MLA Balasaheb Thorat | भाजपच्या बेभान, बेताल नेत्यांना वठणीवर आणावे लागेल |काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपच्या बेभान, बेताल नेत्यांना वठणीवर आणावे लागेल

|काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

| १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप

पुणे : “गेल्या काही वर्षात लोकशाही, राज्यघटना आणि महापुरुषांवर सातत्याने आघात होत आहेत. लोकशाहीचे मूल्ये, तत्वांना पायदळी तुडवले जात आहे. समाजात द्वेष पसरवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीचे, राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी, तरुणांसाठी राज्यघटनेच्या मूल्यांवर, तत्वांवर शिबिरे घेऊन जागृती करायला हवी,” असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे नेते बेभान झाले असून, त्यांना वठणीवर आणण्यासाठी निवडणुकीतून उत्तर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. (MLA Balasaheb thorat)

श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त (Soniya Gandhi Birthday) आयोजिलेल्या १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला. काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, गटनेते आबा बागुल, दत्ता बहिरट, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर,अविनाश बागवे, चंदुशेठ कदम, लता राजगुरू, मनीष आनंद, सुजाता शेट्टी, रफिक शेख, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, रजनी त्रिभुवन, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सिरसाट, भूषण रानभरे, शिवा मंत्री, कैलास गायकवाड, प्रवीण करपे, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, सतीश पवार, रमेश सकट, राजेंद्र भुतडा, अजित जाधव, सुनील धाडगे, चंद्रशेखर कपोते, रतनगिरी शिलार, प्रशांत सुरसे, रामदास मारणे, भरत सुराणा, बाळासाहेब अमराळे, भीमराव पाटोळे, बाळासाहेब मारणे, भगवान धुमाळ, ऍड. शब्बीर खान, सीमा सावंत, स्वाती शिंदे, प्राची दुधाने, रमेश पवळे, किशोर मारणे, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, जया किराड, गौरव बोराडे, कान्होजी जेधे, अजय पाटील, अस्लम बागवान, निलेश बोराटे, द. सु. पोळेकर, रेखाताई घलोत, अनुसया गायकवाड, साहिल केदारी, विशाल मलके, श्रीकृष्ण बराटे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ‘युपीए’ सरकारने सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. मुक्त अर्थव्यवस्थेला चालना दिली. माहिती अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा योजना, रोजगार हमी योजना अशा लोकोपयोगी निर्णय घेतले गेले. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मोहन जोशी या सप्ताहाद्वारे करत आहेत. सलग १८ वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचे काम केवळ मोहन जोशी करू शकतात. भारत जोडो यात्रेला ते माझ्याबरोबर सहसमन्वयक म्हणून काम पाहत होते. त्यांचे काम एखाद्या लॅपटॉपप्रमाणे आहे. सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते अपडेट असतात. पक्षासाठी एकनिष्ठ व कर्तव्य भावनेने करत असलेल्या मोहन जोशी यांचे कार्य कौतुकास्पद आहे.”

“आज देशात वेगळी परिस्थिती आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे चुकीचे निर्णय लादले गेले. त्यातून महागाई वाढत आहे. स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना सुरु आहे. प्रकल्प गुजरातला जाताहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज दडपशाहीची भाषा वापरात आहेत. राज्यातील सरकार, मुख्यमंत्री त्यावर बोलत नाही. याउलट छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचा अवमान करण्याची चढाओढ भाजप त्यांच्या नेत्यांमध्ये लागल्याचे दिसते. त्यामुळे बेताल आणि बेभान वागणाऱ्या भाजपचा बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल,” असे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशासाठी कठीण असणाऱ्या या कालखंडात राहुल गांधी पायी चालत महागाई, बेरोजगारी, द्वेषभावना याला वाचा फोडत आहेत. सामान्यांचा, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम या यात्रेतून होत आहे. हजारोंच्या संख्येने लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. एका चांगल्या हेतूने देशहितासाठी निघालेल्या राहुल गांधींच्या यात्रेमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. देशवासियांना आशेचा किरण दाखवण्याचे काम या यात्रेने केले आहे. गुजरातमध्ये भाजपाला चांगल्या जागा मिळाल्या असल्या, तरी त्यांचा नैतिक पराभव तिथे झाला आहे. आप, एमआयएम पक्षाने काँग्रेसची मते खाल्ल्याने भाजपाला गुजरातमध्ये यश मिळाले. मात्र हिमाचलमध्ये काँग्रेस आणि दिल्लीमध्ये आप पक्षाला मिळालेला वीज भाजपाला जनतेने दाखवलेला लाल कंदील आहे,”

प्रास्ताविकात मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi)  यांनी सप्ताहात झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मोहन जोशी म्हणजे, “श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २ ते ९ डिसेंबर या कालावधीत हा अठरावा सप्ताह उत्साहात साजरा झाला. शहराच्या विविध भागात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. आरोग्य शिबिरे, शालेय साहित्याचे वाटप, शिष्यवृत्तीचे वाटप, जनजागृतीचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी यंदा हा सप्ताह एका वेगळ्या उंचीवर गेला आहे.”

आबा बागुल, कैलास कदम यांनीही मनोगते व्यक्त केली. वीरेंद्र किराड यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र धंगेकर यांनी आभार मानले.

Dr. Ganesh Devi | ‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

– अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत ‘भारत जोडो’ महाराष्ट्रातील यात्रेच्या छायाचित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन

पुणे : “राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी १०२ वर्षांपूर्वी देशभर झपाटून प्रवास केला. हजारो अनुयायांना स्वातंत्र्यसंग्रामात आणले. आज राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेतून (Bharat Jodo Yatra) तितक्याच झपाट्याने प्रवास करताहेत. देशातील द्वेष संपवून समाजाला जोडण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रेमुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल. तसेच सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक उद्देशाने निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतुन काँग्रेसही उभारी घेईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी (Dr Ganesh Devi) यांनी केले.

श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’ पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (दि. ९) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Fomer MLA Mohan Joshi) होते. यावेळी सौ. देवी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावर, माजी मंत्री रमेश बागवे, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, राजस्थान काँग्रेसचे नेते जुगल प्रजापती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे आदी उपस्थित होते.

डॉ. गणेश देवी म्हणाले, “महात्मा गांधींचा जो झंजावात होता, तोच झंझावात राहुल गांधींच्या यात्रेत दिसत आहे. आपल्या हातून झालेल्या चुकांचा पश्चाताप करण्याची ही वेळ आहे. मात्र, या कठोर तपश्चर्येतून समाजातील तणाव, दुरावा दूर करून समाज व देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. भाजपच्या धोरणामुळे समाज विभागाला जात आहे. हे थांबवण्यासाठी द्वेषमुक्तीचा हा लढा अधिक विस्तृत व्हायला हवा. त्यासाठी भारत जोडो यात्रेत प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे. आजचा अंधार दूर करून उद्याची पहाट उजाडणार, हा आशावाद या यात्रेने दिला आहे.”

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “देशाच्या इतिहासात ‘भारत जोडो’ यात्रा एक महत्त्वाची घटना आहे. दोन आठवडे ही यात्रा महाराष्ट्रातून गेली. या देदीप्यमान यात्रेत अनेकांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे या छायाचित्र प्रदर्शनातून ही यात्रा पुणेकरांना अनुभवता येईल. निवडक २०० छायाचित्रातून ही चित्ररूपीयात्रा साकारली आहे.”

जयंत आसगावकर म्हणाले, “मोहन जोशी यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या या सप्ताहाचे सातत्य खूप महत्वाचे आहे. राहुल गांधी झपाट्याने काम करताहेत. द्वेषभावना संपवण्याचे ध्येय घेऊन चालत आहेत. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक लोकांनी यात सहभागी होऊन एकजूट दाखवावी. यातून तरुण कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे.”

गजानन आमदाबादकर म्हणाले, “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भविष्याची नांदी आहे. शेतकरी या देशाचे चित्र बदलू शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करताहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेताहेत. त्यामुळे शेतकरी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. आपल्या मुलांच्या मनात द्वेष पसरवण्याचे काम होतेय, हे थांबले पाहिजे.”

अजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.

