Gajanan Deshmukh | व्हॉईस आॅफ मिडीयाच्या वतीने पुरस्कारांची घोषणा़ | सकारात्मक पत्रकारीता जोपासण्याचा संघटनेकडून प्रयत्ऩ

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र

व्हॉईस आॅफ मिडीयाच्या वतीने पुरस्कारांची घोषणा़

| सकारात्मक पत्रकारीता जोपासण्याचा संघटनेकडून प्रयत्ऩ

परभणी : सकारात्मक पत्रकारिता ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे, हे विचार रुजवण्यासाठी व्हॉईस आॅफ मीडिया संघटनेने या वर्षीपासून व्हॉईस आॅफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार सुरू केला आहे. यात रोख अडीच लाख रुपयांचे चार पुरस्कार तसेच विशेष पाच पुरस्कार व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉईस आॅफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी शनिवार, दि़२८ जानेवारी रोजी निरज हॉटेल येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली़

लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन काम करीत असलेल्या व्हॉईस आॅफ मीडिया या देश पातळीवरील पत्रकार संघटनेचे १८ हजार सदस्य असून २३ राज्यात ही संघटना सक्रिय आहे. सकारात्मक पत्रकारिता वाढावी यासाठी संघटनेच्या वतीने यावर्षी पासून अडीच लाख रुपयांच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे स्वरूप प्रथम बक्षीस रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान, द्वितीय ६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान, महिला पत्रकार ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान तृतीय क्रमांक ४१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान असे आहे. उत्तेजनार्थ पाच विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दैनिक, साप्ताहिक, मासिक, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे प्रतिनिधी यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडणे आवश्यक आहे. १ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक असणाºया सकारात्मक बातम्या, लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. महाराष्ट्र व मराठी भाषेपुरतीच ही स्पर्धा असणार असून जानेवारी २०२४ मध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. व्हॉईस आॅफ मीडिया कोकण विभागीय कार्यालय एल. ३०- १२०१ – स्वप्नपूर्ती, सेक्टर ३६ खारघर, नवी मुंबई ४१०२१० या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत संघटनेच्या सर्वच ठिकाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव यांना सहभागी होता येणार नसल्याचेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ही स्पर्धा संघटने बाहेरील पत्रकारांसाठी सुद्धा असणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी सकारात्मक बातम्या लिहून या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन व्हाईस आॅफ मीडियाचे राज्य सहसरचिटनिस डॉ.ज्ञानेश्वर भाले, राज्य कार्यवाहक सूरज कदम, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया आणि परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अक्षय मुंडे, कैलास चव्हाण, विजय कुलकर्णी, प्रदीप कांबळे, मोईन खान, सुशील गायकवाड, मोहन धारासुरकर, प्रसाद जोशी, अमोल लंगर आदींची पत्रकार परिषदेस उपस्थिती होती़

Marathi Language | आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे

Categories
Breaking News cultural Education पुणे महाराष्ट्र

आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे

 

जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे १४जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान *मराठी भाषा संवर्धन पंधरवडा* महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.* *मराठी भाषेचे संवर्धन* या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, स्वरचित *काव्य लेखन स्पर्धा, मराठी भाषेशी संबंधित. *घोषवाक्य लेखन स्पर्धा* ,*प्रश्नमंजुषा*, *मराठी हस्ताक्षर स्पर्धा.*,*भिंतीपत्रक- पोस्टर्स स्पर्धा*,*कथा अभिवाचन स्पर्धा”, काव्यवाचन स्पर्धा “मराठी भाषेचे संवर्धन” या विषयावर प्रा.डॉ.पुरुषोत्तम काळे(महाराष्ट्र साहित्य पत्रिका, संपादक) यांचे विशेष व्याख्यान शनिवार,दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते.

