Supriya Sule Baramati Loksabha | या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री | सुप्रिया सुळे

Categories
Breaking News Political पुणे

Supriya Sule Baramati Loksabha | या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री | सुप्रिया सुळे

Supriya Sule Baramati Loksabha- (The Karbhari News Service) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP- Sharadchandra Pawar) या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित असणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच त्या म्हणाल्या कि या लढतीत माय बाप जनता माझ्या सोबत राहील याची मला खात्री आहे. (Baramati Loksabha Constituency)

याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर, सुषमा अंधारे, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, दाैंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे आदरणीय पवार साहेब व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे. मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री आहे.”

तत्पूर्वी त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन मी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Mahavikas Aghadi Pune | रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे  एकाच वेळी अर्ज भरणार!

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Pune | रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे  एकाच वेळी अर्ज भरणार!

|  १८ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे पुण्यात शक्तिप्रदर्शन

 

Mahavikas Aghadi Pune – (The Karbhari News Service) – महाविकास आघाडीचे उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule Baramati Loksabha Constituency), शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe Shirur Loksabha Constituency) व पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune Loksabha Constituency) हे तीनही उमेदवार गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी महाविकास आघाडीच्या (Mahaviaks Aghadi Pune) वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. (Pune Loksabha Election)

दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे  सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे,  रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर रास्ता पेठेतील हॉटेल शांताई समोर महाविकास आघाडीची भव्य सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके हे दिग्गज नेते पुण्यातून विजयाचे रणशिंग फुंकणार आहेत.

Javed Akhtar | Shabana Azami | महिलेला स्वतंत्र विचार करू द्या , तिला सन्मानाची वागणूक द्या

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Javed Akhtar | Shabana Azami | महिलेला स्वतंत्र विचार करू द्या , तिला सन्मानाची वागणूक द्या

Javed Akhtar | Shabana Azami | महिलांना कोणत्याही क्षेत्रात कमी न लेखता त्यांना बरोबरीची आणि सन्मानाची वागणूक देण्याची गरज असून महिलांचे युग आले आहे, अशा शब्दात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी आपले मत मांडले. प्रत्येक क्षेत्रात मोठमोठ्या पदावर त्या काम करू लागल्या आहेत. त्यांना आदर नाही, तर एक व्यक्ती म्हणून बरोबरीचे स्थान देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले. शबाना आझमी (Sbabana Azami) यांनी यावेळी बोलताना महिला ही घरातील एक गरज आहे म्हणून न बघता ती एक स्वतंत्र व्यक्ती असून तिलाही स्वतंत्र विचार करू द्यायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Javed Akhtar | Shabana Azami)

महिला धोरण यशस्वी झाले याचे समाधान |  शरद पवार

संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणलं. ते आज यशस्वी झालेलं पाहून नक्कीच समाधान वाटत आहे, अशा शब्दात खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी, साहित्य, उद्योजकता,  सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सहा यशस्विनींना आज प्रख्यात लेखक आणि कवी जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते यशस्विनी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सांगली येथील डॉ. सुनिता बोर्डे यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, सातारा येथील भारती नागेश स्वामी यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’,  पुणे येथील लक्ष्मी नारायणन यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, ठाणे येथील शर्मिला प्रभाकर कलगुटकर यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, नांदेड येथील राजश्री पाटील यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’ तर नाशिक येथील शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सन्मानपत्र, यशवंतराव चव्हाण यांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
खासदार श्रीनिवास पाटील, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौझिया खान, सुरेखा ठाकरे, उषा दराडे, आशा मिरगे, अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप, विद्या चव्हाण, अजित निंबाळकर, सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले, राजलक्ष्मी भोसले, वैशाली नागवडे, मृणालिनी वाणी, भारती शेवाळे, कविता आल्हाट, लोचन शिवले, वासंती काकडे, आमदार, राज्यातील चव्हाण सेंटरचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच राज्यभरातून आलेल्या महिला भगिनी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
खासदार शरद पवार यांनी यावेळी बोलताना राज्यात महिला धोरण आणताना झालेला विरोध, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्या सर्वांवर मात करत महिला धोरण कसे लागू केले आणि हळूहळू त्यांचा तो निर्णय कसा लोकांना आवडू लागला यावर सविस्तर विवेचन केले. देशाचे संरक्षण मंत्री असताना संरक्षण दलातही महिलांसाठी खास आरक्षण ठेवण्याची गरज आणि त्यानुसार नियोजन कसे केले. आणि आजमितीला संरक्षण दलात महिला अधिकारी कशा कामगिरी बजावत आहेत. हवाई दलातील अपघातांचे प्रमाण महिलांमुळेच कसे कमी झाले, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुरस्कारार्थी सहाही यशस्विनीनी यावेळी पुरस्काराप्रती आपल्या भावना व्यक्त करतानाच त्या त्या क्षेत्रात त्या करत असलेल्या कामांची माहिती दिली. सेंटरचे पुणे केंद्र सचिव अंकुश काकडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. मनाली भिलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
—-
News Title | Javed Akhtar  Shabana Azami |  Let the woman think independently, treat her with dignity