Service Duty Dedication Week | द्वेषाने विखुरलेल्या भारताला जोडण्याचे काम राहुल गांधी ‘भारत जोडो’ पदयात्रेतून करताहेत | जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

द्वेषाने विखुरलेल्या भारताला जोडण्याचे काम राहुल गांधी ‘भारत जोडो’ पदयात्रेतून करताहेत

| जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन

|गांधी परिवार, काँग्रेसला त्यागाची मोठी परंपरा

|भारतीय संविधान, काँग्रेस विचारांमुळे देश एकसंध

 

पुणे : “गांधी परिवार, (Gandhi Family) काँग्रेसला (Congress) त्यागाची मोठी परंपरा आहे. काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची, आपलेपणाची आहे. देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय संविधान आणि काँग्रेसची हीच विचारधारा आवश्यक आहे. आज द्वेषाने विखुरलेल्या देशाला जोडण्याचे काम राहुल गांधी (Rahul Gandhi)  भारत जोडो पदयात्रेतून (Bharat Jodo yatra)  करत आहेत,” असे प्रतिपादन माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केले. (Indian National congress, INC, INC Pune)

सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हासदादा पवार, सप्ताहाचे संयोजक, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, दत्ता बहिरट आदी उपस्थित होते. (Former MLA Mohan Joshi)

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर आपण बोलले पाहिजे. हृदयाची आणि प्रेमाची भाषा, संवाद गरजेचा आहे. आज राहुल गांधी तेच करत आहेत. स्वत्व विसरून काम करणाऱ्या राहुल गांधींचा त्याग आपण लक्षात घ्यायला हवा. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी जो त्याग केला, त्याच वाटेवर राहुल गांधी चालत आहेत. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम ते करत असल्याने त्यांच्याविषयी जनतेमध्ये प्रेम, आस्था आहे. आपल्या पित्याच्या खुन्यांना क्षमा करण्याची त्यागभावना केवळ राहुल गांधींकडे आहे.”

“हा देश महात्मा गांधींचा आहे आणि त्या देशाची सद्भावनेची संस्कृती आहे. मात्र, गांधींना मारणाऱ्या त्याच नथुरामचे इथे होणारे उदात्तीकरण दुर्दैवी आहे. इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. चित्रपटांच्या माध्यमातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर होणार हल्ला आपण सहन करता कामा नये. शिवाजी महाराजांना देवत्व देऊ नये, त्यांचा कार्याचा आदर्श ठेवून काम करायला हवे. गांधी-आंबेडकर यांच्यातील संबंध खूप चांगले होते. त्यांच्यात मतभेद जरूर होते. मात्र, देशहितासाठी त्यांनी कायम एकत्रित काम केले. खरा इतिहास आपण नव्या पिढीला सांगितला पाहिजे. गांधी-नेहरू-आंबेडकर या तिघांनी दूरदृष्टीने देशाची रचना केली. अनेक संस्था निर्माण केल्या. इंदिरा गांधींनी देशाला सक्षम केले. काँग्रेसच्या विचारधारेतून हे सगळे झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने काय केले? हा प्रश्न विचारणाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहावा,” असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी मांडले.

उल्हासदादा पवार म्हणाले, “सेवा, कर्तव्य आणि त्यागाची गांधी घराण्याची परंपरा आहे. ‘भारत जोडो’ मधून खऱ्या अर्थाने ‘मन की बात’ होत आहे. सत्याची जाण नसलेल्या, खोटेपणाचा बुरखा पांघरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनतेने डोळे तपासणी करण्याची गरज आहे. एका वेगळ्या परीपेक्ष्यातून देश जात असताना आजच्या स्थितीत निर्भय लोकांची गरज आहे.”

स्वागत प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “समाजातील सर्व घटकांना जोडणारे विविध कार्यक्रम शहराच्या विविध भागात होत आहेत. अशा अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनियाजीना शुभेच्छा देण्याचा आमचा प्रयत्न करतो आहोत.”

अनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. वीरेंद्र किराड यांनी आभार मानले.
——————————-
सप्ताहाचे आव्हाडांकडून कौतुक
गेली १८ वर्षे मोहनदादा जोशी या सप्ताहाच्या माध्यमातून गांधी परिवाराच्या त्यागाची, सेवेची आणि कर्तव्यभावनेने केलेल्या कामाची परंपरा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. काँग्रेसच्या प्रेमाच्या, सद्भावनेच्या विचाराने समाजातील सर्व घटकांसाठी नाविन्यपूर्ण व उपयुक्त असे उपक्रम राबवत आहेत. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने दिलेल्या या कृतियुक्त शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी जोशी यांचे कौतुक केले.
——————————-
राज ठाकरे जातीद्वेष पसरवणारे
जाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचे काम राज ठाकरे यांच्याकडून वारंवार केले जात आहे. मग ते इतिहासाचे दाखले देऊन असो की, भोंग्याचा प्रश्न उपस्थित करून. शरद पवार यांनी कधीही जाती-धर्मात द्वेष पसरवण्याचे पाप केले नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालण्याची काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची विचारधारा आहे, असे कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

Congress Pune | स्मृती ईराणी यांच्या विरोधात पुणे महिला कॉंग्रेसचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

स्मृती ईराणी यांच्या विरोधात पुणे महिला कॉंग्रेसचे आंदोलन

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा  सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी घोषणा देऊन अपमान केला. स्मृती ईराणी यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन गोंधळ घातला. हातवारे करीत पूर्ण सदन डोक्यावर घेतले होते या कृत्याच्या निषेधार्थ आज महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे ‘माफी माँगो माफी मांगो स्मृती ईराणी माफी मांगो, भ्रष्टाचारीणी स्मृती ईराणी या घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.

      या प्रसंगी निषेध व्‍यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी म्हणाल्या की, ‘‘बेकायदेशिरपणे बार चालविणाऱ्या स्मृती ईराणीने आमच्या नेत्या मा. सोनियाजी गांधी यांच्याबद्दल माफी माँगो हे बोलणे हस्यास्पद आहे. सोनियाजी गांधी या त्यागमूर्ती असून देशाचे पंतप्रधान पद त्यांनी सोडून दिले. स्मृती ईराणी या स्वत: कोणत्या क्षेत्रातून आल्या आहेत आणि आपल्या मुलीला कोणत्या क्षेत्रात त्यांनी उभी केले आहे हे आधी त्यांनी पहावे. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांच्यावर टिका केलेली आम्ही कदापीही सहन करणार नाही. बीन संस्कारी सून स्मृती ईराणी जर पुण्यामध्ये आल्या तर आम्ही त्यांना पुण्यात फिरणे मुश्किल करू.’’

      यानंतर पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यावेळी म्हणाल्या, ‘‘संसदेमध्ये झालेला प्रकार हा निदंनीय आहे. आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर असून त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वागणूक झाली तर आम्ही कदापीही सहन करणार नाही. सोनियाजी गांधी या नुकत्याच आजारातून बाहेर पडलेल्या असताना ज्या पध्दतीने स्मृती ईराणी संसदेत त्यांच्याशी वागल्या हे बघितल्यावर लक्षात येते की, गोव्‍यामधील अवैध दारू व्‍यवसायात झालेल्य बदनामीला लपविण्यासाठीच हे कृत्य स्मृती ईराणी यांनी केले. त्यामुळेच आज पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्मृती ईराणी यांचा आम्ही ‘जोडो मारो आंदोलन’ करून निषेध करीत आहोत.’’

      यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, कमल व्‍यवहारे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रजनी त्रिभुवन, संगीता पवार, स्वाती शिंदे, सिमा सावंत, सुंदरा ओव्‍हाळ, ताई कसबे, नंदा ढावरे, पपिता सोनावणे, सुजाता नेमुर, प्रियंका रणपिसे, प्राची दुधाने, छाया जाधव, आयेशा शेख, सिमा महाडिक, प्राजक्ता गायकवाड, अंजू डिसुझा, अश्विनी गवारे, ॲड. रूकसाना पठाण, सुरेखा माने, रूकसाना शेख आदींसह असंख्य महिला कार्यकर्त्यां या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Congress | Pune | मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | पुणे काँग्रेसची टीका

