताना सर्वांशी संवाद ठेवणं शक्य नव्हते असे देखील त्यांनी यावेळी मान्य केलं.

| संजय राऊत यांचे ट्विट 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे, या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे, यादरम्यान शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी होय संघर्ष करणार!! असे ट्वीट केले आहे.

Supriya Sule | कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो

| सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी पराभव मान्य करत भाजपाचं अभिनंदन केलंय. “आमच्याकडे संख्याबळ नसतानाही आम्ही ही संधी घेतली होती. कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. भारतीय जनता पार्टीला शुभेच्छा. शरद पवार म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती, परंतू त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते अखंड राहिली. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा जे अपक्ष आमच्यासोबत होते ते जागेवरच आहेत.”

“आम्ही राष्ट्रवादीला पाठिंब्याची अपेक्षा असणाऱ्या संजय शिंदे यांचे मत मिळाले नाही याबाबत बसून चर्चा करणार आहोत. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, मात्र ‘अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है’. आमचे नेते ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करते आहे. जास्त बोललात तर ईडीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. एकादा अपयश येत तेव्हा लोकांना असे वाटते की यांची स्ट्रॅटेजी चुकली,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

Rajya sabha Election Analysis | Sharad Pawar | राज्यसभा निवडणूक निकालाचे शरद पवारांनी असे केले विश्लेषण 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

राज्यसभा निवडणूक निकालाचे शरद पवारांनी असे केले विश्लेषण 

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. भाजप आणि सत्ताधारी यांनी केलेल्या मागण्यांमुळे ऐनवेळी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. मध्यरात्री निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. यामध्ये पहिला फटका शिवसेनेला बसला. सेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं. एकूण 284 मतांवर दिल्लीचा रस्ता ठरवण्यात आला.मात्र, संपूर्ण निकाल लागल्यानंतर मविआची 10 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. आणि धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी पवारांची पुण्यात भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांना लोकांना आपलेसं करण्यात यश आलं. मात्र, अपक्षांच्या मतांमध्ये गंमती झालेल्या आहेत, असं शरद पवार म्हणाले. आघाडीची मतं फुटली नाही, तर ती फडणवीसांनी वेगवेगळ्या मार्गांनी वळवल्याचं वक्तव्य पवारांनी केलंय. यानंतर त्यांनी आणखी एक वक्तव्य केल्याने आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. पटेल यांचा मतांचा कोटा पूर्ण झाल्याने त्यांचा राज्यसभेचा रस्ता सुकर झाला आहे. मात्र, शिवसेनेचा सहावा उमेदवार पडल्याने महाविकास आघाडीत नाराजीचा सूर आहे. यावर बोलताना पवारांनी पटेल यांना एक ज्यादाचं मत मिळाल्याचं सांगितलं. हे मत मविआतील नसून अन्य बाजूचं असल्याचं पवारांनी सांगितलं, आणि आता चर्चा वाढू लागल्या आहेत. राष्ट्रवादीला आलेलं ज्यादा मत हे शिवसेना जाणार नव्हतं. आमच्या विरोधकांच्या कोट्यातील एक मत राष्ट्रवादीला आलं, असं पवार म्हणाले. भाजपचा हा रडीचा डाव असल्याचं पवारांनी म्हटलंय.
याचा मविआ सरकारवर काही फरक पडणार नाही. एखादं मतं इकडे तिकडे ज्यादा घेतलं. फार काही फरक पडला नाहीस असं पवार म्हणाले. त्यांच्यातील अनेक लोक आहेत ज्यांनी कधी काळी माझ्याबरोबर काम केलं आहे. मी शब्द टाकला तर ते नाही म्हणत नाही. पण मी त्यात पडलो नाही. एकाने मला स्वतः हून सांगितलं. आणि स्वत:हून मत दिलं.मला या निकालाने धक्का बसलेला नाहीधक्का बसेल असा हा निकाल नाही. आम्ही रिस्क घेतली. मतांची संख्या पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांनाही फरक पडलेला नाही. आम्ही धाडस केलं आणि प्रयत्न केला.
भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या अपक्षांवर योग्य खेळी केली. याचा त्यांना फायदा झाला. जो चमत्कार झाला आहे. पण तो मान्य केला पाहिजे.  असं पवार म्हणाले.विविध  मार्गांनी माणसं स्वतकडे वळवणं हे फडणवीसांचं जमलंय. यामध्ये फडणवीसांना यश आलं आहे, असं म्हणत पवारांनी त्यांचं कौतुक केलंय.