NCP president Sharad Pawar | महाराष्ट्र की राजनीति में इतने अहम क्यों हैं शरद पवार?

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र हिंदी खबरे

NCP president Sharad Pawar | महाराष्ट्र की राजनीति में इतने अहम क्यों हैं शरद पवार?

| शरद पवार कितनी बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं?  (How many times Sharad pawar was CM of Maharashtra?)

 NCP president Sharad Pawar | शरद पवार एक प्रमुख भारतीय राजनीतिज्ञ और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के संस्थापक हैं।  वह पांच दशकों से अधिक समय तक भारतीय राजनीति में एक प्रमुख व्यक्ति रहे हैं और भारत सरकार में कई महत्वपूर्ण पदों पर रहे हैं, जिसमें महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में चार कार्यकाल शामिल हैं। NCP president Sharad Pawar
 शरद पवार का जन्म कब हुआ था?  (How old is Sharad pawar?)
  12 दिसंबर 1940 को महाराष्ट्र के एक छोटे से शहर बारामती में जन्मे, पवार ने 1960 के दशक के अंत में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के सदस्य के रूप में अपना राजनीतिक जीवन शुरू किया।  वह पहली बार 1967 में महाराष्ट्र विधान सभा के लिए चुने गए और कांग्रेस पार्टी में विभिन्न पदों पर रहे।
  शरद पवार ने एनसीपी क्यों स्थापित की?  (Why Sharad pawar formed NCP?)
  1999 में, शरद पवार ने भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से नाता तोड़ लिया और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन किया।  एनसीपी एक क्षेत्रीय राजनीतिक दल है जो मुख्य रूप से महाराष्ट्र राज्य में काम करता है, लेकिन इसने भारत के अन्य राज्यों में भी अपनी पैठ बना ली है।
 शरद पवार जिन्होंने किस क्षेत्र में काम किया?
  शरद पवार महाराष्ट्र के विकास में एक महत्वपूर्ण व्यक्ति हैं, खासकर कृषि और उद्योग में।  उन्होंने 2005 से 2008 तक भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) के अध्यक्ष के रूप में भारत में क्रिकेट के विकास में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई।
  वर्षों से, पवार कई प्रमुख राजनीतिक गठबंधनों का हिस्सा रहे हैं और उन्होंने भारत के राजनीतिक परिदृश्य को आकार देने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है।  उन्होंने भारत सरकार में रक्षा मंत्री, कृषि मंत्री और उपभोक्ता मामले, खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्री के रूप में कार्य किया है।  उन्होंने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद (आईसीसी) के अध्यक्ष के रूप में भी काम किया है।
 महाविकास अघाड़ी में शरद पवार का क्या योगदान है?
  शरद पवार को भारतीय राजनीति की गहरी समझ के साथ एक चतुर और चतुर राजनेता के रूप में जाना जाता है।  उन्हें अक्सर सर्वसम्मति निर्माता के रूप में वर्णित किया गया है और सफल गठबंधन बनाने के लिए विभिन्न राजनीतिक दलों और नेताओं को एक साथ लाने में सक्षम हैं।
  हाल के वर्षों में, पवार भारत की सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी (भाजपा) के खिलाफ एकजुट विपक्ष बनाने के प्रयासों में सक्रिय रूप से शामिल रहे हैं।  वह विभिन्न विपक्षी दलों को एक साथ लाने और भाजपा के खिलाफ एक संयुक्त मोर्चा बनाने के उद्देश्य से कई बैठकों और चर्चाओं में सबसे आगे रहे हैं।
