Rahul Gandhi | Supreme Court |सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला आणखी एक चपराक | प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

Rahul Gandhi | Supreme Court |सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला आणखी एक चपराक | प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी

 

Rahul Gandhi | Supreme Court |काँग्रेसचे नेते राहूल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना गुजरात न्यायालयाने (Gujrat High Court) दिलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली . मणीपूर हिंसाचाराकडे (Manipur Violence) दुर्लक्ष करत असल्याबद्दल केंद्र सरकारला (Central Government) सुनावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  आणखी एक चपराक केंद्र सरकारला, पर्यायाने भारतीय जनता पक्षाला (BJP) लगावली आहे. विरोधी पक्ष संपवण्याच भाजपचा कुटील डाव या स्थगितीने धुळीस मिळाला असल्याची प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Maharashtra Congress Vice President Mohan joshi) यांनी व्यक्त केली. (Rahul Gandhi | Supreme Court)

भारत जोडो यात्रेतून (Bharat Jodo Yatra) संपूर्ण देशात विविधतेत एकता असे वातावरण निर्माण केलेले राहूल गांधी यांची भाजपला भीती वाटत होती. त्यामुळेच दुसर्या राज्यात राहूल जी यांनी केलेल्या एका भाषणाचे खोटे निमित्त करून गुजरातमध्ये खटला दाखल करण्याचे कारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रुहमंत्री अमीत शाह यांनी रचले. मात्र देशातील सर्वोच्च न्यायालयाने हे कारस्थान हाणून पाडले आहे असे जोशी म्हणाले.
आता ८,९ व १० ऑगस्ट या दिवशी संसदेत होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या चर्चेसाठी देखील राहूल जी गांधी सहभागी होऊ शकतील ही देशातील जनतेच्या दृस्ठीने ही उत्साहाची बाब आहे असे जोशी यांंनी सांगितले. (Rahul Gandhi News)


News Title |Rahul Gandhi | Supreme Court | Another slap of the Supreme Court to the central government | State Congress Vice President Mohan Joshi

Rahul Gandhi | INC Pune | राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Rahul Gandhi | INC Pune | राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

 

  Rahul Gandhi | INC Pune |  काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या वक्तव्‍याबाबत गुजरातच्या एका भाजप नेत्याने  गुजरात न्यायालयात बदनामीचा खोटा आरोप करत खटला दाखला केला होता. या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालाला  राहुल गांधी यांनी गुजरात जिल्हा सत्र न्यायालयात (Gujrat Session Court) आव्‍हान दिले होते.  जिल्हा व सत्र न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवल्याने या विरूध्द  गुजरात उच्च न्यायालयात आव्‍हान दिले होते. या प्रकरणी  गुजरात उच्च न्यायालयाने (Gujrat High Court) निकाल दिला असून गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. अशा या खोट्या मानहानी खटल्यात राहुलजी गांधी यांना अडकवल्याच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (INC Pune) वतीने आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. (Rahul Gandhi | INC Pune)

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे (INC Pune President Arvind Shinde) म्हणाले की, ‘‘भाजपा विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल देशातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून पहात आहे. मा. राहुलजी गांधी यांनी मोदी आणि अदानीच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून ही जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. मा. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु मा. राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही परंतु राजकीय द्वेषातून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदी सरकारने विरोधी पक्ष संपविण्याचे षडयंत्र चालू केले आहे. लोकतंत्राची हत्या व पायमल्ली करण्याचे काम भाजप सरकार सध्या करीत आहे.’’

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रा. विकास देशपांडे यांनी ही निषेधाचे भाषण केले.

यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, बाळासाहेब दाभेकर, हाजी उस्मान तांबोळी, नीता रजपूत, लता राजुगरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, रजनी त्रिभुवन, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, ब्लॉक अध्यक्ष प्रदिप परदेशी, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, सुनिल घाडगे, सचिन आडेकर, अशोक जैन, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, NSUI अध्यक्ष अभिजीत गोरे, महिला अध्यक्षा पुजा आनंद, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, वाल्मिक जगताप, भरत सुराणा, गुलाम खान, विनय ढेरे, अक्षय जैन, आशुतोष शिंदे, वाहिद निलगर, अविनाश अडसूळ, राज घलोत, रेखा घलोत, वैष्णवी किराड, परवेज तांबोळी, राजेंद्र पेशने, सुंदरा ओव्‍हाळ, ज्योती परदेशी, सीमा सावंत, घनश्याम निम्हण, श्रीकृष्ण बराटे, दिपक ओव्हाळ, राहुल तायडे, विनोद चौरे, सचिन भोसले, सईदभाई सय्यद, बाबा सय्यद, मुन्ना खंडेलवाल, लतेंद्र भिंगारे, पपिता ओव्‍हाळ, शारदा वीर, वैशाली रेड्डी, ॲड. राहुल ढाले, ॲड. फैय्याज शेख, ॲड. राजेंद्र काळेबेरे,  आदींसह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार रवि आरडे यांनी मानले.

