PMC Pune Road Department | रस्ते दुरुस्तीची 42 कोटींची कामे केली जाणार 

Categories
PMC पुणे

PMC Pune Road Department | रस्ते दुरुस्तीची 42 कोटींची कामे केली जाणार

| महापालिका पथ विभागाची माहिती

PMC Pune Road Department | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) पावसाळ्यापूर्वी (Before Monsoon) रस्ते दुरुस्तीची (Road maintenance) कामे केली जातात. त्यानुसार यावर्षी देखील कामे केली जाणार आहेत. त्याची तयारी महापालिका पथ विभागाकडून (PMC Road Department) सुरु करण्यात आली आहे. पूर्ण शहरात जवळपास 42 कोटींची कामे केली जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली. (PMC Pune Road Department)
पावसाळ्यात रस्ते खराब होण्याचे प्रमाण वाढताना दिसते आहे. पावसाळ्यात रस्ते खराब होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून महापालिका प्रशासनाच्या वतीने मान्सून पूर्व कामे केली जातात. यामध्ये रस्त्याची दुरुस्ती केली जाते. यावर्षी ही कामे करण्याची तयारी पथ विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. लवकरच याबाबत निविदा प्रक्रिया राबवून कामे करण्यास सुरुवात केली जाणार आहे. (PMC Pune News)
पथ विभागाच्या माहितीनुसार यासाठी जवळपास 56 टेंडर काढले जाणार आहेत. यामध्ये दुरुस्तीच्या कामाचे 38 टेंडर, हॉट मिक्स प्लांट साथीचे 2 टेंडर आणि Road Maintenance Vehicles (RMV) चे 16 टेंडर काढले जाणार आहेत. त्यासाठी जवळपास 42 कोटींचा खर्च येणार आहे. लवकरच याबाबतचे प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात येतील. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Road Maintenance)
News Title | PMC Pune Road Department | 42 crores worth of road repairs will be done| Municipal Road Department Information

Baner-Balewadi Water issue | अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश 

Categories
Breaking News PMC Political पुणे

अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश

पुणे | बाणेर-बालेवाडी (Baner-Balewadi) भागात पाण्याची समस्या (Water issue) मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या भागात  २४x७ समान पाणी पुरवठा योजनेची कामे प्रलंबित आहेत. यावरून महापालिकेच्या कारभाराची तक्रार माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Ex corporator Amol Balwadkar) यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian minister Chandrakat patil) यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत पालमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. (PMC pune)
अमोल बालवडकर यांच्या पत्रानुसार  बाणेर-बालेवाडी- -पाषाण भागामध्ये २
७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील ८ पैकी ६ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्या देखील सुरु करण्यात येतील. परंतु या टाक्यांना ट्रान्समिशन लाईन मधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या लाईनचे काम आपण केलेल्या सूचनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे. वारजे ते बाणेर-बालेवाडी पर्यंतच्या भागामध्ये या ट्रान्स्मिशन लाईनचे काम अनेक ठिका अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. तसेच या टाक्यांच्या अंतिम टप्प्यामधील काही कामे देखील प्रलंबित आहेत. या कामांबाबत आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई केल्यास लवकरच या २४ x ७ समान पाणी पुरव योजनेची सुरुवात बाणेर-बालेवाडी भागामध्ये होईल. असे बालवडकर यांनी पालकमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटले होते.
 बालेवाडी व बाणेर येथील टाक्यांना पाणी पुरवठा करण्याकरिता जोडण्यात येणाऱ्या पाईप लाईनच्या कामामध्ये काही जागा मालकांच्या परवानग्या प्रलंबित आहेत. परवानग्या मिळविण्याकरिता पुणे म.न.पा.च्या अधिकार्यांना कृपया आपण योग्य त्या सूचना करून तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे. या सर्व प्रलंबित कामांमुळे २४ x ७ समान पाणी पुरवठा योजना या प्रकल्पास विलंब होत आहे. बाणेर-बालेवाडीचा गंभीर पाणी प्रश्न आपल्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. तरी पुढील काळात अशी पाणी टंचाई भासू नये या करिता हा प्रकल्प या भागामध्ये लवकरात लवकर सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. जर हि सर्व कामे लवकर पूर्ण झाली तर येत्या उन्हाळ्याच्या सुरवातीला एप्रिल – मे पर्यंत या प्रकल्पाचे उद्घाटन करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल.
तरी सदर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याकरिता आपण संबंधित खात्यांच्या अधिकार्यांना तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे. पालकमंत्र्यांनी बालवडकर यांच्या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्तांना आदेश देत प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सांगितले आहे.
| ही आहेत प्रलंबित कामे 
१. डुक्कर खिंड वारजे – NHAI च्या उर्वरित परवानगी करिता २५० मी. चे काम प्रलंबित आहे.
२. वारजे येथे दिलीप बराजे यांच्या परवानगी अभावी ३६ मी.ची लाईन प्रलंबित.
३. चांदणी चौक – श्री.अजमेर यांच्या जागेमधून जाणार्या ६० मी च्या लींचे काम प्रलंबित.
४. HEMRL येथील रामनदी वरील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे पुढे ट्रान्स्मिशन लाईन चे काम अपूर्ण.
५. पाषाण तलाव नजीकच्या शिव मंदिर येथील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे ४० मी लाईनचे काम प्रलंबित.
६. सुस खिंड ते कुमार पेपीलोन सोसायटी पर्यंतचे सुमारे ८०० मी चे काम पाईप उपलब्ध नसल्याने प्रलंबित
७. सुतारवाडी गावठाण येथे सुमारे १५० मी चे काम अरुंद रस्त्यामुळे प्रलंबित.
८. सुस खिंड पूल ते किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) पर्यंत एकूण १२७५ मी. लांबी पैकी ८७४ मी. लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.
९. किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) ते बालेवाडी डेपो पर्यंतच्या एकूण २१५० मी. पैकी १२३० मी लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.