  शरद पवार भारत में एक राजनीतिक दिग्गज नेता हैं और उनका प्रभाव महाराष्ट्र से बाहर तक फैला हुआ है।  उनके राजनीतिक कौशल और भारत के विकास के प्रति प्रतिबद्धता के लिए उनका व्यापक रूप से सम्मान किया जाता है।  अपने अस्सी के दशक में होने के बावजूद, पवार भारतीय राजनीति में एक सक्रिय और प्रभावशाली व्यक्ति बने हुए हैं और भारतीय राजनीति में उनके योगदान को हमेशा याद किया जाएगा।
 —-
 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन कब हुआ था?  (When was national congress party formed?)
 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) भारत में एक क्षेत्रीय राजनीतिक दल है, जो मुख्य रूप से महाराष्ट्र राज्य में काम कर रही है।  पार्टी की स्थापना 1999 में प्रमुख भारतीय राजनीतिज्ञ और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री शरद पवार ने की थी।  (शरद पवार)
 |  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन कैसे हुआ?  (How was NCP formed?)
  राकांपा का गठन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस में विभाजन का परिणाम था, वह राजनीतिक दल जिसका पवार कई वर्षों से हिस्सा थे।  1990 के दशक के अंत में, सोनिया गांधी की नेतृत्व शैली से महाराष्ट्र के कुछ कांग्रेस नेताओं में असंतोष बढ़ रहा था, जिन्होंने अपने पति राजीव गांधी की हत्या के बाद पार्टी अध्यक्ष का पद ग्रहण किया था।
 शरद पवार ने कांग्रेस पार्टी क्यों छोड़ी?
  पवार सहित कुछ कांग्रेस नेताओं ने पार्टी के भीतर सत्ता के केंद्रीकरण पर नाराजगी जताई और महसूस किया कि क्षेत्रीय नेताओं के विचारों को नजरअंदाज किया जा रहा है।  युवा नेताओं को मौके नहीं मिलने से पार्टी के भीतर भी असंतोष का माहौल था।
 एनसीपी की स्थापना किसने की?  (Who formed ncp in 1999?)
  1999 में, पवार और तारिक अनवर और पी.  एक।  संगमा ने कई अन्य कांग्रेस नेताओं के साथ कांग्रेस से अलग होने और महाराष्ट्र के लोगों की जरूरतों के प्रति अधिक संवेदनशील एक नई राजनीतिक पार्टी बनाने का फैसला किया।
  एनसीपी को आधिकारिक तौर पर 25 मई 1999 को लॉन्च किया गया था, जिसके संस्थापक और अध्यक्ष पवार थे।  पार्टी के संस्थापक सदस्यों में महाराष्ट्र के अन्य प्रमुख राजनेताओं में छगन भुजबल, प्रफुल्ल पटेल और अजीत पवार शामिल थे।
  एनसीपी का गठन महत्वपूर्ण था क्योंकि यह पहली बार था जब भारत में मौजूदा राजनीतिक ढांचे के बाहर एक प्रमुख राजनीतिक दल का गठन किया गया था।  पार्टी किसी भी प्रमुख राष्ट्रीय राजनीतिक दल जैसे कांग्रेस, भारतीय जनता पार्टी (बीजेपी) या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआई) से संबद्ध नहीं थी।
 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अवधारणाएं और नीतियां क्या हैं?  (What is the concept of ncp and ideology of ncp?)
  शुरुआती दिनों में, एनसीपी ने एक मजबूत संगठनात्मक संरचना बनाने और महाराष्ट्र में अपना राजनीतिक आधार विकसित करने पर ध्यान केंद्रित किया।  पार्टी ने अपने राजनीतिक प्रभाव को बढ़ाने के लिए अन्य क्षेत्रीय दलों के साथ गठबंधन बनाने का काम किया।
—–

NCP president Sharad Pawar | शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे महत्व का आहे? 

