Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार! | चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार!

|  चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Pune – (The Karbhari News Service) – लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एकदिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भांडारी, आ. माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, समन्वय समितीचे प्रमुख तथा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशेलकर, शहर प्रमुख प्रमोदनाना भागगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या सह मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय रहावा. प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत, त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता असावी यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बारामती, शिरुर, आणि पुणे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक झाली. या बैठकीत माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये एनडीएला ४०० पार करुन माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं, यावर सर्वांचच एकमत आहे. आजच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकीनंतर प्रत्येक पक्षाचे नेते विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संपर्क करणार आहेत.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम हटविण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बूथवर मिळणाऱ्या मतांमध्ये ३७० मते अधिक मिळाली पाहिजेत, अशी सूचना पक्ष श्रेष्ठींनी केली आहे. त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची मतांची संख्या काढली, ती देखील ४०० पार करतील, आणि लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री तथा शिवसेना नेते विजयबापू शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, यांच्या सह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम शेतकरी संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे लवकरच बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तालुकानिहाय दौरा करणार असून, याद्वारे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Shivsena MLA Disqualification | शिवसैनिकांनी निकालाचे आतषबाजी करीत पुण्यात केले जल्लोषात स्वागत

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification | शिवसैनिकांनी निकालाचे आतषबाजी करीत पुण्यात केले जल्लोषात स्वागत

 

Shivsena MLA Disqualification | अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला शिवसेनेतील (Shivsena Eknath Shinde)  आमदार अपात्रतेचा निकाल आज लागला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत आलेल्या तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय (Pune Shivsena office)  येथे फटाक्यांची आतशबाजी करीत व महालक्ष्मी मंदिरात महाआरती करून मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. (Maharashtra Politics)

पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Pune Shivsena) म्हणाले की, “हा ऐतिहासिक निकाल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्थापित केलेले सरकार हे कायद्याद्वारे व संविधानिक तत्वाने स्थापन झालेले सरकार आहे. न्यायदेवतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, इथून पुढे सरकार अजून नव्या ऊर्जेने काम करेल.”

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकृतपणे काल संध्याकाळी 6 वाजता वाजता जाहीर केला. यामध्ये शिवसेनेतील सर्व आमदार पात्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेलं सरकार हे पूर्णपणे संविधानिक व कायद्याने बनलेले सरकार आहे असे जाहीर झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे, पक्षातील विविध पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत विजयाचा भव्य जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरविले गेले. तसेच, शिवसेनेच्यावतीने मोठ्या उत्साहात आतिषबाजी करत, मध्यवर्ती कार्यालय ते बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन इथपर्यंत भव्य मिरवणूक काढत, आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सवात सहभागी झाल्या

यावेळी संपर्क प्रमुख संजय मशिलकर, शिरूर लोकसभा निरीक्षक विकास रेपाळे, सहसंपर्क प्रमुख अजय बाप्पू भोसले, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, बाळासाहेब पोखरकर,सुरेंद्र जेवरे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, युवासेना सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर,शर्मिला येवले, महिला आघाडी शहर प्रमुख पुजाताई रावेतकर, माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश माझीरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, नवनाथ निवंगुणे, धनंजय जाधव, प्रमोद प्रभुणे, उपशहर प्रमुख सूरज परदेशी, गौरव साईनकर,सचिन थोरात, सुहास कांबळे, श्रुती नाझीरकर,श्रद्धाताई शिंदे, कांचन दोडे,मयूर पानसरे, आकाश शिंदे व शिवसेना, युवासेना सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, अंगिकृत संघटना व शिवसैनिक उपस्थित होते

Shivsena Pune | शिवसेना भवनात शेकडो तरुणांचा शिवसेना प्रवेशाचा वाढता ओघ

Categories
Breaking News Political पुणे

Shivsena Pune | शिवसेना भवनात शेकडो तरुणांचा शिवसेना प्रवेशाचा वाढता ओघ

Shivsena Pune | पुणे शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी जोर वाढला असून सारसबाग येथील शिवसेना भवन(Shivsena Bhavan Pune) येथे काल हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या शेकडो तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Shivsena city chief Pramod Bhangire) यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. (Shivsena Pune)

