Author Dnyaneshwar Jadhwar | मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी | आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र संपादकीय

Author Dnyaneshwar Jadhwar | मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी | आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य

 

मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी म्हणून ज्ञानेश्वर जाधवर यांच्या “आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य” (Aashechya Gungit lataklele Tarunya) या कादंबरीकडे बघता येईल. कारण प्रमाणिकपणे तरुण-तरुणींच्या जगण्याचे भाव विश्व यात उलगडत जाते. मानवाने निर्माण केलेल्या आक्राळ विक्राळ व्यवस्थेत तरुणांचे आयुष्य फरफटत जाते. त्यातून त्याला सावरता सावरता नाकी नऊ येतात. ज्यांना स्वतःला सावरता येत नाही ते आत्महत्या सारखा पर्याय जवळचा करतात. पण या कादंबरीतील गोष्ट व्यवस्थेच्या कचाट्यातून सुटण्यास मदत करते.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे तरुणांचे स्वप्न हे मृगजळाप्रमाणे आहे. कारण हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी बसतात आणि निवड मात्र काहींचीच होते. त्यातून तरुणांच्या तारुण्याच्या आणि जगण्याच्या समस्यां उभा राहतात. म्हणजे एकदा पास झाले नाही म्हणून परत परत परीक्षेला बसतात, त्यातून त्यांचे वय वाढत जाते, वाढत्या वयात हाताला काम नाही म्हणून बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो, बेरोजगार आहे म्हणून लग्न जुळत नाही. प्रेम करून लग्न करावं तर समाज मान्यता देत नाही, लग्न होत नाही म्हणून त्यांच्यांवर मानसिक दडपण येते, त्यातून शारीरिक व मानसिक आजार सुरु होतात. त्या आजारातून संपूर्ण कुटुंबाचं खच्चीकरण होतं, काहींना व्यसने लागतात. हे सर्व घडण्यापाठीमागे नेमकं काय आहे? याचा कथात्मशोध या कादंबरीत घेतला आहे.

मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्था निर्माण केली पण त्या व्यवस्थेतून डावे -उजवे अशी सरळ सरळ विचारांची दरी उभा केली. चतुर भांडवलदारांनी आधुनिक जगात लाखो सामान्य नागरिकांना शासकीय व खाजगी पद, प्रतिष्ठा मिळवण्याची आणि श्रीमंत होण्याची स्वप्न दाखवली. त्याचा परिणाम गांवागांवातील माणसांवर झाला. आणि ही माणसं आशेच्या गुंगीत जगू लागली. तर काही डाव्या – उजव्यांच्या पलीकडे जाऊन मानवी जगण्याकडे पाहू लागली. त्यांचे देखील अस्तित्व पणाला लागून लाखो तरुणांच्या जगण्याचे प्रश्न कसे आ वासून उभा राहिले. याचा धांडोळा घेणारी ही समकालीन साहित्यकृती आहे म्हणून महत्त्वाची ठरते.

कादंबरी : “आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य”
लेखक : ज्ञानेश्वर जाधवर
प्रकाशक : पुस्तकविश्व्
मुखपृष्ठ : अन्वर हुसेन
मांडणी : सारद मजकूर

Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | ज्ञानेश्वर जाधवर यांच्या ‘कूस’ कादंबरीला प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | ज्ञानेश्वर जाधवर यांच्या ‘कूस’ कादंबरीला प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार

सामाजिक वेदना मांडणारी व मानवी जीवनमूल्य असणारी कादंबरी “कूस” | प्रा. मिलिंद जोशी

Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | साहित्यात वाङमय मुल्यासोबत जीवनमूल्यनाचाही सहभाग असायला हवा. समाजाची वेदना मांडणारे साहित्याचं श्रेष्ठ असून सामाजिक अस्वस्थता मांडणारे साहित्य निर्माण होत आहे. आजचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर (Author Dnyaneshwar Jadhwar) हे समाजभिमुख आहेत. तर समाजाने देखील साहित्याभिमुख झाले पाहिजे. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Working President of Maharashtra Sahitya Parishad Prof. Milind Joshi) यांनी रविवारी पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यक्त केलं. (Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel)