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

NCP president Sharad Pawar | शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे महत्व का आहे?

| शरद पवार किती वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते? (How many times Sharad pawar was CM of Maharashtra?)

NCP president Sharad Pawar | शरद पवार हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) चे संस्थापक आहेत.  ते पाच दशकांहून अधिक काळ भारतीय राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत आणि त्यांनी भारत सरकारमध्ये चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
शरद पवार यांचा जन्म कधी झाला? (How old is Sharad pawar) 
 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील बारामती या छोट्याशा शहरात जन्मलेल्या पवार यांनी 1960 च्या उत्तरार्धात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.  1967 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि त्यांनी काँग्रेस पक्षात विविध पदे भूषवली.
 शरद पवार यांनी NCP ची स्थापना का केली? (Why Sharad pawar formed NCP?) 
 1999 मध्ये शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.  NCP हा एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे, परंतु भारतातील इतर राज्यांमध्येही त्याने प्रवेश केला आहे.
शरद पवार यांनी कोण कोणत्या क्षेत्रात काम केले? 
 शरद पवार हे महाराष्ट्राच्या विकासात विशेषत: कृषी आणि उद्योगक्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे.  2005 ते 2008 या कालावधीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भारतातील क्रिकेटच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
 गेल्या काही वर्षांत पवार अनेक प्रमुख राजकीय आघाड्यांचा भाग राहिले आहेत आणि त्यांनी भारताच्या राजकीय परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  त्यांनी भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्री, कृषी मंत्री आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री म्हणून काम केले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
महाविकास आघाडीत शरद पवार यांचे योगदान काय? 
 शरद पवार हे भारतीय राजकारणाची सखोल जाण असलेले एक चतुर आणि चतुर राजकारणी म्हणून ओळखले जातात.  त्यांचे अनेकदा सहमती निर्माण करणारे म्हणून वर्णन केले गेले आहे आणि यशस्वी युती तयार करण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांना एकत्र आणण्यात ते सक्षम आहेत.
 अलिकडच्या वर्षांत, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात एकसंघ विरोध निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये पवार सक्रियपणे सहभागी झाले आहेत.  विविध विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने अनेक बैठका आणि चर्चेत ते आघाडीवर राहिले आहेत.
 शरद पवार हे भारतातील राजकीय हेवीवेट नेते आहेत आणि त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या पलीकडे पसरलेला आहे.  त्यांची राजकीय कुशाग्रता आणि भारताच्या विकासाप्रती त्यांची बांधिलकी यासाठी त्यांचा सर्वत्र आदर केला जातो.  ऐंशीच्या दशकात असूनही पवार हे भारतीय राजकारणातील सक्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत आणि भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
—-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केंव्हा झाली? (When was national congress party formed?) 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे, जो प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे.  या पक्षाची स्थापना 1999 मध्ये प्रख्यात भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली होती. (Sharad pawar)
| राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा स्थापन झाला? (How was NCP formed?) 
 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये (Indian national congress) फूट पडल्याचा परिणाम होता, पवार अनेक वर्षांपासून ज्या राजकीय पक्षाचा भाग होते.  1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वशैलीबद्दल महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष वाढत होता.
शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष का सोडला? 
 पवारांसह काही काँग्रेस नेते पक्षांतर्गत सत्तेच्या केंद्रीकरणावर नाराज होते आणि प्रादेशिक नेत्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांना वाटले.  पक्षांतर्गत तरुण नेत्यांना संधी न मिळाल्याने नाराजीचेही वातावरण होते.
Ncp कुणी स्थापन केला? (Who formed ncp in 1999?) 
 1999 मध्ये, पवार आणि तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांच्यासह इतर अनेक कॉंग्रेस नेत्यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेण्याचा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या गरजांना अधिक प्रतिसाद देणारा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृतपणे सुरुवात झाली, त्याचे संस्थापक आणि अध्यक्ष पवार होते.  पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख राजकारण्यांचा समावेश होता.
 NCP ची स्थापना महत्त्वपूर्ण होती कारण विद्यमान राजकीय चौकटीच्या बाहेर भारतात प्रथमच मोठा राजकीय पक्ष स्थापन झाला होता.  काँग्रेस, भारतीय जनता पार्टी (भाजप), किंवा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) यासारख्या कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्षांशी हा पक्ष संलग्न नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संकल्पना आणि धोरणे काय आहेत? (What is the concept of ncp and ideology of ncp?) 
 सुरुवातीच्या काळात, राष्ट्रवादीने एक मजबूत संघटनात्मक रचना तयार करण्यावर आणि महाराष्ट्रात आपला राजकीय पाया विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले.  पक्षाने आपला राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्याचे काम केले.
 गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तो महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.  हा पक्ष राज्यातील अनेक सत्ताधारी युतींचा एक भाग आहे आणि भारतीय संसदेतही त्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
 आज, राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक आहे आणि इतर राज्यातही त्याचे लक्षणीय अस्तित्व आहे.  या पक्षाचे नेतृत्व शरद पवार करत आहेत, ज्यांना भारतातील सर्वात प्रभावशाली राजकारणी म्हणून ओळखले जाते.
 —

