Tag: Raj Thackeray
Raj Thackeray visited the India History Research Board (Bharat Itihas Sanshodhak Mandal) and gifted a brick of Babri Masjid
Bharat Itihas Sanshodhak Mandal | Raj Thackeray | भारत इतिहास संशोधक मंडळास राज ठाकरे यांनी भेट दिली बाबरी मशिदीची वीट
| राज ठाकरे यांच्याकडून पुण्येश्र्वर व नारायनेश्र्वर मंदिराच्या अवशेषांची विशेष पाहणी
Maharashtra Navnirman Vidyarthi Sena | MNVS | बी.एम.सी.सी येथे मनविसे शाखेचे भव्य दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
Maharashtra Navnirman Vidyarthi Sena | MNVS | बी.एम.सी.सी (BMCC) येथे मनविसे शाखेचे (NNVS Branch) भव्य उद्घाटन दिमाखदार सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी अग्रगण्य संघटना म्हणून नावारूपाला येऊन हजारो विद्यार्थी मनविसे मध्ये सामील झाले. राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली व अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या समर्थ नेतृत्वाखाली मनविसे सर्वत्र युनिट उद्घाटन झाले. अशी माहिती प्रशांत कनोजिया (प्रमुख संघटक महा. राज्य) यांनी दिली.
या प्रसंगी मनसेचे शहर अध्यक्ष मा.साईनाथ बाबर यांच्या शुभहस्ते शाखा उद्घाटन झाले.या वेळी रणजित शिरोळे ( महा. सरचिटणीस ), प्रशांत कनोजिया (प्रमुख संघटक महा. राज्य), आशिष साबळे ( महा.सचिव )
नरेंद्र तांबोळी ( जनहित अध्यक्ष ),सुहास निम्हण(उपाध्यक्ष पुणे), विनायक कोतकर, सुनील कदम, योगेश खडके, सुनील लोयरे, अॕड.सचिन पवार ( उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ), रुपेश घोलप, सारंग सराफ, अभिषेक थिटे ( राज्य कार्यकारिणी सदस्य ), अमोल शिंदे ( शहर अध्यक्ष मनविसे ) अमेय बलकवडे- महेश भोईबार (शहर संघटक) परिक्षित शिरोळे, धनंजय दळवी, सचिन ननावरे अभिजित येनपुरे, निलेश जोरी, शशांक अमराळे, आनंद बापट, मंदार ठोंबरे, प्रीतम घोगरे, पुष्कर पाडेकर, समीर नांद्रे, विनायक राऊत, यश निकम, संकेत अडसूळ, सिध्देश्वर शिंदे, यश कदम, श्रीपाद भाऊसार, सुयश डोंगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक केतन बाबासाहेब डोंगरे(विभाग अध्यक्ष छत्रपती शिवजी नगर), यांनी केले तर आभार प्रदर्शन संकेत जाधव यांनी केले.
1 हजार लोकांमागे १ राजदूत | पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे ची जोरदार तयारी
| 3500 राजदूत नेमले जाणार
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे सज्ज झाली आहे. पुण्यासाठी मनसेकडून रणनिती आखली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी राजदूत नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 3500 राजदूत नेमले जाणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक पार पडली आहे. पुण्यात मनसे 3500 राजदूत नेमणार आहे. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लवकरच राजदूतांची नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.
पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना राजदूत नेमण्याबाबत सूचना केल्या आहेत. मनसेच्या संघटनात्मक पातळीवरच्या विभागनिहाय नेमणुका करण्यात येणार आहेत. दरहजारी मतदारांच्या मागे एक राजदूत नेमण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष बाबर यांनी सांगितले.
—
राजदूताची नियुक्ती झाल्यानंतर त्याने संबंधित भागात पक्षाची ध्येय धोरणे यांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. शिवाय या अगोदर तिथे पक्षाच्या नगरसेवकाने केलेली कामे, लोकांपर्यंत पोचवायची आहेत.
साईनाथ बाबर, शहर अध्यक्ष, मनसे, पुणे.
राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित अंध विद्यार्थ्यांसोबत राज यांचा संवाद! काय प्रश्न विचारला राज ठाकरेंनी?
पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेला काही अंध विद्यार्थी उपस्थित होते. ठाकरेंनी त्यांना सन्मानाने व्यासपीठावर बसवले. अंध विद्यार्थ्यांनी राज ठाकरे कडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. दरम्यान व्यासपीठावर सभा झाल्यानंतर राज ठाकरेंनी या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी याल का असा प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी सांगितले कि आम्ही कुठेही यायला तयार आहोत.