News Title |Rahul Gandhi | INC Pune | Agitation on behalf of Pune City District Congress Committee in support of Rahul Gandhi

Rahul Gandhi | मी गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत – राहुल गांधी.

Categories
Breaking News Political देश/विदेश

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही.

या देशाने मला सगळं दिलं. प्रेम, आदर दिला. म्हणून मी देशासाठी लढणार.

मोदी आणि अदानी यांचे नाते सगळेजण सांगतात.

मोदी माझ्या पुढील भाषणाला भीत होते. कारण मी अदानी बद्दल बोलणार होतो. म्हणून माझी खासदारकी रद्द केली.

मी जे पण प्रश्न उपस्थित करतो, ते खूप विचार करून करतो.

यांनी काहीही करू द्या. मी काम करणे थांबवणार नाही.

अदानी च्या कंपनीत 20 हजार कोटी कुठून आले?

जनतेच्या मनात आता प्रश्न उपस्थित होत आहे कि भ्रष्ट अदानीला का वाचवले जात आहे?

मी लढत राहणार. लोकशाही तंत्र मजबूत करण्यासाठी लढणार.

अदानी मुद्द्यांवरील लक्ष हटवण्यासाठी देशद्रोह, खासदारकी रद्द करणे, ओबीसी असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत.

मी गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत.

Mohan Joshi | ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु

| ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

शिशुपालाचे शंभर अपराध झाले तसे आता केंन्द्रातील भाजपच्या मोदी सरकारचे झाले असून कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्या क्षणापासून कॉंग्रेसने आता रणशिंग फुंकले आहे व अंतिम लढ्याला सुरुवात केली आहे आणि पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.

ते म्हणाले, देशातील महाभयंकर महागाई, बेकारी, कोलमडलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार याविरुद्ध संसदेत मोदी सरकारला धारेवर धरणारे कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला लागलेली अखेरची घरघर आहे. किंबहुना त्यांच्या या षडयंत्राला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच म्हणावे लागेल.

राहुल गांधींच्या रूपाने देशातील जनतेला आश्वासक पर्याय निर्माण झाल्याचे चित्र देशात वाढत राहिल्यामुळेच त्यांचा आवाज बंद करण्यासाठी कटकारस्थानात मास्टरकी असणाऱ्या भाजपने राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी केलेला हा लोकशाही विरोधी प्रयत्न आहे. असे सांगून मोहन जोशी म्हणाले, मात्र देशातील जनता या लोकशाही विरोधी मोदी सरकारला सत्तेवरून दूर करण्यासाठी आता आसुसलेली असून पुण्यातील कसबा विधानसभा असो अथवा भाजपच्या ताब्यातील हिमाचल प्रदेश असो, जनतेने भाजपला धूळ चारली आहे व कॉंग्रेसला विजयी केले आहे. त्यामुळेच स्वतःला महानायक समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला धडकी भरली आहे.

गेली ९ वर्षे मनमानी पद्धतीने जनताविरोधी निर्णय घेत मित्र असणाऱ्या मुठभर उद्योगपतींचे खिसे भरण्याचे पाप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले असून, सारा देश अडानीच्या घशात घालण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या महापापाला राहुल गांधी यांनी जोरकस विरोध केला. हे स्पष्ट करून मोहन जोशी म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रेतून साऱ्या देशाला राहुल गांधींनी आपलंसं केलं. त्यांच्यामुळे आपले पंतप्रधानपद व सत्ता जाणार हे ओळखल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साऱ्या भाजपने संसदेत गोंधळ घालून राहुल गांधींना आठ दिवस बोलू दिले नाही आणि पूर्वी रचलेल्या षड्यंत्राप्रमाणे सुरतमधील सत्रन्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून निर्णय घेऊन त्याआधारे राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे या त्यांच्या महापापामुळे देशातील जनतेत संतापाची लाट आली असून राहुल गांधींची प्रतिमा आता अधिक उंचावली आहे, असे मोहन जोशी म्हणाले.

