Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी रद्द करा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी रद्द करा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी

 

Pune – (The karbhari Online) – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha quota activist Manoj Jarange Patil) केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एसआयटी चौकशीची आदेश देण्यात आले आहेत. मात्र ही एसआयटी चौकशी रद्द करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा पुणे (Maratha Kranti Morcha Pune) शहराच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

निवेदनानुसार मराठा समाजास ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण तसेच सगेसोय-यांची अंमलबजावणी याबाबत केलेल्या आंदोलनानंतर, राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचे सोडून स्वतंत्र एस ई बी सी प्रवर्ग करून १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. यामुळे मराठा समाजाची दिशाभूल झाली. असे असताना व आंदोलन करणं हा हक्क असताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर राज्य सरकारकडून एसआयटी चौकशी चे आदेश देण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत . जरांगेपाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलगीरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात शांतता रहावी याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. परंतु सत्तेत सहभागी असलेले अनेक नेते मंत्री/आमदार यांचेकडून महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल तसेच एकमेकांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर चुकीचे संदेश जातात,अशा नेत्यांवर देखील एसआयटी चौकशी का नेमली नाही असा प्रश्न समाजामध्ये निर्माण होत आहे.
तरी मुख्यमंत्री यांनी याचा फेरविचार करून सदर चौकशी मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक राजेंद्र कुंजीर अनिल ताडगे ,सचिन आडेकर ,संतोष नानवटे अर्जुन जाधव यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन दिले.

Maratha Seva Sangh | मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अभिवादन

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अभिवादन

मराठा सेवा संघाच्या वतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या ३३४ व्या स्मृतीदिन व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या १८० व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर व पुणे शहराचे माजी अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले.

यावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड , माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, राजेंद्र भुतडा आदी प्रमुखांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सचिन आडेकर म्हणाले ” छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होतेच परंतु एक उत्तम शासक आणि धुरंधर सेनानी देखील होते. वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र स्फटिका सारखे स्वच्छ होते. महाराजा सयाजीराव गायकवाड हे राजर्षी शाहू महाराज यांचे आदर्श होते. त्यांनी सहकार्य केलेल्यांन पैकी अनेकांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कार्य सर्व देशातच नव्हे तर विदेशात देखील दखल घेतले गेले आहे.”


यावेळी बोलताना शिवश्री राजेंद्र कुंजीर म्हणाले ” महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने एक सांस्कृतिक भवन केले गेले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले त्यांचे चांगले स्मारक करून त्यांचा विचार समाजात रुजविणे आपले कर्तव्य आहे.”

माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी यावेळी या सांस्कृतिक भवनाची माहिती दिली.
सारिका जगताप , गणेश सपकाळ, राकेश भिलारे , विजय जाधव , अनिल भिसे , प्रसन्न मोरे यावेळी उपस्थित होते.