राज यांच्या प्रत्येक भूमिका महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाची असून त्यांनी महागाई, गॅस दरवाढ अशा मुद्दयांना हात घातला पाहिजे असे मत या अंध तरुणांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, लहानापासूनच राज यांची भाषण ऐकत आलो आहे. राज ठाकरेंच्या सगळ्या भूमिका आक्रमक आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आक्रमक दाखवणारे दुसरे नेतृत्व नाही. बाळासाहेबानंतर राज साहेबच राज्याचा विकास करू शकतात असं ते यावेळी म्हणाले आहेत.
सामान्य माणसांच्या समस्येवरही बोलायला हवे
आम्हाला त्यांचे मराठी पाट्या, भोंगे हे मुद्दे महत्वाचे वाटतात. अयोद्धेबाबत ते आज बोलणार आहेत. त्यांनी सर्वच लाऊडस्पिकर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. ती सामान्य नागरिकांसाठी योग्यच आहे. पण त्याबरोबरच राज यांनी महागाई, गॅस दरवाढ याबाबत बोलायला पाहिजे. एखाद्या वेळेस नोकरदार वर्ग गॅस घेऊ शकतो. पण गोरगरिबाने कुठं जायचं. त्यांना गॅस दरवाढ परवडत नाही. जर राज ठाकरेंनी याबाबत भूमिका घेतल्यास दरवाढ कमी होण्याची शक्यता आम्हाला वाटते. असा राज ठाकरेंवरचा विश्वास या अंध तरुणांनी यावेळी व्यक्त केला आहे.
अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?
: मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे?
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्या दौरा का रद्द केला? याचं कारण सांगितलं. तसेच त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. इतकंच नाहीतर मुख्यमंत्र्यांवर, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
.औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात.
अफजल खानाच्या कबरीचा विस्तार किती झालाय? त्याच्या कबरीसाठी फंड येतो कुठून? औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात. तरीही महाराष्ट्र थंड आहे. आम्हाला काहीही वाटत नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळची अजान बंद झाली. अजानचा आवाज हळूहळू वाढणार. भोंग्यांचा विषय सुरू झाला तर एकदा तुकडा पाडून टाका. हे आंदोलन आहे. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीस आली. जे कायद्यानुसार वागतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? जे कायदे पाळत नाहीत त्यांच्यासोबत चर्चा करणार का? आंदोलने होत राहणार आहे. आमची टीम तयार आहे. हे आंदोलन सुरू ठेवायचं आहे. त्यासाठी एक पत्र देणार आहे आणि ते प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायची आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
”पवारांनी बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवली” –
”औरंगाबादेत बघता बघता एमआयएमचा खासदार झाला. कोणीतरी येतं आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतं? तुम्ही काय करता? एमआयएमच्या अवलादी हे औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्त होतात. याचं शिवसेनेला काहीच वाटत नाही. कारण शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची आहे. औरंगजेब हा शरद पवारांना सुफी संत वाटतो का? शरद पवार बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवत आहेत. तरीही शिवसेना पवारांसोबत आहे”, असा टोलाही पवारांनी लगावला.
तुम्ही कोण? महात्मा गांधी कि वल्लभभाई पटेल?
”राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो, असं म्हणतात. पण, मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोल नाक्यापासून सर्वच आंदोलन यशस्वी झाले. तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याचा गुन्हा आहे का? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. भूमिका कुठलीच घ्यायची नाही. संभाजीनगरचं नामकरण झालं की नाही झालं काय फरक पडतो असं म्हणतात. मी आहे असं सांगतात. पण तू कोण आहे ? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?” अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.
राऊत-राणा एकत्र जेवतात
राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लेहमध्ये जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदूत्व फक्त बोलण्यापुरतं आहे. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा लावलाय? यांचं हिंदूत्व खोटं आणि आमचं खरं असं सांगतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? –
कारसेवकांना ठार करून शरयू नदीत मृतदेह सोडले होते. त्या ठिकाणाचं देखील दर्शन मला घ्यायचं होतं. पण, राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. अयोध्येत काही झालं असतं तर आपले कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले असते. तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला तुरुंगात टाकलं असतं. आपल्या कार्यकर्त्यांची मला काळजी आहे. आता आठवलं का? राज ठाकरेंनी माफी मागावी? आतापर्यंत कुठे गेले होते? विषय माफी मागण्याचा आहे ना? गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाची व्यक्त आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मारलं होतं. त्यांना गुजरातमधून हाकलण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली – राज ठाकरे
पायाचं दुखणं वाढलं आहे. कंबरेला त्रास होतो. त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार आहे. अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं. अनेकजण कुत्सितपणे बोलायला लागेल. पण, मुद्दाम त्यांना बोलण्यासाठी दोन दिवस वेळ दिला आणि आज भूमिका सांगण्यासाठी सभा घेतली. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली. अयोध्या वारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं आहे., असा आरोप देखील राज ठाकरेंनी केला.