ते आपल्या व्याख्यानात म्हणाले,”मराठी ही एक अत्यंत प्रगल्भ भाषा आहे.तिचा इतिहास हा दोन हजार वर्षाचा आहे. मराठी भाषेत अभिजात ग्रंथांचा ठेवा आहे. अनेक बोली मिळून मराठी भाषेची निर्मिती झालीआहे. आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर बसवावे. आज इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या दर्जांपेक्षा मराठी माध्यमांच्या शाळेचा दर्जा सरस आहे. महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मातीत आदर्शांचा फार मोठा ठेवा आहे तो सर्व मराठीत प्रतिबिंबित झाला आहे. जगातला सर्वात मोठा कवी म्हणून मला तुकाराम महाराज हे श्रेष्ठ वाटतात. मराठी भाषेत अनेक नीती मूल्यांचे शिक्षण आहे. मराठीच्या अस्तित्वावर जर कोणी प्रहार करण्याचा प्रयत्न करणार असेल तर मराठी माणूस तो कदापिही सहन करणार नाही कारण मराठी बाणा हा ताठ कण्यासारखा आहे.”

महाराष्ट्रीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करून महोत्सवाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी केले, सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.एम.शिंदे, उपप्राचार्य डॉ.एस. एफ.ढाकणे, उपप्राचार्य,डॉ.के.डी.सोनावणे, डॉ. रमेश काशिदे हे मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सृष्टी महाकाळ या विद्यार्थिनीने केले., प्रा.रोहिणी मदने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ. छाया तांबे यांनी मानले.

Contract Employees | पुणे महापालिकेत खरंच साडे आठ हजारापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत काय? | आमदार माधुरी मिसाळ यांना पडला प्रश्न

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे महापालिकेत खरंच साडे आठ हजारापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत काय?

| आमदार माधुरी मिसाळ यांना पडला प्रश्न

पुणे | पुणे महापालिकेतील विविध विभागात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांची संख्या साडे आठ हजारापेक्षा खरंच जास्त आहे का, असा प्रश्न भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना पडला आहे. त्यामुळे याबाबतचा तपशील त्यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडे मागितला. त्यानुसार आता महापालिका प्रशासनाने सर्व विभागाकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे.
आमदार मिसाळ यांच्या प्रश्नानुसार सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करताल काय :-
(१) पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभाग, पाणी पुरवठा, पथ, मोटार वाहन, सुरक्षा विभाग, विद्युत, मंडई, सांस्कृतिक केंद्र, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, अग्निशामक दल अशा एकूण २८ विभागातील कामे
करण्यासाठी साडेआठ हजारपेक्षा जास्त कंत्राटी कामगार नियुक्त केले आहेत, हे खरे आहे काय? 
(२) असल्यास, कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कामगार व ठेकेदारांचा सर्वसाधारण तपशील काय आहे? 
(३) असल्यास, कंत्राटी कामगारांच्या वेतन देणेकामी पुणे महानगरपालिकेकडून एकूण किती खर्च करण्यात येत आहे, याचा तपशिल देण्यात यावा. 
यानुसार महापालिका प्रशासनाने सर्व खात्याकडून कर्मचाऱ्यांची संख्या, संबंधित ठेकेदाराचे नाव आणि त्यावर झालेला खर्च याची माहिती मागवली आहे.

Budget Provision | यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार

Categories
Breaking News PMC पुणे

यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार

| मागील वर्षी आदेश न पाळल्याने आयुक्तांचे पुन्हा आदेश
पुणे | महापालिका प्रशासनाकडून विविध खात्यांना विकासकामासाठी बजेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र सर्वच विभागाकडून आर्थिक वर्षाच्या शेवटी बिले सादर केली जातात. त्यामुळे मागील वर्षी आदेश देण्यात आले होते कि, तिमाही खर्चाचे अहवाल द्यावेत. मात्र त्यावर अमल झाला नाही. त्यामुळे यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्तांना जारी करावे लागले आहेत.
आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या विविध विभागांस विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतुदी उपलब्ध करून दिल्या जातात. सदर तरतुदिमधून निविदा प्रक्रिया राबवून वर्षाचे कालावधीत समप्रमाणात खर्च करणे अपेक्षित असताना खात्यांकडून तसे न करता आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात देयके अदा करण्यासाठी सादर केली जातात. त्यामुळे शेवटच्या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च (Rush of Expenditure) झालेला दिसतो. सदर बाब वित्तीय नियमांशी विसंगत असून प्रशासकीय दृष्ट्याही उचित नाही. यास्तव सर्व खात्यांनी प्रतीमहा होणारा खर्च (Cash Flow Statement ) व प्रति तिमाही झालेल्या कामांची बिले व जमा खर्चाबाबतचा तपशील तिमाही अहवाल सादर करणेबाबत  १९/४/२०२२ चे कार्यालय परीपत्रकान्वये निर्देश देण्यात आले आहेत. तथापि त्यानुसार कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