यावेळी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला पुढे घेऊन जाण्यासाठी व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या अध्यक्षपदी असलेल्या अभिजीत बोराटे यांना शिवसेना शहराच्या प्रवक्तापदी जबाबदारी देण्यात आली. तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुद्धा करण्यात आल्या. शहरात शिवसेनेचे पक्ष संघटन मोठ्या प्रमाणावर बळकट होत असून येत्या काही काळात शिवसेनेत विविध पक्षाचे मोठे पदाधिकारी सुद्धा प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच  शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले.

यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे, महिला शहर प्रमुख लीना ताई पानसरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, वैद्यकीय शहर प्रमुख अजय सपकाळ, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, राजाभाऊ भिलारे, श्रद्धा शिंदे ,सामाजिक कार्यकर्ता अमर घुले, विभाग प्रमुख हडपसर अक्षय तारू, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. काहीच दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या काही माजी नगरसेवकांनी ही शिवसेना पक्षात प्रवेश केला हे विशेष.

Pune News | Team CM च्या सदस्यांनी वाचवले सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे प्राण! 

Categories
Breaking News Political social पुणे

Pune News | Team CM च्या सदस्यांनी वाचवले सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे प्राण!

 

Pune  News | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.1) पुणे दौऱ्यावर (PM Narendra Modi Pune Visit) आले होते. पुणेकरांनी मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मोदींचा दौरा असल्याने पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा बंदोबस्त तैनात केला होता. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य केले. तसेच भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group) आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांना सहकार्य केले. याच दरम्यान शिवाजीनगर येथे झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक (Retired Police Inspector) गंभीर जखमी (Seriously Injured) झाले. यावेळी त्याठिकाणी उपस्थितीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीमचे प्रमुख सुधीर जोशी (Sudhir Joshi) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपघातात (Pune Accident News) जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांचे प्राण वाचवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे मेट्रो (Pune Metro) उद्घाटन सोहळ्यासाठी वडगाव शेरी मतदार संघातील भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीचे उपाध्यक्ष आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे (Retired PI Vitthal Surve) आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना त्यांना कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (Karnataka State Transport Corporation) बसने जोरदार धडक दिली. त्याचवेळी कार्यक्रमाला आलेले सुधीर जोशी आसनव्यवस्थेकडे जात होती. त्यांनी अपघात (Pune Accident News) पाहताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी विठ्ठल सुर्वे यांना तातडीने वैद्यकीय उपचार (Medical Treatment) मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.

त्याठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने होते. मात्र, कर्तव्यावर नियुक्त असल्याने त्यांनी मदत करण्यास असमर्थता दाखवली. यानंतर जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगाने हालचाली करत त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तज्ञ डॉक्टरंशी संपर्क करीत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. सुर्वे यांच्या मेंदूला मार बसल्याने वेळात वैद्यकीय उपचार मिळाल्याने सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे यांचे प्राण वाचले.

यावेळी आशुतोष शेंडगे, ऋषिकेश गोसावी, उपशहरप्रमुख सुधीर कुरूमकर यांनीही तातडीने मदत केली. विठ्ठल सुर्वे त्यांच्यावर संचेती रुग्णालयात (Sancheti Hospital) आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. शिवसेना (Shiv Sena) शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) आणि एकनाथ शिंदे सोशल फाउंडेशनतर्फे (Eknath Shinde Social Foundation) त्यांच्या उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.


News Title | Pune News | Members of Team CM saved the life of a retired police inspector!

 Pune Potholes | रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल | शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा इशारा

Categories
Breaking News PMC Political पुणे

 Pune Potholes | रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल | शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा इशारा

Pune Potholes | पुणे शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईल (Shivsena) आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी महापालिकेला (Pune Municipal Corporation) दिला आहे. (Pune Potholes)

भानगिरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे हे महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असून, आज पुणे शहरातील बहुतांश रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून जून महिन्यात पाउस झाला नसताना, जूलै महिन्यात फक्त पंधरा दिवसात झालेल्या पावसाने हे खड्डे पडले आहेत. पावसाळापुर्व केलेल्या कामाच्या माहितीत पुणे महानगरपालिकेतर्फे, आम्ही पावसळ्यात शहरात खड्डे पडू नये म्हणून ५५ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले होते, तरी फक्त १५ दिवसाच्या पावसाने पुण्यात रस्त्यावर खड्डे पडले आहेत.  या खड्डयामुळे दुचाकीचे शहर असलेल्या पुण्यात, दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. दुचाकींचे अनेक अपघात होत आहेत. चारचाकी वाहनांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. पादचाऱ्यांना देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आपणांस विनंती आहे की, येत्या १५ दिवसात पुणे शहर खड्डेमुक्त करावे, अन्यथा कायम समाजसेवेत तत्पर असलेल्या शिवसेनेतर्फे “शिवसेना स्टाईल” आदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही अनुचित घडल्यास पुणे महानगरपालिका जबाबदार असेल. असे ही निवेदनात म्हटले आहे.

———-
News Title | Pune Potholes | Fill the potholes on the road quickly otherwise there will be a Shiv Sena style protest City President Pramod Bhangire warned

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र संपादकीय

Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?

Maharashtra Politics | (Author: Ganesh Mule) | लोकशाहीचे (Democracy) जसे चार महत्वाचे स्तंभ आहेत, अगदी त्याचप्रमाणे आणि किंबहुना त्याहूनही महत्वाचा लोकशाहीचा आधार हा विरोधी पक्ष (Opposition Party) असतो. मात्र विकासाचे कारण देत तोच विरोधी पक्ष जर सत्ताधाऱ्या (Ruling Party) सोबत हातमिळवणी करून सत्तेत बसू लागला तर हा लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने अशाच गोष्टी घडत चालल्या आहेत. त्यामुळे युवकांचा (Youth) राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे आम्ही राजकारणात रोल मॉडेल (Roll Model) म्हणून कुणाकडे पाहायचे, असा संभ्रम राजकारणात येऊ पाहणाऱ्या आणि सर्वसामान्य युवकांना पडला आहे. (Maharashtra Politics)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. जे काही घडतं त्यामुळे लोक फक्त सुन्न होतात. सुरुवातीला भाजप (BJP) हा मोठा पक्ष असून देखील भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मुख्यमंत्री कुणाचा असणार, या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपचा हात सोडला. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेवर आली. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा सगळ्यात मोठा हात होता. काँग्रेस (INC), शिवसेना (Shivsena)आणि राष्ट्रवादीने (NCP) सत्ता स्थापन केली. मात्र हे सहन न झाल्याने आणि विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेल्या भाजपने कुरघोड्या करायला सुरुवात केली. यात सगळ्यात आघाडीवर होते ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). फडणवीस हे पवारांना शह देतात म्हणून त्यांची लोकप्रियता वाढू लागली होतीच. शिवाय त्यांना केंद्राकडून देखील साथ मिळत असल्याने त्यांचे महाराष्ट्रात वर्चस्व वाढत चालले होते. (Maharashtra Political Crisis)
मग फडणवीस यांनी आपले बुद्धिचातुर्य चालवत आणि गनिमी कावे करत शिवसेनेत उभी फूट पाडली. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना एकाकी पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडाने शिवसेना तर फुटलीच मात्र महाविकास आघाडीला देखील आपली सत्ता राखता आली नाही. मग भाजप आणि शिंदे यांनी ठाकरेंचं उरलं सुरलं देखील सगळं हिरावून घेतलं. बंडखोरी केलेली सगळी लोकं ही ED आणि तत्सम यंत्रणांना घाबरलेली होती. फक्त हेच लोक नाही तर काँग्रेस, उद्धव यांची सेना आणि राष्ट्रवादीतील लोकांच्या मागे देखील यंत्रणा लावल्या जात होत्या. कुठल्याही पद्धतीने दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करायचा हा चंग बांधून भाजपने कुरघोड्या सुरु ठेवल्या.
याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) नुकतेच बंड केले. विरोधी पक्षात असणारा राष्ट्रवादी मग  लगेच सत्ताधारी झाला. शरद पवारांना हे माहित होते कि नाही, हे पुढे उघड होईलच. मात्र या सगळ्या घटनांमुळे मात्र सर्वसामान्य लोक, युवक यांचा मात्र राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष जर सत्तेच्या दावणीला बांधला जात असेल तर लोकशाहीचा गाडा कसा टिकणार? लोकांच्या आशेचा किरण कोण असेल? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागले आहेत.
जे चाललंय ते सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे, हे याचमुळे. कारण काँग्रेस ला कंटाळून लोकांनी भाजपला मोठा पक्ष बनवलं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आपल्या आशेचा किरण मानलं. मात्र भाजपने लोकांच्या हिताची भूमिका घेतली असं दिसून येत नाही. भ्रष्टाचारी लोकांच्या मागे यंत्रणा लावल्या म्हणून लोकांना भाजपविषयी आदर वाटू लागला. पण कालांतराने भाजपने त्याच लोकांना आपल्या पक्षाचा आश्रय देत त्यांना मंत्री केलं. त्यामुळे लोकांना यातला नेमका बोध कळेना. तसेच शरद पवार यांचं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मक्तेदारी मोडून काढणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र त्यांच्या कुरघोड्या पाहता ते लोकांसाठी कमी आणि सत्तेसाठी चिटकून राहण्यासाठी सर्व गोष्टी करतात, हे लक्षात येऊ लागलं. शरद पवारांच्या नेहमीच्या बदलत्या भूमिकेमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. कालच्या प्रकरणात आपला हात नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी लोकं आता त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
सत्ताधाऱ्यांनी लोकांचं, लोक काय बोलतात यावर फार लक्ष द्यायचं नसतं आणि आपला अजेन्डा चालवायचा असतो, अशी एक रीत पडून गेली आहे. मात्र  विरोधी पक्षानं लोकांची बाजू घेऊन लोकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असतो, हे देखील सोयीस्कर रित्या विसरले जात आहे. अशा परिस्थितीत उत्साहाने राजकारणात येऊ पाहणाऱ्या नवख्या युवकांनी नेमकं कुणाला आदर्श मानायचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
यात लोकांनाच अग्रणी भूमिका घ्यायला हवीय. राजकारणातून आपला फार विकास होत नसतो, हे आता तरी लोकांनी लक्षात घ्यायला हवंय. आपला विकास आपल्यालाच करावा लागतो. आपल्याशिवाय आपल्याला कुणी वाचवू शकत नाही, हे सूत्र लक्षात घेऊन आणि राजकारणाकडे दुर्लक्ष करून लोकांनी स्वविकास करून घ्यायला हवाय.

सर्वच राजकीय पक्ष म्हणतात, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे पण युवा वर्गाने कोणाचा आदर्श घ्यावा हाच मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ज्यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्तिमत्वे कधी एका पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात हे वास्तव सद्यस्थितीत आहे आणि  पक्षाची ध्येयधोरणे काय ? या मुद्द्याला तिलांजली दिली जात असल्याचे वास्तवही आहे.त्यामुळे युवा वर्गाने राजकारणात यावे ही साद एकीकडे घातली जात आहे आणि दुसरीकडे जनहितासाठी आवश्यक असणारा विरोधी पक्ष कायमचा हद्दपार करण्याचे डावपेच सुरू आहेत त्यासाठी राजकारणात फोडाफोडीचे राजकारण तर खुलेआम होत आहे मात्र विकासाच्या नावाखाली स्वार्थ साधला जात असेल तर लोकहिताचा विचार कुणीच करत नाही असेच म्हणावे लागेल.

– हेमंत बागुल, काँग्रेस कार्यकर्ता.
——
Article Title | Maharashtra Politics |  If only the opposition parties want to sit with the rulers, how can the car of democracy survive?  And then who will be the role model of the youth in politics?

Hadapsar Devlopment Works | हडपसर आणि महंमदवाडी परिसरात विविध विकास कामांचे उदघाटन | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांचे विशेष प्रयत्न

Categories
Uncategorized

Hadapsar Devlopment Works | हडपसर आणि महंमदवाडी परिसरात विविध विकास कामांचे उदघाटन

| शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांचे विशेष प्रयत्न

Hadapsar Devlopment Works  | पुणे शहरातील हडपसर आणि महंमदवाडी परिसरात (Hadapsar and Mohammedwadi₹ मुख्यमंत्री विशेष निधीतून (CM Special Fund)  आणि शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे (Shivsena City President Nana Bhangire m) आणि शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांच्या विशेष प्रयत्नातून कोट्यवधी रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भव्य उदघाट्न आज होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.  शहर अध्यक्ष नाना भानगिरे (Nana Bhangire) यांनी ही माहिती दिली. (Hadapsar Devlopment Works)

ही होणार कामे

1. महंमदवाडी सर्वे नं. २५ व २६ मधून सर्वे नं, ५६ पर्यत जाणारा ३०व २४ मीटर चा .डि. पी रस्ता विकसित करण्यासाठी – २६ कोटी निधी

2. महंमदवाडी डि. पी. स्कुल ते हांडेवाडी कडे जाणाऱ्या
रस्त्यासाठी – १ कोटी ८० लक्ष निधी
3. हडपसर येथील सर्वे नं.७१/७२ मधील डि.पी रस्ता
विकसित करण्यासाठी – १ कोटी ५० लक्ष निधी
4.  महंमदवाडी तरवडेवस्ती येथील कै. दतोबा उर्फ आप्पा शंकर तरवडे पाझर तलाव येथे संत सृष्टी उभारण्यासाठी – २ कोटी निधी
5. वाडकर नळा येथील महात्मा ज्योतीराव फुले जलतरण तलाव विकसित करण्यासाठी -५० लक्ष निधी
6. महंमदवाडी व हडपसर विभागातील विविध सोसायटी मधील ड्रेनेज व रस्ते विकसित करण्यासाठी -४ कोटी निधी

महंमदवाडी व हडपसर येथील खालील ठिकाणी रस्त्याचे  व ड्रेनेज कामाचे  उद्घाटन
एसीपी वास्तु सोसायटी, सिद्धीविनायक बिहार सोसायटी, नमो बिहार सोसायटी गंगा व्हिलेज सोसायटी, सेलेना पार्क, चिंतामणीनगर, बडदे मळा, कृष्णानगर, कृष्णानगर, काळेपडळ, साठेनगर, साठेनगर, महंमदवाडी (पिरवाडी), महंमदवाडी (घुले बस्ती) संकेत पार्क, शुभारंभ सोसायटी, रुणवाल सोसायटी, सुबाश पार्क, रवी पार्क, जेन टाऊनशिप साडेसरानळी, ससाणे नगर, हिंगणे मळा, गाडीतळ हडपसर, शिवशंभो कॉलणी, फुरसुंगी, तारोडी, भेकराई, गजानन महाराज मंदिर, हडपसर, टक्कर बिहार, जय तुळजाभवानी, श्रमिक सहकार, गोधळेनगर, शनी मंदिर
—-
News Title | Hadapsar Development Works |  Inauguration of various development works in Hadapsar and Mahamadwadi area |  Special efforts of Shiv Sena city president Nana Bhangire

Pune News | Pramod (Nana) Bhangire) | पुणे शहरातील विविध मुख्य समस्या सोडवण्याबाबत प्रमोद भानगिरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune News | Pramod (Nana) Bhangire) | पुणे शहरातील विविध मुख्य समस्या सोडवण्याबाबत प्रमोद भानगिरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

| महापालिका आयुक्तांना आदेश देण्याबाबत केली विनंती

Pune News | Pramod (Nana) Bhangire | पुणे शहरात (Pune city) वाहतुककोंडी (Pune traffic) पासून रस्ता रुंदी (Road Widening)!पर्यंत  विविध समस्या भेडसावत आहेत. यामुळे शहरवासियांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे (Shivsena city president Pramod Bhangire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. तसेच या समस्या सोडवण्याबाबत पुणे महापालिका आयुक्तांना (PMC Pune Commissioner) आदेश देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली.  (Pune Municipal Corporation)
याबाबत प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी सांगितले कि  पुणे शहरात विविध ठिकाणी भेट दिल्या. नंतर तेथील समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या अतिशय गंभीर असून त्या समस्या लवकरात लवकर सोडवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पुणे शहरातील विविध मुख्य समस्या मार्गी लावण्यासाठी त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्ताना आदेश द्यावे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली आहे. (Shivsena city president Pramod Bhangire)

मुख्यमंत्र्यांकडे या समस्या मांडल्या

1) ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अवैध बांधकामांवर शास्ती रक्कम शर्तीच्या अधीन राहून माफ करून मूळ कराचा भरणा करण्यास शासनाने जो निर्णय दिला तसाच निर्णय पुणे महानगरपालिकेत घ्यावा.
2) पुणे शहरातील २४*७ पाणी पुरवठा प्रकल्पाला गती मिळावी.
3) पुणे शहरातील वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते त्यामुळे होणारे अपघात ही खूप मोठी समस्या आहे. मागील दोन दिवसापूर्वी एन आय बी एम महंमदवाडी-उंड्री रोड वर अरुंद व तीव्र उतार असल्यामुळे तेथे अपघात होवून दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.  अन्य चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ह्या रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

4) हडपसर येथील सोलापूर हायवे वर असलेला पूल हा बांधून देखील  वाहतूक कोंडी जशीच्या तशी आहे. त्यामुळे तो पूल पाडून नव्याने बांधण्यात यावा.

5) त्याचप्रमाणे मुंढवा-मगरपट्टा खराडी बायपास रोड वरील मुंढवा महात्मा चौक येथे मोठ्या प्रमाणात औद्योगीक परिसर असल्याकारणाने व तेथे पूल नसल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते, मांजरी-आव्हाळवाडी-वाघोली येथील रेल्वे रुळावारील रखडलेला पूल, मांजरी बु. येथील नदीवरील पूल नसल्या कारणाने नागरिकांना प्रचा वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे व काही नागरिक तर ह्या वाहतूक कोंडीमुळे तेथून पलायन करून दूसरा
पर्याय शोधत आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी व होणारे अपघात टाळण्यासाठी हे सर्व पूल व रस्ते रुंदीकरण लवकरात लवकर होणे खूप गरजेचे आहे.
6) तसेच पुणे महानगरपालिकेतील रस्तावर असणारे अनधिकृत धंदे हे पण बंद होणे गरजेचे आहे.मुंढवा ते केशव नगर येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फळ, भाज्या व इतर विक्रेते आपल्या हातगाड्या लावून वाहतुकीस अडचण निर्माण करत आहे त्यामुळे वाहतूक कोंडीस पाहता त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
7) PMPML च्या कर्मचार्यांना ७व्या वेतन आयोगाचे उर्वरित ५०% रक्कम जमा करण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व pmpml चे अध्यक्ष यांना आदेश देण्यात यावे.
8) उपरोक्त  संबंधित ठिकाणी महापालिका आयुक्त यांनी पाहणी करण्याच्या सूचना द्याव्यात.
—–
News Title | Pune News | Pramod (Nana) Bhangire) | Pramod Bhangire met the Chief Minister regarding solving various major problems in Pune city

Dr. Baba Adhaav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी

| महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

पुणे : “ महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा.बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा ‘, अशी मागणी पुणे शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे. आज पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे,उपप्रमुख डॉ.अमोल देवळेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन केले,त्यानंतर ही मागणी केली.यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही प्रसिद्धीस दिले आहे.गजानन थरकुडे,उत्तम भुजबळ,विशाल धनावडे,पल्लवी जावळे,पृथ्वीराज सुतार,बाळा ओसवाल,अशोक हरणावळ,संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच राष्ट्रवादी च्या एड. रुपाली पाटील-ठोंबरे उपस्थित होत्या .

‘गेली नऊ दशके अव्याहतपणे फुले विचारांची कास धरून सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे डॅा. बाबा आढाव हे खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस आहेत. फुले जयंती प्रसंगी बाबा आढाव यांच्यासारख्या ऋषितुल्य वक्तित्वाचा सन्मान करणे म्हणजे आपला प्रबोधनकारी वारसा जपणे होय.येणाऱ्या महाराष्ट्र दिनी बाबा आढावांचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार देऊन सन्मान व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे.या मागणीचा आदर करत सरकारने त्वरित तशी घोषणा करावी आणि समविचारी सर्व लोकांनी या संदर्भात तशी निवेदने माध्यमातून मुख्यमंत्री व सरकारकडे करावी’, असे या पत्रकात म्हटले आहे.

‘सत्यशोधक’ विचारांचा हा वारसा फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अमुल्य असा ठेवा आहे.महापुरूषांच्या प्रतिमेचा-कार्याचा गुणगौरव तर आपण त्यांच्या जन्मदिनी करतोच परंतू त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणे हिच त्यांच्याप्रति खरी कृतज्ञता ठरेल’, असे या पत्रकात म्हटले आहे.

Balbharati-Poud Phata road | बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध | वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध

| वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन

पुणे | महापालिकेकडून (PMC Pune) बालभारती-पौड फाटा रोड (Balbharti-Paud Fata Road) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या प्रकल्पाला शहरातील पर्यावरण प्रेमिकडून विरोध करण्यात येत आहे. भाजप मात्र या प्रकल्पाचे समर्थन करत आहे. आप आणि कॉंग्रेस ने या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यानंतर आता शिवसेना’ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivivsena) ने देखील या प्रकल्पाला विरोध केला आहे. वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन देण्यात आले आहे. अशी माहिती पक्षाचे नेते तथा माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिली आहे.
सुतार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना नुसार पुणे मनपा मार्फत बालभारती ते पौड रस्त्याचे काम व सुतारदरा (कोथरूड) ते पंचवटी (पाषाण) व जनवाडी (गोखलेनगर) हे दोन बोगदयांचे काम ३२० कोटी रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. या कामांसाठी पुणे शहरातील वेताळ टेकडी फोडण्यात येणार आहे. हे पुण्याच्या पर्यावरणाचा -हास करणारे आहे, ही टेकडी फोडल्यामुळे हजारो दुर्मिळ वृक्ष नष्ट होणार आहेत, पाण्याच्ये नैसर्गिक प्रवाह बंद होणार आहेत, उष्णता मोठया प्रमाणावर वाढणार आहे, तसेच भू-जल पातळीही मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सध्या जगभर ग्लोबल वार्मिंगमुळे अनेक संकटे जगावर येत आहेत, वेताळ टेकडी फोडून पुणेकरांना महानगरपालिका वेगळ्याच संकटात ओढत आहे. कोथरूडला जाण्यासाठी पर्यायी रस्ता हवा याबाबत आमची मागणी आहे. परंतु टेकडया फोडून,पर्यावरणाचा ऱ्हास करून, पुणेकरांना संकटात टाकून नाही.
वेताळ टेकडी वाचविण्यासाठी  १५ एप्रिल रोजी सायं ५ वा वेताळबाबा चौक, ते जर्मन बेकरी असे वेताळ टेकडी बचाव कृती समिती मार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये पुणेकरांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे. यासाठी कृती समिती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, गटनेते पृथ्वीराज सुतार, यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी उपशहरप्रमुख आनंद मंजाळकर, विभागप्रमुख प्रविण डोंगरे उपस्थित होते, या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, माजी पर्यावरणमंत्री, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार, संपर्कप्रमुख आमदार सचिनजी अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली, वेताळ टेकडी बचाव मोहिमेला  शिवसेना’ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समर्थन देण्यात आले आहे. १५ एप्रिलच्या जनजागृती अभियानात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. असे सुतार यांनी म्हटले आहे.