Dipali Dhumal | पाणी पुरवठा विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा थांबवाव्या | माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

पाणी पुरवठा विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा थांबवाव्या

| माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नोटीसा देणे त्वरित थांबविण्यात याव्यात, अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या  दीपाली  धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली. कोणतीही खबरदारी न घेता अचानक दिलेल्या नोटिसांमुळे नागरिकामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. तरी  सर्व प्रकारात लक्ष देऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे कि अश्या प्रकारच्या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये व या नोटीसा देणे थांबवावे. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.

धुमाळ यांनी याबाबत महापालिका आयुक्त यांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा विभागा मार्फत नागरिकांसाठी समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत एल अॅणड टी कंपनी मार्फत अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या व पाईप लाईन चे काम सुरु आहे. मध्यंतरी प्रशासन व एल एन टी अधिकार्यांनी जबरदस्तीने नागरिकांच्या घरोघरी जाऊन नळ कनेक्शनला पाण्याचे मीटर बसवले होते व सदर मीटर बसवताना झालेले तोडफोड, लिकेज व नुकसान तसेच काम अपूर्ण सोडून मीटर बसविण्यात आले त्यावेळी नागरिकांना असे सांगण्यात आले की हे मीटर लवकर सुरु होणार नाही व याचे कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा बिल येणार नाहीत अशी नागरिकांची खोटी समजुत काढून त्यांना आता पाणीपुरवठा विभाग मार्फत नोटीसा येत आहेत.

नोटीस कोणत्याही प्रकारची मीटर रिडिंग न घेता किंवा त्या ठिकाणी व त्या जागी जाऊन सदर कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा खरच पाण्याचा वापर तेवढ्या प्रमाणत होत आहे का अशी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अंदाजे आकडे टाकून नोटीसा देत आहेत. सदर कुटुंबात व्यक्ती असेल तर त्या कुटुंबात 5 ते 6 व्यक्ती आहेत अशी बोटी आकडेवारी नमुद करून त्या कुटुंबाला नोटीस देत आहे. तसेच या नोटीस मध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि नोटीस दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या कालावधी नंतर पाणीपुरवठा विभाग द्वारे कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत किती नाही याची शहानिशा न करता या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे.

या प्रकाराबाबत आम्ही संबंधित अधिकार्‍यांशी  चर्चा चौकशी केली त्यावेळी अधिकार्‍यांना असे सांगण्यात आले कि या नोटीसा फक्त नागरिकांमध्ये पाण्याच्या नियमित वापराबाबत जनजागृती करण्यासाठी देत आहेत परंतु असे असेल तर या बाबत आधी जाहिरात करून प्रचार करून नोटीस दिली गेली पाहिजे होती याची कोणतीही खबरदारी न घेता अचानक दिलेल्या नोटिसांमुळे नागरिकामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. तरी या सर्व प्रकारात लक्ष देऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे कि अश्या प्रकारच्या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये व या नोटीसा देणे थांबवावे. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.

 

water at polling stations | पुणे महानगरपालिका निवडणूक २०२२ | मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ | मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा

| निवडणूक विभागाची शिक्षण विभागाकडे मागणी

पुणे | आगामी महापालिका निवडणुकीची महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. प्रभाग रचनेननंतर आता मतदारयाद्या देखील अंतिम करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान  अंतिम टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात येणार आहे. निवडणूकीकरिता पुणे शहरातील प्रभागनिहाय ठरविलेल्या विविध मतदान केंद्रांवर मतदारांकडून मतदान केले जाणार असून अशा ठरविलेल्या मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी आणि मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी  पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवडणूक विभागाने शिक्षण विभागाकडे केली आहे.
याबाबत निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी शिक्षण विभागाला तसे पत्र दिले आहे. त्यानुसार  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात असून तद्नंतर लवकरच तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात येणार आहे. सदर निवडणूकीकरिता पुणे शहरातील प्रभागनिहाय ठरविलेल्या विविध मतदान केंद्रांवर मतदारांकडून मतदान केले जाणार असून अशा ठरविलेल्या मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी आणि मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले विभागांतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करून काही दुरुस्ती असल्यास किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यास त्याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून त्या दुरुस्त करून घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेकामी आपणाकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना योग्य ते आदेश होणेस विनंती आहे. असे पत्रात म्हटले आहे.