तरी वरील बाब विचारात घेऊन सर्व खातेप्रमुख यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या कामांची देयके दिनांक १५ मार्च २०२३ पर्यंत मुख्य लेखा व वित्त विभागाकडे देयके अदा करण्यासाठी सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच डिसेंबर २०२२ अखेर काम पूर्ण झालेल्या कामांची देयके अदा करण्यासाठी दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत  सादर करण्यात यावी. बिलासोबत सादर करावयाच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण असे देयक सादर करण्यात यावे. अपूर्ण कागदपत्रांसह देयक सादर केल्यास व त्यामुळे देयक अदा करण्यास विलंब झाल्यास / तरतूद व्यपगत झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व व जबाबदारी संबंधित खात्याची / विभागाची राहील. सर्व खातेप्रमुख यांनी आपले विभागातील सर्व संबंधितांना याबाबत सूचना देऊन वर विहित केलेल्या वेळेत देयके मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठविण्याची दक्षता घ्यावी.

Kasba by-election | कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कसबा पोटनिवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे. मी स्वतः पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. सर्व कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली. कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची महाबैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजयनाना काकडे, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,माजी सभागृह नेते गणेश बिडकर,
भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक पोटे, गणेश घोष, संदीप लोणकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कसबा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पांडे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपाचे ४० असे मतदारसंघ आहेत; जिथे कोणतीही राजकीय समीकरणे तयार झाली, तरी भारतीय जनता पक्षाचाच विजय होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. खासदार गिरीश बापट यांनी पक्षाची भक्कम बांधणी करुन, हा बालेकिल्ला तयार केला आहे. आपल्याला असे शंभर मतदारसंघ तयार करायचे आहेत‌. त्यामुळे मुक्ताताईंच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे.

पाटील पुढे म्हणाले की, कसबा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील राजकीय समितीचे प्रमुख पद आ. माधुरीताई मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. संजयनाना काकडे त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहतील. त्यासोबतच संघटनात्मक कामांसाठी राजेश पांडे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली असून, राजेश येनपुरे त्यांना मदत करतील. तर व्यवस्थापन समिती कसबा‌‌ मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वात काम करेल.‌

ते म्हणाले की, कसबा निवडणुकीसाठी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, निवडणुकीच्या अनुषंगाने किमान शंभर घरी भेट देणार आहे. त्यासाठी मी माझ्या वेळापत्रकात ही बदल केला आहे. कार्यकर्त्यांनीही आपापल्या कामाचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांच्या भक्कम पक्षबांधणीमुळे पाचवेळा या मतदारसंघातून भाजपाला विजय मिळाला. आजही ते पक्षाचं काम रुग्णालयातून करत आहेत. त्यामुळे बापट साहेबांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शहरातील प्रत्येक पदाधिकारी काम केले पाहिजे.

मुळीक पुढे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे हास्यास्पद नेतृत्व ठरत आहेत. सध्या ते ‘भारत जोडो’ यात्रा करत आहेत. पण त्यांचेच पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताची फाळणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अशा पक्षांना लोक उभे करणार नाहीत. भारतीय जनता पक्षालाच कसब्याची जनता विजयी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. माधुरी मिसाळ म्हणाल्या की, यंत्र, तंत्र आणि मंत्र या त्रिसूत्रीवर आपण काम केले, तर कसबा विधानसभा मतदारसंघ आपल्याला सहज जिंकणे शक्य आहे. इथला प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी आपुलकी जपतो; आणि हीच आपुलकी आणि प्रेम भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळाले आहे. त्यामुळे आपण कसबाची पोटनिवडणूक शंभर टक्के जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा उपाध्यक्ष संजय नाना काकडे म्हणाले की, कसबा आणि चिंचवड हे पुणे जिल्ह्यातील भाजपाचे बालेकिल्ले आहेत‌. पण तरीही कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत गाफील राहू नये. पक्ष नेतृत्व ज्यांना उमेदवारी देईल, त्यांचा सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करुन निवडून आणू‌, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले की, आज मोदींचे नेतृत्व जनसानसात आज रुजलेलं आहे.‌याचं एकमेव कारण म्हणजे बूथ वरील कार्यकर्ता. बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. त्यामुळे बूथ कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

बैठकीचे प्रास्ताविक मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू काकडे यांनी केले. तर छगन बुलाखे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Higher education | येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन | शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

बालभारतीचा ५६ वा वर्धापनदिन संपन्न

येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन | शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे | येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले.

