Rajgad | Toranagad Fort | राजगड आणि तोरणागड येथे अत्याधुनिक रस्ते करण्याची मागणी | माजी नगरसेविका राणी भोसले यांनी नितीन गडकरींकडे केली मागणी

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Rajgad | Toranagad Fort |  राजगड आणि तोरणागड येथे अत्याधुनिक रस्ते करण्याची मागणी

| माजी नगरसेविका राणी भोसले यांनी नितीन गडकरींकडे केली मागणी

Raigadh | Toranagadh | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) २५ वर्षे वास्तव्य असलेल्या किल्ले राजगड (Rajgad))व किल्ले तोरणागड (Toranagad) येथे अत्याधुनिक रस्ते मार्ग करण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका तथा शहर उपाध्यक्ष राणी भोसले (Rani Bhosale) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. (Rajgad | Toranagad)

भोसले यांनी याबाबत गडकरी यांना पत्र दिले आहे. पत्रानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे सन १६४७ ते १६७२ असे तब्बल २५ वर्षे किल्ले राजगड येथे वास्तव्य
होते. तसेच हिंदवी स्वराज्याचे प्रथम तोरण बांधलेला किल्ला तोरणा हा देखील शेजारीच आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा स्फूर्तीदायक इतिहास किल्ले राजगड येथे घडला आहे. सदर किल्ल्यावर अखंड हिंदुस्तानमधून तसेच महाराष्ट्रामधून शिवप्रेमी नागरिकांचा ओघ सुरु असतो. सदर किल्ल्यांवर पोहोचण्यासाठी सद्यस्थितीत खूप खराब व निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या पायाभूत सुविधा सदर ठिकाणी उपलब्ध नाहीत. (Fort Roads)

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ (मुंबई – बेंगलोर) येथून किल्ले राजगड व तोरणागड हे अंतर फक्त ३० कि.मी. आहे. सदर ३० कि.मी. अंतराचा रस्ता अत्याधुनिक पद्धतीने तयार झाला, रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण झाले तर निश्चितच संपूर्ण वेल्हे तालुका व राजगड व तोरणा किल्ला या परिसराचा कायापालट होणार आहे.
डोंगरी, दुर्गम व अतिमागास तालुका असा, जो आमच्या या ऐतिहासिक वेल्हे तालुक्याला शिक्का लागला आहे
तो निश्चित सदरच्या कार्याने पुसला जाईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र व पावन झालेल्या या शिवभूमित आपल्या माध्यमातून रस्त्याची कामे व्हावीत व सदर परिसर जगाच्या नकाशावर पुढे यावा यासाठी आपण भरघोस निधी मंजूर करून सदर रस्त्यांचा विषय मार्गी लावावा अशी आपणास नम्र विनंती आहे.

वेल्हे तालुक्यात अरुंद व निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्यामुळे दोन बस समोरासमोर आल्यास एक बस रस्त्याच्या कडेला उतरल्याशिवाय दुसरी बस मार्गस्थ होऊ शकत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चिखल
असल्यामुळे खूप मोठी कसरत करावी लागते. संपूर्ण भारत देशात आपली रस्ते विकासपुरुष म्हणून गणना केली जाते. नुकतेच आपण कापूरहोळ ते भोर तसेच शिंदेवाडी ते महाड घाट या रस्त्यांसाठी खूप मोठं निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. राष्ट्रीय महामार्ग क्र.४ (मुंबई – बेंगलोर) येथून रस्ते दुरुस्तीसाठी अंदाजे १०० कोटी
रुपये निधी पुरेसा होईल. आपले माध्यमातून सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला तर किल्ले राजगड, किल्ले तोरणागड व संपूर्ण डोंगरी व दुर्गम, अतिमागास वेल्हे तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात या रस्त्यांची कामे कामे झाल्यास संपूर्ण ग्रामीण जनतेचे जीवनमान, विद्यार्थ्यांचे शिक्षक व बेरोजगारांना रोजगार व शिवप्रेमी व दुर्गप्रेमी पर्यटकांमुळे सदर परिसराचा निश्चितच कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. असे भोसले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-
News Title | Rajgad | Toranagad | Demand for modern roads in Rajgad and Tornagad | Former corporator Rani Bhosale made a demand to Nitin Gadkari

Ajit Pawar | Rajgad | पुणे जिल्हयातील या तालुक्याचे नामांतरण “राजगड” करण्याची अजित पवारांची मागणी 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

   पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण “राजगड” करण्याची अजित पवारांची मागणी

पुणे | पुणे जिल्ह्यातील (Pune District) वेल्हे तालुक्याचे (Taluka Velhe) नाव राजगड (Rajgad) करावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader) यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री (DCM Devendra Fadnvis) यांना अजित पवार (Ajit pawar) यांनी पत्र दिले आहे. (Rajgad)
(Ajit Pawar’s demand to change the name of Velhe taluka in Pune district to “Rajgad”)
अजित पवार यांच्या पत्रानुसार  पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करणेबाबत लोकभावना तीव्र आहेत. याबाबत जिल्हा परिषद पुणे यांचे २२.११.२०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव करुन वेल्हे तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ५८ ग्रामपंचायतींना वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करणेबाबत सकारात्मक ठराव दिले आहे. वेल्हे तालुक्यामध्ये स्थित असलेल्या राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील तमाम नागरिकांचे जिव्हाळयाचे संबंध असून सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज
यांची प्रथम राजधानी असलेने सदर ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी २७ वर्षे शासन चालविले असल्याने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे. (Opposition Leader Ajit pawar)
पवार यांनी पुढे म्हटले आहे कि वेल्हे तालुका हा शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला आणि किल्ले मालिकेतील किल्ले राजगड व किल्ले तोरणा असे दोन महत्वपूर्ण किल्ले समाविष्ट असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्त पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापी, सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असलेने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे. वेल्हे तालुक्यातील तमाम नागरिकांच्या भावना या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये स्थित असल्याने किल्ले राजगड वरुन या तालुक्याचे नामकरण “राजगड” करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी. असेही पवार यांनी म्हटले आहे. (Ajit Pawar)