Ayodhya tour | Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याबाबत उद्या राज ठाकरे काय बोलणार? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

अयोध्या दौऱ्याबाबत उद्या राज ठाकरे काय बोलणार?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी (ता.२२) पुण्यात जाहीर सभा होत आहे. पुण्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. मनसेकडून (mns) या सभेचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

  या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरे उद्या पुण्यात काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. मनसे या सभेचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सकाळी दहा वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पुण्यातील सभेसाठी पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे.

राज ठाकरे यांनी आज संत साहित्याचे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. मराठीतील संत साहित्याची परंपरा तसंच महाराष्ट्राचा इतिहास यांबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे हेसुद्धा याप्रसंगी उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला, याचं कारणही राज ठाकरे रविवारी होणाऱ्या पुण्यातील सभेत सांगणार आहेत. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) दौरा स्थगित केल्यावरून राजकारण तापले आहे. सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

राज ठाकरेंच्या या निर्णयाबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाकरेंना डिवचलं आहे. “आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती..” असं म्हणत राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

राऊत म्हणाले, “अयोध्या दौरा रद्द करण्यामागे काय अडचणी आहेत ते माहित नाही. पण, भाजपने असे का करावे? भाजप प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील नेत्यांना वापरून घेत आहे. त्यातलाच हा प्रकार दिसतोय. यातून काही लोकांना शहाणपण आले तर बरं होईल. आपण वापरले जातोय हे काही लोकांना उशिरा कळतं. कारण यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतंय,” 

“राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती,” असेही संजय राऊत म्हणाले.

Code Of Conduct | आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत

Categories
Breaking News Political पुणे

आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत

आज पुणे शहराचे पोलीस कमिशनर अमिताभजी गुप्ता यांनी शहरात राजकीय पक्षांच्या सद्यस्थितीत असलेल्या वातावरणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ,भाजप ,शिवसेना ,वंचित बहुजन आघाडी, एम.आय.एम, मनसे या सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.  बैठकीत यापुढे आंदोलन करत असताना पोलिसांनी घालून दिलेली आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत झाले.

देशाची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठलेही गैरप्रकार झाले नव्हते. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणीमध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना एकत्र घेत घेतलेल्या या बैठकीनंतर नंतर पुणे शहरात राजकीय सलोखा टिकेल असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

 

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप अंकुशअण्णा काकडे,भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे , मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर,आमदार माधुरीताई मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Pune Corporation employees | 79 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख!   : सुमारे 40 कोटी रक्कम दिली गेली 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

79 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख!

: सुमारे 40 कोटी रक्कम दिली गेली

: मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची माहिती

पुणे.  शहरात कोरोनाचा कहर कमी होत चालला आहे. महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे केंद्र सरकारच्या योजनेत बसत नाहीत त्यांना 1 कोटीचे सुरक्षा कवच जाहीर केले होते. मात्र महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य दिले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे. यासाठी कुठलेही निकष नसतील. फक्त रुग्णालयाचे सर्टिफिकेट लागेल. त्यानुसार यासाठी 84 कर्मचारी पात्र होत आहेत. महापालिकेने आतापर्यंत 79 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख दिले आहेत. 3 कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कडून मदत मिळाली आहे. बाकी 6 लोकांना लवकरच हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अशी माहिती महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर यांनी दिली.
 – कोरोना सुरक्षा कवच देणारी पहिली महानगरपालिका
 महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना लागू केली आहे.  महानगरपालिकेत कामगार कल्याण निधी यापूर्वीच लागू करण्यात आला आहे.  ही मदतया निधी अंतर्गत दिली जाईल.  महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार, या योजनेचे लाभार्थी असे सर्व लोक, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी असतील ज्यांना कोरोनाचे काम देण्यात आले आहे.  कारण आरोग्य विभाग वगळता सर्व विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी या कामावर पालिका प्रशासनाने गुंतले आहेत.  या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 1 कोटीची आर्थिक मदतदिली जाईल.  जर वारसला नोकरी हवी असेल तर नोकरी आणि 75 लाखांची मदत दिली जाईल.  या योजनेशी संबंधित सर्व अधिकार कामगार कल्याण निधी समितीकडे असतील.  या योजनेत दोन टप्पे होते. त्यानुसार केंद्राच्या योजनेत न बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 1 कोटी दिले जाणार होते. तर त्या योजनेत बसणाऱ्या लोकांना 50 लाख दिले जाणार होते. मात्र केंद्राकडून थोड्याच लोकांना मदत मिळाली आहे. राज्य सरकारने तर आपले हात वर केले होते.
 –  95कर्मचाऱ्यांचा मृत्यू
  या व्यतिरिक्त, आता अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत.  आतापर्यंत 95 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यानुसार महापालिकेने केंद्राच्या विमा कंपनीला सुमारे प्रस्ताव पाठवले होते.  ही प्रक्रिया द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी करणार आहे.  पण कंपनीने नियमानुसार पुढे जाऊन त्याला मान्यता दिली नाही.  सफाई कामगारांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात येत होते.  कंपनीने आता आपला चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला होता.  त्याची मदत मिळत नव्हती.  दुसरीकडे, महापालिका सुरक्षा कवच लागू करण्यास सक्षम नव्हती.  अशा स्थितीत महापालिकेने केंद्राचा मार्ग सोडून आपला वाटा देणे सुरू केले.  शिवाय विमाकंपनी आणि शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिका प्रशासनाचा सतत पाठपुरावा सुरू होता.  पैकी काही प्रस्ताव मंजूर झाले.  केंद्राकडून 3 कुटुंबांच्या खात्यांमध्ये 50 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यांनतर महापालिकेने महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य केले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे.
: 57 वारसांना नोकरी
याबाबत दौंडकर यांनी सांगितले कि एकूण 95 कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. यामध्ये पोस्ट कोविडचा देखील समावेश आहे. 95 पैकी 10 कर्मचारी ठेका कर्मचारीतर 1 बालवाडी शिक्षिका होती. त्यानुसार आपल्या योजनेत 84 पात्र झाले. त्यापैकी 79 लोकांना महापालिकेने 50 लाखाची मदत त्यांच्या वारसांना दिली आहे. 3 लोकांना केंद्र सरकारचे 50 आणि महापालिकेचे 25 अशी 75 लाखाची मदत मिळाली आहे. महापालिकेने यासाठी जवळपास 40 कोटी दिले आहेत.  दौंडकर पुढे म्हणाले, महापालिकेने आतापर्यंत 57 वारसांना नोकरी देखील दिली आहे.

PMC | salaried employees | पुणे महापालिकेतील रोजंदारी तत्त्वावरील 277 कर्मचारी होणार कायम 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेतील रोजंदारी तत्त्वावरील 277 कर्मचारी होणार कायम

: महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे : महापालिकेत पूर्वीपासून रोजंदारी तत्वावर सलग 5 वर्ष काम करणाऱ्या 277 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येणार आहे. तसेच त्यांना सर्व लाभ देखील देण्यात येणार आहे. नुकताच महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पुणे महानगरपालिकेत सन १९९४ पासून रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी पुणे महानगरपालिका  कामगार युनियन यांचेतर्फे औद्योगिक न्यायालयात  दावा दाखल करून त्यांना कायम करणेबाबतच मागणी केली होती. औद्योगिक न्यायालयाने  निर्णय दिला होता.