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | काँग्रेसची टीका

केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा हुकूमशाही पद्धतीने वापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आज सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले याच्या निषेधार्थे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवार दि. 27 जुलै 2022 रोजी सकाळी १०.०० वा., डॉ आंबेडकर पुतळा येथे “शांततापूर्ण सत्याग्रह” करण्यात आला त्यावेळी पुणे शहर प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा बागवे, यांच्या सह इतर सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी ह्यांनी आंदोलनात निषेधात्मक भाषणात आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे मानसिक रोगी आहेत, त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांनी जे जे वचन जनतेला दिले होते त्याच्या बरोबर विरुद्ध करण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी जनतेला 2014 पेक्षा महागाई कमी करण्याचे वचन दिले होते पण आजारी मोदी हे ते विसरले आणि त्यांनी महागाई कमी करण्याऐवजी महागाई वाढवली, त्यांनी सांगितले होते की देशाची इज्जत वाढवेल त्या एवजी आजारी मोदी धडाधड सरकारी संपती विकत आहेत. आणि त्याच्या पुढे आत्ता त्यांना अजून एक रोग झाला आहे ते म्हणजे काही ही कारण नसताना गांधी घराण्यातील मंडळीना त्रास द्यायचा त्यालाच आधारून ईडी च्या माध्यमातुन राहुल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांना त्रास देण्याचे कार्य सुरू आहे..

आजारी असलेले मोदी हे घृणा पूर्ण तिरस्कारपूर्ण राजकारण करत आहेत पण आम्ही तिरस्कार घृणा करणार नाही कारण आम्ही गांधी विचारांची मंडळी आहोत त्यानुसार आम्ही परमेश्वराला अशी प्रार्थना करतो हे परमेश्वरा ह्या आजारी मोदी ह्यांना बरे कर, त्यांच्या मध्ये शिरलेला भस्मासुर राक्षस बाहेर काढ आणि त्यांना सद्बुद्धी दे….

त्यांच्या समोर फक्त देशातील 2 बिजनैस मन दिसत आहेत त्यांना 130 करोड़ जनता दिसत नाही. त्यांना असे वाटते की ते केवळ दोन उद्योजकांचे पंतप्रधान आहेत तरी परमेश्वरा त्यांना बुद्धी दे आणि स्मृती दे जेणेकरून त्यांना आठवेल की पंतप्रधान म्हणुन त्यांचे कार्य 130 करोड़ जनतेसाठी आहे केवळ दोघांसाठी नाही.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘नॅशनल हेराल्ड वर्तमान पत्राने स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहेत्याच वर्तमान पत्राच्या खोट्या प्रकरणात सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली जात आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्ष महागाईबेरोजगारी सारखे सामान्य माणसांचे प्रश्न हाताळत आहे. संसदेत व संसदेबाहेर काँग्रेस पक्ष भाजपा सरकारला जाब विचारत आहे त्यामुळे ईडीसारख्या कारवायांच्या माध्यमातून दबाव आणून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात आहे. सोनियाजी गांधी या देशातील गोरगरीब, सर्वसामान्य पिडीत, शोषित, वंचितांचा आवाज आहेत. त्या केंद्र सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नाही. लोकशाहीत विरोधकांना असा त्रास देण्याचे काम लोकशाहीला मारक आहे. सरकारविरोधात आवाज उठवणे हा लोकशाही परंपरेचा भाग आहे पण भाजपा सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे.’’

Congress Pune | महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे

     अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना केंद्रातील भाजपचे मोदी सरकार सूडबुध्दीने लक्ष करीत असून ईडीच्या चौकशीसाठी सातत्याने बोलवित आहेत. याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथील देशभक्त कै. केशवराव जेधे यांच्या पुतळ्याजवळ शांततापूर्ण बैठा सत्याग्रह करण्यात आला.

     यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने घेतलेले चूकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजकीय सूडबुध्दीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांना लक्ष करून ईडीच्या चौकशीसाठी बोलविले जात आहे. हे हुकूमशाही सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करीत असून या विरूध्द आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ज्या पध्दतीने केंद्रातील मोदी सरकार आमच्या नेत्या सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना ईडी चौकशी मार्फत त्रास देत आहे व काँग्रेस पक्षाला बदनाम करीत आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असावा असे काँग्रेस पक्षाला वाटते परंतु या ठिकाणी केंद्रातील भाजप सरकार हे हिटलरशाही पध्दतीने विरोधी पक्ष संपविण्याचे काम करीत आहे.’’

     यावेळी माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी, अविनाश बागवे आदींनी आपले विचार व्यक्त केले.     तसेच यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे, आबा बागुल, कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर, महिला अध्यक्षा पुजा आनंद, नगरसेविका लता राजगुरू, वैशाली मराठे, रफिक शेख, अजित दरेकर, नरेंद्र व्यवहारे, अण्णा राऊत, नीता रजपूत, रजनी त्रिभुवन, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, शोएब इनामदार, सतीश पवार, भरत सुराणा, अविनाश अडसुळ, प्रशांत सुरसे, शिलार रतनगिरी, राजू साठे, राहुल तायडे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, सिमा महाडिक, योगिता सुराणा, ॲड. निलेश बोराटे, राजू नाणेकर, उमेश कंधारे, रामविलास माहेश्वरी, विश्वास दिघे, भगवान कडू, बाळासाहेब प्रताप, रवि मोहिते, कान्होजी जेधे, शिवराज भोकरे, अक्षय माने, वैशाली परदेशी, अनुसया गायकवाड, वाल्मिक जगताप, सुरेश कांबळे, सचिन सावंत, चेतन आगरवाल, शाबीर खान, नर.सिंह आंदोली, हनुमंत राऊत, विक्रम खन्ना, बाबा सय्यद, हेमंत राजभोज, ॲड. अश्विनी गवारे, श्रीकृष्ण बराटे, अविनाश गोतारणे, रवि पाटोळे आदी उपस्थित होते.

     सत्याग्रहाचे सूत्रसंचालन द. स. पोळेकर यांनी केले तर आभार सचिन आडेकर यांनी मानले.

Rahul Gandhi | Pune congress | राहुल गांधीच्या समर्थनार्थ पुणे कॉंग्रेस कडून निदर्शने 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राहुल गांधीच्या समर्थनार्थ पुणे कॉंग्रेस कडून निदर्शने

केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसच्या अध्यक्षा  खा.‌ सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) दबाब आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचमुळे गेली ३ दिवस काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावून त्यांच्या अटकेसाठी मार्ग तयार करीत असून या अन्यायाविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रभारी  अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक येथे निदर्शने करण्यात आली.

     यावेळी बोलताना प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आमचे नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे नेतृत्व राहुलजी गांधी करतील या भीतीमुळेच नॅशनल हेरॉल्ड या चूकीच्या प्रकरणामध्ये मुद्दामून नाव बदनाम करून खोट्या गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असून पक्षाचा कार्यकर्ता कदापी शांत राहणार नाही, या विरोधात रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येथून पुढे करतील मोदी सरकारने चूकीच्या पध्दतीने राहुलजी गांधी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठ्या  प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला जाईल.’’

     यावेळी माजी आमदार रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड यांची यावेळी निषेधाची भाषणे झाली.

     यावेळी कमल व्यवहारे, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, संगीता तिवारी, पुजा आनंद, गोपाळ तिवारी, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, नारायण पाटोळे, सुनिल शिंदे, शिवा मंत्री, प्रदिप परदेशी, सतिश पवार, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, अजित जाधव, सचिन आडेकर, यासीन शेख, आबा जगताप, नितीन परतानी, साहील केदारी, मेहबुब नदाफ, सुरेश कांबळे, फैय्याज शेख, विश्वास दिघे, गुलाम हुसेन, प्रमोद निनिरिया, मुन्नाभाई शेख, परवेज तांबेळी, संजय अंभग, सेल्वराज ॲन्थोनी, संतोष आरडे आदींसह असंख्य काँग्रेस कार्येकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Soniya Gandhi | Rahul Gandhi | भाजपच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