बालभारतीच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण सचिव रणजित सिंग देओल, ज्येष्ठ समीक्षक व प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक, उपसंचालक औदुंबर उकिरडे, शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या विषयावरील थेट प्रसारित मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

बालभारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन श्री. केसरकर म्हणाले, आपल्या जीवनात बालभारतीचे एक आगळे वेगळे स्थान आणि महत्व आहे. बालभारतीचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत आहे.

देशात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. येत्या १० वर्षात भारत हा जगातील तरुण देश असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्वाचा विकास करून भारताचे नेतृत्व करावे. अभियंता, डॉक्टर हे करिअरचे एकमेव क्षेत्र नसून विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्कृष्ठ काम करावे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षांना सामोरे जाताना चांगला फायदा होईल असे सांगून दहावी-बारावीच्या आगामी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता परीक्षांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी किशोर विभागाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यास बालभारतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000

Pariksha pe Charcha | क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

Categories
Breaking News Education Political देश/विदेश पुणे

क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रमाद्वारे शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळा येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी लेखन पॅड आणि कंपास साहित्य भेट दिले. तसेच परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी आणि बारावी हे दोन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. दहावी, बारावी झाल्यानंतर आता मागे पाहायचे नाही. नंतरच्या शिक्षणात तुम्हाला कुठेही काहीही अडचण आली तर सांगा आपण ती नक्की सोडवू. शिकून आपल्याला चांगले काम करायचे आहे. ही जिद्द मनात ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा.” यावेळी तुषार पाटील, क्रांतिवीर लहुजी वस्ताद शाळेच्या मुख्याध्यापिका संकपाळ मॅडम, सतीश साठे, सीमा खेडेकर, विक्रम खेनट यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थिती होते.

Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ? | मोहन जोशी यांचा सवाल

Categories
Breaking News PMC Political पुणे

चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?

– मोहन जोशी यांचा सवाल

पुणे | पुण्याची मेट्रो कधी पूर्ण होणार या प्रश्नावर ‘तारीख पे तारीख’ असेच उत्तर भाजपाने तयार ठेवले आहे. याचे कारण म्हणजे गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मार्गावरील मेट्रोचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. आता २६ जानेवारी हा दिवस उलटून गेला. म्हणूनच यावर असे विचारावेसे वाटते की, चंद्रकांतदादा, क्या तुम्हारा वादा ? प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा सवाल केला आहे.

जोशी म्हणाले, आता म्हणे मार्च महिन्याचा वायदा करण्यात येत आहे. जनतेला वायदे करायचे, आश्वासने द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत ही त्या भाजपची नीती बनली आहे. ‘अच्छे दिन लायेंगे’, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार’, ‘गॅस, पेट्रोल, ‘डीझेल दरवाढ कमी करणार’ , ‘महागाई कमी करणार’, ‘दरवर्षी २ कोटी नवे रोजगार निर्माण करणार…’ असे असंख्य वायदे भाजपच्या मोदी सरकारने केले. मुख्य म्हणजे असे अनेक वायदे करताना जनतेला आपण बांधील आहोत असे ते मानत नाहीत. त्यांचे वायदे ‘हेडलाईन मॅनेजमेंट’पुरतेच असतात. आदरणीय चंद्रकांतदादा पाटीलदेखील याच मुशीत घडले आहेत. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोबाबत प्रत्येकवेळी नवीन वायदे करताना त्यांना ना खंत ना खेद! ‘हेडलाईन छापून येण्यापुरताच त्यांचा पुण्याच्या विकासाशी संबंध आहे. त्यामुळेच आता नवा वायदा करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या खात्यांमध्ये ‘वायदामंत्री’ हे नवे खातेदेखील स्वीकारावे. सुज्ञास अधिक सांगणे न लागे !