OBC Reservation | BJP | ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी : योगेश टिळेकर

पुणे : मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी. असे आवाहन ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले.

दोन वर्षांत घरात बसूनही सरकारला अभ्यास करता येत नसेल तर त्यांनी मध्य प्रदेशमधील भाजप सरकारची कॉपी करावी आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यासाठी मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रातही ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक आणि ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्या वेळी मुळीक बोलत होते.

ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस राजेश येनपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर सुशिल मेंगडे, धनंजय जाधव, गायत्री खडके, आरती कोंढरे, मनिषा लडकत, प्रशांत हरसुले, प्रतिक देसरडा, दीपक माने, नंदकुमार गोसावी, राजेश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक पुढे म्हणाले, राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमवावे लागले नसून, राज्य सरकारने ते पद्धतशीरपणे घालवले आहे. आरक्षण हातचे जात असताना छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड हे ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री केंद्र सरकारकडे बोट दाखवित निमूटपणे बसून राहिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला वेळोवेळी सूचना केल्या, मात्र ठाकरे सरकारने त्या सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा आदेश दिला. याउलट मध्य प्रदेश सरकारने र्नयायालयाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याने त्यांना आरक्षण मिळाले. आरक्षण गमविण्यासाठी पूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे. आता तरी जागे व्हावे आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला ओबीसींचे आरक्षण मिळवून द्यावे.

टिळेकर म्हणाले, ओबीसींना राजकीय आरक्षण देताना ते किती प्रमाणात द्यावे हा प्रश्न आहे. त्यासाठी समर्पित आयोगामार्फत एंपिरिकल डेटा अर्थात ओबीसींची वस्तुस्थितीनुसार आकडेवारी गोळा करून प्रमाण ठरवणे आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील राजकीय आरक्षण स्थगित करतानाच ते पुन्हा लागू करण्यासाठी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारने नेमके हेच काम केले नसल्याने राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू झाले नाही. दुसरीकडे मध्य प्रदशेने न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब डेटा गोळा करून चाचणी पूर्ण केली आणि ओबीसी आरक्षण पुन्हा मिळविले. मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी.

MVA Vs BJP | Pune | महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात मूक आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात मूक आंदोलन

दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची  घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन घेण्यात आले.

महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले कि,  सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठल्या महिला भगिनीवर हात उचलल्यापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाची मजल आजपर्यंत गेली नाही. परंतु दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांमध्ये आपले निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनींना पुणे भाजपच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी अक्षरशः जोर-जोरात फटके मारले त्यांचा पदर ओढण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून पुण्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणी मध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. असे असताना काल घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत आज निषेध आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या निषेध आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत काळया रंगाच्या फिती लावत सुमारे एक तास शांतपणे बसून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी कुठल्याही आंदोलनात कसे वागावे याबाबतची आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवून दिली असून कुठल्याही आंदोलनात वैचारिक मतभेद असले तरी विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे.प्रत्येक आंदोलन हे आदर्श आंदोलन झाले पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आम्हाला तशी शिकवण आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी घालून दिलेली आहे. असे असताना आमच्या महिला भगिनींना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. त्या आरोपींवर परवा गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासनास विनंती आहे की, सदर आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी , या कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला जाईल की पुन्हा कोणीही अशा प्रकारची गैरवर्तन करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. परवा ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन झाले त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस ,चंद्रकांत पाटील यांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली नाही.  याउलट यापुढील काळात यापेक्षा उत्तमप्रकारे प्रत्युत्तर काढण्याची भाषा करत असतील तर ते एक प्रकारे महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची पाठराखण करण्यासारखेच आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणविसांनी, भाजप सारख्या पार्टी विथ डिफरन्सचा नारा पिटनाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी भाषा करणे खरोखरच अशोभनीय आहे. या गोष्टीचा देखील आम्ही या मूक आंदोलनात निषेध व्यक्त करतो”.