भाषणाच्या सुरुवातीला पवारांना टोला –
निवडणुका नाही, उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांना टोला लगावला.
अंध विद्यार्थ्यांना मंचावर स्थान –
पुण्यातील अंध विद्यार्थ्यांची राज ठाकरेंच्या सभेला उपस्थिती लावली आहे. त्यांना व्यासपीठावर बोलावून राज ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला. त्यांना मंचावर स्थान देण्यात आले.
अयोध्या दौऱ्याबाबत उद्या राज ठाकरे काय बोलणार?
या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरे उद्या पुण्यात काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. मनसे या सभेचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सकाळी दहा वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पुण्यातील सभेसाठी पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला, याचं कारणही राज ठाकरे रविवारी होणाऱ्या पुण्यातील सभेत सांगणार आहेत. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) दौरा स्थगित केल्यावरून राजकारण तापले आहे. सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
राज ठाकरेंच्या या निर्णयाबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाकरेंना डिवचलं आहे. “आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती..” असं म्हणत राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
“राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती,” असेही संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंच्या सकाळच्या सभेमुळे भुवया उंचावल्या!
: राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
पुण्यात रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरे यांची सकाळी सभा होणार आहे. मात्र ठाकरे यांच्या सकाळच्या सभेच्या वेळेमुळे मात्र भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कारण ठाकरे नेहमी संध्याकाळी सभा घेतात. त्याला प्रतिसाद देखील तसाच मिळतो. मात्र आता सकाळी सभा असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
शहरात सभेसाठी दोन ठिकाणे पाहण्यात आली होती. त्यापैकी एक मुळा मुठा नदीपात्र निश्चित करण्यात आले होते. परंतु पावसाचे कारण देत कार्यकर्त्यांनी नदीपात्रात सभा रद्द झाल्याचे सांगितले. अखेर स्वारगेटला रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण राज ठाकरे नेहमी सायंकाळी सभा घेतात. पण यावेळी मात्र चक्क सकाळी सभा ठेवल्याने चर्चाना उधाण आल्याचे दिसत आहे. सायंकाळच्या सभेवरूनच अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली होती. आता सकाळी सभा घेऊन राज यांनी पवारांचे चॅलेंज स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
‘आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दुपारी सभा घेतली आहे का, तसेच कधी कष्ट घेतले आहेत का, यांची सभा कधी होते तर संध्याकाळी होते,’ अशा शब्दात अजित पवार यांनी राज यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र राज ठाकरेंनी सकाळी सभा आयोजित करून अजित पवार यांचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मशिदींवरील भोंग्याचा मुद्द्यावरून राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे, औरंगबाद येथे जाहीर सभा झाली होती. या सभेत राज ठाकरे यांनी भोंगे, हिंदुत्व, या मुद्द्यांना हात घातला होता. त्याचबरोबर शरद पवार आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. पुण्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. त्याबाबतही ते पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसे द्वारा प्रदर्शित
टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सुरुवातीला औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ दे… हे वाक्य घेण्यात आले आहे. तर टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणंही वाजत आहे. या टीझरवरून पुण्यातील सभा जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या अनुषंगाने मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.
मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांना एकत्र आणणार का राज ठाकरे?
: उद्यापासून राज ठाकरे पुणे दौऱ्यावर
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा उद्यापासून पुण्याच्या (Pune) दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय रविवारी मनसेच्या (MNS) पार पडलेल्या मेळाव्या संदर्भातदेखील राज ठाकरे या दौऱ्यामध्ये आढावा घेणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुढील महिन्यातील पाच तारखेला राज ठाकरे अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी पुण्यातील या दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जात आहे. तर, दुसरीकडे आगामी काही दिवसात पुण्यामध्ये राज यांची आणखी एक जाहीर सभा होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Raj Thackeray Pune Tour)
दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी रज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर उत्तरसभेत आणि औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेतदेखील त्यांनी मनसे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे जाहीर केले होते. जदरम्यान, राज यांच्या या भूमिकेनंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुणे शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये पुणे मनसेमधील खदखद दूर करण्याचा प्रयत्न करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात होणार ‘राज’ सभा?दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये राज ठाकरे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जाहीर सभा घेण्याची चर्चा देखील पुणे मनसेमध्ये जोरदार सुरू आहे. नुकतीच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ सभा पार पडल्या यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि फडणवीसांपाठोपाठ आता राज ठाकरेदेखील पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या सभेबाबत चर्चा होऊ शकते अशी शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान, औरंगाबाद येथील सभेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली असून, यासभेसाठी मनसेकडून पोलिसांना पत्र देत परवानगी मागण्यात आली आहे.