Tag: Pradeep Deshmukh
झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!
पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula mutha river revival project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष ( trees) बाधित होणार आहेत. हे वृक्ष तोडू नयेत या मागणीसाठी राष्ट्रवादी कडून (ncp pune) संभाजी उद्यानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवक्ता प्रदीप देशमुख यांनी झाडावर चढून बसत झाडे न तोडण्याचा पुनरुच्चार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. ते म्हणाले की, पुणे शहरात विकास कामांना आमचा विरोध नाही. पण विकास काम करत असताना, पर्यावरणाचा देखील भाजप आणि महापालिका प्रशासन थोडा विचार करायला पाहिजे होता. तो त्यांनी केला नसल्याने आता नदी पात्र सुधार प्रकल्प अंतर्गत हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे.
नियमानुसार आम्ही झाड लावणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आजवर पुणे महापालिका प्रशासनामार्फत झाडे काढल्यावर कोणत्याही ठिकाणी झाडे लावण्यात आली नाही. यामुळे या नदी पात्रात झाडांचे देखील तेच होणार आहे. यामुळे झाडांची कत्तल झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यावरण प्रेमींनी यावेळी दिला.
प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, केवळ आपल्या बॉसेसना खुश करण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे.या सर्व झाडांचे पुनर्रोपण करता येणे अशक्य आहे. आम्ही देखील विकासाचे समर्थक आहोत पण पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास आम्हाला अमान्य आहे.
यावेळी शहाराघ्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , दिपाली धुमाळ ,किशोर कांबळे , नितीन कदम , अजिंक्य पालकर , मनोज पाचपुते , कैलास मकवान , विक्रम जाधव , हरीश लडकत , फईम शेख, शिल्पा भोसले इ प्रमुख उपस्थित होते.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ची राज्य सरकार विरोधात सह्यांची मोहीम
राज्यातील ईडी सरकारच्या नाकर्तेपनामुळे वेदांता फॅक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुणे शहरातील सर्व महाविद्यालयांच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या सह्यांच्या मोहीमेचा शुभारंभ आज फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बाहेर करण्यात आला मोदींनी मागील काही वर्षांपूर्वी बेरोजगारांनी पकोडे तळा असा सल्ला दिलेला होता त्यालाच अनुसरून विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले पकोडे नागरीकांना वाटण्यात आले.
‘पन्नास खोके विदयार्थ्यांना धोके’, ‘महाराष्ट्राला पॉपकॉर्न गुजरातला फोकस्कॉन ‘ अश्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. सदर प्रसंगी विध्यार्थांचा खूप मोठेया प्रमानावर प्रतिसाद होता .
या प्रसंगी बोलताना प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले महाराष्ट्राच्या विदयार्थ्यांना व तरुणांना दोन लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प या ED सरकारने दुर्लक्षित केला आणि परराज्याच्या दावणीला नेऊन बांधला. आपल्या राज्यातील तब्बल दोन ते तिन लाख कुटुंबाची प्रगती यामुळे थांबणार आहे या सर्व तरुणाच्या आशा ह्या ED सरकारने धुळीस मिळवण्याचे पाप केलेलं आहे ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत संपूर्ण देशाला नोक-या दिल्या त्या महाराष्ट्रातील बेरोजगारांना पुढील काळात नोक-यांकरीता कुटुंबाला सोडून परराज्यात जावे लागण्याची परीस्थीती निर्माण होण्याचा खुप मोठा धोका आहे त्यांना जनता नक्कीच योग्यवेळी उत्तर देईल.
सदर प्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख, विक्रम जाघव, संध्या सोनवणे, शुभम माताळे, कार्तिक थोटे, ओम पोकळे, ऋषीकेश शिंदे,अद्वैत कुऱ्हाडे, श्रीकांत बालघरे,ऋषीकेश कडू, चैतन्य पडघन, पियूष मोहिते, सत्यम पासलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते…
खड्ड्यांत कागदी नाव , बदक , खेकडे , मासे सोडून राष्ट्रवादीचे अभिनव आंदेलन
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची जी चाळण झालेली आहे त्याला पुर्णत: भाजप जबाबदार असुन या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वारगेट येथे अभिनव पध्दतीने आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. पिएमटी डेपो बाहेर केलेल्या ह्या आंदोलनात तेथील रस्त्यावर असणा-या मोठ्या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या, रबरी बदक सोडण्यात आले. तसेच या खड्ड्यांजवळ अर्घगोलात बसून प्रतिकात्मक मासे, खेकडे देखील पकडण्यात आले.
मागील आठवड्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन पुणे शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवून नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते द्यावे अशी मागणी केली होती, जर आठवडाभरात पुणे खड्डेमुक्त झालं नाही तर पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यावेळी दिलेला होता .
पुणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून मागील काही दिवसांत या खड्ड्यांमुळे पुणेकरांचे बळी देखील गेले आहेत.