 

Breaking : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Categories
Breaking News Political देश/विदेश

काँग्रेस  नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द. दोन वर्षांची शिक्षा झाल्याने कारवाई. काँग्रेस पक्षाला मोठा झटका.

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा

भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) १०० दिवस पुर्ण झाले त्या निमित्ताने भारत जोडो यात्रा समिती, पुणे तर्फे पुण्यात सकाळी ८ ते १० या वेळेत प्रतिकात्मक पदयात्रा (symbolic walk) काढण्यात आली. भारताला जोडणाऱ्या महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले (Gopal Krishna Gokhale) यांच्या पुतळ्याला हार घालून पदयात्रेची सुरूवात करण्यात आली. या पदयात्रेचे प्रास्ताविक करताना ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘भारत जोडो यात्रा देश जोडणारी यात्रा असून ही यात्रा काश्मीर मध्ये पोहोचल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलेले असेल. राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रेचा जो देश हिताचा उद्देश आहे, त्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढीत आहोत.’’

      यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व कायदेतज्ञ ॲड. असिम सरोदे म्हणाले की, ‘‘देशातील विभाजनकारी शक्तींना प्रेम, सत्य, अहिंसेच्या मार्गाने हरविले जाऊ शकते हा या यात्रेचा संदेश आहे. भारत जोडोमुळे अनेक लोक एकत्र आली. काँग्रेस पक्षाला लोक जोडली जातील का? याचा विचार न करता राहुल गांधी आज चालत आहेत यामुळे लोक त्यांच्याकडे आर्कषली जात आहेत. भारत जोडो यात्रेमुळे देशाची लोकशाही मजबूत होईल अशी खात्री राहुलजी गांधी यांना आहे.’’

      यानंतर सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘‘गेल्या आठ वर्षात समाजात, जातीजातीत, धर्माधर्मात व्देष, तेढ निर्माण करून देशातील वातावरण दूषित करण्यात आले  आहे. हे प्रयास आजही सुरू आहे. अशा वातावरणात देशाला धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रात पुन्हा एकत्र बांधण्याचे काम महात्मा गांधींचे आचार विचार करू शकत होते. गेले शंभर दिवस कन्याकुमारी पासून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ते ठळकपणे अधोरेखीत केले आहे. त्यामुळे या यात्रेमुळे म. गांधींनी दाखवलेल्या धर्मनिरपेक्षतेचा मार्ग काँग्रेसला पुन्हा एकदा गवसला आहे.’’

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी म्हणाले की, ‘‘सत्तारूढ हे धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, महिलांचा सन्मान न करणे, महापुरूषांचा वारंवार अपमान करणे, संविधानाचा न पाळण्याचे काम आत्ताचे सत्ताधारी करीत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे ईडीचे मुख्य कार्यकारी असल्यासारखे वागत आहे. या सत्ताधारी पक्षाने लाजलज्जा सोडली आहे म्हणून आम्ही भारत जोडो म्हणत आहोत’’

      महागाई, बेरोजगारीच्या विरोधात निघालेल्या या यात्रेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे असे लोकायतच्या अलका जोशी म्हणाल्या.

      तिरंगा झेंड्याखाली निघालेल्या या पदयात्रेचा समारोप पोलिस ग्राउंड येथे करण्यात आला. संपूर्ण पदयात्रे दरम्यान ‘महागाईशी नाते तोडा, भारत जोडा‘ या व इतर घोषणांनी, रंग दे बसंती‘ , ‘हम होंगे कामयाब‘ या गाण्यांनी फर्ग्युसन कॉलेज रोडवर जोशपूर्ण वातावरण तयार झाले होते.

      समारोप करताना पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी युक्रांदचे संदीप बर्वे, काँग्रसचे दत्ता बहिरट यांनी मनोगत व्यक्त केले.

या पदयात्रेत गोपाळ कृष्ण गोखले यांची नात शर्मिष्ठा खेरे, युवराज शाह, निरज जैन, संगिता तिवारी, रजनी त्रिभुवन, रफिक शेख, जाबुंवत मनोहर, ॲड. अनिल कांकरीया, गोपाळ तिवारी, रविंद्र म्हसकर, संदीप मोकाटे, विनय ढेरे, विजय खळदकर, अजित जाधव, अविनाश गोतारणे, रमेश सोनकांबळे, रविंद्र आरडे, हेमंत राजभोज, जयकुमार ठोंबरे, विनोद रणपिसे, गुलाम खान, चैतन्य पुरदंरे, भगवान कडू, अशोक गेलोत, शिलार रतनगिरी, सुनिल शिंदे, आबा जगताप, सोमेश्वर बालगुडे, प्रसन्न मोरे, राजेंद्र भूतडा, विश्वास दिघे, सुंदरा ओव्हाळ, शर्वरी गोतारणे, रजिया बल्लारी इ. तसेच लोकायत व युक्रांतचे कार्यकर्ते सहभागी होते.

