Pune Navratri Mahotsav | आपले प्रश्न आपणच सोडवण्याचा निर्धार करा | रुपाली चाकणकर

Categories
Breaking News cultural Political social पुणे
Pune Navratri Mahotsav | आपले प्रश्न आपणच सोडवण्याचा निर्धार करा |  रुपाली चाकणकर
Pune Navratri Mahotsav | ‘राज्य महिला आयोगाच्या (Women Commission for State of Maharashtra) माध्यमातून काम करताना कौटुंबिक कलहाची प्रकरणे सर्वाधिक असल्याचे दिसून येते. बेपत्ता होणाऱ्या मुलींचा प्रश्नही मोठा आहे. तसेच भृणहत्या आणि बालविवाह ही देखील समस्या आहे. यासाठी आपल्या सर्वांनाच मोठे काम करावे लागेल. आपली मुलगी १८ वर्षाची झाल्याशिवाय आणि स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय कोणत्याही आईने आपल्या मुलीचे लग्न करू नये हा संकल्प नवरात्रौनिमित्त केला पाहिजे’ असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हंटले.
 पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत संपन्न होणाऱ्या २४ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात लॉन टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले आणि स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री पाटील यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ११ हजार रुपये, देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा अध्यक्षा जयश्री बागुल, समितीच्या उपाध्यक्षा निर्मलाताई जगताप, सदस्या छायाताई कातुरे, विद्याताई साळी, अनुराधाताई वाघोलीकर व प्रांजली गांधी मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन झाल्यावर देवीची आरती करण्यात आली. ऋतुजा माने व सहकलावंतांनी याप्रसंगी गणेश वंदना सादर केली. महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करतांना म्हंटले की “नवरात्रौ हा स्त्री शक्तीचा महोत्सव आहे. घरातील प्रत्येक मुलीला शिकवलेच पाहिजे. विविध सामाजिक प्रश्नांमुळे मुलींची घटती संख्या आणि मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे याकडे समाजाने विचारमंथन केले पाहिजे.”
याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष  व पुण्याचे माजी महापौर आबा बागुल म्हणाले की ,  हा महिला महोत्सव सलग २४ वर्षे चालू आहे. ही सारी श्री. लक्ष्मीमातेचीच कृपा आहे. पुणे नवरात्रौ महोत्सव व पुणे नवरात्रौ महिला महोत्सव या माध्यमातून हजारोंना आधार देण्याचे विविध उपक्रम सातत्याने चालू असून सांकृतिक , शैक्षणिक, सामजिक, धार्मिक , अध्यात्मिक याबरोबरच हरवेलेले संस्कार समाजात रुजवण्यासाठी ‘संस्कारमाला’ हे उपक्रम समाजाला आधार देतात याचे समाधान आहे.
याप्रसंगी रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, “मुलगी सासरी जातांना जमवून घे असे आई मुलीला सांगत असते. मात्र आता आईनी असे सांगितले पाहिजे की सासरचे तुला जेवढे सन्मानाने वागवतील त्याच्यापेक्षा जास्त सन्मानाने तू त्यांना वागव. मात्र हुंड्यासाठी छळ होऊ लागला तर जाब विचारायला शिक.
कुठलाही उपक्रम सुरु करणे सोप्पे असते चालू ठेवणे मात्र अवघड असते. गेली २४ वर्षे पुणे नवरात्रौ महिला महोत्सव मोठ्या उत्साहात चालू आहे ही कौतुकाची बाब आहे. जयश्री बागुलांच्या मागे आबा बागुल भक्कमपणे उभे आहेत ही कौतुकाची बाब आहे. आपल्याला संविधान देऊन महिलांना हक्क मिळून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाईंच्या हाती लेखणी देणारे महात्मा फुले हे पुरुषच होते. समाजात काम करतांना पती, भाऊ, वडील यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. मात्र आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात. त्यासाठी नवरात्रौनिमित्त संकल्प करूया असे त्या म्हणल्या.
सत्काराला उत्तर देताना Rescuing Every Distressed Indian Overseas (REDIO) संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री पाटील म्हणल्या की, “तेजस्विनी पुरस्कार मिळाला हा लक्ष्मीमातेचा आशीर्वाद आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात सुखरूप परत आणणे हे मी काम करते. यामध्ये महिलांना खूप मोठा आधार मिळत असतो. पुणे नवरात्रौ महोत्सवात परवा महर्षी पुरस्काराने सन्मानित होणारे डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे माझे गुरु असून त्यांचे फार मोठे सहकार्य या कामात मिळाले. तसेच माझे पती व कुटुंबीय यांचे देखील या कामी मोठे सहकार्य लाभले. त्यामुळे डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि माझे पती व कुटुंबीय यांना मी हा पुरस्कार समर्पित करते.”
आंतरराष्ट्रीय कीर्तीची लॉन टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले म्हणल्या की, “आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव उंचावण्याची संधी मला मिळाली याचे मला खूप समाधान आहे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती रामदासी यांनी केले. आभार प्रदर्शन महोत्सवाच्या उपाध्यक्षा निर्मला जगताप यांनी केले. कार्यक्रमात महिलांची प्रचंड मोठी गर्दी होती.
या उद्घाटन सोहळ्यानंतर महिलांसाठी असणारी ‘वेशभूषा’ स्पर्धा संपन्न झाली.
——-

