Tag: pimpari-chinchwad Municipal Corporation
PCMC | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
PCMC | पिंपरी चिंचवड शहर (Pimpari chinchwad city) वेगाने विकसीत होणारे शहर असून या सुनियोजित अशा औद्यगिक नगरीची लोकसंख्याही लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छता करणाऱ्या वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार अश्विनी जगताप, महानरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर योगेश बहल, विजयकुमार खोराटे आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, शहराची देशपातळीवर ओळख व्हावी यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे रोजगाराच्या संधीदेखील वाढत असल्याने सर्वांनी विकासकामांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उंच इमारती बांधल्या जात आहेत. त्यासाठी सक्षम आणि अद्ययावत अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पिंपरी चिंचवड शहराची २०३२ ची अंदाजित लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
देशात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. वंदे भारत रेल्वे, विमानतळांचे विस्तारीकरण, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आदी कामांचा समावेश यात आहे. जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. देश जगातील तीसरी अर्थव्यवस्था बनण्याकडे वेगाने वाटचाल करीत आहे. त्याचा लाभ शहरातील नागरिकांनाही होत असून शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या रहात आहेत, असेही श्री.पवार म्हणाले.
कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
श्री.पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी आणि गवळी माथा येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कामासाठी ९ कोटी रुपये खर्च आला आहे यावेळी आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (पर्यावरण) हरविंदरसिंह बन्सल, कार्यकारी अभियंता (विद्युत) अनिल भारसाखळे उपस्थित होते.
श्री.पवार यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानासाठी उभारण्यात आलेली इमारत आणि पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवनाचेही उद्घाटन केले. या भवनात ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, म्युझिक थेरपी, ऑडिओलॉजी, डान्स थेरपीसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचाराची सोय करण्यात आली आहे. बहुसंवेदी वातावरण युक्त परिसर असणारे दिव्यांग व्यक्ती अधिनियमातील तरतूदीनुसार २४ हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेले देशातील पहिले केंद्र आहे. केंद्रासाठी सीएसआर फंडातून सॅंडविक कंपनीने ७२ लाख रुपयांची मदत केली आहे. केंद्राची इमारत चार मजली इमारत असून सुमारे ११ कोटी रुपये खर्च आला आहे.
काळेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनासाठीचे ट्रान्सफर स्टेशनचे उद्घाटन आणि वाकड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगवी येथील नूतनीकृत कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात आले.
PCMC | PM Awas Yoajana| झोपडपट्टी विरहीत शहर करण्याचे शासनाचे प्रयत्न | उपमुख्यमंत्री अजित पवार
PCMC | PM Awas Yojana | पुणे | राज्यातील नागरिकांना हक्काचे आणि चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टी विरहीत शहर (City Without Slum) असावे आणि राज्यातील प्रत्येक गरीब बांधवाला हक्काचे घर मिळावे हे शासनाचे स्वप्न आहे. त्यासाठी १ हजार ५३८ प्रकल्पांच्या माध्यमातून १५ लाख सदनिकांच्या उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (PCMC | PMC Awas Yojana)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे (Pimpari Chinhwad Municipal Corporation) पिंपरी आणि आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजने (Pradhanmantri Awas Yojana) (शहरी)अंतर्गत उभारलेल्या गृहप्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यात ९ लाख सदनिकांना केंद्रीय मान्यता संनियंत्रण समितीची मान्यता मिळाली आहे. ६ लाखाहून अधिक कुटुंबांना सदनिकांसाठी अनुदान देण्यात आले आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदी माध्यमातून घरे उपलब्ध होत आहेत.
आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी रमाई घरकूल योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना राबविण्यात येत आहे. अशा विविध योजनांमधून नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यात येईल. ग्रामीण भागातील पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी अनुदान १ लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरजू कुटुंबांना घर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मनाला समाधान देणारा आहे, असे त्यांनी सांगितले. म्हाडा अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी मिळाली असल्याने धोकादायक इमारतींच्या पुर्नविकासासाठी तसेच रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लाभ होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
श्री.पवार पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगिण विकासासाठी अनेकदा कठोर निर्णय घेण्यात आले. वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक सुविधा निर्माण कराव्या लागतात. रोजगाराच्या निमित्ताने बाहेरील अनेक नागरिक शहरात येतात. त्यांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्र सरकार दीड लाख आणि राज्य शासन एक लाख रुपयाचे अनुदान देते. हे घर चांगल्या दर्जाचे असावे असा शासनाचा प्रयत्न आहे. हक्काच्या घरासाठी ११ हजार २८७ इच्छुकांनी अर्ज भरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर विश्वास दाखविला आहे. महानगरपालिकेने सोडतीनंतर पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा कधी मिळणार हे त्वरीत कळवावे, त्यासाठी उशिर लावू नये. शहारात जागा उपलब्ध असल्यास कामगारांसाठी सोलापूरच्या धर्तीवर गृहसंकुल उभारण्याचा प्रयत्न करता येईल, असे त्यांनी सांगितले.