Dr. Ganesh Devi | ‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

– अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत ‘भारत जोडो’ महाराष्ट्रातील यात्रेच्या छायाचित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन

पुणे : “राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी १०२ वर्षांपूर्वी देशभर झपाटून प्रवास केला. हजारो अनुयायांना स्वातंत्र्यसंग्रामात आणले. आज राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेतून (Bharat Jodo Yatra) तितक्याच झपाट्याने प्रवास करताहेत. देशातील द्वेष संपवून समाजाला जोडण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रेमुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल. तसेच सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक उद्देशाने निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतुन काँग्रेसही उभारी घेईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी (Dr Ganesh Devi) यांनी केले.

श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’ पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (दि. ९) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Fomer MLA Mohan Joshi) होते. यावेळी सौ. देवी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावर, माजी मंत्री रमेश बागवे, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, राजस्थान काँग्रेसचे नेते जुगल प्रजापती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे आदी उपस्थित होते.

डॉ. गणेश देवी म्हणाले, “महात्मा गांधींचा जो झंजावात होता, तोच झंझावात राहुल गांधींच्या यात्रेत दिसत आहे. आपल्या हातून झालेल्या चुकांचा पश्चाताप करण्याची ही वेळ आहे. मात्र, या कठोर तपश्चर्येतून समाजातील तणाव, दुरावा दूर करून समाज व देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. भाजपच्या धोरणामुळे समाज विभागाला जात आहे. हे थांबवण्यासाठी द्वेषमुक्तीचा हा लढा अधिक विस्तृत व्हायला हवा. त्यासाठी भारत जोडो यात्रेत प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे. आजचा अंधार दूर करून उद्याची पहाट उजाडणार, हा आशावाद या यात्रेने दिला आहे.”

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “देशाच्या इतिहासात ‘भारत जोडो’ यात्रा एक महत्त्वाची घटना आहे. दोन आठवडे ही यात्रा महाराष्ट्रातून गेली. या देदीप्यमान यात्रेत अनेकांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे या छायाचित्र प्रदर्शनातून ही यात्रा पुणेकरांना अनुभवता येईल. निवडक २०० छायाचित्रातून ही चित्ररूपीयात्रा साकारली आहे.”

जयंत आसगावकर म्हणाले, “मोहन जोशी यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या या सप्ताहाचे सातत्य खूप महत्वाचे आहे. राहुल गांधी झपाट्याने काम करताहेत. द्वेषभावना संपवण्याचे ध्येय घेऊन चालत आहेत. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक लोकांनी यात सहभागी होऊन एकजूट दाखवावी. यातून तरुण कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे.”

गजानन आमदाबादकर म्हणाले, “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भविष्याची नांदी आहे. शेतकरी या देशाचे चित्र बदलू शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करताहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेताहेत. त्यामुळे शेतकरी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. आपल्या मुलांच्या मनात द्वेष पसरवण्याचे काम होतेय, हे थांबले पाहिजे.”

अजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.

Service Duty Dedication Week | द्वेषाने विखुरलेल्या भारताला जोडण्याचे काम राहुल गांधी ‘भारत जोडो’ पदयात्रेतून करताहेत | जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

द्वेषाने विखुरलेल्या भारताला जोडण्याचे काम राहुल गांधी ‘भारत जोडो’ पदयात्रेतून करताहेत

| जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन

|गांधी परिवार, काँग्रेसला त्यागाची मोठी परंपरा

|भारतीय संविधान, काँग्रेस विचारांमुळे देश एकसंध

 

पुणे : “गांधी परिवार, (Gandhi Family) काँग्रेसला (Congress) त्यागाची मोठी परंपरा आहे. काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची, आपलेपणाची आहे. देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय संविधान आणि काँग्रेसची हीच विचारधारा आवश्यक आहे. आज द्वेषाने विखुरलेल्या देशाला जोडण्याचे काम राहुल गांधी (Rahul Gandhi)  भारत जोडो पदयात्रेतून (Bharat Jodo yatra)  करत आहेत,” असे प्रतिपादन माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केले. (Indian National congress, INC, INC Pune)

सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हासदादा पवार, सप्ताहाचे संयोजक, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, दत्ता बहिरट आदी उपस्थित होते. (Former MLA Mohan Joshi)

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर आपण बोलले पाहिजे. हृदयाची आणि प्रेमाची भाषा, संवाद गरजेचा आहे. आज राहुल गांधी तेच करत आहेत. स्वत्व विसरून काम करणाऱ्या राहुल गांधींचा त्याग आपण लक्षात घ्यायला हवा. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी जो त्याग केला, त्याच वाटेवर राहुल गांधी चालत आहेत. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम ते करत असल्याने त्यांच्याविषयी जनतेमध्ये प्रेम, आस्था आहे. आपल्या पित्याच्या खुन्यांना क्षमा करण्याची त्यागभावना केवळ राहुल गांधींकडे आहे.”

“हा देश महात्मा गांधींचा आहे आणि त्या देशाची सद्भावनेची संस्कृती आहे. मात्र, गांधींना मारणाऱ्या त्याच नथुरामचे इथे होणारे उदात्तीकरण दुर्दैवी आहे. इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. चित्रपटांच्या माध्यमातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर होणार हल्ला आपण सहन करता कामा नये. शिवाजी महाराजांना देवत्व देऊ नये, त्यांचा कार्याचा आदर्श ठेवून काम करायला हवे. गांधी-आंबेडकर यांच्यातील संबंध खूप चांगले होते. त्यांच्यात मतभेद जरूर होते. मात्र, देशहितासाठी त्यांनी कायम एकत्रित काम केले. खरा इतिहास आपण नव्या पिढीला सांगितला पाहिजे. गांधी-नेहरू-आंबेडकर या तिघांनी दूरदृष्टीने देशाची रचना केली. अनेक संस्था निर्माण केल्या. इंदिरा गांधींनी देशाला सक्षम केले. काँग्रेसच्या विचारधारेतून हे सगळे झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने काय केले? हा प्रश्न विचारणाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहावा,” असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी मांडले.

उल्हासदादा पवार म्हणाले, “सेवा, कर्तव्य आणि त्यागाची गांधी घराण्याची परंपरा आहे. ‘भारत जोडो’ मधून खऱ्या अर्थाने ‘मन की बात’ होत आहे. सत्याची जाण नसलेल्या, खोटेपणाचा बुरखा पांघरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनतेने डोळे तपासणी करण्याची गरज आहे. एका वेगळ्या परीपेक्ष्यातून देश जात असताना आजच्या स्थितीत निर्भय लोकांची गरज आहे.”

स्वागत प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “समाजातील सर्व घटकांना जोडणारे विविध कार्यक्रम शहराच्या विविध भागात होत आहेत. अशा अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनियाजीना शुभेच्छा देण्याचा आमचा प्रयत्न करतो आहोत.”

अनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. वीरेंद्र किराड यांनी आभार मानले.
——————————-
सप्ताहाचे आव्हाडांकडून कौतुक
गेली १८ वर्षे मोहनदादा जोशी या सप्ताहाच्या माध्यमातून गांधी परिवाराच्या त्यागाची, सेवेची आणि कर्तव्यभावनेने केलेल्या कामाची परंपरा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. काँग्रेसच्या प्रेमाच्या, सद्भावनेच्या विचाराने समाजातील सर्व घटकांसाठी नाविन्यपूर्ण व उपयुक्त असे उपक्रम राबवत आहेत. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने दिलेल्या या कृतियुक्त शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी जोशी यांचे कौतुक केले.
——————————-
राज ठाकरे जातीद्वेष पसरवणारे
जाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचे काम राज ठाकरे यांच्याकडून वारंवार केले जात आहे. मग ते इतिहासाचे दाखले देऊन असो की, भोंग्याचा प्रश्न उपस्थित करून. शरद पवार यांनी कधीही जाती-धर्मात द्वेष पसरवण्याचे पाप केले नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालण्याची काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची विचारधारा आहे, असे कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन

|पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

काँग्रेस नेते  खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेसाठी पुणे शहरातील शक्तीस्थळांवरील मातीचे संकलन आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे भारत जोडो यात्रेचे समन्वयक ॲड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पुणे शहरातील ऐतिहासिक व भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी सबंधित शक्ती स्थळांवरील माती सकंलन आज करण्यात आले. पुणे शहर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर असून छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पुण्यातील लाल महालातून माती संकलन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस भवन हे देखील स्वातंत्र्य पूर्व काळातील एक अग्रगण्य स्थान असून १९४२ च्या चले जाव चळवळीमध्ये याच ठिकाणी देशातील पहिला हुतात्मा नारायण दाभाडे हे होते. आद्य क्रांतीकारक उमाजीराजे नाईक यांना इंग्रजांनी ज्या ठिकाणी फाशी दिली त्या मामलेदार कचेरी येथील त्यांच्या स्मारकातून माती संकलन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज सुधारणेबरोबरच स्वातंत्र्याचे महत्व ज्यांनी पटवून दिले व स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला अशा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळावरून (समताभूमी) येथून मातीचे संकलन केले. महात्मा गांधीजींचे गुरू ना. गोपाळकृष्ण गोखले यांच्या राहत्या घरातून म्हणजेच गोखले इन्स्टिट्यूट गोखले स्मारक येथून माती संकलनीत करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचे जहाल नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचे पुणे येथील राहते घर या ठिकाणाहून देखील माती संकलित करण्यात आली. आद्य क्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमंवाडी स्मारकाची माती संकलित करण्यात आली. छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी असलेले, तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिंहगडावून, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू ब्रु. येथून व भीमा कोरोगाव येथील विजय स्तंभ येथून व तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातून मातीचे संकलन केले गेले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी, सुजित यादव, सचिन आडेकर, सुनिल शिंदे, विजय खळदकर, अजित जाधव, रजनी त्रिभुवन, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, राकेश त्रिभुवन, ऋषीकेश बालगुडे, अमर गायकवाड, रवि आरडे, हरिदास अडसूळ, दत्ता जाधव, योगेश बोर्डे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Bike Rally | Pune Congress | भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन

 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये  खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी गृहराज्य मंत्री मा.आ. सतेज पाटील व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरूवात करण्यात आली संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली फिरून आगाखान पॅलेस येथे तीचा समारोप करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी गृहराज्य मंत्री मा.आ. सतेज पाटील म्हणाले की, ‘‘आमचे नेते राहुलजी गांधी हे कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत भारतात तयार झालेले विषमतेचे वातावरण धर्म व जातीमधील तेढ तसेच देशातील याच्या विरोधात भारत जोडण्यासाठी यात्रा करीत आहेत. या यात्रेला संपूर्ण भारतभर मोठा प्रतिसाद मिळत असून पुण्यात देखील आज या समर्थनार्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.’’

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, ‘‘गेल्या आठ वर्षांमध्ये या देशामध्ये माणासांमाणसांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काही जातीयवादी शक्ती करीत आहेत. काँग्रेस नेते राहुलजी गांधी या विरोधात भारत जोडो यात्रा काढीत आहेत या यात्रेमध्ये सर्वसामान्यांबरोबरच बुध्दीजीवी वर्ग सुध्दा जोडला जात असून देश एकसंघ ठेवण्यासाठी या यात्रेचा उपयोग होत आहे.’’

यावेळी भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री रमेश बागवे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, प्रशांत बधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपक मानकर, शुक्राचार्य वांजळे, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, नगरसेवक चंदूशेठ कदम, दत्ता बहिरट, बाळासाहेब दाभेकर, विजय खळदकर, संगीता तिवारी, पुजा आनंद, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, मनीष आनंद, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, नीता रजपूत, शिवाजी केदारी, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सुनिल घाडगे, अजित जाधव, विनोद रणपिसे, साहिल केदारी, सुनिल शिंदे, राहुल शिरसाट, विशाल मलके, प्रशांत सुरसे, रजनी त्रिभुवन, शानी नौशाद, लेखा नायर, अरुण वाघमारे, भुजंग लव्हे, सुनील मलके, बाबा नायडु, भरत सुराना, मीरा शिंदे, वैशाली रेड्डी, सुनिल पंडित, भगवान कडू, अनिल अहिर, ॲड. राहुल ढाले, सेल्वराज ॲथोनी, संदिप मोकाटे, राजू मगर, दत्ता जाधव, शिवराज भोकरे, अक्षय माने, आयुब पठाण, हेमंत राजभोज, योगेश भोकरे, सौरभ अमराळे, नितीन परतानी, रवि आरडे, राहुल तायडे, शिलार रतनगिरी, विठ्ठल गायकवाड, अजित ढोकळे, कुणाल काळे, स्वाती शिंदे, पपिता सोनावणे, सुबकडेताई, शारदा वीर, आनंद दुबे, विशाल गुंड, ज्योती परदेशी, सुरेश कांबळे आदींसह पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते.