NCP Vs Governor | Video | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्यपालांना शिवरायांची पुस्तके भेट | राज्यपालांना काळे झेंडे ही दाखवले

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्यपालांना शिवरायांची पुस्तके भेट | राज्यपालांना काळे झेंडे ही दाखवले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा अवमान केल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी (Governor Bhagatsingh koshyari)  हे पहिल्यांदाच पुणे शहरात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP Pune) सर्जिकल स्ट्राइक करत त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत निषेदाच्या व मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पुस्तके (Books) भेट देण्यात आली.  (NCP agitation against Governor)

याबाबत बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , “छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या पुणे जिल्ह्यात व कर्मभूमी असणाऱ्या पुणे शहरात महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा विना -निषेध विना- धिक्कार वावर होणे हे आम्हा शिवछत्रपतींच्या मावळ्यांना रुचणारे नव्हते. त्यामुळेच आज त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा राजभवनास आम्ही दिलेला होता.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आमचे आंदोलन दडण्यासाठी कलम १४९ अन्वये आम्हास नोटीस बजावली होती. तसेच सुमारे शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा सकाळी ०७.०० वाजताच माझ्या वानवडीतील निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला होता. मला ताब्यात घेण्याचा किंवा स्थानबद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याने ही संभाव्य परिस्थिती ओळखून सकाळी साडेसहा वाजताच गनिमी काव्याने मी घर सोडले होते.
राजभवनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार दुपारी ठीक साडेबारा वाजता आम्ही राजभवनाच्या बाहेर दाखल झालो, राजभवनाच्या गेट जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते- पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाचे व्यापक स्वरूप व आक्रमकता पाहता पुणे शहर पोलिसांनी आम्हास विनंती केली , त्यानुसार आमच्यापैकी काही प्रतिनिधींना राजभवनात राज्यपालांना भेटण्यासाठी सोडण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार अवमानास्पद विधाने करणाऱ्या राज्यपालांना आम्ही इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांची काही पुस्तके भेट देण्यासाठी घेऊन गेलो. राज्यपालांची भेट झाल्यानंतर आम्ही ती पुस्तके देत शिवाजी महाराज कोण होते..? , याबाबतची माहिती घेऊन त्यांच्या बाबतचा खरा इतिहास वाचूनच इथून पुढे महाराजांबद्दल वक्तव्य करावे अशी सूचना केली.यावेळी राजभवनात झालेल्या वीस मिनिटांच्या बैठकीत राज्यपालांनी त्यांच्याकडून छत्रपती शिवरायांबद्दल झालेल्या चुकीच्या स्टेटमेंट बद्दल जवळपास चार ते पाच वेळेस दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुन्हा त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही याची ग्वाही देखील त्यांनी दिली. आम्ही देखील राज्यपालांना स्पष्ट शब्दात सांगितले की,” केवळ आपल्या घटनात्मक पदाचा व वयाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेधाचे आंदोलन करत आहे. जर पुन्हा अशा प्रकारचे कृत्य आपल्याकडून झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापेक्षा अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल”, असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिला.


पुणे शहर ही छत्रपती शिवरायांची भूमी असणाऱ्या पावन शहरात राज्यपालांचा हा उन्माद खपवून घेतला जाणार नाही असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यपालांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आम्ही दिला, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

या आंदोलनासाठी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी, रुपाली पाटील,किशोर कांबळे, सुषमा सातपुते,संदीप बालवडकर,महेश हांडे, दीपक कामठे,रोहन पायगुडे, ॲड.विवेक भरगुडे, स्वप्निल जोशी, कुलदीप शर्मा आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP vs Ramdev Baba | रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची गुडलक चौकात निदर्शने

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची गुडलक चौकात निदर्शने

 योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Pune) पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात “बाबा रामदेव – बाबा कामदेव” ,”बाबा रामदेव चा धिक्कार असो” , महिलांच्या सन्मानात……राष्ट्रवादी मैदानात” या घोषणा महिला भगिनींच्या वतीने करण्यात आल्या.
यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्त्रीचे आदिशक्ती आणि देवी म्हणून पूजन करतो. स्त्री शक्तीचा जागर व सन्मान हा फक्त नवरात्री पुरता किंवा महिला दिनापुरता मर्यादित विषय नसून ३६५ दिवस स्त्रियांचा सन्मान राखणे त्यांना पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक देणे, हीच यापूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली शिकवण आहे. परंतु दुर्दैव असे की महाराष्ट्रात बाबा रामदेव सारखा भोंदू बाबा या महाराष्ट्राच्या पुण्यभूमी मध्ये महिलांबाबत अत्यंत खालच्या पातळीचे विधान करतात.
 ठाण्यामध्ये रामदेव बाबा यांनी तमाम माता-भगिनींच्या पोशाखाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले ते अत्यंत निंदनीय होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा जाहीर निषेध करतेहे त्यांच्या मानसिक विकृतीचे प्रदर्शन घडवणारे वक्तव्य होते. याच्यापेक्षा सर्वात धक्कादायक बाब आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे , असे म्हणत अमृता फडणवीस त्यांच्या बाजूला बसलेल्या असताना तसेच अनेक माता भगिनी समोर बसलेल्या असताना काल त्यांनी निंदनीय वक्तव्य केले, असे होत देखील असताना अमृता फडणवीस शेजारी बसून हसत होत्या, यावरून त्यांची मानसिकता दिसून येते.
 मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर  बाबा रामदेव यांच्या वक्तव्याशी सहमत नसतील तर त्यांनी बाबा रामदेव यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
या आंदोलप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते प्रदीप देशमुख,अर्चना कांबळे मुणालीनी वाणी,किशोर कांबळे , संतोष नांगरे , वैष्णवी सातव स्वाती चिटणीस, विनोद पवार   प्राजक्ता जाधव विपुल मैसूरकर , सुशांत ढमढेरे , अर्जुन गांजे, शिवाजी पाडाळे ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Prashant jagtap | भाजप करत आहे लोकशाहीचा खून | एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे निवडणुकांना का घाबरतात..? | प्रशांत जगताप यांचा सवाल

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

भाजप करत आहे लोकशाहीचा खून | एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे निवडणुकांना का घाबरतात..? | प्रशांत जगताप यांचा सवाल

लोकशाहीच्या (Democracy) रचनेत निवडणुकींना (Elections) विशेष महत्त्व असून नागरिकांना त्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी निवडण्यापासून वंचित ठेवत लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) करत आहे. असा आरोप पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. (NCP city president Prashant Jagtap)
जगताप यांनी दिलेल्या निवेदनांनुसार मागच्या ८ महिन्यांपासून राज्यातील २४ महानगरपालिका,२७ जिल्हा परिषद, ३५०पंचायत समिती व ३५०नगरपालिका यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सर्वच ठिकाणी प्रशासक राज्य आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. प्रशांत जगताप विरुद्ध महाराष्ट्र शासन ही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून येणाऱ्या २८ नोव्हेंबर रोजी याची अंतिम सुनावणी होऊन निकाल येणे अपेक्षित आहे.असे असताना काल राज्य सरकारने रडीचा डाव खेळत नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्यातील २४ महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिले आहेत,ही बाब निश्चितच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आहे. आज सकाळी याबाबत आम्ही सर्व पुराव्यानिशी सर्वोच्च न्यायालयाच्या ही बाब लक्षात आणून दिलेली आहे. आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास असून मला खात्री आहेत की येणाऱ्या २८ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय तातडीने निवडणुका घेण्याच्या आदेश देईल.  मुळातच १४ जून रोजीच्या न्यायमूर्ती खानविलकर यांच्या आदेशानुसार पंधरा दिवसात आहे त्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश असताना एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे निवडणुका घेण्यास घाबरत असल्याने हा विलंब होत आहे. लोकशाहीच्या रचनेत निवडणुकींना विशेष महत्त्व असून नागरिकांना त्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी निवडण्यापासून वंचित ठेवत लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार शिंदे- फडणवीस सरकार करत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

NCP Vs Governor | Pune | काळे मन हेच भाजपचे अंतर्मन! | अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

काळे मन हेच भाजपचे अंतर्मन! | अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर (NCP Pune)  यांच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  यांच्या विरोधात सावरकर पुतळा सारसबाग येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City president Prashant Jagtap)  म्हणाले की,”राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना यांबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र व महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तीमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत. ही अतिशय गंभीर व संतापजनक बाब आहे.छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत आहेत. यातून त्यांच्या पुर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा ते राबवित आहे. किंबहुना ते महाराष्ट्र भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत आहेत. ” ते पुढे म्हणाले की, “राज्यपाल महाराष्ट्राचा वारंवार अपमान करीत आहेत व त्याला भाजप प्रोत्साहन देत आहेत.”(NCP against Governor Bhagat singh koshyari)

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपतींनी ओरंगजेबाची पाच वेळा माफी मागीतली होते असे नीच व अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली. सत्तेसाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचे तळवे चाटण्याची ही अतिशय लाचार प्रवृत्ती असून कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांचा निषेध करीत आहे.शिवरायांचा अवमान ही भाजपाची मॅच फिक्सिंग असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला.‌ (NCP Vs BJP)

या आंदोलनात यावेळी
“छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचा जयजयकार करण्यात आला ”
“भगतसिंग कोशियारी
नही चलेंगी होषीयारी”
“काळी टोपी
“काळे मन हेच भाजप चे अंतरमन”
“भाज्यपाल हटावो महाराष्ट्र बचावो”
“सुधांशु त्रिवेदीचा धिक्कार असो “अश्या धोषणा देण्यात आल्या

सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे ,प्रिया गदादे , किशोर कांबळे , वनराज आंदेकर , महेश शिंदे ,बाबा पटील , मुणालीनी वाणी, श्वेता होनराव , पार्थ मिठकरी , गणेश मोहीते, मनाली भिलारे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Agitation by NCP Pune)

Mahavikas Aghadi | Sinet Election | विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार | अजित पवार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार

| महाविकास आघाडी प्रणित “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल” च्या मुख्य प्रचार कचेरीचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या मुख्य निवडणूक कचेरीचा शुभारंभ आज महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या शुभहस्ते तर महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादासजी दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या माध्यमातून निवडणूक लढवत असून सर्व दहा ते दहा ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तरुण युवक व उच्च विद्याविभूषित उमेदवारांना संधी देण्यात आली असून पॅनलच्या जाहीरनाम्याचा जाहीरनामाचे प्रकाशन देखील या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की , पुणे विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही राज्याच्या शैक्षणिकदृष्ट्या एक महत्त्वाची निवडणूक मानली जाते. पुणे विद्यापीठाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा व समाजातील सर्वसामान्य बहुजन वर्गातील मुला-मुलींना तेथे उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे हीच सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलची माफक अपेक्षा आहे. विद्यापीठाच्या संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणे, विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या प्रमुख मुद्द्यांसह सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचे उमेदवार ही निवडणूक लढवित असून या पॅनलमधील सर्व उमेदवार हे उच्चविद्याविभूषित असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत त्यांना आपले पसंती क्रमांक ०१ चे मत देऊन त्यांना आपले प्रश्न सिनेट मध्ये मांडण्याची संधी नक्की द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड , कमलनानी ढोले पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, दिपाली धुमाळ,नगरसेवक विशाल तांबे, महेंद्र पठारे, रत्नप्रभा जगताप,नंदा लोणकर,सायली वांजळे, प्रदीप देशमुख,डॉक्टर सुनील जगताप,रुपाली ठोंबरे पाटील यांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Abdul Sattar Vs NCP | Pune | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो आंदोलन”

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो आंदोलन”

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राणी लक्ष्मीबाई पुतळा ,जंगली महाराज रोड येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सुप्रियाताई सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , “महिलांच्या बद्दल आदर नसणारी लोक आज शिवरायांच्या महाराष्ट्राचा गाडा हाकत आहे ही, आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.  खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल! अब्दुल सत्तार सारख्या बेताल वक्तव्य करत महाराष्ट्रातील वातावरण बिघडविनाऱ्या वाचाळवीरांचा बंदोबस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नक्की करतील”.

या आंदोलन प्रसंगीसदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप आमदार सुनील टिंगरे अंकुश काकडे, प्रदीप गायकवाड , विशाल तांबे , प्रदीप देशमुख ,वैशाली नागवडे , मुणालिनी वाणी , किशोर कांबळे , विक्रम जाधव , अप्पा शिंदे , रूपाली पाटील यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP | Pune | पुण्यात राष्ट्रवादी कडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात राष्ट्रवादी कडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन

महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा आशेचा किरण असणारी पोलीस भरती रद्द केल्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्री रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

“राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रातला युवक बेरोजगार केला आहे. राज्यात युवकांचे भवितव्य अधिक गडद होत असल्या बाबत पालकांच्या पोटाला पीळ पडला आहे अनेक मोठमोठे उद्योग बाहेर पाठवले गेले , पोलीस भारतीचा बनाव करून युवक निराश झाला आहे.महाराष्ट्राचे पुढील भवितव्य अंधारात आहे याची खंत वाटते महाराष्टाच्या हिताचे निर्णय घेण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात अनेक लोकांहिताचे प्रश्न आ वासून उभे आहेत. युवक बेरोजगारीने हंबरडा फोडत आहेत. आजपर्यंत आपला पोशिंदा राजा बळीराजा पूर्ण पणे कोलमडला आहे. लाखो आत्महत्या पहायला मिळत आहेत. आता वेळ आली आहे या महाराष्ट्रातला युवक वर्ग बेरोजगारीने पिचला जात असून त्यांच्या हाताला काम देण्याचे धोरण सरकार कडे नाही. हे चित्र बदलण्यात शिंदे सरकार कडे ठोस कुठलेही धोरण नाही” , असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

याचा निषेध करत राष्ट्रवादी युवक च्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले. “शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी करतात गुजराती चाकरी” , “द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी” , “पन्नास खोके महाराष्ट्राला धोके” अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ” राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला असून, कुठलाही नवीन प्रकल्प त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागण्याची शिंदे फडणवीस सरकारमध्ये इच्छाशक्ती नसताना राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेले प्रकल्प देखील यांना टिकवता आलेले नाही. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या अडचणीत सापडल्या असून त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली पोलीस भरती देखील या सरकारने स्थगित करून तरुणांच्या शासकीय नोकऱ्यांचा मार्ग देखील बिकट केला आहे. राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले असून लवकरात लवकर या सर्व भरत्या घेण्यात याव्या यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने आम्ही घेत आहोत”.

या आंदोलन प्रसंगी शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, किशोर कांबळे,मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर, श्रीहरी दबडे,बापू डाकले , संगीता बराटे , गिरीष गुरुनानी , आनंद सागरे,गजानन लोंढे , कुलदीप शर्मा,योगेश सुतार, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Pune | Agitation | महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निषेध आंदोलन

राज्यात नव्याने सुरू झालेल्या “मुंबई – अहमदाबाद रोजगार भगाओ एक्सप्रेस” चे चालक व मालक शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मामलेदार कचेरी येथे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार वेदांता फॉक्सकॉन,मरीन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क,मेडिकल डिवाईस पार्क हे सर्व मोठे उद्योग महाराष्ट्र बाहेर गुजरातला हलवल्यानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प देखील बडोद्याला पळविण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात उत्कृष्ठ इन्फ्रास्ट्रक्चर, चोवीस तास वीज, मुबलक पाणी व सुशिक्षित तरुण या सगळ्या सोयीच्या गोष्टी असताना देखील, या राज्यातून प्रकल्प बाहेर जात आहेत. कारण राज्यातील सत्ताधारी सरकार जरी महाराष्ट्र सरकार असले तरी, केंद्रातील गुजराती मालकाच्या इशाऱ्यावर काम करणारे सरकार असून, राज्यातील जनतेच्या हितापेक्षा केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचे हित जपणे हे या सरकारचे आद्य कर्तव्य असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जात असल्याने राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान होत आहे.टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातच होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील प्रकल्प पळविले जाताय, ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी चिंताजनक बाब आहे.सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे.

महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील युवकांसाठी अतिशय चिंताजनक बाब असून असेच जर चालत राहिले तर जसे बिहार – उत्तर प्रदेश मधून तरुण रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात तसे महाराष्ट्रातील तरुणांना देखील गुजरातमध्ये कंपन्यांच्या गेट उभे राहावे लागेल, इतिहासात अशी वेळ महाराष्ट्र राज्यावर कधीही आलेली नाही.परंतु आता ही वेळ येण्याची शक्यता वाटत आहे.

“शिंदे फडणवीसांच्या स्वप्नातील महाराष्ट्रात तरुणांनी केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी, आणि फटाके फोडणे हेच आहे का …? याचा खुलासा देखील राज्याच्या मुख्यमंत्री – उप मुख्यमंत्र्यांकडून होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सद्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. तसेच अधिक गुंतवणूक येईल याकडे लक्ष द्यावे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार आहे, असे सांगितले. मात्र एकामागे एक प्रकल्प इतरत्र जात आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून देशाचे नेते हे संपूर्ण राष्ट्राचे नेते आहे. त्यांनी केवळ गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये” असे मत शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

 

या आंदोलनप्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख , वनराज आंदेकर, महेंद्र पठारे,प्रकाश कदम, फारुक इनामदार, सुधीर कोंढरे, मृणालिनी वाणी,किशोर कांबळे,अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते,महेश शिंदे,शांतिलाल मिसाळ , गणेश नलावडे, निलेश वरे, महेश हांडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Prashant Jagtap | Pune Rain | नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

Categories
Breaking News PMC Political पुणे

नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

पाऊसाने च उघडकीस आणला भाजपचा नालेसफाई घोटाळा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

गेल्या काही दिवसात पुणे शहरात झालेल्या प्रत्येक पावसात पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले होते. व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी घुसले होते, कित्येक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले तर दुचाकी देखील वाहून गेल्यात. प्रशासनाच्या गैरवस्थापनाचा व नालेसफाईमध्ये हलगर्जीपणा केल्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसला. एक कारभारी कोल्हापूरचा तर दुसरा नागपूरचा अशी पुण्याची गत झाली असून या दोघांच्या कार्यक्षमतेवर नागरिक बोट उचलतील या अगोदर त्यांनी पुणे शहरातील गत पाच वर्षातील नालेसफाई च्या कामांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवावे , असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.

जगताप  म्हणाले, या अगोदर पुण्यनगरीने अनेक मोठे- मोठे पावसाळे पाहिले आहेत परंतु त्या काळात दरवर्षी उन्हाळ्यात होणारी नालेसफाई यामुळे हा सर्व पाऊस सामावून घेण्याची या पुण्यनगरीची क्षमता होती. परंतु अलीकडच्या काळातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची किंमत सर्वसामान्य पुणेकरांना मोजावी लागली आहे.

खरे तर पुणे शहरातून उद्भवलेली ही परिस्थिती गेल्या पाच वर्षात नालेसफाई न करता परस्पर बिले लाटल्याने निर्माण झाली आहे.इतिहासात कधीही पुण्यात पाणी जमा झाले नव्हते परंतु या पाच वर्षात आंबील ओढ्याला आलेला पूर, कात्रज तलाव ओव्हर फ्लो होऊन आलेला पूर, यावर्षी तर पुणे शहराच्या मध्यवर्तीतील प्रत्येक रस्त्यावर आलेला पूर ही पाच वर्षांमध्ये झालेल्या अक्ष्यम चुकांची परिणीती आहे. पुणे शहरातील कुठलाही नाला आज साफ झालेला नाही त्यामुळे चोक-अप होणारे हे सर्व पाणी पुण्याचा रस्त्यांवर आले आहे. पुणेकर व्यावसायिकांचा दुकानांमध्ये, पुणे शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये हे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये न झालेल्या नालेसफाईमुळे झालेल्या या सर्व परिस्थितीबद्दल जबाबदारी स्वीकारून जबाबदारपणे चूक मान्य करण्याऐवजी पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीवर बोट दाखवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला येत्या निवडणुकांमध्ये नागरिक अरसा नक्की दाखवतील, परंतु कुठल्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी जशी रस्सीखेच करता तशी जर चूक झाल्यानंतर चूक कबूल केली असती तर कदाचित पुणेकरांनी तुम्हाला माफ केले असते. परंतु यावेळी देखील पुणे भाजपमधील राजकारण्यांनी ती परिपक्वता दाखवली नाही.

आज पुणे शहर पाण्याखाली असण्याला गत पाच वर्षातील पुणे महानगरपालिकेची न झालेली नालेसफाई जबाबदार आहे व तसेच या न झालेल्या नालेसफाईच्या पोटी एक हजार कोटींची बिले लाटनारे सत्ताधारी पक्षातील नगरसेवक व त्यांनी पाळलेले ठेकेदार देखील तितकेच जबाबदार आहेत , असा माझा थेट आरोप आहे. असे ही जगताप म्हणाले.

 

NCP Pune | समाविष्ट ३४ गावांसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींचा निधी द्यावा | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे

 समाविष्ट ३४ गावांसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींचा निधी द्यावा

| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

समाविष्ट गावांमध्ये दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारणे,नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे,एसटीपी प्लॅन्ट उभे करणे, पाणीपुरवठा योजना सुरू करणे, नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे , ही कामे तातडीने होणे गरजेचे आहेत. या समाविष्ट गावांमधील नागरिकांना या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात या हेतूने राज्य सरकारकडे १० हजार कोटींची मागणी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले.

राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी कायमस्वरूपी व्यवस्था नाही,खासगी टँकरने होणारा पाणीपुरवठा, कचरा संकलन करण्यासाठी अपुरी व्यवस्था, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब झालेले रस्ते, नागरिकांना आरोग्य विषयक मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत अशी या समाविष्ट गावांची परिस्थिती आहे.

पुणे शहरात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आयटी व इतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या नागरिकांनी या समाविष्ट गावांमधील सोसायटीमध्ये आपल्या सदनिका घेतल्या असून या सर्व नागरिकांना सोयी सुविधा देण्यास पुणे महानगरपालिकेची सध्याची यंत्रणा कमी पडत आहे.

त्याचप्रमाणे पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे अपघात होत असून हे खड्डे दुरुस्त करण्यात यावे , पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दर आठवड्यात किमान एक दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो ही परिस्थिती सुधारून 365 दिवस नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी देण्यात यावे, शहरात ठीक ठिकाणी दिसणारा कचरा राडाराडा याची विल्हेवाट लावत शहर स्वच्छ करणे, शहरातील मोकाट जनावरे कुत्री यांचा बंदोबस्त करणे, समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या बिना वापर पडून आहेत या टाक्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन त्या वापरात आणणे व नागरिकांना नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत करणे या मागणी देखील यावेळी करण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , “पुणे शहरातील समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सदर निधी मिळणे अत्यंत गरजेचे असून याबाबत महाराष्ट्र आदरणीय विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिष्टमंडळ येत्या आठवड्यात मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहे. समाविष्ट गावांमध्ये सोयी सुविधा मिळाव्या हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका असून या गावांमध्ये सोयी सुविधा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, आमदार  सुनील टिंगरे, चेतन तुपे,अंकुश काकडे रवींद्र माळवदकर, दिपक मानकर,दिपाली धुमाळ,विशाल तांबे,अश्विनी कदम,महेंद्र पठारे, निलेश निकम,प्रदीप गायकवाड,काकासाहेब चव्हाण,श्रीकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.