7th Pay Commission | PMC Education Department | शिक्षण विभागातील 435 सेवानिवृत्त सेवकांना अखेर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फरक आणि पेन्शन

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

7th Pay Commission | PMC Education Department | शिक्षण विभागातील 435 सेवानिवृत्त सेवकांना अखेर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फरक आणि पेन्शन

7th Pay Commission | PMC Education Department | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातून (PMC Education Department) 2016 नंतर  सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कमर्चाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे (6th Pay Commission) पेन्शन मिळत होती. सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू होऊन देखील फरक किंवा  आयोगाप्रमाणे पेन्शन (PMC Employees Pension) मिळत नव्हती. याबाबत तक्रारी आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाप्रमाणे सर्व रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. तसेच पेन्शन देखील सातव्या आयोगा प्रमाणे मिळणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune) देण्यात आली. (7th Pay Commission | PMC Education Department)
पुणे महानगरपालिकेतील शिक्षण विभागात सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या जवळपास 435 कर्मचाऱ्यांची निवृत्ती लाभाची रक्कम पुणे महानगरपालिकेने त्यांच्या खात्यात वर्ग केली नव्हती. २०१६ ते २०२० या दरम्यान निवृत्त झालेले हे सर्व कर्मचारी होते. आपल्या निवृत्तीनंतर सहा ते सात वर्ष होऊन देखील ही रक्कम त्यांना न मिळाल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. याबाबत डिसेंबर महिन्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आयुक्तांसमवेत बैठक केल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन  होते. परंतु सदर काम न झाल्यामुळे गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत याबाबतची बैठक घेतली. त्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांची त्यांच्या निवृत्ती लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. (Pune Municipal Corporation News)
याबाबत शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले कि, 2016 ते 2018 या काळात कर्मचाऱ्यांना ऑफलाईन वेतन दिले जायचे. या मुख्य तांत्रिक अडचणीमुळे या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांनुसार पेन्शन मिळण्यास उशीर झाला. मात्र याबाबत तत्कालीन प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी पुढाकार घेतला. तसेच सांख्यिकी, लेखा व वित्त विभाग तसेच पेन्शन विभागाचा पाठपुरावा करत सातव्या आयोगाप्रमाणे फरक आणि पेन्शन मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानुसार कर्मचाऱ्यांना आता याचा लाभ मिळू लागला आहे. याबाबत कर्मचारी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. (PMC Pune News)
——
News Title | 7th Pay Commission | PMC Education Department | 435 retired servants of education department finally get differential and pension as per 7th Pay Commission

PMC Hirkani Kaksh | वर्षभरापासून बंद असलेला पुणे महापालिकेतील हिरकणी कक्ष अखेर परत सुरु झाला