या आंदोलनात प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुशअण्णा काकडे, वैशालीताई नागवडे, काँग्रेसचे रमेश दादा बागवे, मोहन जोशी, संगीताताई तिवारी, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे,संजय मोरे, आम आदमी पार्टीचे मनोज माने, बाबुराव चांदेरे,बाळासाहेब बोडके,प्रदीप देशमुख,मृणालीनीताई वाणी, सदानंद शेट्टी,आप्पा रेणूसे,उदय महाले,किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव,महेश हांडे,दयानंद इरकल,दिपक कामठे, निलेश वरे आदींसह मोठ्या अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Chandrakant Patil : Congress : काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून खूप आनंद झाला

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून खूप आनंद झाला

: चंद्रकांत पाटलांचा कॉंग्रेसला खोचक टोला

 

पुणे : पुण्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने गोमुत्र आणि गुलाबजल टाकून त्या पायऱ्या स्वच्छ केल्या. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून आपल्याला खूप आनंद झाला.

महाविकास आघाडीला दहा मार्चनंतर सत्ता सोडण्याची वेळ येईल

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी सांगितले.

भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता. या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल.

त्यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड व एकूण संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करून काल पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा आपला सवाल आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी केली नाही तर आपण न्यायालयात जाऊ.

 

PMC election 2022 : Jayant Patil : जयंत पाटील म्हणाले; पुणे महापालिकेत आघाडी हवी!

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे महापालिकेत आघाडी हवी : जयंत पाटील

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जावे. त्यासाठी तिन्ही पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न असेल, असे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, ही आमची भूमिका असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

महापालिका निवडणूक स्वबळावर की आघाडीच्या माध्यमातून सामोरे जावे, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. शहर पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाचा आग्रह धरला आहे, तर पक्षाच्या शहर पातळीवरील नेत्यांनी आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. असे असतानाच प्रदेशाध्यक्ष पाटील यांनीदेखील शुक्रवारी आघाडीच्या बाजूने कौल दिला. पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘चांदिवाल आयोगाच्या समोर सचिन वाझे यांनी सांगितले होते, अनिल देशमुख यांची माझी कधी भेट झाली नाही. आता त्यांना कोणी मॅनेज करून बोलायला भाग पाडत असेल.’’

तर मागील आठवड्यात भाजपचे किरीट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की झाली होती. यावर सोमय्या यांनी मुख्यमंत्री यांच्या आदेशावरून हल्ला झाला होता, असे म्हटले होते. त्यावर पाटील म्हणाले ,‘‘सोमय्या यांना ‘सीआयएसएफ’चे संरक्षण आहे. त्यांना ‘सीआयएसएफ’ने संरक्षित केले पाहिजे होते. यात ते कमी पडले आहेत. मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे आहेत असे अजिबात नाही. त्याला महत्त्व देणे योग्य नाही. सत्ता नसल्याने भाजपचा आत्मविश्‍वास कमी होत चालला आहे.’’ हिजाब प्रकरणावर पाटील म्हणाले, ‘‘भारतीय घटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. कुणाचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाहीत.’’

Mahavikas Aghadi : PMC Election : प्रभाग  रचना  जाहीर  झाल्याबरोबर  महाविकास  आघाडीत  ‘बिघाडी’! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रभाग  रचना  जाहीर  झाल्याबरोबर  महाविकास  आघाडीत  ‘बिघाडी’! 

: राष्ट्रवादीची  स्वबळाची  भाषा  तर  घटक  पक्ष  म्हणतात  आम्हाला  काही  फरक  पडत  नाही 

 

पुणे – महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Election) प्रारूप प्रभाग रचना (Ward Structure) राष्ट्रवादी काँग्रेससाठी (NCP) अनुकूल असल्याचे दिसत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून आघाडीची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने आता थेट स्वबळावर (Independent) लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रभाग रचनेचे स्वागत करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत १२२ नगरसेवक निवडून येतील असा दावा यांनी पत्रकार परिषदेत केला. तर इकडे महाविकास आघाडीतील  घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र आम्हाला काही फरक पडत नाही. असे म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रत्यक्षात हे पक्ष सोबत लढणार कि बिघाडी होणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

