Tag: Pune Congress
Pune Congress Agitation for inauguration of Ruby Hall to Ramwadi Metro and Airport New Terminal!
| Agitation to get the attention of the rulers in a legitimate way shown by the public uncle: Mohan Joshi
Pune Congress challenge to Pune BJP from Nirbhay Bano Sabha!
Nirbhay Bano sabha Pune | निर्भय बनो सभेवरून पुणे कॉंग्रेस चे पुणे भाजपला आव्हान!
Nirbhay Bano Sabha Pune | निखिल वागळे(Nikhil Wagle), अमोल पालेकर (Amol Palekar), असीम सरोदे (Asim Sarode) यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात निर्भय बनो सभा (Nirbhay Bano sabha pune) घेतली जाणार आहे. मात्र निखिल वागळे यांच्या उपस्थित राहण्याबाबत शहर भाजपने (Pune BJP) आक्षेप घेतला आहे. तसेच सभा उधळून लावण्याचा इरादा भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला आहे. मात्र भाजपचे हे आव्हान शहर कॉंग्रेस (Pune Congress) ने स्वीकारले आहे. उद्याची सभा ही यशस्वीरित्या पार पडेल याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. अशी खात्री पुणे कॉंग्रेस ने दिली आहे.
-
भाजपने काय म्हटले होते?
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल कायम अवमानकारक वक्तव्ये करणारे, देशाची माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आडवाणी यांना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला शाबासकी देण्यासारखे आहे. अशी आपल्या मनातील मळमळ ओकून समाजातील वातावरण कलुषित करणारे काही नतद्रष्ट लोक येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे ‘निर्भय बनो’ नावाची सभा घेणार आहेत.
गेल्या दहा वर्षात नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाचा वेगाने विकास होतो आहे. जगभरात मोदी जींच्या नावाचे कौतुक केले जात आहे. पण हे सगळं बघून काही लोकांच्या पोटात दुखते आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक देशातील घटनात्मक पदांवर असणाऱ्या नेत्यांची बदनामी या सभेच्या माध्यमातून केली जाते. या सभेत सहभागी होणारे वक्ते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरूनही कायम गरळ ओकत असतात.
अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही या निवडक लोकांनी अत्यंत खालच्या पातळीवर उतरून देशातील या सर्वोच्च सन्मानाचा अनादर केला होता. त्याचबरोबर मोदी आणि अडवाणी यांचा अपमान केला होता.
निर्भय बनो सभेच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घेणे एवढे एकच उद्दिष्ट आयोजकांचे आहे. भारतीय जनता पार्टी या स्वरुपाच्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दुही माजवणाऱ्या प्रवृत्तींच्या कायमच विरोधात उभी राहिली आहे. खोटं बोल पण रेटून बोल ही संस्कृती निर्भय बनोच्या नावाखाली रुजविण्याची वृत्ती यातील वक्त्यांकडून सुरू आहे. पण पुणे शहर भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही.
देशविघातक वक्तव्ये करणाऱ्यांना वेळीच आळा घालण्यासाठी आपण निर्भय बनो सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. देशात भयमुक्त वातावरण असताना चार टाळकी निर्भय बनो म्हणून आपला अजेंडा रेटत आहेत. त्यांचा हा अजेंडा उधळून लावल्याशिवाय पुणे शहर भारतीय जनता पार्टी शांत राहणार नाही.
-
कॉंग्रेस ने काय म्हटले आहे?
‘निर्भय बनो’ ची उद्या शुक्रवार रोजी होणारी सभा ही गुंडशाही व झुंडशाहीच्या विरोधात घेतली आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे अतिशय संस्कारी अध्यक्ष धीरज घाटे यांनी ही सभा उधळवून लावायची धमकी दिली आहे आणि तसे त्यांनी तेथील पोलीस स्टेशनला निवेदनही दिले आहे. खरे तर आता नविन पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आले आहेत आणि ते कायदा व सुव्यवस्था या बाबत अतिशय दक्ष आहेत. त्यांनी पुण्यातील गावगुंड ते मोठे गुंड सगळ्यांची परेड पोलीस आयुक्तालय येथे काढली होती. त्यामुळे या धर्मांध गुंडाचा बंदोबस्त पोलीस आयुक्त निश्चित करतीलच परंतु या सभेसाठी इंडिया आघाडीमधील सर्व घटक पक्ष व महाविकास आघाडी हे तेथे लोकशाही वाचविण्यासाठी आणि ‘निर्भय बनो’ सभा ही व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी संरक्षण देण्याचे काम करणार आहेत.
खरे तर संविधानाने आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार, भाषणाचा अधिकार दिलेला आहे. असे असतानाही काही संविधान विरोधी लोक गुंडशाही व झुंडशाहीच्या माध्यमातून पुण्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत तो प्रयत्न आम्ही कदापीही यशस्वी होवू देणार नाही. लोकशाही ही असल्या धमक्यांना घाबरता नाही. उद्याची सभा ही यशस्वीरित्या पार पडेल याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.
PMC Water Tank | Datta Bahirat Patil | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन |उद्घाटना नंतर धक्काबुक्की!
| श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट | माजी नगरसेवक दत्ता बहिरट
PMC Water Tank | Datta Bahirat Patil |पुणे : काँग्रेस आणि महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) प्रभाग क्रमांक ११ (PMC Ward no 11) येथील आशा नगर (PMC Ashanagar Water Tank) येथील माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. दरम्यान उद्घाटन झाल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ranindra Dhangekar), मोहन जोशी (Mohan Joshi Pune congress) तसेच काही पत्रकारांना धक्का बुक्की झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान या प्रकारामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनास येण्यास टाळल्याचे दिसून आले. (PMC Water Tank | Datta Bahirat Patil)
See Video Here|https://www.instagram.com/reel/C2kAhQwNxoO/?utm_source=ig_web_copy_link
याप्रसंगी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे, दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, अभय छाजेड, विरेंद्र किराड, अविनाश बागवे, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, उदय महाले, राहुल शिरसाट आदी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या प्रतिसादाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने पाण्याच्या टाकीची उभारणी मी करू शकलो. भारतीय जनता पक्षाचे आमदार यांचा कामाचा श्रेय घेण्याचा प्रकार त्यांच्या अंगलट आला. रहिवाशांनी त्यांना दाद दिली नाही. यापुढे विकास कामात काँग्रेस आघाडीवर राहील, असे यावेळी बोलताना माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सांगितले.
पाण्याच्या टाकीसाठी बहिरट यांनी प्रयत्न केले हे सर्वाँना माहीत आहे. काँग्रेसच्या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप भाजप करीत आले आहे. पण लोकांकडून त्यांना प्रतिसाद मिळेनासा झाला आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
टाकीसाठी विना मोबदला जागा बहिरट यांनी मिळवून दिली. लोकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने हे घडले, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या मुख्य सभेने टाकीचे उदघाटन कसे करावे? हे ठरवून दिले होते, परंतु, भाजपच्या आमदारांनी टाकीसाठी काहीही न करता उदघाटनाचा घाट घातला आहे, हे सर्व जनता ओळखून आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील जनतेला दत्ता बहिरट यांच्या कामाची चांगली माहिती आहे. जनता बहिरट यांच्यावर विश्वास ठेवेल, असे बागवे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात ॲड.शाबीर खान, विनोद रणपिसे, उदय वाघ, प्रविण डोंगरे, आशुतोष जाधव, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, राजश्री ताई अडसूळ, संगीता ताई रूपटक्के, राजन नायर, भरत ठाकूर, कुणाल काळे, प्रसाद वाघमारे, स्वप्नील नाईक, साहिल राऊत, प्रथमेश लभडे, वाल्मिकी जगताप, जावेद नीलगर, विनोद बांदल, सनी यादव आदी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth | रहाळकर राममंदिरात काँग्रेसने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप
Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth | पुणे | जय सियारामच्या जयघोषात आणि मंगलमयी उत्साही वातावरणात सदाशिव पेठेतील रहाळकर श्रीराम मंदिरात (Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth) काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Pune Congress Karykartas) आज सोमवारी महाआरती, भजन केले आणि नंतर प्रसादाचे वाटप केले. (Pune Important Places)
अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण (Shri Ram Lalla Pran Pratishta) सोहळ्यानिमित्त माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते, त्याला भाविक वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी श्रीरामाचे भजन करण्यात आले, प्रसाद वाटण्यात आला. याप्रसंगी आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), दत्ता बहिरट (Datta Bahirat Pune congress), संजय बालगुडे (Sanjay Balgude Pune Congress), रोहित टिळक (Rohit Tilak Pune Congress), शेखर कपोते, रमेश अय्यर, पूजा आनंद, रजनी त्रिभुवन, लता राजगुरु, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, प्रविण करपे, स्वाती शिंदे, शानी नौशाद, नरेंद्र व्यवहारे, गौरव बोराडे, प्रथमेश आबनावे, चैतन्य पुरंदरे, रोहन सुरवसे, किशोर मारणे, अनिल आहेर आदी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
श्रीरामाविषयी सर्व भारतीयांच्या मनात श्रद्धा आहे. श्रीराम हे दैवत प्रत्येक भारतीयाचे आहे, कोणा विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाचे नाही व कोणा पक्षाचे अथवा संघटनेचेही नाही, या दैवताला पक्षीय, राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणी केला, तरी ते भारतीयांना मान्य होणार नाही. प्रभू रामचंद्रांविषयी सर्वांच्या मनात आस्था आहे. आपल्या सहज बोलण्यातही श्रीरामाचे नाव घेतले जाते हे त्याचेच ऊदाहरण आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना याच श्रद्धायुक्त भावनेने आम्ही प्रभू श्रीरामाची महाआरती केली,असे याप्रसंगी बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले.
श्रीरामाचा पक्षीय, राजकीय वापर करणाऱ्याना रामरायानेच सदबुद्धी द्यावी अशी प्रार्थना सुद्धा या प्रसंगी रामरायाच्या चरणी करण्यात आली, असे मोहन जोशी म्हणाले.
कॉंग्रेसचे नेते, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा शिलान्यास झालेला आहे, पण त्याचा कधीही राजकीय वापर करण्यात आला नाही याचेही स्मरण मोहन जोशी यांनी करून दिले.
रहाळकर राम मंदिराच्या विश्वस्तांच्या वतीने मोहन जोशी, आ.रविंद्र धंगेकर, रोहित टिळक यांचा सत्कार करण्यात आला. महाआरतीचे नियोजन सुरेश कांबळे आणि गोरख पळसकर यांनी केले.
Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti |सदाशिव पेठेतील रहाळकर राममंदिरात पुणे काँग्रेस कार्यकर्ते करणार महाआरती
| माजी आमदार मोहन जोशी
Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti |पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त (Shri Ram Lalla Pran Pratistha) २२ जानेवारीला दुपारी १२ वाजता सदाशिव पेठेतील रहाळकर श्रीराम मंदिरात (Rahalkar Ram Mandir Sadashiv Peth Pune) कॉंग्रेस कार्यकर्ते महाआरती करणार आहेत, अशी माहिती माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti)
या महाआरती सोहळ्यात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळील (Nagnath Paar Sadashiv Peth) रहाळकर श्रीराम मंदिर (Rahalkar Shriram Mandir) सुमारे २०० वर्ष जुने असून तिथे पट्टाभिशक्त श्रीरामाची मूर्ती आहे. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या श्रीराम मंदिरात महाआरती आयोजित केल्याचे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
श्रीरामाविषयी सर्व भारतीयांच्या मनात श्रद्धा आहे. श्रीराम हे दैवत प्रत्येक भारतीयाचे आहे, कोणा विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाचे नाही व कोणा पक्षाचे अथवा संघटनेचेही नाही, या दैवताला पक्षीय, राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणी केला, तरी ते भारतीयांना मान्य होणार नाही.
प्रभू रामचंद्रांविषयी सर्वांच्या मनात आस्था आहे. आपल्या सहज बोलण्यातही श्रीरामाचे नाव घेतले जाते हे त्याचेच ऊदाहरण आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना याच श्रद्धायुक्त भावनेने आम्ही प्रभू श्रीरामाची महाआरती करीत आहोत. श्रीरामाचा पक्षीय, राजकीय वापर करणार्यांना रामरायानेच सदबुद्धी द्यावी अशी आमची प्रार्थना असेल. कॉंग्रेसचे नेते, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा शिलान्यास झालेला आहे, पण त्याचा कधीही राजकीय वापर करण्यात आला नाही याचेही स्मरण यानिमित्ताने होईल असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
Pune congress | Pune Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका गटाची प्रदेश पदाधिकाऱ्या सोबत गुप्त बैठक!
| पुणे काँग्रेसला लागलेले गटबाजीचे ग्रहण सुटेना
लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) कांग्रेस ने जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Constituency) इच्छुक उमेदवारांचे अर्ज काँग्रेस कडून (Pune City Congress) मागवण्यात आले होते. त्यासाठी 9 जानेवारी ची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत शहर कार्यालयाकडे बऱ्याच इच्छुक लोकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. यामध्ये जवळपास 20 उमेदवारानी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा दर्शवली आहे. यामध्ये बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, आबा बागुल, आमदार रविंद्र धंगेकर, माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, यांच्यासह 20 लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात आरजे संग्राम खोपडे यांचा देखील समावेश आहे. (Pune Lok Sabha Constituency | Pune Congress)
Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी!
| अर्ज करण्यासाठी आज होता शेवटचा दिवस
Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) कांग्रेस ने जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Constituency) इच्छुक उमेदवारांचे अर्ज काँग्रेस कडून (Pune City Congress) मागवण्यात आले होते. त्यासाठी 9 जानेवारी ची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत शहर कार्यालयाकडे बऱ्याच इच्छुक लोकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. यामध्ये जवळपास 20 उमेदवारानी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा दर्शवली आहे. यामध्ये बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, आबा बागुल, माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, यांच्यासह 20 लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात आरजे संग्राम खोपडे यांचा देखील समावेश आहे. (Pune Lok Sabha Constituency | Pune Congress)
| अविनाश बागवे यांचा अर्ज डायरेक्ट प्रदेश अध्यक्षांकडे?
| हे आहेत इच्छुक
2. बाळासाहेब शिवरकर ( माजी मंत्री)
3. रविंद्र धंगेकर (आमदार)
4. मोहन जोशी
5. अभय छाजेड (सरचिटणीस, म.प्र.काँ.क.)
6. अनंत गाडगीळ (माजी आमदार )
7. दिप्ती चवधरी ( माजी आमदार )
8. संजय बालगुडे
9. आबा बागुल ( माजी उपमहापौर )
10. दत्ता बहिरट
11. गोपाळ तिवारी ( प्रवक्ते, म.प्र.काँ.क.)
12. विरेंद्र किराड
13. यशराज पारखी ( प्रदेश प्रतिनिधी)
14. मुकेश धिवार
15. राजू नागेंद्र कांबळे
16. मनोज पवार
18 नरेंद्र व्यवहारे
19. संग्राम खोपडे (आर. जे.)
20. दिग्विजय जेधे
Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत करा | काँग्रेस आक्रमक
Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे : आठ वर्षाहून अधिक काळ लांबलेला पुणे मेट्रोचा (Pune Metro) पहिला टप्पा पूर्ण करून त्यावर लवकरात लवकर वाहतूक चालू करा. पुणेकरांच्या संयमाचा अंत होऊ देऊ नका, असा इशारा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी मेट्रो प्रशासन आणि भाजप सरकारला आज सोमवारी दिला. (Pune Airport | Pune Metro | Pune Congress)
पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करा, स्वारगेट ते कात्रज मार्ग (Swarhet katraj Underground Metro) काम लवकर सुरू करा, लोहगांव विमानतळापर्यंत (Pune Lohgaon Airport) मेट्रो सेवा द्या, अशा मेट्रो संबंधीच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रो संचालक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या कामाचे भूमीपूजन सुमारे आठ वर्षापूर्वी केले. त्यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. मेट्रो लवकरच धावू लागेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले. आठ वर्ष उलटली तरी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. भाजप नेत्यांच्या सुप्त संघर्षात मेटुोचे काम लांबत गेले, त्यामुळे लाखो रूपयांनी खर्च वाढत गेला.ज्या पुणेकरांनी भाजपला महापालिकेत सत्ता दिली, आमदार, खासदार निवडून दिले, पण पुणेकरांना मेट्रो सेवेचा पुरेपूर लाभ भाजप देवू शकले नाही. याकडे भाजपचे त्यांच्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले, असे मोहन जोशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.
या आंदोलनात दत्ता बहिरट, सुनिल मलके, मंजुर शेख,शेखर कपोते, प्रवीण करपे, शाबिर खान, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, विनोद रणपिसे, रोहन सुरवसे पाटील, किशोर मारणे, सुरेश कांबळे, रामविलास माहेश्वरी, बाबा नायडू, महेंद्र चव्हाण, राजाभाऊ कदम, साहील राऊत, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबा सय्यद, अनिकेत सोनावणे आदी कार्यकर्ते सामील झाले होते.