BJP Mahila Aghadi | स्व. सुषमा स्वराज अवॉर्डने ‘ती’चा सन्मान

Categories
Breaking News Political social पुणे

स्व. सुषमा स्वराज अवॉर्डने ‘ती’चा सन्मान

पुणे: आपल्या कुटुंबापासून ते देश सांभाळण्याची अविरत शक्तीचे उदाहरण असलेल्या स्त्री शक्तीला सलाम करत समाजातील उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा भाजप महिला आघाडीच्या वतीने पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर व भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक हे प्रमुख उपस्थित होते.

भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चनाताई तुषार पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात अनुरागजी ठाकूर यांनी महिलांच्या कामाचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर महिलांचा सन्मान यावेळी संपन्न झाला. सांस्कृतिक आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी यावेळी प्रमुख उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहित केले. यावेळी नव्या निवडीबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पुण्याच्या प्रभारी अलका शिंदे, अपर्णा गोसावी, सर्व मंडलाध्यक्षा विनया बहुलीकर, हर्षदा फरांदे, स्वाती कुरणीक, ममताताई दांगट, अश्विनी पांडे या उपस्थित होत्या. सर्व कार्यकारिणी, पदाधिकारी व सहकारी उपस्थित होत्या.
भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला.

Thomas Cup 2022 | Badminton | थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघासाठी केंद्राकडून 1 कोटीचं बक्षीस

Categories
Breaking News Sport देश/विदेश

थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघासाठी केंद्राकडून 1 कोटीचं बक्षीस

नवी दिल्ली : भारतीय पुरूष बॅडमिंटन (Badminton) संघाने 14 वेळा थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करत इतिहास रचला. यापूर्वी गेल्या 70 वर्षात भारताच्या कोणत्याही संघाला थॉमस कपची फायनल गाठता आली नव्हती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर राजकीय वर्तुळातून भारतीय पुरूष बॅडमिंटन संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच शुभेच्छांच्या वर्षावात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Sports Minister Anurag Thakur) यांनी या संघाला 1 कोटी (1 Crore) रूपयांचे बक्षीस जाहीर केले.

भारताने इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कप फायनलमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पहिल्याच फायनमध्ये भारतीय पुरूष संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. भारताने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा परावभ केला. भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. भारत यापूर्वी थॉमस कपमध्ये 1952, 1955 आणि 1979 मध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचला होता. तर महिला बॅडमिंटन संघाने 2014 आणि 2016 ला उबर कपच्या अंतिम चार संघात प्रवेश केला होता.दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून 1 कोटी रूपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. ठाकूर यांनी ट्विट केले की, ‘भारतीय संघाने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियचा 3-0 असा पारभव केला. भारताने पहिल्यांदाच थॉमस कप पटकावला. भारतीय क्रीडाविभागाला या दैदिप्यमान विजयानंतर संघासाठी 1 कोटी रूपये बक्षीस जाहीर करताना आनंद होत आहे. आम्ही यासाठी नियमात शिथीलता देत आहोत.’भारताच्या विजयी संघात लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत, एचसी प्रणॉय, दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिरा शेट्टी यांचा समावेश आहे.