चऱ्होली, बो-हाडेवाडी, डुडुळगाव, आकुर्डी, पिंपरी, रावेत याठिकाणी इच्छुकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्यात एकूण लोकसंख्येच्या २ टक्के दिव्यांग आहेत. त्यांनाही चांगले घर मिळविण्याचा हक्क आहे. रावेतमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. महानगरपालिकेतर्फे आयोजित सोडतीचा कार्यक्रम संगणकीय प्रणालीवर आधारीत असून अत्यंत पारदर्शक आहे. त्यामुळे नागरिकांनी मध्यस्थकडून होणाऱ्या फसवणूकीला बळी पडू नये. सोडतीत घर न मिळाल्यास नागरिकांनी निराश होऊ नये. म्हाडा किंवा शासनाच्या इतर योजनांच्या घरांसाठी प्रयत्न करावे. शहरात अधिकाधिक गृहप्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील, असे श्री.पवार म्हणाले. गृहनिर्माण प्रकल्पात योगदान देणाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
खासदार बारणे म्हणाले, हक्काचे घर मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे हे शक्य झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत विविध चांगली कामे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात झाली आहेत. महानगरपालिकेने आवास योजना राबवितांना त्याचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्यावी. गरीब माणसाला वास्तूत गेल्यावर समाधान लाभावे अशी घराची रचना असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजनांचा नागरिकांना लाभ देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मनपा आयुक्त श्री.सिंह यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ९३८ सदनिकांची सोडत काढली जात आहे. सोडतीचा निकाल महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि लाभार्थ्यांच्या मोबाईलवर देण्यात येणार आहे. पिंपरी प्रकल्पात ३७० सदनिका असून त्याची एकूण किंमत एकूण ४७ कोटी असून त्यात केंद्राचा हिस्सा ५ कोटी ५० लक्ष आणि राज्याचा ३ कोटी ७० लक्ष आहे. आकुर्डी प्रकल्पात ५६८ सदनिका असून त्याची एकूण किंमत ७० कोटी आहे. त्यात महानगरपालिकेचा हिस्सा १६ कोटी ८० लक्ष, राज्य शासन ५ कोटी ६० लक्ष, केंद्र सरकार ८ कोटी ५० लक्ष असून उर्वरीत लाभार्थ्यांचा हिस्सा आहे. दोन्ही प्रकल्पाचे ३० चौरस मीटर चटई क्षेत्र असून त्यात सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
Pimpari Chinchwad Zoo | पिंपरी चिंचवड : प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Pimpari Chinchwad Zoo | नागपूर | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC Zoo) संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत जाहिर केला. हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.
यासंदर्भात सदस्या श्रीमती अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
या प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी २०१७ पासून प्राणिसंग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही. दरम्यान, २०१७ ते सन २०२३ या कालावधीत एकूण ३६ प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. ३६ प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या वन विकास महामंडळाकडे महापालिकेने हे प्राणीसंग्रहालय हस्तांतरीत करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.
Indrayani River Devlopment Project | PMRDA | पीएमआरडीएचा इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर!
सद्यस्थितीत 577.16 कोटी रकमेचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासनास सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनांच्या पर्यावरण विभागाने स्वीकारला असून केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. हा प्रस्ताव केंद्र शासन स्थरावर देखील लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा आहे.
PM Modi in Pune News | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
| मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा- प्रधानमंत्री
*पुणे शहर हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर*
*‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर भर*
*महाराष्ट्राने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली*
*डिजीटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा*
*गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक घरांची निर्मिती*
*देशाची ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल | मुख्यमंत्री*
*पुणे मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल | देवेंद्र फडणवीस*
*शहराच्या विकासात पुणेकरांची साथ | उपमुख्यमंत्री अजित पवार*
*विकासकामांमुळे शहर विकासाला गती*
Pimpari Chinchwad Smart City | AAP | पिंपरी चिंचवड शहरात साचलेल्या पाण्यात आप कडून सोडल्या कागदी होड्या
Pimpari Chinchwad Smart City | AAP |आम आदमी पार्टी (Aam Aadami Party) कडून शहरात साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून निषेध व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुचवण्यात आले नाही तर खड्यांमध्ये झाडे लावू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावाने या खड्ड्यांचे नामकरण करू. असा इशारा आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे (Raviraj Kale) यांनी दिला. (Pimpari Chinchwad Smart City | AAP)
काळे यांनी सांगितले कि, पिंपरी चिंचवड शहरात शेकडो कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे स्वप्न आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना दाखवण्यात आले. परंतु सध्या शहराची खासकरून पिंपळे निलख, विशालनगर,कस्पटे वस्ती या परिसरात जागोजागी पाणी साचलेले दिसते. स्मार्ट सिटीचे कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्याच जागी अनेक मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात. या संबंधीत प्रकार वेळोवेळी ड प्रभागातील जनसंवाद माध्यमातून मांडण्यात आला परंतु प्रशासक असल्याने या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्यास कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारांना नेमके शहरातील रस्त्यांवर पाणी साचवण्याचे काम दिले होते की रस्ते स्मार्ट करण्याचे काम दिले होते याची चौकशी मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी करावी. अशी मागणी काळे यांनी केली आहे. (Pimpari Chinchwad Municipal Corporation)
News Title |Pimpari Chinchwad Smart City | AAP | Paper boats left by AAP in stagnant water in Pimpri Chinchwad city
Pimpari Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना जलपर्णीचा हार घालण्याचा आप चा इशारा
Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता
| पीएमपी सीएमडीनी मागणी करूनही दोन्ही मनपा आणि पीएमआरडीए कडून प्रतिसाद नाही
Divyang PMPML Free pass | ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिना (Divyang In Rural Area) पीएमपीएमएलचा (PMPML) मोफत बस प्रवास पास (Free Bus Pass) मिळणेबाबत वेगवेगळ्या संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे. मनविसे देखील (MNVS) याची मागणी पीएमपीकडे (PMPML pune) केली आहे. त्या अनुषंगाने पुणे (PMC Pune) व पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpari Chinchwad Municipal Corporation) आणि पीएमआरडीए (PMRDA) कडे याबाबतचे धोरण तयार करण्याची मागणी पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया (PMPML CMD Omprakash Bakoria) यांनी केली आहे. मात्र तिन्ही संस्थांकडून याबाबत कुठलाही प्रतिसाद अजून पीएमपीला मिळालेला नाही. यावरून दिव्यांगांबाबतची उदासीनता दिसून येत आहे. (Divyng PMPML free pass)
भागातील दिव्यांग व्यक्तिंचे मोफत बस प्रवास पास पोटीचे कोणतेही अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिीनां सदया मोफत बस प्रवास पास सवलत देणेत येत नाही. (PMP bus pass News)
दोन्ही महापालिकांकडून अद्याप याबाबतचे धोरण प्राप्त झालेले नाही. तरी पुणे व पिंपरी चिंचवड मनपाचे हद्दीतील दिव्यांग व्यक्तिनां देणेत येणारे मोफत बस पासचे धोरणाप्रमाणेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस सदर पासेस पोटीचे अनुदान पीएमआरडीएकडून महामंडळास मिळाल्यास महामंडळामार्फत ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास देणेस हरकत नाही. यास्तव ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस सदर पासेसपोटीचे अनुदान पीएमआरडीएकडून महामंडळास मिळणेबाबतचे धोरण निश्चित करून महामंडळास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करणे विषयी विनंती आहे. जेणे करून याबाबतची पुढील कार्यवाही करणे महामंडळास शक्य होईल. असे पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया यांनी मागणी केली होती. मात्र याबाबत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुणे जिल्हा आणि बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यात येतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील अंध व अपंग विद्यार्थी व नागरिकांना मोफत बस सेवा दिली पाहिजे. अशी मनविसे ने मागणी केली आहे.