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Hirkani Kaksh | वर्षभरापासून बंद असलेला पुणे महापालिकेतील हिरकणी कक्ष अखेर परत सुरु झाला

| विवेक वेलणकर यांनी सातत्याने केला होता पाठपुरावा

PMC Hirkani Kaksh | वर्षभरापासून बंद असलेला पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) हिरकणी कक्ष (Hirkani Kaksh) अखेर परत सुरु झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (State Commission for Women President Rupali Chakankar) यांच्या उपस्थितीत हा कक्ष सुरु झाला. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Sajag Nagrik Manch President Vivek Velankar) यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. ‘द कारभारी’ (thekarbhari.com) वृत्तसंस्थेने देखील याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. (PMC Hirkani Kaksh)
महापालिकेतील मुख्य इमारतीतील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या महिला नागरीक यांच्यासाठी २०१६ साली गाजावाजा करुन  उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष गेल्या काही महिन्यांपासून गायब झाला होता. याठिकाणी स्तनदा मातांना बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था तसेच कुणा महिलेला बरे नाहीसे वाटायला लागले तर थोडा वेळ विश्रांती घेण्याची सोय होती. महापालिका मुख्य इमारतीतील तळमजल्यावर हा कक्ष उभारण्यात आला होता. वर्षभरापूर्वी तिथे दिव्यांग कक्ष सुरु करण्यात आला व हिरकणी कक्ष बंद करण्यात आला. या कक्षासाठी कागदोपत्री तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहाशेजारील खोलीत जागा देण्यात आली मात्र ही जागा मालमत्ता विभागाचे ताब्यात होती व त्यांनी त्या जागेचा ताबा दिला नाही. त्यामुळे हिरकणी कक्ष बंदच राहिला. (Pune Municipal Corporation News)
याबाबत विवेक वेलणकर यांनी सांगितले कि त्यासंदर्भात मी महापालिका प्रशासकांना २१/१२/२०२२  रोजी पत्र दिले होते.  मात्र त्यावर काहीच हालचाल झाली नाही. मग मी राज्य महिला आयोगाला तक्रार केली , त्यांनी तातडीने याची दखल घेऊन हिरकणी कक्ष तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र त्यालाही महापालिका प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शेवटी गेल्या आठवड्यात मी परत तक्रार केल्यानंतर राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महापालिकेला परत एक पत्र लिहून आज त्या महापालिकेत हा कक्ष स्थापन झाला की नाही ते पाहण्यासाठी येणार असल्याचे कळवले. मग मात्र सूत्रे हलली आणि महापालिका मुख्य इमारतीतील तळमजल्यावरच होता तिथे आज सकाळी रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत हा कक्ष सुरु झाला. असे वेलणकर म्हणाले. (PMC Pune News)
—-
महापालिका मुख्य इमारतीतील तळमजल्यावरच होता तिथे आज सकाळी रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्ष सुरु झाला. मात्र  महापालिका प्रशासन आपल्या महिला कर्मचाऱ्यांबद्दल किती असंवेदनशील आहे हे या सगळ्या प्रकरणात दिसून आले.
विवेक वेलणकर,  अध्यक्ष,  सजग नागरिक मंच, पुणे 
—–
The Hirakni kaksh of the Pune Municipal Corporation, which has been closed for a year, has finally started again

Aarogyawari | Palkhi Sohala | वारीतील महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक

Categories
Breaking News cultural Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Aarogyawari | Palkhi Sohala | वारीतील महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियानाचा शुभारंभ

Aarogyawari | Palkhi Sohala | वारी दरम्यान (Pandharpur Wari 2023) महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची (Sanitory Napkins) व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी (Lactating Mothers) वारी मार्गावर हिरकणी कक्ष (Hirkani Kaksha) उभारण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक (Toll Free Number) आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. (Aarogyawari | Palkhi Sohala)

निवडुंग विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोग (Maharashtra State Women Commission) आणि पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यवारी अभियानाचे  (Aarogyawari Abhiyan) उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade), महिला आयोगाच्या सदस्य संगिता चव्हाण, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. (Aarogyawari Abhiyan)