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार ज्ञानेश्वर जाधवर यांच्या कूस कादंबरीला प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. कूस कादंबरी ही महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार महिलांच्या व्यथा सोबत, एकूणच कामगारांच्या जगण्याचा मागोवा घेणारी आहे. (Koos Novel)

यावेळी बोलताना समीक्षक डॉ. प्रकाश सपकाळे कूस बद्दल म्हणाले, “कूस मध्ये वाङ्मयीन मूल्य , तंत्रमूल्य आणि जीवन मूल्य या तीनही मूल्यांचा समावेश आहे म्हणूनच आम्ही कूस कादंबरीची निवड केली आहे. कूस या कादंबरीत अलीकडंच शोषण कोणत्या पातळीवर होत आहे. मानवाच्या भाव भावनाच शोषण कसं होत आणि त्याच विकृतीकरण सध्या समाजात कसं पसरत आहे. निर्मित केंद्र , ऊर्जा केंद्र आहेत जी नष्ट करण्याच्या पाठीमागे हा समाज लागला आहे. म्हणजे स्त्रीच गर्भाशय काडून टाकण्यास इथली व्यवस्था कशी जबाबदार आहे, त्यात त्या बाईचा बळी जातोय, म्हणजे तिथं एक शोषण करणारी व्यवस्था आहे. तीच व्यवस्थाच जबादार आहे. हा शाश्वत व चिरंतन असणारा विषय लेखकाने बारकाईने मांडला आहे. कूस हि कादंबरी जिथे संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरु होते. दीर्घ काळ वाचकांच्या मनात रेंगाळणे हेच कूस या कादंबरीचं यश आहे.” (Author Dnyaneshwar Jadhwar)

डॉ. वासुदेव वले म्हणले की, “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील सरांनी ज्या पद्धतीने ज्ञानपरंपरा उभी केली आहे, त्या पद्धतीने ज्ञानाची चिकित्सा करणारे साहित्य समाजाला उपयुक्त ठरू शकते. तशा पद्धतीचा आशय आणि गाभा असणारी कूस कादंबरी आहे. म्हणून आम्हाला या कादंबरीचा गौरव यथोचित वाटतोय. लेखनाच्या पातळीवर सकासपणा असणारी आणि मानवी जगण्याचे अनेक कंगोरे मांडणारी ही कादंबरी आहे.”

वाचक नाना लामखेडे म्हणाले, “कूस मधील सुरेखा चा प्रवास वाचून अस्वस्थ वाटत आहे. आणि आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेचा तिटकारा वाटतोय कि आपण किती खालच्या पातळीवर येऊन जीवन जगत आहोत. लेखकाने अत्यन्त अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. सोबतच अनेक तपशील दिले आहेत. कूस ही कादंबरी वाचनिय तर आहेच पण विचार करण्यास भाग पडतेय त्यामुळे ही कादंबरी चिरंतन टिकून राहील.”

डॉ अशोक कोळी म्हणाले , “ कूस ही कादंबरी मराठी साहित्यात महत्वाची आहे कारण आजपर्यंत साहित्यात असा परिघा बाहेरचा विषय आला नव्हता. त्यामुळे अशा मानवाचं जगणं समजून घेण्यासाठी कसू भविष्यात उपयोगी ठरेल.”

यावेळी लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी पुरस्कार मिळाल्या नंतर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, कूस ही फक्त एकट्या सुरेखा कुटेंची गोष्ट नाही तर ती एक प्रातिनिधीक पात्र आहे. आपल्या समाजातील तळातील स्त्रियांचं जगणं कसं रक्तानं माखलेलं आहे, त्याचा कथात्मक शोध कूस मध्ये घेतलेला आहे. कुटूंब सांभाळणारी स्त्री हीच आजच्या समाजाचा आधार आहे पण आज तिलाच संपवण्याच्या गोष्टी विकृतीपणे समाजात घडत आहेत. याची मांडणी कूस मध्ये केली आहे.”

यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी वि. दा पिंगळे, प्रा .सपकाळे , प्राचार्य डॉ. ए. आर पाटील, शोभा पाटील, प्रतिमा पाटील, ममता पाटील, डॉ. स्वाती विसपुते , डॉ. संगीता गावंडे, डॉ. आशिष महाजन , स्नेहल पाटील, गणेश राऊत, प्रा. पुरुषोत्तम महाजन , नामदेव पाटोळे , प्रा. विजयेंद्र पाटील आणि विलास मोरे उपस्थित होते.


News Title | Principal Dr. Kisanrao Patil State Level Literary Award to Dnyaneshwar  Jadhawar’s ‘Koos’ novel. 

Mindset | Book | Mindset हे पुस्तक का वाचावे? | कदाचित तुमचा दृष्टिकोन किंबहुना आयुष्य देखील हे पुस्तक बदलू शकेल..!

Categories
Education social देश/विदेश लाइफस्टाइल संपादकीय

Mindset हे पुस्तक का वाचावे?

| कदाचित तुमचा दृष्टिकोन किंबहुना आयुष्य देखील हे पुस्तक बदलू शकेल..!

काही पुस्तकं अशी असतात. ती तुमचे आयुष्य बदलून टाकतात. तुमचा दृष्टिकोन बदलतात आणि तुमचे आयुष्य सुलभ होते. त्यातीलच एक महत्वाचे पुस्तक म्हणजे माइंडसेट. डॉ कॅरोल एस ड्वेक या लेखिकेने लिहिलेले आणि जगप्रसिद्ध असलेले हे पुस्तक.
 मनोरचना तुम्ही बदलू शकता. स्थिर मनोरचना आणि वाढीची मनोरचना (Growth mindset) असे दोन ठळक प्रकार सांगितले गेले आहेत.  मात्र तुम्हाला वैयक्तिक प्रगती साधायची असेल, यश, पैसा मिळवायचा असेल, नातेसंबंध सुधारायचे असतील तर वाढीची मनोरचना उपयुक्त ठरते.
तुम्ही तुमच्या मनोरचनेत वाढ करू शकता.
फक्त असं मानू नका कि एखादा माणूस त्याच्या नशिबाने मोठा झालेला असतो. त्याच्यामागचे कष्ट शोधा आणि तेवढे परिश्रम घेण्याची तयारी ठेवा. त्याचप्रमाणे बुद्धिचातुर्य वापरा. व्यूहरचना आखा.
सगळ्यांत महत्वाचे म्हणजे आपल्या मुलांची
प्रशंसा करू नका. त्यांच्या परिश्रमाची प्रशंसा करा. हे करून तुम्ही देखील खूप काही करू शकता.
क्षेत्र कुठलेही का असेना … सर्वोच्च स्थानी कायम टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे चारित्र्य आणि चांगले वर्तन या दोन गोष्टी असाव्याच लागतात.
तुमच्या क्षमतेने सर्वोच स्थानी जाऊ शकता मात्र तिथे टिकून राहण्यासाठी उपरोक्त दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
प्रत्येकजण आपली मनोरचना बदलून वाढीची मनोरचना अंगिकारू शकतो.  नैसर्गिक बुद्धिमत्तापेक्षा आपल्या परिश्रमावर लक्ष द्यायला हवंय.
अशा वेगवेगळ्या सूत्रासाठी हे पुस्तक वाचायला हवंय आणि संग्रही ठेवायला हवंय ..!

