Sus, Mhalunge Water Issue | सुस, म्हाळुंगे गावांचा पाणी प्रश्न सुटणार! 26 कोटींचा येणार खर्च

Categories
Breaking News PMC social पुणे

Sus, Mhalunge Water Issue | सुस, म्हाळुंगे गावांचा पाणी प्रश्न सुटणार! 26 कोटींचा येणार खर्च

Sus, Mhalunge Water Issue | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस आणि म्हाळुंगे गावचा (Sus and Mhalunge Villages) पाणी प्रश्न (Water Issue) सुटण्याची शक्यता आहे. या दोन्ही गावात समान पाणीपुरवठा योजने (PMC Equal Water Project) अंतर्गत पाण्याच्या टाक्यांचे काम केले जाणार आहे. यासाठी 26 कोटींचा खर्च येणार आहे. महापालिका प्रशासनाकडून (Pune Civic Body) याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Sus, Mhalunge Water Issue)
पुणे महापालिका हद्दीत (PMC Pune Limits) नव्याने 23 गावांचा समावेश झाला आहे. यामध्ये सुस आणि म्हाळुंगे या गावांचा देखील समावेश आहे. मात्र या गावांमध्ये पाण्याची समस्या लोकांना भेडसावत आहे. महापालिकेकडून इथे टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जातोय. इथली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) तसेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Former Corporator Amol Balwadkar) हे पाठपुरावा करत होते. त्यानुसार आता इथला पाणी प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. (Pune Municipal Corporation News)
सुस आणि म्हाळुंगे गावात समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाण्याच्या टाक्या (ESR and GSR) बांधण्यात येणार आहेत. यासाठी 26 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune Water Supply Department)
News Title | Sus, Mhalunge Water Issue |  Sus, the water problem of Mhalunge villages will be solved!  26 crores incurred

Water problem of Baner-Balewadi-Sus-Mhalunge | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे (Baner-Balewadi-Sus-Mhalunge) येथील  पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी व समस्या जाणुन घेण्यासाठी बालेवाडी येथे मा.नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांच्या मागणी नुसार महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner Vikram Kumar) प्रत्यक्ष पाहणी करुन नागरीकांशी व महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी महापालिका आयुक्तांनी अत्यंत गंभिर असलेल्या पाणी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी नागरीकांनी चार चार दिवस मनपा कडुन कोणत्याच प्रकारचा पाणी पुरवठा बाणेर-बालेवाडी भागाला होत नसल्याने धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा असुन देखिल येथील नागरीकांना पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे असे आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. यावर तातडीने उपाय योजना करुन वारजे येथुन पाणी पुरवठा वाढविण्याचे तसेच बाणेर व बालेवाडी येथे तातडीने वाढीव पंप बसविण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना दिले. तसेच बालेवाडी येथील अंडर ग्राऊंड टाकीमध्ये पंप बसवुन बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले.( Water problem Baner-Balewadi-Sus-Mhalunge )

तसेच २४x७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असुन येत्या १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उर्वरीत पाईप लाईनचे काम पुर्ण करणे, नविन टाक्यांना पंप बसवुन टाक्या कार्यरत कराव्या व त्यातुन या भागाला पाणी पुरवठा करण्याचे आदेश देखिल  आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी “बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे भागाला त्यांच्या हक्काचा मुबलक पाणी पुरवठा करुन येथील नागरीकांना व माता-भगिनींना लवकरात लवकर या कृत्रिम टंचाईतुन मुक्तता करावी” अशी मागणी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली. तसेच या भागातील सर्व वॅाल्व्हची पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना योग्यरित्या हताळण्याची आवश्यकता असल्याचे देखिल सांगितले.

यावेळी “या भागाला निर्माण झालेली पाणी समस्या हि पुर्णपणे कृत्रिम असुन या भागातील सर्व वॅाल्वमन ला सक्तिची ताकिद देवुन सर्व वॅाल्व पुर्वरत करत या भागाला लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करण्याची मागणी” यावेळी गणेश कळमकर यांनी केली.

यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, युवा नेते गणेश कळमकर, युवा नेते लहु बालवडकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, शशिकांत बालवडकर, संदिप बालवडकर, अस्मिता करंदिकर व परिसरातील सोसायटींचे नागरीक, ग्रामस्थ व पुणे मनपा पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Road Work in Sus | पालिकेने केला नाही म्हणून सुस मधील नागरिकांनी रस्ता बनविण्याकरिता घेतला पुढाकार

Categories
Breaking News PMC social पुणे

पालिकेने केला नाही म्हणून सुस मधील नागरिकांनी रस्ता बनविण्याकरिता घेतला पुढाकार

वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पत्र व्यवहार करून देखील महादेव नगर सुस येथील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या प्रश्नाचे उत्तर महानगरपालिकेला विचारले असता पालिकेकडून निधी नसल्याचे वेळोवेळी सांगण्यात आले म्हणून स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोडचे काम आपल्या हाती घेतले आहे. सर्व स्थानिक नागरिकांनी आपल्या स्वखर्चातून रोड वरती मुरूम टाकून रोड तात्पुरत्या स्वरूपाचा चालू करण्यात आला आहे. तरीदेखील पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर या रोडचा प्रश्न मार्गी लावावा अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.

यावेळी रयत विद्यार्थी परिषदेचे खजिनदार ऋषिकेश कानवटे, अशोक लिपणे, बबन गडसिंग, मल्लिनाथ बिराजदार, हनुमंता पुजारी, भगवान आंबुरे, हरी पवार, अमोल चव्हाण, धोंडीराम रेंगे, प्रमोद चांदरे, सुनील चांदरे, सचिन कामटकर, अनिल अंभोरे, प्रकाश सामाले, केशव पवार, पिराजी कानवटे, माणिक अंभोरे या सर्वांच्या पुढाकारामुळे रोडची अवस्था येण्या जाण्या योग्य झाली आहे. तरी महानगरपालिके प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे. अशी मागणी ऋषिकेश पिराजी कानवटे खजिनदार, रयत विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्य यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Har Ghar Tiranga | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प | अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

Categories
Breaking News cultural Political social पुणे

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प

| अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प अमोल बालवडकर फाऊंडेशन  आणि भाजपा सक्रिय महिला यांच्या वतीने केला आहे.

याबाबत अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, आज या अभियानाची सुरुवात योग्य व्यक्तीच्या हाती पहिला तिरंगा देऊन करावी असे मनात होते. या अनुषंगाने आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या मुलाला प्रोत्साहन देणार्या शूरवीराच्या मातोश्री सौ.मित विज यांना पहिला तिरंगा देऊन या अभियानाला सुरुवात झाली. आपल्या प्रभागातील एक युवक लेफ्टनंट गुरप्रितसिंग विज हे भारतीय सैन्य दलात मोलाची कामगिरी बजावत असुन त्यांच्या मातोश्री सौ.मित विज व त्यांचा संपुर्ण परिवार कायमच गुरप्रित सिंग यांना प्रोत्साहन देत असतात. यावेळी गुरप्रित सिंग सैन्य दलात बजावत असलेल्या कर्तव्याबाबत त्यांच्या मातोश्रींकडुन माहिती घेतली.

खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिक, सीमेवरचे सैनिक किंवा देशसेवा करणारे सगळे लोक जेव्हा देशासाठी आपले योगदान देतात तेव्हा फक्त तेच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण परिवाराचे योगदान मोठे असते. त्यामुळे या सर्वांच्या हिमतीने आणि त्यागामुळे आज देश ताठ मानेने उभा आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या-ज्या सैनिकांनी बलिदान दिले आणि आजही आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी व सेवेसाठी जे-जे सैनिक स्वतःचे मौलिक योगदान देत आहेत अशा सर्व सैनिकांना माझा मानाचा मुजरा! असे ही बालवडकर म्हणाले.

Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा

| भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेने हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशा सूचना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार  चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेली पाणीपुरवठा समस्या निवारण बैठक बाणेर येथील अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर संपन्न झाली.
या बैठकिचे आयोजन मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योतीताई गणेश कळमकर, स्वप्नालीताई प्रल्हाद सायकर यांनी केले होते.

यावेळी पुरेसा पाऊस पडुन धरणांमध्ये पाणी साठा असुनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरणाच्या अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. तसेच वारंवार पाठपुरावा करुन देखिल अधिकारी या गंभिर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना निदर्शनास आणुन दिले.