संतांनी माणसातला देव ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला असून आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा घडते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्य महिला आयोगाने अतिशय संवेदनशीलतेने हा उपक्रम सुरू केला आहे. मासिक पाळीसारख्या विषयाकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनामुळे याबाबतची समस्या मांडताना मनात संकोच असतो. त्यामुळे महिलांची ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाच्या सहकार्याने शहरात अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारे यंत्र बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात जागा उपलब्ध झाल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले. वारीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, साधुसंतांच्या विचारधारा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. पंढरपूर वारीच्या निमित्ताने हा विचार सर्वत्र पोहोचतो. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे. वारीदरम्यान महिलांना २३ ते २४ दिवस चालावे लागते. या कालावधीत त्यांना एकदा तरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन आरोग्यवारी अभियान सुरू करण्यात आले आहे.

वारी दरम्यान महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी वारी मार्गावर हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. महिला वारकऱ्यांच्या हस्ते १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यासोबत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार धंगेकर म्हणाले, वारीच्या निमित्ताने सर्व धर्मातील एकात्मता दिसून येते. वारीसाठी जिल्हा प्रशासनाने चांगल्या सुविधा केली आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यवारी उपक्रम स्तुत्य असून वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपा ठाकूर यांनी प्रास्ताविकात आरोग्यवारी अभियानाची माहिती दिली. वारी सोहळ्यादरम्यान महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियान आणि महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.


News Title | Aarogyawari | Palkhi Sohala | ‘1091’ toll free number for women in Wari | Guardian Minister Chandrakantada Patil launched Aarogyawari Abhiyaan

Pandharpur Aashadhi wari | पंढरपुरकडे पायी निघालेल्या लाखो महिला वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य वारी’

Categories
Uncategorized

Pandharpur Aashadhi wari | पंढरपुरकडे पायी निघालेल्या लाखो महिला वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य वारी’

| राज्य महिला आयोगाचा उपक्रम | रुपाली चाकणकर यांची माहिती.

Pandharpur Aashadhi wari | आषाढी एकादशीला (Aashadhi Ekadashi) विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरकडे पायी निघणार्या लाखो वारकरी मध्ये  महिला वारकरी (Mahila Warkari) ची संख्या ही लक्षणीय असते. या महिला वारकारी च्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून (State women commission)  ‘आरोग्य वारी’ (Aarogya Wari) या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State women commission president Rupali Chakankar) यांनी सांगितले. (Pandharpur Aashadhi wari)

याबाबत बोलताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. आषाढी व वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. वेगवेगळ्या वयोगटातील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामधून लाखो वारकरी महिला या पंढरीची वाट दरवर्षी चालत असतात. यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य वारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. २० – २१ दिवस महिला जवळपास दोनशे किमीचा पायी प्रवास करत असतात. यामुळे वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत महिला आयोगाची आग्रही भूमिका आहे. यात

१. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.
२. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे.
३. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
४. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत.
५. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करुन देण्यात यावा.
६. पालखी सोहळ्याकरिता निर्भया पथक तैनात करण्यात यावे. अशी आयोगाची भुमिका आहे. (Maharashtra state women commission)

आरोग्य वारी उपक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत दुरदृश्यप्रणाली द्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, उपसचिव दिपा ठाकूर यांचेसह निवासी उपजिल्हाधिकारी पुणे, अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका, निवासी उपजिल्हाधिकारी सातारा, उपायुक्त सातारा जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापुर, अतिरिक्त आय़ुक्त सोलापुर महानगरपालिका आदी उपस्थित होते. सातारा, पुणे, सोलापुर या तीन ही जिल्ह्याच्या प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला. (Rupali chakankar news)