जगताप म्हणाले, निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे व नियमानुसार प्रभाग रचना तयार केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला १२२ जागा मिळतील. ही प्रभाग रचना राष्ट्रवादीसाठी पूरक असल्याने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी माझी इच्छा आहे. यासाठी पुढील तीन दिवसात शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतली. आघाडीसाठी शिवसेनेसोबत चर्चा झाली असली तरी ती प्राथमिक आहे, त्यात कोणताही निर्णय झालेला नाही. भविष्यात आघाडी झालीच तर राष्ट्रवादी काँग्रेस १७३ पैकी ११० जागांच्या खाली येणार नाही. भाजपसह इतर पक्षातील १६ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार आहेत, असेही जगताप यांनी सांगितले.

शिवसेना म्हणते आम्हाला काही फरक पडत नाही

 निवडणुकीत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीनेच आम्हाला दोन वेळा बैठकीला बोलविले होते. पण त्यांना आता आघाडी करायची नसले तर आम्हाला काही फरक पडत नाही. सर्व जागा ताकदीने लढण्याची आमची तयारी आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळाल्याने प्रशांत जगताप यांची भूमिका बदलली असेल, पण आम्ही आघाडी करताना आम्ही कायम सतर्कच आहोत, असे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले.

आमची तर पहिलीच स्वबळाची तयारी – काँग्रेस

 शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे आज स्वबळाची भाषा करत आहेत. पण आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच काँग्रेस स्वबळावर लढणार असे सांगितल्याने तीन महिन्यांपासून आमची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीने आघाडीसाठी आमच्याकडे संपर्क साधला होता, पण त्याचवेळी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकणार नाही, असे त्यांना स्पष्ट केले होते. असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले

PMC ward structure : प्रभाग रचना : सत्ताधाऱ्यांना काय वाटते? कुणाला होईल फायदा? 

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रभाग रचना : सत्ताधाऱ्यांना काय वाटते? कुणाला होईल फायदा?

 

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आज प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आता सर्व इच्छुकांची बाजी पणाला लागणार आहे. मात्र प्रभाग रचना आणि बदललेल्या प्रभागामुळे मात्र कुणीही समाधानी असल्याचे जाणवत नाही. प्रस्थापित सर्व नगरसेवकांचे प्रभाग तोडण्यात आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते भाजपला दोषी मानत आहेत तर भाजप देखील महाविकास आघाडीवर दोषारोप करत आहे. प्रभाग रचनेचा नक्की कुणाला फायदा झाला? हे मात्र निवडणूक निकालानंतरच दिसेल, असे मानण्यात येत आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी मात्र अब कि बार सौ पार हा नारा कायम ठेवला आहे.

 

प्रभागांची मोडतोड करुन आणि निकष बदलून नवे प्रभाग करुन भारतीय जनता पक्षाला रोखता येईल, असे विरोधकांना वाटत असले तरी त्यांच्या भ्रमाचा भोपळा पुणेकरच फोडतील. गेल्या पाच वर्षांत पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवूनच भारतीय जनता पक्षाने महापालिकेचा कारभार केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदानरुपी साथ मतदार देतील हा विश्वास आहे. पुण्याच्या भविष्याचा वेध घेताना विविध महत्त्वाचे प्रकल्प गेल्या पाच वर्षात पूर्णत्वास नेले. मेट्रो आणि समान पाणीपुरवठा प्रकल्पही पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहेत. शिवाय विविध नव्या प्रकल्पांचीही मुहूर्तमेढ रोवली जात आहे. पुणे शहराला जागतिक पातळीवर अधोरेखित करताना देशपातळीवरही विविध पुरस्कार आणि मानांकनांनी पुण्याच्या शाश्वत विकासकामांवर शिक्कामोर्तब झाले. सुज्ञ पुणेकर या सर्व बाबींचा सारासार विचार करुन भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहतील, हा विश्वास आहे.

