Pune Drug Racket | Shivensena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या विळख्यातून पुण्याला सोडवा | पुणे पोलिस आयुक्तांना शिवसेनेचे (UBT) निवेदन 

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Drug Racket | Shivensena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या विळख्यातून पुण्याला सोडवा | पुणे पोलिस आयुक्तांना शिवसेनेचे (UBT) निवेदन

 

Pune Drug Racket | Shivsena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या (Pune Drug) विळख्यातून पुण्याला सोडवा, अशी मागणी शिवसेना पुणे (Shivsena Pune UBT) च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पुणे पोलिस आयुक्तांना (CP Pune) निवेदन देण्यात आले आहे.

शिवसेनेच्या निवेदनानुसार  पुणे शहर विद्येचे माहेर घर म्हणून परिचित आहे, त्यासोबत भारतातील महत्वाचे आय टी हब म्हणून ही बघितले जाते. या शहरात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, या तरुण पिढीला ड्रग, गांजा , गुटखा , या सारख्या अमली पदार्थ सेवन करण्यासाठी पुणे शहरात सहज उपलब्ध होत आहे. हे मागील काही शहरातील घटनांमधून निदर्शनास आले आहे. पुणे पोलीसांनी ड्रग्ज व्यावसायिकाला पकडल्यामुळे खूप मोठ रॅकेट हाती लागले आहे. त्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. जे कोणी छोटे मोठे उत्पादक, व्यावसायिक, हितसंबंधित व्यक्ति अथवा राजकीय वरदहस्त ठेवलेले नेते या रॅकेटमधे सहभागी असतील त्या प्रत्येकावर कारवाई करून त्याचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा. अशी मागणी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही करत आहोत . यामुळे पुणे शहर पोलिसांचा नावलौकिक जागतिक पातळीवर उंचावला जाईल.

तसेच अत्यंत महत्वाचे पुणे शहरात शाळा महाविद्यालयांच्या जवळ, वस्ती भागात अनेक पान टपऱ्यांमध्ये , दुकानांमध्ये तसेच काही व्यक्तींकडे आरोग्याला घातक गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत आणि सर्रास पणे विकल्या जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पुण्यात सहज उपलब्ध होऊन सर्रास पणे विकला जात आहे. आमच्या माहितीप्रमाणे रोज 20 कोटी रू चा गुटखा पुण्यात आणला जातो. बिनदिक्कतपणे त्याची विक्री होते आणि त्याचे सेवन केले जाते. कॅन्सरचे प्रमाण याच कारणाने दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस प्रशासनाचा यावर वचक असावा, असे आपणास सूचित करावयाचे आहे. सध्या तरी असे दिसते कि याचे मोठे उदाहरण ससून हाॅस्पिटल मधील ड्रग्ज रॅकेट हे आहे ,

यावेळी बोलताना संजय मोरे म्हणाले शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहरातील तरुणांच्या आरोग्य , शिक्षण विषयात गांभीर्याने लक्ष देत असून आपण तत्पर यावर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना सामान्य पुणेकरांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून सदर गुटखा भरलेल्या गाड्या अडवून संपूर्ण गुटख्याची होळी करून आम्ही जनआंदोलन घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही .

यावेळी शिष्टमंडळात पुणे शहरप्रमुख संजय मोरे ,गजानन थरकुडे ,विधानसभाप्रमुख विशाल धनवडे, उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनंत घरत, मकरंद पेठकर उपस्थित होते.

cartoon competition | “बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

“बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

पुणे| जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त (५ मे) पुण्यामध्ये “बाळकडू” या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबागसमोरील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे या स्पर्धेतील व्यंगचित्रांचे प्रदर्शन दिनांक ५ मे रोजी होणार आहे. नुकतेच या स्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, युवासेनेचे राजेश पळसकर, अविनाश बलकवडे, सनी गवते, युवराज पारीख, संजय साळवी आणि शिवसैनिकांसह विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पुणे अनंत घरत, व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी केले आहे.

जास्ती जास्त युवकांपर्यंत ही स्पर्धा नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे वरुण सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. मराठी मातीतील कुंचल्याचे फटकारे, देशातील राजकिय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारे, निर्भीड व्यंगचित्रकारांचे एक व्यासपीठ उभे करण्याचे आमचे उदिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धकांनी सहभाग नोंदवण्यासाठी २ मे पर्यंत amit.papal19@gmail.com यावर आपले व्यंगचित्रकार पाठवावे किंवा ९०२८९०२१८०, ९९२२९२७९५९ यावर संपर्क साधावा.

Sanjay More | कसब्यात पराभव झाल्याने भाजप आणि मित्र पक्षाला मिळकतकर आठवला | शहर प्रमुख संजय मोरे यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political social पुणे

कसब्यात पराभव झाल्याने भाजप आणि मित्र पक्षाला मिळकतकर आठवला

| शहर प्रमुख संजय मोरे यांचा आरोप

पुणे | मागील आठ  महिन्यापासून सरकार असूनही 40% मिळकतकर सवलतीबाबत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने काही निर्णय घेतला नाही. याना पुणेकरांच्या वाढीव मिळकत कराबाबत काही देणेघेणे नाही आणि नव्हते. परंतु कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत मविआ कडून सडकून पराभव झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील पुतना मावशीचे प्रेम जागे झाले आहे. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे पुण्याचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केला आहे.
मोरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेने मिळकत करातील 40% सवलत रद्द केली. 2019 पासूनच्या सवलतीची रक्कम 2022 – 2023 यावर्षीच्या बिलामधे आकारल्याने नागरिकांमधे नाराजी असल्याचे शिवसेना पुणे शहराचे वतीने 8 जून 2022 रोजी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून लेखी पत्राद्वारे निवेदन दिले होते. आजपर्यंत काहिच निर्णय घेतला नाही. मागील आठ  महिन्यापासून यांचे सरकार असूनही याबाबत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला पुणेकरांच्या वाढीव मिळकत कराबाबत काही देणेघेणे नाही आणि नव्हते. परंतू कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत मविआ कडून सडकून पराभव झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील पुतना मावशीचे प्रेम जागे झाले. नागरिकांनी झिडकरल्यानंतर यांना मिळकत कर आठवला.
आठ महिन्यापासून शांत का बसले याचे उत्तर अगोदर यांनी द्यावे. पुणेकर नागरिक सुजाण आहेत. त्यांना चांगले माहिती आहे. मागील जूनमधे शिवसेनेने हा प्रश्न नगरविकास मंत्र्यांकडे मांडला. परंतू तेव्हा ते पुढच्या फुटीच्या प्लॅनिंगमधे व्यस्त असल्याने नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. असे ही मोरे यांनी म्हटले आहे.

Shivsena Vs BJP | CAG | महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन

भारतीय जनता पार्टीची (Bhartiya Janata Party) सत्ता असलेल्या पुणे महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामाची ‘कॅग’मार्फत (CAG) चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज पुणे महापालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला पुण्यातील सेनेचे सर्व पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षात पुणे महाापलिकेत विकास कामांच्या अनेक योजना आल्या. मात्र, त्यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला. प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. या कामांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला. स्मार्ट सिटी, जायकाचा नदी सुधार प्रकल्पासारख्या योजना योग्यरित्या मार्गी लागू शकल्या नाहीत, असा शिवसेनेचा आरोप आहे.

महापालिकेसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला आघाडीच्या सहकाऱ्यांची संख्यादेखील मोठी होती. पुण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून तणावात भर पडत आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनाला शिवसेनेच्या शहर पातळीवरील सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

Shiv sainiks Pune | Uddhav Thackeray | पुण्यातील शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यातील शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पुण्यातील शिवसैनिकांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीला शिवसेना संपवायची आहे, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी आहे, हा प्रवास विनातिकीट करायचा आहे.  सोबत रहा अशा भावनिक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी पुण्यातील शिवसैनिकांना साद घातली.

मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्यासह शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक विशाल धनवडे व अन्य माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख रुपेश पवार, विजय देशमूख, अनंत गोयल तसेच बरेच शिवसैनिक उपस्थित होते.

ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठीच हे सगळे सुरू आहे. यापुढचा प्रवास विनातिकीट आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, मात्र ताकदीने माझ्यासमोर उभे रहा, आपण शिवसेना पुन्हा उभी करू, त्यांचा डाव हाणून पाडू. फुटून बाहेर पडलेल्या आमदारांनी हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.

Buddha Jayanti | बुद्धजयंती निमित्त ‘नालंदा बुद्धविहारात’ कार्यक्रमांचे आयोजन

Categories
cultural पुणे

बुद्धजयंती निमित्त ‘नालंदा बुद्धविहारात’ कार्यक्रमांचे आयोजन

चतुश्रुंगी परिसरातील आनंद यशोदा सोसायटीतील “नालंदा बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी आयोजित करण्यात आलेल्या “बुद्धवंदना” कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे सचिव आयुष्यमान रमेश दुधगावकर यांनी भगवान गौतम बुद्ध तसेच डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जेष्ठ कार्यकर्ते सुभाष उबाळे यांनी सामूहिक वंदनेतर्गत “बुद्धवंदना”, म्हटली. त्यापाठोपाठ उपस्थितांनी सामूहिक बुद्धवंदना म्हटली,
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मंडळाचे माजी अध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले की,भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनात व एकूणच बौद्ध धम्मात “पौर्णिमेला”,अनन्यसाधारण विशेष महत्व आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात जन्म ते मृत्यू या कालावधीत अत्यन्त महत्वपूर्ण घटना या पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत.

प्रामुख्याने वैशाखी पौर्णिमेला अलौकिक महत्व आहे,कारण राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांचा जन्म,राजकन्या यशोधरेचा जन्म,राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिनय, सम्बोधी (ज्ञानप्राप्ती ), आणि महापरिनिर्वाण,या अत्यन्त महत्वपूर्ण घटनांमुळे वैशाखी पौर्णिमेस अलौकिक महत्व आहे.
भगवान गौतमबुद्ध यांनी आपल्या जीवनात सत्य,तार्किकता,कारनभाव,
चिकित्सक व वैज्ञानिक दृष्टिकोन,याला महत्व दिले तसेच दुःख,दुःखाचे कारण,दुखनिवारन,याकरिता आर्यष्टांगिक मार्ग याचे महत्व प्रमाण मानून मानवजातीला दुखमुक्तीचा मार्ग दाखविला आहे.
गौतमबुद्धांच्या धम्मउपदेशातून त्यांनी सत्याच्या कसोटीवर आपले सिद्धांत प्रमाण मानले. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी न्याय,बंधुता,एकात्मता,समानता,वैश्विक बंधुभाव आपल्या उपदेशातून दिले,त्यांच्या विचारधारेचा प्रभाव मानवकल्याणाचा असल्यामुळे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर “युद्ध नको,बुद्ध हवा”,याची निश्चित प्रचिती येते,त्यामुळे त्यांना ” विश्वशांतिदुत”,म्हटले जाते,असे संजय मोरे यांनी सांगितले.
नालंदा बुद्धविहारात विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून खऱ्या अर्थाने नालंदा बुद्धविहार हे समाजप्रबोधनाचे केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मा,दीपक सावंत,विनोद लोंढे,अशोक गायकवाड,सौ,नंदा सुभाष उबाळे,नामदेव गायकवाड,ज्ञानेश्वर बाबर,महादेव कांबळे,सुनील बनसोडे,डॉ, मनोज दुधगावकर,किरण दुधगावकर,किरण सरोदे,व अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते,तसेच परिसरातील नागरिक व फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी,जनवाडी, गोखलेनगर ,औंध,पाषाण याभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिपक सावंत यांनी केले,
बुद्ध जयंतीनिमित्त उपस्थितांना “खिरदान”,करण्यात आले,

Sanjay Raut : संजय राऊत यांची 5 मे ला पुण्यात तोफ धडाडणार!  : शिवसेनेची जाहिर मेळावा सभा 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

संजय राऊत यांची 5 मे ला पुण्यात तोफ धडाडणार! 

शिवसेनेची जाहिर मेळावा सभा

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना आणि भाजप या पूर्वीच्या मित्रपक्षांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे फायर ब्रॅन्ड नेते अशी ख्याती असलेले नेते खासदार संजय राऊत यांची पुणे शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ते काय बोलतात ? कोणावर आसूड ओढणार ? कोणाकोणाचा आवाज बंद करणार ? याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.

पुण्यात शिवसेनेची जाहिर मेळावा सभा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे. गुरूवारी 5 मे 2022 रोजी, सायं 5 वा  स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह रस्ता, माळवाडी हडपसर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिली आहे.

 गुरूवारी पुणे शहरात होणाऱ्या जाहीर मेळावा सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला शिवसैनिकां सोबतच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहणार आहेत.

Shivsena Pune : Agitation : कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ? : शिवसेना पुणे

Categories
Political पुणे महाराष्ट्र

कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ?

: शिवसेना पुणे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोशारी यांचा शिवसेना पुणे शहराचे वतीने जाहिर निषेध करून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

कोशारींनी दाखवली आपली अर्धवट होशारी, छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास आणि पराक्रम संपूर्ण देशाला माहिती आहे, परदेशात त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. राज्यपालांना महाराष्ट्रातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी छ शिवाजी महाराजांचा ज्वलंत ईतिहास व पराक्रमाची माहिती देउ शकेल. ती त्यांनी आत्मसात करावी. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवरायांचा कायम अपमर्द होत आहे. आणि ईतर राज्यामधे देखील त्यामधे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, कर्नाटक सरकार, केंद्रीय मंत्री, राज्यपाल भगतसिंग कोशारी, पुणे शहर भाजप यासर्वांनी छ शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांना दुय्यम दर्जाचे स्थान देण्याचा भाजप नेत्यांकडून कायम प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. कोशारींच्या वक्तव्यावर भाजप कडून राजीनामा घेतला जाणार का ? हे जाहिर करावे.

याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेवक संजय भोसले, पल्लवी जावळे, विशाल धनवडे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, मतदार संघ संपर्कप्रमुख रामभाऊ कदम, दिपक शेडे, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, उत्तम भुजबळ, प्रविण डोंगरे, संजय डोंगरे, उमेश गालिंदे, अनिल दामजी, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, राहुल जेकटे, जावेद खान, प्रसाद काकडे, योगेश पवार, नंदू येवले, संदिप गायकवाड, जगदिश दिघे, सागर बारणे, बाळासाहेब गरुड महिला आघाडीच्या सुनिता खंडाळकर, करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्वाती कथलकर, धनश्री बोराडे, वैशाली दारवटकर, जयश्री भणगे, अनुपमा मांगडे, युवा सेनेचे आकाश शिंदे, युवराज पारिख, सनी गवते, परेश खांडके, अक्षय फुलसुंदर उपस्थित होते.

Mahavikas Aghadi Pune Vs Modi Gov : मोदी सरकारच्या दडपशाहीला पुण्यातून महाविकास आघाडीचा विरोध

Categories
Political पुणे महाराष्ट्र

मोदी सरकारच्या दडपशाहीला पुण्यातून महाविकास आघाडीचा विरोध

 

पुणे :   केंद्र सरकारने (Central Government) ई.डी. (ED) च्या मार्फत महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सूडापोटी अटक केल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने ए. डी. कॅम्प चौक, नाना पेठ, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोदी सरकारच्या (Modi Government) दडपशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

     यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारने महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी मंत्र्यांना अटक करीत आहे. ई. डी., सी. बी. आय., इन्कम टॅक्स यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दडपशाही आणून भितीचे वातावरण निर्माण करीत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वारंवार केंद्रातील मोदी सरकारचा पर्दाफाश केल्यामुळे त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली. अशाच प्रकारे अल्पसंख्यांकावर अत्याचार करण्याचा मोदी सरकारने विडा उचलेला आहे. हाथरस आणि उन्नाव येथे सुध्दा दलित महिलांवर अत्याचार झाले. तेथील भाजप सरकारने या प्रकरणावर सुरूवातील कानाडोळा केला आणि नंतर जनतेच्या दबावामुळे आरोपींवर कारवाई केली. महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ शकले नाही याचा राग केंद्र सरकारला आहे. अशा प्रकारे मंत्र्यांना अटक करून महाराष्ट्रातील सरकारला पाडण्यासाठी कट रचत आहे.’’

     राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारचे ई.डी. खाते हे मोदी सरकारचे हस्तक म्हणून काम करीत आहे. अनेकांना चौकशीसाठी बोलावून त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना मानसिक त्रास द्यायचे काम ई.डी. खाते करीत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते ई.डी. ऑफिसमध्ये बसून महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात कट रचतात आणि त्याची अंमलबजावणी ई.डी. खाते करीत आहे. देशाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा कारभार कोणत्याही सरकारने केलेला नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यावर सूडापोटी देशातील विरोधकांच्या मुसकट दाबण्यासाठी सी. बी. आय., ई.डी. मार्फत कारवाया करीत आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तीव्र निषेध करतो.

     शिवसेना प्रमुख संजय मोरे म्हणाले की, ‘‘मोदी सरकारने या देशात अघोषित आणीबाणी आणली आहे. आपल्या राजकीय विरोधकांचा ई.डी., सी.बी.आय. मार्फत चौकशी लावून त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना बदनाम करण्याचे काम करीत आहे. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहे. या मुळ विषयांवरून लोकांची दिशाभुल करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करीत आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ई. डी. ने व सी.बी.आय. ने गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे अनंतराव अडसुळ, प्रताप सरनाईक व भावना गवळी यांच्यावर सुध्दा ई.डी. ने कारवाई केली आहे.

     मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अतिशय खंबीरपणाने राज्याचा कारभार सांभाळत आहे. किरीट सोमय्या हा भाजपाचा मोहरा आहे. आपली सत्ता येवू शकली नाही म्हणून सूडभावनेने महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठी हा खेळ खेळला जात आहे. जर केंद्र सरकारने अशा पध्दतीने कारवाई सुरू ठेवली तर शिवसैनिक आपल्या पध्दतीने त्यांना उत्तर देतील.’’

     यावेळी राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, जयदेव गायकवाड, अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी, सोनाली मारणे, अविनाश बागवे, रफिक शेख, पल्लवी जावळे, प्रदिप देशमुख, विशाल मलके, शिलार रतनगिरी, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सुनिल घाडगे, राहुल तायडे, विनय ढेरे, विवियन केदारी, मेहबुब नदाफ, रजनी त्रिभुवन, सुरेखा खंडागळे, अनुसया गायकवाड, जावेद खान, जुबेर शेख, भोलासिंग अरोरा, मुन्नाभाई शेख, मीरा शिंदे, अभिजीत महामुनी, बंडू नलावडे, सुमित डांगी, राधिका मखामले, कल्पना उनवने, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.