आज पुण्याच्या रस्त्यावर पडलेले खड्डे हे गेल्या पाच वर्षात रस्त्यांच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची साक्ष देत आहेत. गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते जर दरवर्षी पावसाळ्यात दुरुस्त करावे लागत असतील. तर ५ वर्षात भाजपने केलेल्या रस्त्यांच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली.
“खड्डे हा केवळ त्या रस्त्यापुरता मर्यादित विषय नसून या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे , मणक्याचे आजार होत आहेत. काही अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहेत, तर काहींचा या खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. जर सर्वसामान्य पुणेकरांनी भरलेल्या टॅक्समधून कोट्यावधी रुपये खर्चून रस्ते तयार केले जातात. त्याचे निकृष्ट काम केले जाते तर या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदारी धरत गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपमधील पदाधिकारी, या रस्त्यांचा दर्जा तपासणारे अधिकारी, या रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार या सर्वांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा”,अशी मागणी देखील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केली.
या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख,संतोष नांगरे, विपुल म्हैसुरकर, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, श्वेता होनराव, संजय दामोदरे, विजय बगाडे, सोनाली उजागरे, राहुल गुंड, प्रदीप शिवशरण, योगेश पवार, मंथन जागडे,अर्जुन गांजे, आनंद बाफना, बाळासाहेब अटल, रुपेश आखाडे, मोहसीन काझी, गणेश दामोदरे, अर्जुन गांजे, आनंद बाफना, सचिन गांधी, नामदेव पवार, अर्जुन भिसे, संतोष पिसाळ, समीर पवार व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादीने आता तुकाराम महाराजांनाच घातले साकडे
श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात महारष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषण न करू दिल्यामुळे राजशिष्टाचाराचा भंग झाला व समस्त महाराष्ट्रातील नागरिकांचा अपमान झाला. याच्याच निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वात संत तुकाराम महाराज पादुका चौकात , फर्ग्युसन रोड येथे आज पंतप्रधान कार्यालयाचा व भाजप चा भजन, अभंग व कीर्तन करून निषेध केला गेला .
याप्रसंगी बोलताना प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की मागील वेळीस पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये अजित दादा पवार यांचे भाषण संपूर्ण देशभर गाजले होते याचाच धसका घेऊन या वेळी जाणून बुजून अजित दादांना चे नाव भाषणाच्या यादीतून वगळण्यात आले मात्र अजित दादा हे असे नेते आहेत जे बोलले असते तरी त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांनी भाषण का केले नाही यावरच धडली मात्र टेलिप्रॉम्पटर वर वाचून केलेल्या भाषणापे़क्षा ते जास्त लोकांना भावले असते त्यामुळे भाजपाने केलेला हा खोडसाळपणा जनतेने पूर्णपणे हाणून पडलेला आहे. यापुढे तरी त्यांना सुबुद्धी लाभो असे या ठिकाणी बोलताना देशमुख म्हणाले.
यावेळी प्रवक्ते प्रदिप देशमुख, बाळासाहेब बोडके, कार्याध्यक्ष मनोज पाचपुतेव अजिंक्य पालकर, महेश हांडे,दीपक जगताप, गणेश नलावडे,पंकज साठे, स्वप्नील जोशी , केतन ओरसे व पुणे शहर युवक पदाधिकारी व युवक मतदारसंघ अध्यक्ष उपस्थित मोठया संख्येने होते.
महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी महागाई बाजार उभारुन आंदोलन
पुणे : देशात महागाईने उच्चांक गाठला असून यावर्षी महागाईचा उच्चांक मोडीत काढला असून या आठवड्यात घाऊक महागाई दर १५.८८ वर गेला आहे. हा गेल्या ९ वर्षांतील उच्चांक असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही कठिण परिस्थिती देशावर ओढावली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात मोदी महागाई बाजार भरविण्यात आला होता.
पुणे शहरात अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. याशिवाय काही बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत. पण आज पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात उभारण्यात आलेल्या भाजीपाला , फळे , फुलविक्रेता ,पुस्तक विक्रेता , शालेय साहीत्य , किराणा, चहा , वडापाव विक्रेता याचबरोबर मासळी बाजारासह “मोदी महागाई बाजार पेठची” चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. यामध्ये बाजारपेठ उभी करून महागाई विरोधात आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. मोदीजी, महागाईचा बाजार उठवा नाहीतर जनता तुमचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवे सह जीवनावश्यक वस्तूत देखील मोठ्या प्रमाणत वाढ करण्यात आली आहे.याचा फटका सर्वसामान्य जनतेसह किरकोळ विक्रेत्यांना देखील बसला आहे.जनता दिवसेंदिवस महागाईच्या ओझ्याखाली पिचली जात असून आता व्यापारी आणि विक्रेत्यांवरही महागाईची ही संक्रांत ओढावली आहे.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे मे महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीचा दर ५६.३६ टक्के, तर गव्हाच्या दर १०.५५ टक्के आणि अंडी, मांस आणि मासळीच्या भाववाढीचा दर ७.७८ टक्के होता. तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.११ टक्के आणि ७.८ टक्के होता. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर ७९.५० टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.४ टक्के होता.