पुणे जिल्हा प्रशासनाने महिला वारकर्यांसाठी १२९० फिरती स्वच्छतागृहे व १२ शाळांमधे न्हाणीघराची व्यवस्था केली आहे. डाँक्टरांच्या पथकात स्त्री रोग तज्ञांची सुविधा उपलब्ध असून ३० ठिकाणी निवारा कक्ष उभारण्यात आले आहेत. हिरकणी कक्ष, सँनिटरी पँड मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात अंगणवाड्यांमधे महिला वारकर्यांसाठी न्हाणीघर, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून दुचाकी वर तैनात आरोग्य पथकाची सोय करण्यात आली आहे. पिवळ्या रंगाच्या या दुचाकी लगेच ओळखता येतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. महिला निवारा कक्षात महिला नोडल अधिकारी, २१ ठिकाणी हिरकणी कक्ष सातारा जिल्हा प्रशासनाने तयार केले आहेत. सोलापुरात दर दिड किमी वरच्या निवारा कक्षात निर्भया पथक गस्त घालणार आहे, ४० ठिकाणी हिरकणी कक्ष, २५ डाँक्टर पथक अशा सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. (Pandharpur wari mahila warkari)

या सर्वांचा आढावा घेत महिलांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात असे निदेश आयोगाच्या अध्यक्षांनी तीन ही जिल्ह्याच्या प्रशासनला दिले आहेत. विठूरायाच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालणार्या महिला वारकर्यांकरिता सेवा सुविधा उपलब्ध करुन देत त्यांच्या आरोग्याची काळजी, सुरक्षेची दक्षता घेतल्यास खर्या अर्थाने महिलांची वारी निर्मल वारी होईल असा विश्वास श्रीमती चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केला.


News Title |Pandharpur Aashadhi wari | ‘Arogya Wari’ for lakhs of women pilgrims walking towards Pandharpur | Activities of State Commission for Women | Rupali Chakankar’s information.

State Commission for Women | महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन

|मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव

| महिला आयोग – फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ

| महाराष्ट्रात पहिल्यांदाच फेसबुकची शासकीय यंत्रणेसोबत जनजागृती मोहिम

मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे होणार आहे.

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्य महिला आयोगाच्या अध्य़क्षा रुपाली चाकणकर, सदस्या अँड गौरी छाब्रिया, अँड संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, आभा पांडे, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमात राजकारण, समाजकार्य, प्रशासन क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाउल उचलणारी हेरवाड ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोग आणि फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणार्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ यावेळी होणार आहे. पुढील एक वर्ष हे अभियान राबविण्यात येणार असून यात महिलांमध्ये इंटरनेट, सायबरच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. फेसबुक महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे शासकीय यंत्रणेशी करार करत जनगागृतीपर मोहीम हाती घेत आहे. आयोगाकडे गेल्या काही वर्षात वाढलेल्या आँनलाईन फसवणूक, सायबर गुन्हे अशा तक्रारी पाहता भविष्यात महिलांना सायबर साक्षर करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

तसेच राज्य महिला आय़ोग आणि इंटरनँशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज – वल्नरेबल कम्युनिटीज अन्ड क्रिमीनल जस्टीस सिस्टिम या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. सर्वसामान्य नागरिक जागरुक असतील तर अनेक गुन्ह्यांना आळा घालता येतो. त्यासाठी लोकांचा यंत्रणांवरील विश्वास दृढ होणे गरजेचे आहे. समाज आणि पोलिस, शासन, न्याययंत्रणा यांच्यातला समन्वय वाढण्याच्या उद्देशाने आय़ोगाने प्रथमच अस टुलकिट केले आहे.

Mhila Aayog Aypa Dari | महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त- रुपाली चाकणकर

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त- रुपाली चाकणकर

जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचा प्रारंभ

पुणे | महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेला ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे शहर भागासाठीच्या सुनावणीस प्रारंभ करण्यापूर्वी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे उपस्थित होत्या.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम राज्य महिला आयोगाकडून होणार आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाने बालविवाह रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, या कामाबाबत जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून श्रीमती चाकणकर म्हणाल्या, मागील तीन महिन्यात चंद्रपूर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, गडचिरोली येथेही आयोगाच्या वतीने सुनावणी घेण्यात आली. सुनावणीतून महिलांना जलद न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. सक्षम महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचतात की नाही, याचाही या सुनावणीवेळी मागोवा घेतला जाणार आहे.

पुणे ग्रामीण मधील तक्रारींवर २० जुलै रोजी येथे सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी घेण्यात येणार आहे. २१ जुलै रोजी ज्ञानज्योती सावित्री बाई फुले स्मारक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेजवळ पिंपरी-चिंचवड भागातील तक्रारींची जनसुनावणी सकाळी ११ वाजता होणार आहे. जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहनही चाकणकर यांनी केले.

State women Commission | यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा

| महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

आरोग्यवारी उपक्रमाचा आरंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे  दि.१९ जून रोजी दुपारी १२.३० वा. होत असून या कार्यक्रमाच्या उदघाटनाला राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण या उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची संकल्पना असलेल्या ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.
यामध्ये ,
१. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.
२. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देण्यात यावे.
३. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
४. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत.
अशा सुविधा पुरविण्याबाबत पुणे , सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनास निर्देश देण्यात आलेले होते व या तीनही जिल्ह्याच्या प्रशासनाने आरोग्यवारी या संकल्पनेला अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल या सर्वांचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मनःपूर्वक अभिनंदन. आरोग्य आणि सुरक्षाबाबतीतच्या या महत्वाच्या सुविधा महिला वारकऱ्यांच्या उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे असं म्हणता येईल.

Resolution against widowhood | एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायतीनी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायतीनी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव

पुणे : आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला परिसरातील धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी आज विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी धायरी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जामशिंग गिरासे, तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के उपस्थित होते.

चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महिलांना समान दर्जा देण्यासाठी व समाजातील कुप्रथा बंद करण्याचे काम सुरू आहे. खडकवासला मतदार संघातून शंभर टक्के विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव होणे कौतुकास्पद आणि मार्गदर्शक आहे. राज्यातील गावागावात असे ठराव होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजात महिलांना समान दर्जा देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

गुप्ता म्हणाले, समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी आपला सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे. समाजातील कुप्रथा बंद करून महिलांना सन्मान देणारा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी सर्व मिळून एकत्रित करावे, असेही ते म्हणाले.

महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, खडकवासला विभागातील अनेक ग्रामपंचायतीनी विधवा प्रथे विरुद्ध ठराव केला. २९ ग्रामपंचायतींचा कुप्रथा बंद करून महिलांना सन्मान देणारा हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. एकाच वेळी ठराव करणारा राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. विधवा महिलांना समान अधिकार आहेत. गावातील सरपंच, महिला यांनी यासाठी पुढाकार घेतला ही अभिनंदनीय बाब आहे. राज्यातील गावागावात असे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.देशमुख म्हणाले, स्री पुरुष समानतेचा इतिहास लिहला जाईल, त्यावेळी या ऐतिहासिक कार्यक्रमाची त्यात निश्चितपणे नोंद असणार आहे. कायद्यासोबतच अनुरूप असे सामाजिक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. आजच्या या ठरावाच्या कार्यक्रमातून लोकचळवळ उभी राहील, महिलांना सन्मान देणारी चांगली सुरुवात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

महिला आयोगाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.महिला आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त  कानडे, तहसीलदार कोलते,सरपंच मोनिका पडेर, राहुल पोकळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक,महिला आदी उपस्थित होते.

राज्य महिला आयोगाने विधवा प्रथासारख्या अनिष्ट प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते त्याला राज्यभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व काही प्रभागातील नागरिकांनी आज हा ठराव मंजूर केला आहे. खडकवासला हा महाराष्ट्रातील१०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा पहिला मतदारसंघ असणार आहे.

Supriya Sule News Update | Chandrakant Patil | सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांची दिलगिरी 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांची दिलगिरी

: राज्य महिला आयोगाकडे व्यक्त केली दिलगिरी

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यामुळे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राज्यभरातून टीकेचा सामना करावा लागला. शिवाय राज्य महिला आयोगाने देखील पाटील यांच्याकडून खुलासा मागवला होता. यावर आता चंद्रकांत पाटलांनी आयोगाला आपला खुलासा सादर करत दिलगीरी व्यक्त केली आहे.

: महिला आयोगाला चंद्रकांत पाटील यांनी दिलेला खुलासा

आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे
लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही.
 माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.