शरद पवार यांच्या परिवाराविषयी 

शरद पवार, प्रमुख भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, सार्वजनिक सेवा आणि राजकीय सक्रियतेचा दीर्घ इतिहास असलेल्या कुटुंबातून येतात.  पवारांनी राजकारणी म्हणून आपला ठसा उमटवलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विकासात त्यांच्या कुटुंबाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
बारामती आणि शरद पवार यांचे नाते काय? (How are Baramati and Sharad pawar related?)
 पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील बारामती शहरात झाला.  त्यांचे वडील गोविंदराव पवार हे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.  गोविंदराव पवार (Govindrao pawar) हे देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले होते.
 शरद पवार यांचे भाऊ अप्पासाहेब पवार (Aapasaheb pawar) हे देखील महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व होते.  भाऊसाहेब पवार हे मुंबई विधानसभेचे सदस्य होते आणि 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
 शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha pawar) याही राजकारण आणि सामाजिक कार्यात सक्रिय असतात.  त्यांनी  महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा यासह अनेक सामाजिक उपक्रमांवर त्यांनी काम केले आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाते काय आहे? (How are Supriya Sule and Sharad pawar related?)
 शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे याही एक प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या आहेत.  तिने भारतीय संसदेच्या सदस्या म्हणून काम केले आहे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांचे नाते काय आहे? (How are Ajit Pawar and Sharad pawar Related?) 
 पवारांचे पुतणे, अजित पवार हे देखील एक प्रमुख राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.  त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले असून राज्याच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
 पवार कुटुंबाला लोकसेवा आणि राजकीय कार्याचा मोठा इतिहास आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  खुद्द शरद पवार हे भारतीय राजकारणातील पाच दशकांहून अधिक काळ महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व राहिले आहेत आणि भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
 —

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन

महाराष्ट्र सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत अपशब्द वापरले. त्याविरोधात वडगांवशेरी मतदारसंघात विश्रांतवाडी येथे आमदार सुनिल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
आंदोलनाला मतदारसंघ अध्यक्ष ॲड. नानासाहेब नलावडे, माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, हनिफ शेख, सतिश म्हस्के, शशिकांत टिंगरे, युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, विनोद पवार, किरण खैरे, जावेद शेख, स्वप्निल पठारे हे उपस्थित होते.