भाजपच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार झाला नसताना काँग्रेस अध्यक्षा, खा. सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते, खा. राहुल गांधीना बदनाम करण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार दडपशाही करत आहे. परंतु, काँग्रेस त्यापुढे झुकणार नाही, असे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केंद्रातील मोदी सरकारचा निषेध मोहन जोशी यांनी केला आहे. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरुन काढण्यामागे गांधी कुटुंबियांना बदनाम करण्याचा डाव आहे. त्यातून ईडीमार्फत काँग्रेसचे नेते, खा. राहुलजींची चौकशी केली जात आहे. ही निव्वळ मनमानी आहे. नेहरु, गांधी कुटुंबाने स्वतःची संपत्ती देशाला दान दिली. देशासाठी बलिदान दिले. त्या कुटुंबाला ईडीमार्फत त्रास देणं संतापजनक आणि निषेधार्ह आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, रुपयाची घसरण, काश्मीरातील पंडितांची हत्या आणि पलायन या विषयांवरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार हे काँग्रेसच्या अध्यक्षा, खा. सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते, खा. राहुल गांधी यांच्यावर द्वेषभावनेतून कारवाई करत आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Soniya Gandhi | Congress | सोनिया गांधींची घोषणा  | कॉंग्रेस करणार ‘भारत जोडो यात्रा’

Categories
Breaking News Political देश/विदेश

सोनिया गांधींची घोषणा: कॉंग्रेस करणार ‘भारत जोडो यात्रा’

राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या चिंतन शिबिरातत बोलताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वतीने काश्मीर ते कन्याकुमारी अशी भारत जोडो यात्रा (National Kanyakumari to Kashmir Bharat Jodo Yatra) करण्यात येणार असल्याची घोषणा केली. 

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले की, गांधी जयंतीनिमित्त आम्ही 2 ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा’ सुरू करणार आहोत. या यात्रेत सर्व युवक व सर्व नेते सहभागी होणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, यावर्षी गांधी जयंतीपासून भारत जोडो यात्रा सुरू होईल. या प्रवासात आबालवृद्ध सर्व सहभागी होणार आहेत. यात्रेमुळे जातीय सलोखा राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावरही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उदयपूरच्या चिंतन शिबिरात घेतलेल्या निर्णयांवर लवकरच अमलबजावणी केली जाईल, असे सोनिया म्हणाल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याचे काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आम्ही मात करू, हा आमचा नवा संकल्प आहे.

Ghulam Nabi Azad : Congress : G 23 चे नेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

Categories
Breaking News Political देश/विदेश

G 23 चे नेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) हे आज दिवसभर काँग्रेस (Congress) नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसून आले. आज त्यांनी 10, जनपथ येथील पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या घरी जाऊन त्यांची देखील भेट घेतली. G-23 गटाने पाच राज्यांतील पराभवानंतर घेतलेली भुमिका आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गृहकलहादरम्यान, ही भेट महत्वाची मानली जातेय. आझाद यांच्या या भेटीगाठी नेमक्या कोणत्या हेतूनं सुरु आहेत, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नसल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सोनिया गांधी आणि गुलाम नबी आझाद यांच्यात काही दिवसांपूर्वीच फोनवर चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. G-23 नेत्यांच्या गटाने पाच राज्यांमध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षात संघटनात्मक बदल करण्याची भावना व्यक्त करत अनेक बैठका घेतल्या. तसंच काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक देखील काही दिवसांपूर्वी झाली होती. ही बैठक म्हणजे, आझाद यांच्या माध्यमातून, G-23 नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा गांधी परिवाराचा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जातंय. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या बैठकीनंतर गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्षपदाबाबत बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली.

 

दरम्यान, या बैठकीनंतर गुलाम नबी आझाद म्हणाले की, नेतृत्व बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबद्दलची चर्चा रविवारी झालेल्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत झाली होती. “नेतृत्वाबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीमती सोनिया गांधी यांनीच हा पदभार सांभाळावा असं वर्कींग कमिटीच्या बैठकीत आधीच ठरलेलं होतं. नेतृत्व हा मुद्दा नाही, श्रीमती गांधींनी अध्यक्षपद सोडावं असं कोणीही म्हटलेलं नाही. आमच्याकडे फक्त काही सूचना होत्या, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या” असं आझाद म्हणाले.G-23 चे नेते म्हणून आपण सोनिया गांधींना कोणते बदल सुचवले? असा प्रश्न विचारला असता, आझाद म्हणाले, “काँग्रेस हा एक पक्ष आहे आणि सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, बाकीचे आम्ही सर्वजण नेते आहोत. अंतर्गतरित्या केलेल्या शिफारसी सार्वजनिकरित्या सांगता येणार नाही.”