या  निर्णयाविरुद्ध पुणे मनपा प्रशासनाने  याचिका दाखल केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती न दिल्याने प्रशासनाने में सर्वोच्च न्यायालयात Special leave toAppeal(Civil)CC/13924/2013 दाखल केले होते. त्याबाबत  सर्वोच्च न्यायालयाने दि. १६/८/२०१३ रोजी दिलेल्य आदेशानुसार सदरचा दावा उच्च न्यायालयापुढे पुन्हा निर्णयासाठी दाखल केला. दरम्यानचे कालावधीत तक्रारदारांपैकी काही कर्मचारी हे सतत गैरहजर, मयत, वयोपरत्वे सेवानिवृत्त व काही जण सरळसेवा भरतीने
महानगरपालिकेच्या अन्य विभागात नेमणूकीस आहेत. त्यामुळे तत्कालीन वेळी मे. उच्च न्यायालयांच्या अंतरिम  निर्देशांनुसार उर्वरित कर्मचाऱ्यांना दि.२९/११/१३ रोजी (आज्ञापत्र जा.क्र.नअसे/ २३३३, २३३४ व २३३५) बिगारी
झाडूवाला, कचरा मोटार बिगारी, जे.सी.बी.ऑपरेटर, मोटार सारथी या तत्सम पदावर तात्पुरत्या नेमणूका देण्या आल्या आहेत. तात्पुरत्या नेमणुकांचे स्वरूप बदलून संबंधितांना रोजंदारीतील ५ वर्षेच्या सलग सेवेनंतर कायम करणेस
त्याअनुषंगाने तदर्थ लाभ देणेची विनंती संबंधितांनी Interim Application देऊन उच्च न्यायालयापुढे केली होती याबाबत हा निर्णय घेणेत येत आहे. त्यानुसार सलग 5 वर्ष काम करणाऱ्या 277 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येणार आहे. तसेच त्यांना सर्व लाभ देखील देण्यात येणार आहे.

Raj Thackeray’s morning Rally | राज ठाकरेंच्या सकाळच्या सभेमुळे भुवया उंचावल्या! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सकाळच्या सभेमुळे भुवया उंचावल्या!

: राजकीय वर्तुळात  चर्चाना उधाण

पुण्यात रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरे यांची सकाळी सभा होणार आहे. मात्र ठाकरे यांच्या सकाळच्या सभेच्या वेळेमुळे मात्र भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कारण ठाकरे नेहमी संध्याकाळी सभा घेतात. त्याला प्रतिसाद देखील तसाच मिळतो. मात्र आता सकाळी सभा असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

शहरात सभेसाठी दोन ठिकाणे पाहण्यात आली होती. त्यापैकी एक मुळा मुठा नदीपात्र निश्चित करण्यात आले होते. परंतु पावसाचे कारण देत कार्यकर्त्यांनी नदीपात्रात सभा रद्द झाल्याचे सांगितले. अखेर स्वारगेटला रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण राज ठाकरे  नेहमी सायंकाळी सभा घेतात. पण यावेळी मात्र चक्क सकाळी सभा ठेवल्याने चर्चाना उधाण आल्याचे दिसत आहे. सायंकाळच्या सभेवरूनच अजित पवारांनी  राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली होती. आता सकाळी सभा घेऊन राज यांनी पवारांचे  चॅलेंज स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

‘आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दुपारी सभा घेतली आहे का, तसेच कधी कष्ट घेतले आहेत का, यांची सभा कधी होते तर संध्याकाळी होते,’ अशा शब्दात अजित पवार यांनी राज यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र राज ठाकरेंनी सकाळी सभा आयोजित करून अजित पवार यांचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मशिदींवरील भोंग्याचा मुद्द्यावरून राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे, औरंगबाद येथे जाहीर सभा झाली होती. या सभेत राज ठाकरे यांनी भोंगे, हिंदुत्व, या मुद्द्यांना हात घातला होता. त्याचबरोबर शरद पवार आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. पुण्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. त्याबाबतही ते पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसे द्वारा  प्रदर्शित

टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सुरुवातीला औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ दे… हे वाक्य घेण्यात आले आहे. तर टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणंही वाजत आहे. या टीझरवरून पुण्यातील सभा जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या अनुषंगाने मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.

Amol Balwadkar Vs Baburao Chandere | बाबूराव चांदेरेंच्या भावनेचा विचार करून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी द्यावी  : अमोल बालवडकर यांची प्रतिक्रिया 

Categories
Breaking News Political पुणे

बाबूराव चांदेरेंच्या भावनेचा विचार करून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी द्यावी

: अमोल बालवडकर यांची प्रतिक्रिया

पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील कलगीतुरा नेहमीच पाहायला मिळतो. महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीला वेग आला आहे. त्यामुळे सगळे कंबर कसून कामाला लागले आहेत. अशातच औंध बालेवाडी प्रभागावर sc चे आरक्षण पडले आहे. राष्ट्रवादीकडून बाबूराव चांदेरे यांनी उमेदवारी मागितली आहे. यावर भाजपचे अमोल बालवडकर यांनी उपहासात्मक टीका केली आहे. बालवडकर यांनी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष्याना विनंती केली आहे कि, चांदेरे यांच्या भावनेचा आदर करून त्यांना प्रभागातून उमेदवारी द्यावी.
बालवडकर म्हणाले, आधी  बाणेर – बालेवाडी प्रभाग स्वतःच्या राजकिय सुरक्षिततेसाठी चुकिच्या पद्धतीने तोडायचा ! परत वर म्हणायचं ‘ मी बालेवाडी -औंध प्रभागातुन इच्छुक आहे. वाह !
एव्हढा कॅान्फिडन्स आणता तरी कुठुन? माझी शहर अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांना विनंती आहे कि आपण माजी नगरसेवक चांदेरे यांच्या भावनेचा विचार करावा व त्यांना बालेवाडी – औंध मधुन उमेदवारीवर द्यावी.
यावर चांदेरे काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. याच अनुषंगाने  पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि बाबुराव चांदेरे साहेबांच्या उपस्थिती मध्ये प्रभाग क्रमांक १२ औंध-बाणेर-बालेवाडी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक पार पडली.  यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधून माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी देखील आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे भावना शहराध्यक्ष  प्रशांतदादा जगताप यांना बोलून दाखवली.

Hemant Rasne | हेमंत रासने यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेची मुदत संपली तरी स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहाते

: हेमंत रासने यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

: राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने सहा आठवड्यात बाजू मांडावी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

पुणे : महापालिकेचा कार्यकाळ संपला तरी स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहते अशी याचिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेत प्रथम दर्शनी तथ्य असून राज्य सरकार आणि पुणे महापालिकेलेने या संदर्भातील आपले म्हणणे सहा आठवड्यात आपली बाजू मांडावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार यांची नियुक्ती केली होती. महापालिका अधिनियमानुसार स्थायी समिती बरखास्त होत नाही. नवीन समिती अस्तित्वात येईपर्यंत ती कार्यरत राहते, असा कायदा असल्याचा दावा रासने यांनी केला होता.

या संदर्भात महापालिकेने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. शासनाच्या अभिप्रायानुसार स्थायी समिती अस्तित्वात राहणार नसल्याचे पत्र प्रशासनाने रासने यांना दिले होते. रासने आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन महापालिका आयुक्त आणि नगरविकास विभागाला प्रतिवादी केले होते. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली नव्हती.

या निर्णयाविरोधात रासने यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या समोर याचिकेची सुनावणी झाली. ज्येष्ठ विधिज्ञ शाम दिवान, विनय नवरे, विधिज्ञ श्रीयश ललित, रवीना ललित, महेश कुमार, निखिल बोरवणकर, रुपेंशू सिंग, श्रीनिवास कुमार बोगिसम, देविका खन्ना, व्ही. डी. खन्ना यांनी रासने यांच्या वतीने बाजू मांडली.

दिवाण यांनी युक्तिवाद केला की, जरी महापालिकेची मुदत संपली तरी मुंबई प्रांतिक महानगरपालिका कायद्याच्या कलम ४८ अनुसार स्थायी समितीचे अस्तित्व नवीन स्थायी समिती अस्तित्वात येत नाही तोपर्यंत प्रचलित स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहाते. मुंबई प्रांतिक महानगरपालिका कायद्यातील विविध तरतुदींचा कायदेशीर तर्क हे दर्शवितो की स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहाते.