“जागो-जागी पाईप लाईन मधुन होत असलेली गळती थांबवुन, पंप दुरुस्त करुन तसेच वितरण व्यवस्थेत सातत्य ठेवुन लवकरात लवकर या भागाला पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करावा” अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

यावेळी आयुक्तांनी बाणेर बालेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारे जे पंप आहेत ते पंप लवकरात लवकर दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच वाढीव पंप लावण्यासंदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच नव्याने समाविष्ठ सुस-म्हाळुंगे-बावधन बु. या गावांसाठी पुणे मनपा मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार झाला असुन लवकरच याकरीता निधी उपलब्ध करुन दिला जाईल व या गावांमध्ये देखिल पुणे मनपा मार्फत पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले.

यासोबतच जोपर्यंत या गावांमधील पाणी प्रश्न मार्गी लागत नाही व पाईप लाईन विकसित होत नाहित तोपर्यंत बाणेर-बालेवाडी-पाषाण सहित नविन समाविष्ठ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या मदतीकरीता या भागातील सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन व लोकसहभागातुन विविध भागात टाक्यांची उभारणी करण्यात येईल व सर्वत्र पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले. तसेच २४x७ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ८ टाक्या तातडीने सुरू करण्याचेही आदेश मा.चंद्रकांतदादांनी पुणे मनपा आयुक्त व अधिकारी यांना दिले.

याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, बाणेर बालेवाडी येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, विविध सोसायटीचे चेअरमन-सेक्रेटरी व पदाधिकारी तसेच समस्त नागरिक उपस्थित होते.

Amol Balwadkar : अवघ्या १२ तासांत २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सुस गावातील लोकांना दिलासा 

Categories
PMC पुणे

अवघ्या १२ तासांत २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या

: नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सुस गावातील लोकांना दिलासा

पुणे : सुस गावात पिण्याचे पाणी घेण्यासाठी अनेक नागरिक बाणेर पर्यंतचा २-३ किमीचा प्रवास करतात, यातील काही पायपीट करत तर काही लोक मोटारसायकलवर २० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी घेऊन पिण्याचे पाणी भरण्यासाठी येतात. दररोजची ही त्यांची पायपीट आणि मोटारसायकलवर पाणी वाहण्याची शृंखला सुरू असल्याचे समजले. हे अतिशय धोकादायक आणि जीवावर बेतणारे काम पाहून खूप वाईट वाटले. त्यामुळे त्याच क्षणी माझ्या मनात एक विश्वास निर्माण झाला व मी त्यांना शब्द दिला की येणाऱ्या २४ तासाच्या आत तुमच्या घरापासून अगदी नजीकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देतो. लगेचच यंत्रणा कामाला लावून आणि अवघ्या १०-१२ तासात तेथे प्रत्येकी २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या. त्यात पाणी आणून जलपूजन केले व तात्काळ आजच्या आज ते लोकांना वापरासाठी उपलब्ध करून दिले. असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.

: हे काम चमकोगिरी साठी नाही

आज बालवडकर म्हणाले, आज सकाळी मी माझे सहकारी नारायणराव चांदेरे, श्री.अनिल बापू ससार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुस मध्ये गेलो असता अनेक महिला भगिनींनी पिण्याच्या पाण्याची मागणी केली. पिण्याचे पाणी घेण्यासाठी अनेक नागरिक बाणेर पर्यंतचा २-३ किमीचा प्रवास करतात, यातील काही पायपीट करत तर काही लोक मोटारसायकलवर २० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी घेऊन पिण्याचे पाणी भरण्यासाठी येतात.

दररोजची ही त्यांची पायपीट आणि मोटारसायकलवर पाणी वाहण्याची शृंखला सुरू असल्याचे समजले. हे अतिशय धोकादायक आणि जीवावर बेतणारे काम पाहून खूप वाईट वाटले. तेथील माता-भगिनींना पाण्यासाठी रोज तरसावे लागत होते.

त्याच क्षणी माझ्या मनात एक विश्वास निर्माण झाला व मी त्यांना शब्द दिला की येणाऱ्या २४ तासाच्या आत तुमच्या घरापासून अगदी नजीकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देतो. लगेचच यंत्रणा कामाला लावून आणि अवघ्या १०-१२ तासात तेथे प्रत्येकी २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या. त्यात पाणी आणून जलपूजन केले व तात्काळ आजच्या आज ते लोकांना वापरासाठी उपलब्ध करून दिले. यावेळी सुस च्या उपसरपंच  दिशाताई ससार,  नारायणराव चांदेरे, अनिल बापू ससार, .शशिकांत बालवडकर, स्थानिक नागरिक, महिला भगिनी व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.

यामध्ये माझा कोणताही चमकोगिरी करण्याचा उद्देश नाही. जनतेचं लवकरात लवकर व तात्काळ काम होणं हे माझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यप्रती सदरील काम तात्काळ पूर्ण केले आणि नागरिकांची या समस्येतून सुटका केली. आज संध्याकाळी जेव्हा या भागात पाणी आलं त्यावेळेस इथल्या नागरिकांच्या व महिला भगिनींच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद बघून मला अतिशय समाधानी वाटले.

विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून मी सुस-म्हाळुंगे परिसराला रोज २० टँकर मोफत पाणी पुरवठा करीत आहे. इथून पुढील काळात ते ५० टँकरपर्यंत कसे जाईल हा माझा मानस आहे. आज या भागात मी १० टाक्या लावल्या, गरज पडल्यास केवळ १० टाक्याच नाही तर अजून २०, ३०, ५० जरी टाक्यांची आवश्यकता भासली तरी चालेल, मी माझ्या स्वखर्चाने येथे त्या उपलब्ध करून देईल. पण माझ्या माता भगिनींना कुठेही पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही, त्यांना त्यांच्या घराजवळच पाणी मिळेल याची योग्य ती काळजी मी घेईल.

येणाऱ्या काळात जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला तर त्यांच्या घरात पाणी देण्याचा माझा जो मानस आहे तो निश्चित पूर्ण करेल. असे ही बालवडकर म्हणाले.

Baburao Chandere : Pune : बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ यांनी मानले जाहीर आभार 

Categories
PMC Political पुणे

बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ यांनी मानले जाहीर आभार

: प्रलंबित रस्त्याच्या  कामामुळे  नागरिकांना दिलासा

पुणे : सुस येथील वाढती लोकसंख्या आणि जपाट्याने वाढत असलेली वस्ती , गृह प्रकल्प यामुळे सुस गावातील रस्ता नेहमीच वाहतूक कोंडीचा विषय ठरलेला असतो त्यात सुस गावातील स्मशानभूमी जवळील  अरुंद रस्त्यामुळे येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना रहदारीच्या त्रासाला मोठ्याप्रमाणात सामोरे जावे लागत आहे , याठिकाणी अनेक वेळा अपघात होतात तसेच नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. मात्र नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नाने रस्त्याची समस्या सोडवली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गावातील लोकांनी चांदेरे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

: उपमुख्यमंत्र्यांनी घातले होते लक्ष

सुस गावातील स्मशानभूमी जवळील अरुंद रस्त्याची समस्या ही खुप दिवसांपासून प्रलंबित होती. त्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुस गावचे माजी सरपंच नामदेवराव चांदेरे, पी.डब्लू.डी.चे अधिक्षक अभियंता- अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता – अजय भोसले, सहाय्यक अभियंता – नकुल नरसिंग, शाखा अभियंता – दीपक भोसले , पुणे महानगरपालिकेचे सुस गावच्या संपर्क अधिकारी श्रीमती अश्विनी लांडगे व इतर अधिकारी यांच्या समवेत सदर रस्त्यांची पाहणी केली. सदर ठिकाणचा कलवर्त  व नाल्याकडील रिटनिंग वॉल बांधून देण्याचे पी.डब्लू.डी.चे अधिक्षक अभियंता  अतुल चव्हाण यांनी निश्चित केले आणि त्यांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांना तात्काळ काम करण्याची सुचना करण्यात आली .
वरील काम मार्गी लावल्याबद्दल सुस गावांतील नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून आले आहे आणि या कामाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रत्येक्ष काम करण्यास प्राधान्य देणारे, आपला हक्काचा माणूस नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ व गृह प्रकल्पामधील नागरिकांच्या वतीने मनापासून अभिनंदन  मानले आहेत.