केंद्रातील मोदी सरकारला महागाईवर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयश आले असून याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख , उदय महाले, वनराज आंदेकर, अजिंक्य पालकर, वैशाली थोपटे, सदानंद शेट्टी , मूणालीनी वाणी मोनाली गोडसे, राखी इंगळे, रोहन पायगुडे, सुशांत साबळे,सौरभ गुंजाळ, लक्ष्मण आरडे , रूपाली ठोंबरे , मनिषा होले ,योगेश पवार ,दिलशाद अत्तार हे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर नागरीकही उपस्थीत होते
कमळ चिखलात फुलते गाळात नाही; पावसाने भाजपची चांगलीच पोलखोल
| राष्ट्रवादी प्रवक्ते प्रदीप देशमुखाची टिका
काल पुण्यामध्ये या वर्षीच्या पडलेल्या पहिल्याच पावसाने गेली पाच वर्ष सत्तेवर असलेल्या भाजपची चांगलीच पोलखोल केलेली आहे. काल संपुर्ण शहरभर रस्त्यांवर पाणी तुंबले होते, वाहतुक खोळंबली होती व पुणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पाशवी बहुमताच्या बळावर पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर पुणे करांचे प्रश्न सोडवायचं सोडून सत्तेवर राहून फक्त कमिशनचा मलिदा खाणाऱ्या टेंडर मध्ये अडकलेल्या भाजपा मुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले. असा आरोप राष्ट्रवादी प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला आहे.
देशमुख म्हणाले, : शहराच्या ज्या मध्यवर्ती भागात भाजपाचे वर्षानुवर्षे प्राबल्य राहीलेलं आहे त्या भागाला तर छोट्या ओढया नाल्याचे स्वरूप आले होते. स्वत:च्या पक्षाचे खासदार , आमदार व सभागृह नेते , स्थायी समिती अघ्यक्ष व बहुसंख्य नगरसेवक जेथून निवडून येतात त्यांना येथील प्रशंनाकरीता दोन दिवसांपूर्वी आंदेलन करावे लागले. ह्यातच त्यांनी आपल्या अपयशाची जाहीर कबूली दिलेली आहे व आपण सत्तेत बसण्यास लायक नाही हे त्यांनी मान्यच केले.
देशमुख पुढे म्हणाले, शहरतील सर्वात जास्त निधी ज्या भागात खर्च केला तेथेच ही परिस्थती असेल तर ह्यांच्या नगरसेवकाचे लक्ष कामात होते की मलई खाण्यात होते हे सर्व पुणेकरांना आता कळाले आहे. आचा-याने स्वत:च बनविलेल्या जेवनावर जेवणा-यांसमोर येवून ते किती खराब आहे हेच सांगण्यासारखा हा प्रकार आहे. एकीकडे ही कामे आम्ही केली असे लिहलेले बोर्ड व दुसरीकडे कामेच नाही झाली म्हणून आंदोलन करायचे. भाजपवाल्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत गटबाजीमध्ये पुणेकरांना ओढू नये येत्या मनपा निवडणूकीत पुणेकरांचे ठरले आहे हे त्यांनी निश्चित लक्षात ठेवावे. असे ही देशमुख म्हणाले.
राष्ट्रवादीच्या आंदोलनातील या आरतीची झाली खूपच चर्चा
पुणे : देशांतर्गत वाढलेली महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शनिपार चौक येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. महागाई ची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘ कमळाबाई ‘ ची आरती करण्यात आली. ही आरती प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी लिहिली आहे. ज्याची दिवसभरात खूपच चर्चा चालू आहे.
जयदेवी जयदेवी जय कमळाबाई
महागाई असह्य होई जेंव्हा तु राज्यावर येई …..
जयदेवी जयदेवी
||जय कमळा बाई ||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी, जय देवी जयदेवी |१|
अदानी -अंबानी चं तुझे पिता
गरीबांची कर्दनकाळ तु
नफाखोरांची त्राता ….
जयदेवी जयदेवी
||जय कमळाबाई||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी जय देवी जयदेवी |२|
झोलावाल्या फ़क़ीराचे चे तू विश्वदर्शन करवीशी
सामान्यांच्या इंधनातदरवाढ करशी
जयदेवी जयदेवी
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी |३|
त्रिलोकी तुझ्या भ्रष्टाचाराच्या
गाथा
भारतीय आता पिटतायत आपलाच माथा
जय देवी जय गवी
||जय कमळाबाई||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी |४|
जेव्हा भाजप मुक्त होशील भारतदेशा, तेव्हाच पुर्ण होतील तुझ्या सगळ्या आशा
जय देवी जय देवी
||जय कमळाबाई||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी जयदेवी जयदेवी |५|
*प्रदीप देशमुख
प्रवक्ता व प्रदेश प्रतिनिधि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
सुप्रियाताई सुळे यांनी सदर आंदोलनात …. यापुढे संपुर्ण महाराष्ट्रात ही महागाईची आरती म्हणून पक्षााच्यावतीने गॅस व इंधन दरवाढीची आंदोलने होतील असे जाहीर केले