Sahitya Akademi Award | ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार

Categories
Breaking News cultural Education social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार

|’सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ पुस्तकास अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार

 

नवी दिल्ली| प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर (Writer Pravin Bandekar) यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीकरिता (Novel) सा‍हित्य अकादमी पुरस्कार (sahitya Akademy Award) तर प्रमोद मुजुमदार (Pramod Mujumdar) यांना ‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या अनुवादित पुस्तकासाठी आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा (Translation) साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अकादमीचे सचिव, श्री के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकसमार्ग स्थित रविंद्र सभागृहात वर्ष 2022 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 23 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. (sahitya akademy award)

प्रवीण बांदेकर यांच्या लेखनकार्याविषयी

मूळचे सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील प्रसिध्द लेखक प्रवीण दशरथ बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरी करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2022 साठी जाहीर झाला.

त्यांच्या कविता, कादंबरी, ललित लेखन, बाल साहित्य व अनेक समीक्षा प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी महाविद्यालयीन दिवसांपासून लेखनाला सुरूवात केली असून त्यांची चाळेगत कादंबरी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सोलापूर विद्यापीठ येथे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.

गेल्या 20-25 वर्षांपासून लेखन कार्य करत आलेल्या श्री. बांदेकर यांनी त्यांच्या कादंबरीत कोकणातील विविध सामाजिक प्रश्न, मानवी नात्यातील गुंते, धार्मिक व राजकीय अनुभव बाहुल्यांच्या माध्यमातून कथन केले आहेत. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व साहित्याच्या माध्यमातून कथन केलेले अनुभव, वेगवेगळ्या समस्या जास्तीत-जास्त लोकांसमोर येतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

प्रमोद मुजुमदार यांच्या लेखनकार्याविषयी

सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या मराठी अनुवादित पुस्तकासाठी प्रमोद मुजुमदार यांना आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला.

मूळचे पुण्याचे असलेले श्री. प्रमोद श्रीनिवास मुजुमदार यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. वर्ष 1999 पासून मुक्त पत्रकार म्हणून कारकीर्द आरंभ करत, त्यांनी दैनिक महानगर, साप्ताहिक कलमनामा या नियतकालिकांत पंधरा वर्षे लिखाण केले व आरोग्य, शहरीकरण आणि पर्यावरण इ. विषयांवर स्तंभ लेखन करत आले आहेत. सध्या ‘सलोखा संपर्क गटात’ त्यांचा सहभाग आहे. त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत. अस्तित्वाचे प्रश्न, गुजरात पॅटर्न, आरोग्याचा बाजार, (अनुवाद आणि रूपांतर), सलोख्याचे प्रदेश (अनुवाद), दास्ताँ-ए-जंग सारखी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ हे पुस्तक, श्री मुजुमदार यांनी इंग्रजी पुस्तक, ‘इन गुड फेथ’ या मूळ पुस्तकाचा मराठी भाषेत केलेला अनुवाद आहे. प्रख्यात लेखिका श्रीमती सबा नक्वी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. श्रीमती नक्वी यांनी कश्मीर ते कन्याकुमारी व मणीपूर ते महाराष्ट्रात असलेल्या सार्वजनिक, धार्मिक स्थळांना व लोकप्रिय दैवतांचे दर्शन घेवून, मंदिरांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांचा सार्वत्रिक सलोख्यासाठी पुस्तकात इतिहास मांडला आहे. या पुस्तकाचा अनुवाद श्री मुजुमदार यांनी केला असून त्याबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, प्रख्यात साहित्यिक प्रो. भालचंद्र नेमाडे व प्रसिद्ध लेखक नितीन रिंधे या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम तसेच अनुवादनासाठी निवड झालेल्या पुरस्कारकर्त्यांना 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा 11 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथील कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती, सचिव श्री. के. श्रीनिवासराव यांनी दिली. तसेच अनुवादाबाबतचे पुरस्कारांच्या वितरणाबाबतची तारीख निश्चित झाल्यावर कळविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.