NCP Youth Kothrud | सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची अब्दुल सत्तर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची अब्दुल सत्तर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

पुणे येथील कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये आज कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीष गुरनानी यांनी शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री अब्दुलसत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भिकारचोट अशी गलिच्छ भाशा वापरून मा सुप्रिया ताई सुळे यांचा अपमान केला आहे. अशी गलिच्छ भाषा वापरल्यामुळे नागरिकांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व तेढ निर्माण करण्याचे काम कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले आहे असे #गुरनानी यांनी सांगितले. त्यांनी पुरावा म्हणून व्हिडिओ ची क्लिप पोलिस निरीक्षक बडे साहेब यांच्याकडे सुपूर्द केली आहे.कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी मा. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप साहेब व बाळासाहेब बडे यांच्या कडे दिले आहे.

कोथरूड राष्ट्रवादी युवक वतीने संघटक सचिव केदार कुलकर्णी आणि उपाध्यक्ष सुनील हरळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या वेळी कोथरूड राष्ट्रवादी युवकचे अनेख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थिती होते.

Vedanta Foxconn Project | खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते | खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

Categories
Breaking News Commerce Political पुणे महाराष्ट्र

 खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते

|खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

पुणे – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे राज्यातील सुमारे अडिच ते तीन लाख तरुणांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव येथील जागा वेदांता कंपनीने निश्चित केली होती. ती कशामुळे गेली याचे उत्तर राज्यातील सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल. केवळ खुर्चीमध्ये बसणे आणि हार-तुरे स्विकारणे म्हणजे सर्व काही मिळविले असे नसते तर त्या पदाची जबाबदारी देखील घ्यावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सिरियस होण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुनावले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी वेदांता-फॉक्सकॉन कंपनी राज्याबाहेर गेल्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी *‘महाराष्ट्र को क्या मिला, लॉलीपॉप लॉलीपॉप’ * अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिकेची तोफ डागली. त्या म्हणाल्या की, वेदांता व फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ अशा प्रकारचे लॉलीपॉप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.केंद्र आणि राज्य सरकार केवळ जनतेस लॉलीपॉप दाखवत असून कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात येत नाही. लहान मुलांना ज्या प्रकारे समजूत काढण्यासाठी आश्वासन दिले जाते तसेच लॉलीपॉप सरकार जनतेस देत आहे. राज्याच्या हितासाठी सरकारने काम करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारमध्ये गुजरातमधील वजनदार नेते असून आगामी गुजरात विधानसभा निवणुकीपूर्वी मताचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी वेदांता प्रकल्प हलविण्यात आला आहे.

यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातला हक्काचा वेदांत ग्रुपचा प्रकल्प गुजरात मध्ये गेलेला आहे. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात रोजगार यावा यादृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाही. केंद्र सरकारशी चांगला संवाद असल्याचे सांगणारे सत्ताधारी प्रत्यक्षात मात्र रोजगार आणण्यात अपयशी ठरले आहेत. गुजरात देखील भारताचेच एक राज्य आहे . तेथील जनता देखील आपलीच आहे. पण केंद्रातील सत्ताधारी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला पाण्यात बघत असून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातून अनेक महत्वाची कार्यालये आणि प्रकल्प गुजरातला हलविण्यात आले असून यामागे विशिष्ट शक्ती किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर अदृश्य शक्तीशाली हात आहे. मुख्यमंत्री हे अतिशय स्वाभिमानी आहेत असे आम्हाला सांगितले जाते.त्यांनी आपला स्वाभिमानी मराठी बाणा जागृत करुन केंद्र सरकारला या कृत्याचा जाब विचारावा आणि हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही देशमुख यांनी दिला.

यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख, राजू साने , प्रदीप गायकवाड , महेश शिंदे , बाळासाहेब आहेर , सौ.सरीता काळे , कार्तीक थोटे , सौ.जयश्री त्रिभुवन .सौ.धनश्री कराळे सौ.निता गायकवाड, राजू खांदवे , सौ मंजुश्री गव्हाने व इतर प्रमुख मोठेया संख्येने उपस्थित होते.

Supriya Sule | महागाईकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहे | खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

Categories
Breaking News Political पुणे

महागाईकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहे

| खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

घरखर्च भागवणे अवघड झाले आहे. मात्र केंद्र सरकारने जनतेच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतले आहे त्याला जागवण्याचे काम राष्ट्रवादी रस्त्यावर येवून करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने कोथरूडला महागाई प्रश्नावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. महागाईचा विषय देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, या विषयाकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहेत., असा आरोप खासदार सुळे यांनी यावेळी केला.

खासदार सुळे म्हणाल्या की, तुम्ही केले तर जन कल्याण विरोधकांनी केले तर रेवडी वाटप म्हणायचे. हा अन्याय आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या यंत्रणांच्या फक्त राजकारण्यांनाच नव्हे तर मिडीयावाल्यांना सुध्दा नोटीसा जात आहेत. अटक केली जात आहे. संविधानाने, डॉ. आंबेडकरांनी जो हक्क दिला, तो आवाज दाबण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे अध्यक्ष नढ्ढा म्हणतात की, एक पार्टी एक देश. आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्ही एक देश अनेक पार्टी चा पुरस्कार करतो.

संयोजक शंकर केमसे म्हणाले की, या सरकारच्या काळात जगणं अवघड, मरण सोप झाले आहे. ज्वारी, मुग, साखर सगळेच महाग झाले. मोदीजी तुमच्या राज्यात स्वस्त काय आहे ते सांगा. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे एवढेच यांचे धोरण आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत.

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेकडे केल्या या मागण्या! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेकडे केल्या या मागण्या!

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची पुणे महानगरपालिका आयुक्त,उपयुक्त व अधिकाऱ्यांसमवेत शहरातील खड्डे,रस्ते घनकचरा या समस्यांबाबत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी विविध मागण्या महापालिकेकडे केल्या.

१. बावधन येथील राम नदी मध्ये आजूबाजूच्या परिसरातून कचरा टाकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. परिणामी दुर्गंधी, अनारोग्य पसरते. राम नदीचे संरक्षण होणे गरजेचे आहे. नदीपात्रात नागरिकांकडून कचरा टाकला जाणार नाही या संदर्भात कडक कार्यवाही व्हावी. तसेच या परिसरातील काही सोसायट्यांचे सांडपाणीही राम नदीला येऊन मिळते. त्यामुळे या भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच ड्रेनेज सिस्टीम होणे बाबत कार्यवाही व्हावी.

२. बावधन येथील रामनदीजवळील उद्यान नागरीकांना वापरासाठी खुले व्हावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

३. पाषाण तलावामध्ये कचरा टकला जातो, नागरिकांकडून कचरा टाकला जाणार नाही या संदर्भात कडक कार्यवाही व्हावी.

४. बावधन येथील रामनगर कॉलनी (३००० लोकांची वस्ती आहे.) येथे रामनगर कॉलनी ते एन डी ए रस्ता व  रामनगर कॉलनी, पोलीस स्टेशन समोर रस्ता  करण्यात यावा, पार्किंगची सुविधा उपलब्ध व्हावी आणि महानगरपालिके मार्फत पुरविल्या जाणाऱ्या मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

५. चैतन्य सोसायटी, बावधन येथे रस्ते विकसित व्हावेत अशी स्थानिकांची मागणी आहे.

६. चांदणी चौक ते रामनगर रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. चांदणी चौक – डायव्हर्जन मुळे विनाकारण २ -३ कि.मी. चा प्रवास जास्त करावा लागत आहे, कि जो फक्त २०० मीटर चा होता. तरी डायव्हर्जन काढून टाकावेत अशी स्थानिक आणि प्रवाशांची मागणी आहे.

७. एक्सिस बँक बावधन समोरील सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यात यावेत, स्वच्छता गृहातील पाण्याचे पाईप तुटलेले आहेत. को ओप सोसायट्यांचे सबरजिस्ट्रार ऑफिस बावधन येथे सुरु करण्यात यावे

८. फुरसुंगी साठी MGP ची पेय जल योजना रखडली आहे, खूप दिवसापासून काम चालू आहे, महिलांची पिण्याची पाण्याची गंभीर समस्या आहे.

९. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या गावांचा मालमत्ता कर आकारणी कमी करावी.