जोशी पुढे म्हणाले, दीर्घकालीन पाठ्पुराव्यानंतर काँग्रेस पक्षाने पुण्याॉत मेट्रो प्रकल्प आणला. मात्र भाजप राजवटीत काम रेंगाळले व अखेरीस मागीलवर्षी मार्च महिन्यात जेमतेम १२ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले. आताही गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता २६ जानेवारी दिवस उजाडला. आता नवा वायदा मार्च महिन्याचा ! तसेच, पुण्यातील ३३ किलोमीटर लांबीचे दोन्ही मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते.

 

By-Election | विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल | २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल

| २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

पुणे |  भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारीऐवजी रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १८ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये बदल करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक २५ जानेवारी रोजी जारी करण्यात आले आहे.

सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल. गुरुवार २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.
०००००

Pakistan Economy | पाकिस्तानी रुपयाची भयानक घसरण | एका दिवसात 25 रुपयांनी घट | आता 1 डॉलरच्या तुलनेत ही किंमत

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

पाकिस्तानी रुपयाची भयानक घसरण | एका दिवसात 25 रुपयांनी घट | आता 1 डॉलरच्या तुलनेत ही किंमत

 बुधवारी पाकिस्तानी रुपया प्रति डॉलर 230 रुपयांवर बंद झाला होता.  गुरुवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही तासांतच तो आणखी घसरून 255 रुपयांवर आला.  सरकारने याबाबत सध्या कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
 गंभीर संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या चलनात गुरुवारी डॉलरच्या तुलनेत प्रचंड घसरण नोंदवली गेली.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदत पॅकेजच्या पुढील हप्त्याबाबत सरकारने कठोर अटी मान्य करण्याचे संकेत दिल्यानंतर चलनाचे मूल्य घसरले आहे.  बुधवारी पाकिस्तानी रुपया प्रति डॉलर 230 रुपयांवर बंद झाला होता.  गुरुवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही तासांतच तो आणखी घसरून 255 रुपयांवर आला.  सरकारने याबाबत सध्या कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
 मदत पॅकेज जारी करण्यासाठी पाकिस्तान आयएमएफशी चर्चा करत आहे
 कर्ज परतफेडीत चूक टाळण्यासाठी पाकिस्तानला $6 अब्जच्या मदत पॅकेजपैकी $1.1 अब्जचा महत्त्वाचा हप्ता मिळवायचा आहे.  मदत पॅकेज जाहीर करण्यासाठी पाकिस्तान आयएमएफशी चर्चा करत आहे.  विश्लेषक अहसान रसूल यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी रुपयाची घसरण हे एक संकेत आहे की पाकिस्तान सध्या IMF कडून आवश्यक कर्ज मिळविण्याच्या अगदी जवळ आहे.
 पाकिस्तान मदत पॅकेजसाठी कठोर अटी स्वीकारण्यास तयार आहे
 काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले होते की, त्यांचे सरकार गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले 6 अब्ज डॉलरचे मदत पॅकेज पुनर्संचयित करण्यासाठी आयएमएफच्या कठीण अटी स्वीकारण्यास तयार आहे.  परकीय चलनाचा साठा कमी होत असताना पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट आहे.
 पाकिस्तानच्या निर्यातीवर मोठे संकट निर्माण झाले आहे
 पाकिस्तानच्या निर्यातीवरही खूप वाईट काळ आहे.  खरं तर, पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या विदेशी शिपिंग कंपन्या त्याच्यासाठी त्यांची सेवा बंद करण्याचा विचार करत आहेत.  अशा स्थितीत देशातील सर्व निर्यात ठप्प होऊ शकते.  पाकिस्तान शिप एजंट असोसिएशन (PSAA) चे अध्यक्ष अब्दुल रौफ यांनी अर्थमंत्री इशाक दार यांना पत्र लिहून इशारा दिला आहे की शिपिंग सेवांमध्ये कोणत्याही व्यत्ययामुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी गंभीर समस्या उद्भवू शकतात.