Tata Group Vs Shrinivas Kandul | टाटा ग्रुप कडून श्रीनिवास कंदूल यांना केले जातेय ‘टार्गेट’ | महापालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

Categories
Breaking News PMC पुणे

टाटा ग्रुप कडून श्रीनिवास कंदूल यांना केले जातेय ‘टार्गेट’

| कंदूल यांच्या विरोधात मनपा आयुक्तांकडे तक्रार

| महापालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे | पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामावर महापालिका असमानाधी आहे. त्यामुळे जवळपास १५ कोटी महापालिका कंपनी कडून वसूल करणार आहे. तर दुसरीकडे कंपनीने बिल वेळेवर मिळत नसल्याबाबत पुणे महापालिकेची राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. राज्य सरकारने देखील यावर महापालिकेचा अभिप्राय मागवला आहे. दरम्यान कंपनीने आता वेगळीच भूमिका घेत विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांची तक्रार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. कंपनीच्या या आक्रमक भूमिकेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून महापालिका आयुक्त आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनी कडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकाशात आले आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापारीक्षकानी जोरदार आक्षेप काढले आहेत. तसेच कंपनी कडून त्याबदल्यात १५ कोटी वसूल करण्याचे आदेश देखील मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले होते. त्यानंतर विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला.
महापालिकेच्या विद्युत विभाग मार्फत २०१० सालापासून शहरात एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. रस्त्यावरील प्रकाशासाठी एलईडी पथदिवे उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले होते कारण यामुळे उर्जा बचत होत होती. त्यानुसार इस्को तत्वावर टेंडर काढण्यात आले होते. यामध्ये पथदिवे सहित प्रत्येक फिडर स्काडा सिस्टीम च्या अंतर्गत बसवण्याचा कामाचा समावेश होता. त्यानुसार हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले. कंपनीला कामानुसार रनिंग बिले देखील देण्यात येऊ लागली. आतापर्यंत ११८ कोटींची बिले देखील देण्यात आली. मात्र कंपनी प्रत्यक्ष जागेवर बसवलेल्या फिटिंग नुसार बिले न देता वाढीव बिले देत असल्याचे समोर आले आहे. ही बाब मुख्य लेखापरीक्षक यांनी निदर्शनास आणून दिली.
लेखापरीक्षक यांनी दुसरा आक्षेप काढला आहे. त्यानुसार कंपनी कडून स्काडा सिस्टीम चालू केली नसतानाही काही बिले विद्युत विभागाकडून अदा करण्यात आली आहेत. टेंडर मधील अटीनुसार बिल अदा करण्यासाठी स्काडा consumption रिपोर्ट आवश्यक आहे. मात्र हा रिपोर्ट नसताना देखील बिल अदा केले गेले. त्यामुळे अदा केले गेलेल्या बिलापैकी ५ कोटी ४४ लाख कंपनी कडून वसूल करावेत. असे एकूण १५ कोटी उज्वल कंपनी कडून वसूल करण्याचे आदेश मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले आहेत.
त्यानुसार विद्युत विभागाने कंपनीवर कारवाई करण्याची तयारी चालवली आहे. कंपनी कडून १५ कोटी वसूल करण्या बाबत देखील पत्र देण्यात आले आहे. शिवाय काम चोख करण्याबाबत बजावले आहे. यावर कंपनी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. कारण कंपनीने याबाबत महापालिकेची राज्य सरकार कडे तक्रार केली आहे. महापालिका वेळेवर बिले देत नसल्याने आमचे नुकसान होत आहे. असे कंपनीचे म्हणणे आहे. राज्य सरकारने देखील यावर महापालिकेचा अभिप्राय मागवला आहे. यावर आता महापालिका राज्य सरकारला आपला सविस्तर अहवाल पाठवणार आहे.
दरम्यान कंपनीचे हे सर्व काम उघड करणारे आणि कंपनीच्या कामाबाबत वारंवार आक्षेप घेणारे आणि महापालिकेचे हित पाहणारे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांना कंपनीकडून  टार्गेट केले जात आहे. कंपनीने कंदूल यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केलीआहे. कंदूल यांनी आमचे आर्थिक नुकसान केले आहे. शिवाय बिले वेळेवर न देणे, नसलेल्या चुका काढणे, असे आरोप कंपनीकडून कंदूल यांच्या विरोधात करण्यात आले आहेत. त्यामुळे कंदूल यांना या पदावरून हटवून तिथे दुसरा अधिकारी द्यावा, अशी मागणी कंपनीने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. दरम्यान यावर महापालिका आयुक्त यावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. कंपनीच्या चुका काढणाऱ्या आणि महापालिकेचे हित पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा बळी जाऊ नये, एवढी अपेक्षा महापालिका वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.