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

शहरात मेट्रो प्रकल्पाचे पूर्णत्वाला गेलेले काम, सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीसाठी झालेली बस खरेदी, नदी सुधार योजना प्रकल्प, करोनाच्या काळात सत्ताधारी पक्ष म्हणून पार पाडलेली जबाबदारी, अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज तसेच शहरातील नागरिकांच्या हितासाठी गेल्या पाच वर्षात केलेली कामे यामुळे येणाऱ्या महानगपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिल. ‘अब की बार सौ पार ‘ करून भाजप निश्चितपणे पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरेल.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

MLC election : विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का  : सहापैकी 4 जागांवर भाजप विजयी 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का

: सहापैकी 4 जागांवर भाजप विजयी

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल (Maharashtra Vidhan Parishad Election Result) आज (14 डिसेंबर) जाहीर झाला. अर्थात, सहापैकी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. त्यामुळं त्यांचा निकाल आगोदरच लागला आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध पार न पडलेल्या नागपूर (Nagpur) आणि अकोला-वाशिम-बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar Bawankule), तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) विजयी ठरले. यामुळं या विधान परिषद निवडणुकीत सहापैकी चार जागांवर भाजपनं विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय.

विधानपरिषदेच्या एकूण 6 जागांवर निवडणुका आयोगानं जाहीर केल्या होत्या. त्यातील मुंबईतल्या दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या चार जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या, तर अकोला-वाशिम बुलडाणा आणि नागपूरमध्ये मतदान झालं. अकोला-वाशिम-बुलडाण्यात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) विरूद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल असा सामना रंगला होता, तर नागपुरात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंसमोर काँग्रेसचा उमेदवार होता. मात्र, ऐनवेळी समीकरण बदललं. नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाला पसंती दिली, तर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर (Ravindra Bhoyar) यांना पक्षाने तिकीट दिलं. मात्र, त्यांची उमेदवारी घोषित होताच राजकीय समीकरणं बदलून गेली आणि मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. याचाच फायदा उठवत बावनकुळेंनी बाजी मारली. बावनकुळेंना 362 मतं मिळाली, तर मंगेश देशमुखांना (Mangesh Deshmukh) 186 मतं मिळाली आहेत. मात्र, काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना अवघं एक मत मिळालं आहे, तर 5 मतं अवैध ठरली. नागपूर, अकोल्यात भाजप उमेदवारांचा विजय हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय.

अकोल्यात खंडेलवालांची शिवसेनेवर बाजी

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यात बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला–बुलडाणा–वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हतं. शिवसेनेचे बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या 18 वर्षांनंतर इथं भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला आहे. शिवसेना-भाजप यांची युती असल्यानं भाजपला तिथं यापूर्वी निवडणूक लढवता आली नव्हती. याठिकाणी 18 वर्षानंतर भाजपचा उमेदवार विजयी झालाय.

कोल्हापुरात अमल महाडिकांची माघार, सतेज पाटील बिनविरोध

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातील एका जागेसाठी राज्याचे मंत्री सतेज पाटील (Satej patil) आणि भाजप नेते अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्यात सामना होता. गत काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुका बिनविरोध घेण्यात आल्यानं आता या विधानपरिषदेच्या निवडणुका सुद्धा बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न चालू होते. अशातच सर्वात जास्त लक्ष असलेली कोल्हापूरची जागा यावर्षी बिनविरोध निवडली गेली. परिणामी, राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे बिनविरोध आमदार झाले. दरम्यान, कोल्हापूरच्या मातीत यावेळी तुल्यबळ लढत होण्याची अपेक्षा होती. पण, भाजप नेतृत्वानं ही जागा बिनविरोध काॅंग्रेसच्या पारड्यात टाकल्यानं पाटील यांना काही मेहनत घ्यायची गरज पडली नाही. त्यामुळं सतेज पाटील हे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.

तर दुसरीकडं मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागाही बिनविरोध झाल्या आहेत. मुंबईत काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सुरेश कोपरकरांनी माघार घेतली, त्यामुळं भाजपचे राजहंस सिंग (Rajhans Singh) आणि शिवसेनेचे सुनील शिंदे हे बिनविरोध विधान परिषदेत जाणार आहेत. धुळे-नंदुरबारमध्ये भाजपकडून माजी मंत्री अमरिश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचे गौरव वाणी यांनी अर्ज मागे घेतला, तसेच शाम सनेर, भुपेश पटेल आणि दीपक दिघे यांनीही अर्ज मागे घेतले. मुंबईच्या दोन, धुळे-नंदुरबार, वाशिम-बुलढाणा-अकोला, कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी ही निवडणूक आहे. त्यामुळं इथंही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय.