Kumar Gandharva | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ | दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ

| दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार अशा सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण करणारे पद्मविभूषण कै. पं. कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दिनानिमित्त शनिवार, ८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परीषद, टिळक मार्ग, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक सर्वश्री पं. डॉ. मोहनकुमार दरेकर, पं. राजेंद्र कंदलगांवकर व श्रीमती मीनाताई फातर्पेकर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार भूषवणार आहेत अशी माहिती आयोजक पुणे कला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

कै. पं. कुमार गंधर्व यांचे प्रतिमेचे पूजन केल्यानंतर दीपप्रज्वलन व तन्मयी मेहेंदळे यांनी सादर केलेली प्रार्थना झाल्यानंतर तीनही पाहुणे कै. पं. कुमार गंधर्व यांच्याबद्दलच्या आठवणी व त्यांच्या गायिकीची वैशिष्टे विशद करतील. सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे असे आयोजक मोहन जोशी यांनी सांगितले.

MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली | शहरातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. अशा कणखर मनाचा नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी खासदार स्व. बापट यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभेत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. अशी माणसे दुर्मिळ असतात. सर्वांना सोबत घेताना विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली. पुणे शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले. सर्वांना हवाहवासा नेता आपण गमावला. कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व धर्मियांना मदत केली. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी काम केले. अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा अतिशय मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे नररत्नाची खाण असल्याचे आपण म्हणतो, त्यापैकी खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. त्यांच्यामध्ये माणसे जपण्याची कला होती. महत्वाचे म्हणजे रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता. बोलण्यामध्ये ते खूप चपखल होते. कोणालाही न दुखावता शालजोडीतून शब्द वापरुन आपला मुद्दा पटवून देण्याची हातोटी होती. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. संसदीय कार्यमंत्री म्हणूनही त्यांचे कार्य नोंद घेण्यासारखे होते. शेतीवरही त्यांचे प्रचंड प्रेम होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाचे केलेले काम सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना सगळ्या क्षेत्रातील प्रचंड ज्ञान होते. असे नेते तयार होण्यासाठी चाळीस- चाळीस वर्षे लागतात, अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून बापट कुटुंबियांचे सांत्वन
मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी शनिवार पेठ येथील खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदिश मुळीक उपस्थित होते.


खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक

 

मुंबई, दि. 29 : राज्यपाल रमेश बैस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीश बापट यांनी संसद सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री, संसदीय समित्यांचे सदस्य यांसह विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले गिरीश बापट हे कुशल संघटक होते. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. राजकारणात ते अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता व अनुभवी संसदपटू गमावला आहे”, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकासंदेशामध्ये म्हटले आहे.


राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले | राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

 

मुंबई, दि. 29 : “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


पुणे शहराचे खासदार आणि माझे दीर्घकाळापासूनचे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. गेला काही काळ त्यांचे आजारपण चालू होते पण त्यामुळे त्यांना मृत्यू इतका लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हते. कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री, पालकमंत्री आणि खासदार अशी उत्तम राजकीय वाटचाल करताना त्यांनी स्वतःचा कार्यकर्त्याचा पिंड मात्र सोडला नाही. याच बरोबर राजकीय स्पर्धा असली तरी विरोधी पक्षांशी वितुष्ट असता कामा नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी सदैव जपली. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षामध्ये त्यांचे चांगले मित्र होते. पुण्याच्या विकासात त्यांनी निश्चितच भरीव योगदान दिले. मात्र, शहराच्या विकासात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. हे त्यांचे अजून एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. पुण्याच्या मध्यवस्तीतील कसबा विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा म्हणजेच सलग २५ वर्षे ते आमदार म्हणून निवडून येत होते. यातूनच त्यांच्या लोकसंपर्काची प्रचीती येते. पुण्यातील गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आणि मी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविली. मात्र, तरीही आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाणारा आनंदी वृत्तीचा हा उमदा मित्र आज हरपला. यामुळे कुटुंबातील व्यक्ती गेल्यासारखेच दुःख मला झाले आहे. ईश्वर इच्छेपुढे कोणाचा इलाज नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.

मोहन जोशी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी


मागील ३ ते ४ दशकापासून पुणे शहराच्या सामाजिक राजकीय व सामाजिक क्षेत्राशी जोडलेले नाव म्हणजे गिरीशजी बापट.
अत्यंत संघर्षातून महानगरपालिका,विधानसभा व लोकसभा सदस्य या पदांवर काम करत असताना तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे पालकमंत्रीपद भूषाविताना त्यांनी जपलेले पुणेरीपण ही बाब चिरकाल स्मरणात राहील. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते ,त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय व सामाजिक चळवळीचे अपरीमित नुक़सान झाले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बापट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

| प्रशांत सुदामराव जगताप.
अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.


गिरीश बापट – कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व राजकीय पक्षातील लोकांशी राजकारणापलीकडील मैत्री जपणारा दिलदार मित्र ….भावपूर्ण श्रद्धांजली!

वंदना चव्हाण खासदार, राज्यसभा


गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही : डॉ. नीलम गोऱ्हे

दुःखद निधनाबद्दल वाहिली आदरांजली

पुणे, ता. २८ : दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.

त्यांचा आणि माझ्या गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ परिचय होता. पुणे शहरातून कसबा विधान सभेतून आमदार म्हणून काम करीत असताना त्यांचा परिचय आमच्या कुटुंबात आमची आई कै. श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्याशी सर्वप्रथम झाला.
त्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतानाही सातत्याने संपर्कात असत.

२०१४ नंतर ते पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे खासदार देखील झाले. या संपूर्ण कालावधीत त्यांनी पुणेकरांच्या असंख्य प्रश्न सोडवितानाच अष्टविनायक, पुणे शहरातील वाडे, संसदीय कार्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांचा समन्वय त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केला होते. ते मंत्री असतांना विधान परिषदेत नेहमीच येत होते. सर्व पक्षांच्या आमदारांचे एक चांगले स्नेही म्हणून ते परिचित होते.

स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाना देखील अनेकदा ते आले होते. महात्मा फुले संग्रहालयाच्या ठिकाणाहून त्यांचा सर्वांचा संपर्क होत असे. असा नेता, असा खासदार पुनः होणे नाही अशी भावना मी व्यक्त करीत आहे.


खासदार गिरीश बापट यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपुलकी, प्रेम आणि मैत्री जपण्याचे काम केले. मला व्यक्तिशः त्यांनी मुलाप्रमाणे वागणूक दिली. त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम त्यांनी पक्ष न पाहता वैयक्तिकरित्या लक्ष घालून मार्गी लावून देण्याचे काम केले. प्रत्येक घटकाला ते नेहमी आपलेसे वाटायचे. त्यांच्या निधनाने पुण्यातील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा हेडमास्तर गमविला असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुनिल टिंगरे, आमदार वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

—–

Mohan Joshi | ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु

| ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

शिशुपालाचे शंभर अपराध झाले तसे आता केंन्द्रातील भाजपच्या मोदी सरकारचे झाले असून कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्या क्षणापासून कॉंग्रेसने आता रणशिंग फुंकले आहे व अंतिम लढ्याला सुरुवात केली आहे आणि पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.

ते म्हणाले, देशातील महाभयंकर महागाई, बेकारी, कोलमडलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार याविरुद्ध संसदेत मोदी सरकारला धारेवर धरणारे कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला लागलेली अखेरची घरघर आहे. किंबहुना त्यांच्या या षडयंत्राला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच म्हणावे लागेल.

राहुल गांधींच्या रूपाने देशातील जनतेला आश्वासक पर्याय निर्माण झाल्याचे चित्र देशात वाढत राहिल्यामुळेच त्यांचा आवाज बंद करण्यासाठी कटकारस्थानात मास्टरकी असणाऱ्या भाजपने राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी केलेला हा लोकशाही विरोधी प्रयत्न आहे. असे सांगून मोहन जोशी म्हणाले, मात्र देशातील जनता या लोकशाही विरोधी मोदी सरकारला सत्तेवरून दूर करण्यासाठी आता आसुसलेली असून पुण्यातील कसबा विधानसभा असो अथवा भाजपच्या ताब्यातील हिमाचल प्रदेश असो, जनतेने भाजपला धूळ चारली आहे व कॉंग्रेसला विजयी केले आहे. त्यामुळेच स्वतःला महानायक समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला धडकी भरली आहे.

गेली ९ वर्षे मनमानी पद्धतीने जनताविरोधी निर्णय घेत मित्र असणाऱ्या मुठभर उद्योगपतींचे खिसे भरण्याचे पाप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले असून, सारा देश अडानीच्या घशात घालण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या महापापाला राहुल गांधी यांनी जोरकस विरोध केला. हे स्पष्ट करून मोहन जोशी म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रेतून साऱ्या देशाला राहुल गांधींनी आपलंसं केलं. त्यांच्यामुळे आपले पंतप्रधानपद व सत्ता जाणार हे ओळखल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साऱ्या भाजपने संसदेत गोंधळ घालून राहुल गांधींना आठ दिवस बोलू दिले नाही आणि पूर्वी रचलेल्या षड्यंत्राप्रमाणे सुरतमधील सत्रन्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून निर्णय घेऊन त्याआधारे राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे या त्यांच्या महापापामुळे देशातील जनतेत संतापाची लाट आली असून राहुल गांधींची प्रतिमा आता अधिक उंचावली आहे, असे मोहन जोशी म्हणाले.

 

Rahul Gandhi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे
भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

आगामी २०२४च्या निवडणुकीत कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधींच्या प्रभावामुळे मोदी सरकार व भाजपा सत्ते वरून फेकले जाणार हे लक्षात आल्यामुळेच, खा. राहुल गांधींवर विविध खटले दाखल करून व आरोप करून लोकसभेतून त्यांना अपात्र करणे हे षडयंत्र मोदी सरकार व भाजपाने रचले आहे. सुरत सत्र न्यायाल्याचा निकाल हा त्यातीलच एक भाग आहे. मात्र यामुळे आता देशातील कॉंग्रेस कार्यकर्ते पेटून उठले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातून मोदी सरकारला कॉंग्रेस कार्यकर्ते निश्चित पराभूत करतील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज दिली.

ते म्हणाले की, कर्नाटकातील कोलार येथे २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत जाहीरसभेत केलेल्या भाषणात ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन का आहे? सर्व चोरांचे नाव मोदी का असते?’ अशी टीका कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेमुळे गुजरातमधील मोदी समाजाची मानहानी झाली असे सांगून दाखल केलेल्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा ठोठावली हा भाजपाचा राजकीय विशाल षडयंत्राचा भाग आहे असे मोहन जोशी म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपा म्हणजे भारत देश नाही असे असूनही लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेली टीका म्हणजे भारत विरोधी बाब आहे असे सांगत भाजपने गेल्या आठवड्यात संसद बंद पाडली हा देखील त्या षडयंत्राचा भाग आहे.

‘भारत जोडो’ यात्रेनंतर साऱ्या देशात बदलेल्या वातावरणामुळे मोदी सरकार व भाजपला धडकी भरली आहे. त्यातच प्रचंड महगाई, बेकारी आणि अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा यामुळे संतप्त झालेली देशातील जनता मोदी सरकार व भाजपला येणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करणार याची प्रचिती भाजपला जागोजागी येऊ लागली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा निवडणूक ही त्याचीच प्रचिती आहे असे मोहन जोशी म्हणाले.

त्यामुळेच देशातील या मोदी सरकार विरुद्धच्या असंतोषाचे नेतृत्व करणारे कॉंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांना विविध खटल्यांमध्ये अडकवणे, त्यांची प्रतिमा डागाळणे आणि सत्र न्यायाल्याने शिक्षा दिल्याच्या नावाखाली त्यांना लोकसभेतील त्यांचे अध्यक्ष यांच्या मार्फत अपात्र करणे हे मोठे षडयंत्र भाजपा ने रचले आहे. असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, यामुळे कॉंग्रेस पक्ष झुकणार नाही. लोकशाहीतील निवडणूक आयोग सत्र न्यायालय यांच्यावर दडपण आणून स्वतःला हवे तसे निर्णय लाऊन घेतले जातात अशी टीका भाजपावर होत आहे. त्याचाच हा भाग असावा. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अडाणी प्रेम उघड झाल्यामुळे ते आणि त्यांचा भाजपा पक्ष घायकुतीला आला आहे त्याचेच हे बोलके उदाहरण आहे. आमचे नेते खा. राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्राचा मुकाबला करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील असा इशारा आम्ही देतो असे मोहन जोशी यांनी शेवटी म्हटले.

 

MLA Ravindra Dhangekar | आमच्या लढ्याला यश आले | आता ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत द्या | आमदार रविंद्र धंगेकर

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

आमच्या लढ्याला यश आले | आता ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत द्या | आमदार रविंद्र धंगेकर

शहरातील नागरिकांना मिळकतकरातील 40% सवलत कायम राहावी, यासाठी आम्ही सर्वजण लढा देत होतो. त्या लढ्याला यश आले आहे.  काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली. त्यामध्ये शहरातील मिळकतकरात ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असा दावा काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच ते म्हणाले कि, पुणे शहरातील ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी. (MLA Ravindra Dhangekar)

आमदार धंगेकर पुढे म्हणाले, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत. त्यामुळे मी कसबा मतदार संघातील सर्व नागरिकाचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

धंगेकर यांनी सांगितले कि, शहरात जवळपास १० लाख मिळकती आहे. त्या सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजवर मांडत आलो आणि आमदार म्हणून विधिमंडळात गेल्यावर तीच मागणी केली होती. त्या मागणीला काही प्रमाणात तरी यश आल्याच म्हणावं लागेल. कारण काल मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारला केवळ नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे घ्यावा लागला असून त्यामुळे मी तमाम कसबा मतदार संघातील नागरिकांचा आभारी आहे.

 आमदार धंगेकर म्हणाले, मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे ५०० स्क्वेअर फुटाच्या घराना सवलत दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी, ही मागणी विधिमंडळात करणार असून आमची मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आवाज उठवणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Cantonment Board Elections | पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या | मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या
| मोहन जोशी

देशभरात होणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका भाजपने पराभवाच्या भीतीने देशभरात त्यांना होत असलेला विरोध लोकांमध्ये असलेली प्रचंड नाराजी या भूमिकेतून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे.

मोहन जोशी म्हणाले, निवडणूक आयोगातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांचे फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत त्यांचा आलेल्या सर्वे तसेच देशभरात होत असलेली त्यांच्याविरुद्धची वातावरण नुसतीच आश्वासने देणे, महागाई,  बेरोजगारी याचबरोबर स्थानिक पातळी वरील प्रश्न न सोडवणे, यासारखे अनेक समस्या पण आता डोकेदुखीच्या ठरत आहेत.

पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा कसबा विधानसभा मध्ये झालेला विजय हा नवीन पॅटर्नची नांदी ठरवतो. त्यामुळे पराभवाच्या छायेत पासून दूर राहण्यासाठी आता नवीनच प्रकार सुरु केला आहे.  ही एकप्रकारे संविधानाची मोडतोड सुरू आहे. जी म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन निवडणूक रद्द करणे,  यामुळे लोकांचा आता नक्की निवडणुका होणार, कधी देशामध्ये अघोषित हुकुमशाही याचे रूपांतर आता घोषित हुकूमशाही मध्ये
होणार की काय असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी विचारला आहे.

देशभरातल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नागरिकांनाही यासंदर्भात निवडणुका घेवून त्यांची जन्मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हा एका प्रकारे संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार वारंवार पुढे ढकलणे अथवा विहित कालावधीत निवडणूक न घेणे म्हणजे लोकशाही ची एक प्रकारे पायमल्लीत होत आहे.  याचबरोबर राज्यातील महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही एक प्रकारे पुढे ढकलून जनमताचा अनादरच सुरू आहे. ही एका प्रकारे भाजपकडून ही एका प्रकारे लोकशाही ची पायमल्ली सुरू आहे. असे जोशी यांनी म्हटले आहे.

Kasba by-election | विजयाबद्दल काँग्रेस नेत्यांचे काय आहे विश्लेषण!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या भावी राजकारणाला नेमकी दिशा देणारा विजय –    मोहन जोशी

पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा केलाला दणदणीत पराभव ही महाराष्ट्रातील भावी राजकारणाची दिशा दाखवते. सलग ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ देखील महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाविकास आघाडीने स्वतःकडे खेचून आणला. या मतदारसंघात भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी धनशक्ती व गुंडशक्ती याबरोबरच सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करूनही मतदारांनी भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच नाकारले. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, त्यांचे प्रदेशाध्यक्ष असा फौजफाटा घेऊन उतरलेल्या भाजपने आजारी असणाऱ्या खा.गिरीश बापट यांनादेखील प्रचारात उतरविण्याचा प्रयत्न केला. काहीही करून निवडणूक जिंकायची यासाठी भाजप कोणत्या थरापर्यंत जातो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मात्र कसब्यातील सुज्ञ मतदारांनी भाजपला धिडकारून महाविकास आघाडीला दणदणीत मतांनी विजयी केले. याबद्दल सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो.


कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकीचा विजय – पृथ्वीराज चव्हाण
कसबा पोटनिवडणुकीचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. गेली 32 वर्षे पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. 2019 च्या निवडणुकीत मुक्ता टिळक या भाजप कडून निवडून आल्या होत्या. त्यांच्या दुःखद निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकीचा विजय झाला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
यापुढे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, महाविकास आघाडीने एका विचाराने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली व त्यांना महाविकास आघाडी मधील सर्व पक्षांनी मदत केल्यामुळे हा विजय झाला आहे. यामुळे आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी भाजप व शिंदे गटाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही.
विरोधकांच्या मतांची विभागणी टाळली तर आमचा विजय होऊ शकतो. चिंचवड ला हेच आम्हाला बघायला मिळेल की, विरोधकांच्या मतांची विभागणी करण्यासाठी तिसरा उमेदवार उभा केला गेला. आणि त्यामुळे बरीच मत हि तिसऱ्या उमेदवाराने खाल्ल्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला. पण भाजपविरोधी जनमत मोठे असल्याचे या दोन्ही निवडणुकीच्या निकालातून समजून आले आहे.
वंचित आघाडीने त्यांची ताकद नसताना फक्त महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करून भाजपला फायदा करून देण्याकरिता तिसरा उमेदवार उभा केला.

Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा | मोहन जोशी यांची मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा

| मोहन जोशी यांची मागणी

| न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण

पुणे | थोर पुरूषांची बदनामी प्रकरणात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटक केल्याप्रकरणी न्यायालयाने सरकारवर ताशेरे मारले. २५ हजार रूपयांचा दंड केला. सरकारवर ही वेळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अरेरावीमुळे आली. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा. अशी मागणी मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष कॉंग्रेस यांनी केली .

पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट केला म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर कारवाई केली होती.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की पालकमंत्री पाटील यांनी या प्रकरणात सरकारी पदाचा गैरवापर केला. पोलिसांवर दबाव टाकला. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पाटील यांनी अवमानकारक वक्तव्ये केली होती. काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप कुदळे यांनी त्याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकला असा आरोप करून कुदळे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्याआधी पाटील यांनी, याप्रकरणात कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन वगैरे भाषा वापरली.

पोलिसांच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने अटकेची कारवाई बेकायदा ठरवली आहे. तसेच सरकारला २५ हजार रूपयांचा दंडही केला आहे. पाटील यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे यात स्पष्ट दिसते. कसब्याच्या निवडणुकीतही त्यांनी याच प्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे असे जोशी म्हणाले.

Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ? | मोहन जोशी यांचा सवाल

Categories
Breaking News PMC Political पुणे

चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?

– मोहन जोशी यांचा सवाल

पुणे | पुण्याची मेट्रो कधी पूर्ण होणार या प्रश्नावर ‘तारीख पे तारीख’ असेच उत्तर भाजपाने तयार ठेवले आहे. याचे कारण म्हणजे गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मार्गावरील मेट्रोचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. आता २६ जानेवारी हा दिवस उलटून गेला. म्हणूनच यावर असे विचारावेसे वाटते की, चंद्रकांतदादा, क्या तुम्हारा वादा ? प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा सवाल केला आहे.

जोशी म्हणाले, आता म्हणे मार्च महिन्याचा वायदा करण्यात येत आहे. जनतेला वायदे करायचे, आश्वासने द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत ही त्या भाजपची नीती बनली आहे. ‘अच्छे दिन लायेंगे’, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार’, ‘गॅस, पेट्रोल, ‘डीझेल दरवाढ कमी करणार’ , ‘महागाई कमी करणार’, ‘दरवर्षी २ कोटी नवे रोजगार निर्माण करणार…’ असे असंख्य वायदे भाजपच्या मोदी सरकारने केले. मुख्य म्हणजे असे अनेक वायदे करताना जनतेला आपण बांधील आहोत असे ते मानत नाहीत. त्यांचे वायदे ‘हेडलाईन मॅनेजमेंट’पुरतेच असतात. आदरणीय चंद्रकांतदादा पाटीलदेखील याच मुशीत घडले आहेत. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोबाबत प्रत्येकवेळी नवीन वायदे करताना त्यांना ना खंत ना खेद! ‘हेडलाईन छापून येण्यापुरताच त्यांचा पुण्याच्या विकासाशी संबंध आहे. त्यामुळेच आता नवा वायदा करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या खात्यांमध्ये ‘वायदामंत्री’ हे नवे खातेदेखील स्वीकारावे. सुज्ञास अधिक सांगणे न लागे !

जोशी पुढे म्हणाले, दीर्घकालीन पाठ्पुराव्यानंतर काँग्रेस पक्षाने पुण्याॉत मेट्रो प्रकल्प आणला. मात्र भाजप राजवटीत काम रेंगाळले व अखेरीस मागीलवर्षी मार्च महिन्यात जेमतेम १२ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले. आताही गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता २६ जानेवारी दिवस उजाडला. आता नवा वायदा मार्च महिन्याचा ! तसेच, पुण्यातील ३३ किलोमीटर लांबीचे दोन्ही मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते.

 

Pune Congress Dispute | अरविंद शिंदे यांना संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्याने पक्षाला कमकुवत करण्याची कृती बालिशपणाची | नरुद्दीन अली सोमजी

Categories
Breaking News Political पुणे

अरविंद शिंदे यांना संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्याने पक्षाला कमकुवत करण्याची कृती बालिशपणाची | नरुद्दीन अली सोमजी

शहरातील सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्ते, नेते यांनी नुकतीच पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. मात्र याबाबत काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. सरसकट गुन्हे माफ करण्याची भूमिका ही एका गटाची आहे. ती शहर काँग्रेसची भूमिका नाही. असे शिंदे यांनी  म्हटले होते. यावर शिंदेची ही भूमिका आक्षेपार्ह आहे, असे कॉंग्रेस नेते नरुद्दीन अली सोमजी यांनी म्हटले आहे. अरविंद शिंदे यांना संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्याने पक्षाला कमकुवत करण्याची त्यांची ही कृती बालिशपणाची आहे, असे देखील सोमजी यांनी म्हटले आहे.

सोमजी यांच्या निवेदनानुसार महाराष्ट्र सरकारने कोरोना काळातील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलिस खात्याला दिले आहे. त्यासाठी शासनाने GR काढले आहे,जनतेच्या हिताकरिता पोलिस खात्याने पडताळणी करुन गुन्हे मागे घ्यावे यासाठी कांग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ पुणे पोलिस आयुक्तांना भेटून निवेदन दिले.सरसकट राजकिय गुन्हे मागे घेऊ नये व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी व रमेश बागवे यांचे पत्र अधिकृत मानू नये असे पत्र प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहे. या विषयाची माहिती नसताना केवळ कुरगोडी करण्यासाठी असे पत्र लिहून आयुक्तांची दिशाभूल करने हे त्या अध्यक्षपदाला शोभत नाही. मोहन जोशी आणि रमेश बागवे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत व शिष्टमंडळातील इतर सदस्य प्रदेशचे पदाधिकारी, नगरसेवक व प्रांतीक प्रतिनिधी आहेत. संघटनेच्या कामकाजाची महिती नसल्यामुळे बेजवाबदार वक्तव्य करुन ते वर्तमान पत्रात छापुन पक्षाला बदनाम करण्याचे काम शिंदे करत आहेत.  कोरोना कालावधीतले राजकीय गुन्हे आणि इतर कालावधीतले राजकीय गुन्हे यातील फरक हा समजणे गरजेचे आहे. असे ही सोमजी यांनी म्हटले आहे.

—-

संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्यामुळे पक्ष संघटना कुमकवत करणारी ही कृती पक्षाला धोकादायक आहे. यातून पक्षाच्या संघटन निर्माणाचे कार्य होण्यापेक्षाही पक्षांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे.  यातून काँग्रेस पक्ष कुमकुत करण्याची छुपी योजना तर नाही ना असा संशय येतो?

नरुद्दीन अली सोमजी, कॉंग्रेस नेते, पुणे शहर कॉंग्रेस