याचिकाकर्ते हेमंत रासने यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ दिवाण यांनी या संदर्भातील आदेशाच्या कायदेशीर वैधतेला आव्हान दिले. ते म्हणाले, मुंबर्इ महानगरपालिका प्रांतिक कायद्याच्या कलम ४८ प्रमाणे स्थायी समितीचे अस्तित्व महानगरपालिकेचे सदस्य निवृत्ती झाले तरी कायम राहाते, त्याच प्रमाणे नवीन स्थायी समिती अस्तित्वात येत नाही तोपर्यंत सुद्धा कायम राहाते.

दिवाण यांनी असा युक्तिवाद केला की, मुंबई महानगरपालिका प्रांतिक कायद्याचा सर्वांगीण विचार केल्यानंतर आणि परिवहन समिती (कलम २५) आणि वॉर्ड समिती (कलम २९ए) यांचे महापालिकेची मुदत संपल्यानंतर अस्तित्व कायम राहात नसले तरी कलम २० (३) प्रमाणे स्थायी समितीच्या अस्तित्वाशी महानगरपालिकेच्या मुदतीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहाते.

Taljai Hills | प्रभाग रचनेत प्रकल्पच  पळविण्याचा  आरोप!

Categories
Breaking News PMC Political पुणे

‘ग्रे वॉटर ‘प्रक्रिया प्रकल्पामुळे तळजाई टेकडी सदैव राहणार हिरवीगार!

‘आयत्या पिठावर रेघोट्या’ साठी प्रभाग रचनेत प्रकल्पच  पळविण्याचा   प्रकार:  काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल

पुणे | गेली १५ वर्षे  पिण्याच्या पाण्याच्या  टँकरवर अवलंबून  असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना  माझ्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कै. वसंतराव बागुल उद्यानात साकारलेल्या  देशातील पहिल्या  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातुन आज पाणी मिळत  आहे,त्यामुळे तळजाई टेकडी आता हिरवीगार दिसत आहे आणि भविष्यातही  हा प्रकल्पच तळजाई टेकडीला हिरवीगार ठेवण्यासाठी आधारवड ठरणार आहे. मात्र ही बाब  लक्षात घेऊन काही स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मात्र अंतिम प्रभाग रचनेतून हा प्रकल्प स्वतःच्या प्रभागात समाविष्ट करण्याचे कारस्थान केले आहे . असे असले तरी जनता सुज्ञ आहे. ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ मारणाऱ्यांना ते अजिबात  थारा देणार नाहीत ,अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी दिली आहे. तसेच श्रेयाच्या राजकारणासाठीच प्रभाग रचनेत  कै. वसंतराव बागुल उद्यानाचे दोन तुकडे करून हा प्रकल्प पळविण्याचा ‘उद्योग’ केला का ? असा सवालही केला आहे.

याबाबत काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल म्हणाले कि, माझ्या संकल्पनेतून आणि पुणे  महापालिकेच्यावतीने  सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे  हा   देशातील पहिला  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प साकारला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाच लाख  लिटर पाणी दररोज  तळजाई टेकडीवर जलवाहिनीतून जात आहे.सांडपाण्याचा पुनर्वापर या चळवळीला दिशादर्शक ठरणाऱ्या   या  शुद्ध पाण्याच्या   प्रकल्पाचे सर्वच स्तरातून कौतुक झालेले  आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत स्वतःकडे हा प्रकल्प यावा यासाठी काही व्यक्तींनी तो प्रभाग क्रमांक ५० मध्ये समाविष्ट करण्याचा उद्योग केला आहे. वास्तविक जाहीर झालेल्या  प्रभाग क्रमांक ३८ शिवदर्शन – पद्मावतीमध्ये यापूर्वीच  साकारलेल्या या प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे अगोदरच पाणी तळजाईवर जात आहे. असे असताना या प्रकल्पाचा निवडणुकीसाठी फायदा करून घेण्याबरोबरच श्रेयाच्या राजकारणासाठी  कै. वसंतराव बागुल उद्यानाचे दोन तुकडे करून फक्त हा प्रकल्पच  प्रभाग क्रमांक ५० सहकारनगर -तळजाईमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. वास्तविक या पद्धतीने अशी प्रभाग रचना आजपर्यंत कधीही झालेली नाही. ज्यांनी हे कारस्थान केले. त्यांनी आजवर तळजाईच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केलेले आहे. त्यांच्या प्रभागात तळजाई टेकडी असताना,त्यांनी गेली पंधरा वर्षे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरच निधी खर्च केला. त्यातून तळजाई टेकडी कधीही हिरवीगार दिसली नाही. मात्र ज्यावेळी या भागाचे लोकप्रतिनिधित्व माझ्याकडे आले. त्यावेळी तळजाई टेकडीचा पर्यावरणपूरक विकासाचा आराखडा तयार करण्यात आला.  तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना  पाणी मिळावे. टेकडी सदैव हिरवीगार राहावी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या भरमसाठ खर्चाला आळा बसावा, यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या आदर्शवत   ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली. मात्र  आता ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ साठी प्रभाग रचनेत हा  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प पळविण्याचाच  प्रकार झाला असला तरी जनता या वृत्तीच्या लोकांना थारा देणार नाही असेही आबा बागुल म्हणाले.

PMC Election | BJP | NCP | बहुतांश प्रभागात सत्ताधारी भाजप  विरोधात नाराजी!

Categories
Breaking News PMC Political पुणे

बहुतांश प्रभागात सत्ताधारी भाजप  विरोधात नाराजी

: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आता प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणीकडे  लक्ष देण्यास सुरुवात

पुणे : महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर गेली असली तरी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूकपूर्व घडामोडींना वेग आला आहे. शहरातील बहुतांश प्रभागात सत्ताधारी भाजप भारतीय जनता पार्टी विरोधात असलेली नाराजी  बैठकांमधून जाणवते आहे. त्यामुळेच इच्छुकांची संख्या मोठी असली तरी सर्वजण एक दिलाने काम करतील व येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेत असेल” असा विश्वास शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी व्यक्त केला.

 

गेल्या दोन वर्षांमध्ये सातत्याने पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवणारा प्रमुख पक्ष अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुणे शहरात ओळख निर्माण झाली आहे. सातत्याने होणारी आंदोलने , फेसबुक लाईव्ह, समाविष्ट गावांमधून येणारे मोर्चे या सर्वांमुळे पुणे शहरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आता प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणीकडे देखील लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

“निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर निवडणुका कधीही झाल्या तरी आदरणीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सज्ज आहे”, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले आहे. कालपासून शहरातील सर्व प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी सर्व पदाधिकारी , इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांसमवेत बैठका सुरू केल्या असून शहरातील प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुकांची मोठी संख्या आहे.

“गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत असतानादेखील अपेक्षित कामगिरी करता आली नाही, त्यामुळे शहरातील बहुतांश प्रभागात सत्ताधारी भाजप भारतीय जनता पार्टी विरोधात असलेली नाराजी या बैठकांमधून जाणवते आहे. त्यामुळेच इच्छुकांची संख्या मोठी असली तरी सर्वजण एक दिलाने काम करतील व येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेत असेल” असा विश्वास शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी व्यक्त केला. काल कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १७,१८,२८,२९ या प्रभागनिहाय बैठका आज संपन्न झाल्या. तर आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील १०,११, १२,१५ व १६ या प्रभागातील आढावा बैठक आज संपन्न झाल्या तसेच पुढील काही दिवसात कोथरूड ,पर्वती ,खडकवासला ,हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट व वडगांवशेरी या विधानसभा मतदारसंघातील बैठकी देखील संपन्न होणार आहेत.