Pune Akashvani News | पुण्याबद्दल आकस नसेल तर प्रकाश जावडेकरांनी पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

 Pune Akashvani News | पुण्याबद्दल आकस नसेल तर  प्रकाश जावडेकरांनी  पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी

Pune Akashvani News | आकाशवाणी पुणे केंद्रातील (Akashvani Pune Centre) प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपति संभाजीनगरला  स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेऊन पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नष्ट करण्याचे धोरण आखले आहे असे दिसून येत आहे. अशा वेळी माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असणारे ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांना पुण्याबद्दल आकस नसेल तर किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्याकडे प्रयत्न करून हा निर्णय रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. जर हा निर्णय केंद्र शासनाने (Central Government) रद्द केला नाही तर कॉंग्रेस पक्षातर्फे (Congress Party) तीव्र निदर्शने केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पुण्याबद्दलचा आकस स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे पुणेकरांनी आता संघटित होऊन भाजपचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. तसेच शिवाजीनगर येथे भव्य मेट्रो स्टेशन होत असल्यामुळे पुणे आकाशवाणीच्या सुमारे ४ एकर जागेवर बिल्डरच्या फायद्यासाठी व्यापारी संकुल होण्यासही विरोध केला पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी म्हंटले आहे.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असतानाच त्यांनी घेतलेल्या केंद्र धार्जिण्या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्वायत्तता गेली. पुणे आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्ताचे केंद्र गेले. पुणे दूरदर्शनची देखील त्यांनी दुरावस्था करून टाकली. केवळ राज्याचेच नव्हे तर देशाची सांस्कृतिक राजधानी असा पुण्याचा नावलौकिक कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातबद्दल प्रेम आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरबद्दल प्रेम आहे अशावेळी ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांना पुण्याबद्दल प्रेम आहे काय? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नख लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला साथ देऊन ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर यांनी कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यी मर्जी संपादन केलीही असेल मात्र पुणेकर आता त्यांच्या पुणे विरोधी कटकारस्थानांना क्षमा करणार नाहीत. आता तरी याचे प्रायश्चित्त म्हणून ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे रदबदली करून पुणे आकाशवाणी केंद्राबद्दलचा निर्णय मागे घेण्यास त्यांना भाग पाडावे. कॉंग्रेस पक्ष  पुणेकरांचे हित सांभाळण्यासाठी या निर्णयाविरुद्ध जोरदार आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.  (Pune Akashvani)
—-
News Title | Pune Akashvani News |  If you don’t care about Pune, Prakash Javadekar should do something for Pune – Mohan Joshi

Mohan Joshi Vs Prakash Javdekar | पुण्याच्या सांस्कृतिक कोपर्‍यावर प्रकाश जावडेकरांनी का हातोडा मारला? | मोहन जोशी यांचा सवाल

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

पुण्याच्या सांस्कृतिक कोपर्‍यावर प्रकाश जावडेकरांनी का हातोडा मारला? | मोहन जोशी यांचा सवाल

पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archive of India) चा स्वतंत्रपणे चालणारा कारभार संपवून नॉशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये (National Film Development Corporation) पुण्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय(नॉशनल फिल्म अर्कईव्ह ऑफ इंडिया),फिल्म्स डिव्हिजन, डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल, चिलड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया या नेहरु काळात स्थापन झालेल्या संस्थांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय भाजपाच्या केंद्र सरकारने घेतला. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक कोपर्‍यावर जणू हतोडाच मारला गेला आहे आणि तोही स्वतःला पुणेकर म्हणवणारे तेव्हा केंद्रात माहिती आणि नभोवानी मंत्री असणारे प्रकाश जावडेकर यांच्या संमतीने! पुण्यातील प्रभात रोडवरील या सांस्कृतिक कोपर्‍याचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट करण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाला मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संमती का दिली? कदाचित त्यांना हा विषय कळलाच नसेल आणि तरी त्यांनी संमती दिली. या सर्व गोष्टींचा निषेध कॉँग्रेस पक्षातर्फे आम्ही करतो. असे महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Pradesh Congress Vice President Mohan Joshi) यांनी म्हटले आहे.

जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नॉशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही फायदा मिळवणारी कंपनी असून त्यामध्ये वरील सर्व संस्थांचे विलीनीकरण झाल्यामुळे त्यांची स्वायत्ता आणि लोकाभिमूखता संपली असून या सर्व संस्थांमधून पैसा मिळवणे. हे ध्येयधोरण राबवले जाणार आहे. याशिवाय पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, फिल्म ऑड टेलिव्हीजन इंस्टटयुट, मुंबईतील फिल्मस डिव्हिजन यांच्या शेकडो एकर जमिनीदेखील विकासाच्या नावाखाली व्यावसायिकदृष्ट्या विकसीत करुन त्यापासून करोडो रुपये मिळवणे हे काही वर्षातच घडू शकते. यासोबतच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासारख्या लोकाभिमूख संस्थेच्या सेवा आता अधिक महाग होतील.

पुण्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला आतापर्यंत चित्रपटाचे अभ्यासक असणारे अनेक संचालक लाभले आणि त्यामुळे ही संस्था भरभराटीला आली. आता मात्र पुण्याचा सांस्कृतिक कोपरा असणार्‍या या संस्थेवर केंद्रातील अधिकारी राज्य करणार तेथून या वैभवशाली संस्थेला ओहोटी लागू शकते. त्यामुळेच प्रत्येक पुणेकरांनी पुण्याच्या सांस्कृतिक वैभवावर हतोडा मारणार्‍या या निर्णयास संमती अथवा मूकसंमती देणार्‍या तत्कालीन मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निषेध केलाच पाहिजे. कदाचित याचे खाजगीकरण करण्याचाही केंद्रातील भाजपा सरकारचा हा डाव असावा. पुण्याच्या हिताला बाधा पाहोचवणार्‍या या पापास क्षमा नाही. असे ही जोशी यांनी म्हटले आहे.

Mohan Joshi : बापट,  मोहोळ,  जावडेकर यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यावा : असं का म्हणाले मोहन जोशी?

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

 बापट,  मोहोळ,  जावडेकर यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यावा

: नदी सुधार योजना ही स्टंटबाजी

-: माजी आमदार मोहन जोशी

पुणे – महापालिका निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाला मुळा-मुठा नदी सुधारणेबाबत जाग आली असून त्यासाठीच्या कामाची निव्वळ स्टंटबाजी केली जात आहे, वास्तविक या प्रकल्पाला लागलेल्या विलंबाबद्दल माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विद्यमान खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यायला हवा, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

मुळा-मुठा नदी सुधारणेच्या कामाला जपानमधील जायका कंपनी आणि केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने कामास लवकरच सुरुवात होईल अशी घोषणा भाजपच्या महापौरांनी केली आहे. हा निव्वळ देखावा आहे. सात वर्षांपूर्वीच केंद्राने मंजुरी दिली होती. भाजपने तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सत्कार खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते केला होता. नदी सुधारणा कामांशी संबंधित पर्यावरण खात्याचे मंत्रीपद प्रकाश जावडेकर यांच्याकडे होते. मात्र, सत्कार समारंभ झाले. पण, गेली सात वर्षे या प्रकल्पाला माजी खासदार शिरोळे, माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, विद्यमान खासदार गिरीश बापट, महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी मार्गी लावू शकलेले नाहीत. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रकल्पाचा निधी परत जातोय की काय? अशी परिस्थिती उदभवली होती याची कबुलीच खासदार बापट यांनी दिलेली आहे. सात वर्षे हे निष्क्रीय राहिले आणि आता निवडणूक आली म्हणून धडपड करुन प्रकल्प मंजुरीचे पत्र आणले आहे. एव्हाना हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा होता. ती निष्क्रियता लपवून ठेवायची आणि प्रकल्पाचे काम मार्गी लावत असल्याचा गाजावाजा करत स्वतःची पाठ थोपटून घ्यावयाची असा प्रकार खासदार बापट आणि भाजपची नेते मंडळी करीत आहेत, केवळ नदी सुधारणा प्रकल्पच नव्हे तर स्मार्ट सिटी सारख्या अन्य अनेक प्रकल्पांना पूर्णत्त्वास नेण्यात भाजपच्या या लोकप्रतिनिधींना अपयश आल्याने त्यांना पुणेकरांनी अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यायला हवा, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकात केली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्पाचा खर्च सुमारे ५५०कोटी रुपयांनी वाढलेला आहे. प्रकल्पासाठी होणाऱ्या सुमारे १४७३कोटी खर्चापैकी ८४२ कोटी केंद्र सरकार देणार आहे. उर्वरित ५५०कोटी खर्चाचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी बसणार आहे. याला जबाबदार असलेल्या भाजपला, पुणेकरांसमोर जाब द्यावा लागेल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Modi: Punekars : पुण्यातील गोखलेनगर भागातील नागरिकांनी मोदींना लिहिली पत्रे 

Categories
Political पुणे

पुण्यातील गोखलेनगर भागातील नागरिकांनी मोदींना लिहिली पत्रे

: व्यक्त केले आभार

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर केलेल्या योजनांची गोखलेनगर भागातील नागरिकांना घरोघरी जाऊन माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. याबद्दल नागरिकांच्या भावना व्यक्त करणारी आभाराची पत्रे खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पत्रपेटीत टाकण्यात आली.

यावेळी जावडेकर म्हणाले, या उपक्रमाद्वारे कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये जाऊन लसीकरण, मोफत अन्नधान्य वितरण आणि महिलांच्या नावाने जनधनच्या खात्यात पंधराशे रुपये दिल्याबद्दल महिलांनी मोदींच्या नावे पत्रे दिली होती. मोदी सरकारने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेला हा उपक्रम चांगला आहे.

शहर भाजपचे उपाध्यक्ष योगेश बाचल यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी सतीश बहिरट, लक्ष्मण नलावडे, प्रभाकर पवार, किरण ओरसे, रोहीत लिंबाळे, रामु धनगर, रमेश भंडारी, सर्जेराव धोत्रे, स्नेहल ढावरे, युवराज गाटे, रवी जाधव, ईश्वर बनपट्टे, शैलेश चलवादी उपस्थित होते.

नागरिकांनी जन औषधी योजनेचा लाभ घ्यावा : जावडेकर

गोखलेनगर भागात विवेक किरवे यांनी जनौषधी केंद्र सुरू केले आहे. अशा केंद्रांचा प्रचार केला पाहिजे. शंभर रुपयांतील औषधे वीस रुपयाला मिळतात. डॉक्टर ब्रेंडेड औषधे लिहून देतात त्यापेक्षा मूळ औषधे दिली पाहिजेत. ती स्वस्त आहेत. जनौषधी केंद्र म्हणजे मोदींचे स्वस्त औषधांचे दुकान आहे. देशभर आठ हजारहून अधिक आहेत. चार लाख नागरिक याचा लाभ घेतात. लोकांचा खर्च आवाकात आला आणि त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी जन औषधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जावडेकर यांनी केले