World Environment Day | भारती विद्याभवन शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण करण्याची  घेतली शपथ

Categories
Breaking News Education social पुणे

World Environment Day | भारती विद्याभवन शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण करण्याची  घेतली शपथ

World Environment Day | जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) निमित्ताने भारती विद्याभवन शाळेतील (Bharti Vidya bhavan school) विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण (Environment Protection) करण्याची शपथ घेतली. (World Environment Day)
विद्यार्थ्यांनी आपला परिसर स्वच्छ करणे, आपल्या परिसरातील झाडांना पाणी घालणे पर्यावरण संरक्षण या विषयावर निबंध लिहिणे अशा विविध विषयांतून जागतिक पर्यावरण दिनाच्या विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला. (Environment Day News)
सध्या उन्हाळ्याची सुट्टी असून देखील शाळेतील शिक्षकांमार्फत अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
——
News Title | World Environment Day | Students of Bharti Vidya Bhavan School took an oath to protect the environment

Majhi Vasundhara Abhiyan |  Pune Municipal Corporation third Rank in Majhi Vasundhara campaign

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Majhi Vasundhara Abhiyan |  Pune Municipal Corporation third Rank in Majhi Vasundhara campaign

 |  The first number is Pimpri Chinchwad and the second is Navi Mumbai

 Majhi Vasundhara Abhiyan |  Majhi Vasundhara Abhiyan was implemented on behalf of the state government.  This campaign was implemented for environmental awareness.  In this, Pune Municipal Corporation (PMC) has got the third rank in the group of more than 10 lakh population.  The first has been given to Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the second to Navi Mumbai Municipal Corporation.  Last year also, Pune Municipal Corporation (PMC Pune) got the third rank.  But it was divided into Pune and Sangli Municipal Corporation (Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation).  (Majhi Vasundhara Abhiyan)
 “MajhiVasundhara Abhiyan” was started in the local bodies of the state on October 2, 2020. “Majhi Vasundhara Abhiyan 3.0” was implemented in the local bodies of the state from April 1, 2022 to March 31, 2023. Maji Vasundhara Abhiyan 3.  A total of 16,824 local organizations such as 411 civil local organizations and 16,413 Gram Panchayats of the state participated in 0. (world environment day)
 According to the toolkit released under “Majhi Vasundhara Abhiyan 3.0”, 7,600 marks for Urban Local Bodies (Amrit Group), 7,500 marks for Urban Local Bodies (excluding Amrit Group) and 7,500 marks for Gram Panchayats were fixed for desktop assessment.  (Majhi Vasundhara Abhiyan News)
 In Majhi Vasundhara Abhiyan 3.0, desktop evaluation and field evaluation of the work done by the local self-government bodies during the campaign period were conducted through three systems.  Based on the total marks in the assessment, I am among the 11 population-wise groups in Vasundhara Abhiyan 3.0.  Winners as well, Best Divisional Commissioner, Best on overall performance of Revenue Department and District  Selection of the Collector and the best Chief Executive Officer, Zilla Parishad after the approval of the Government  has been done.  The result in this regard has been declared on 5th June, 2023.  (Pune Municipal Corporation News)
 The following are the details of the best performing local bodies in order of merit:-
  Amrit Group (State Level):
 More than 10 lakh population groups:
  State Level:
 1. Pimpri Chinchwad Municipal Corporation
 2. Navi Mumbai Municipal Corporation
 3. Pune Municipal Corporation
 —-

Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानात पुणे महापालिका तिसऱ्या स्थानावर 

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानात पुणे महापालिका तिसऱ्या स्थानावर

| पहिला क्रमांक पिंपरी चिंचवडचा तर दुसरा नवी मुंबईचा

Majhi Vasundhara Abhiyan | राज्य सरकारच्या (State government) वतीने माझी वसुंधरा अभियान (Majhi Vasundhara Abhiyan) राबवण्यात आले. पर्यावरणीय जनजागृती साठी हे अभियान राबवण्यात आले. यात पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) 10 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक गटात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. पहिला पिंपरी चिंचवड महापालिकेला (PCMC) तर दुसरा नवी मुंबई महापालिकेला (NAVI Mumbai Corporation) मिळाला आहे. मागील वर्षी देखील पुणे महापालिकेला (PMC Pune) तिसरा क्रमांक मिळाला होता. मात्र तो पुणे आणि सांगली मनपाला (Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation) विभागून देण्यात आला होता. (Majhi Vasundhara Abhiyan)

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ३.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२२ ते दिनांक ३१ मार्च, २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था व १६,४१३ ग्राम पंचायती अशा एकूण १६,८२४ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. (world environment Day)

“माझी वसुंधरा अभियान ३.०” अंतर्गत निर्गमित करण्यात आलेल्या टूलकिटनुसार डेस्कटॉप असेसमेंट करिता नागरी स्थानिक संस्था (अमृत गट) ७,६०० गुण, नागरी स्थानिक संस्था (अमृत गट वगळून) ७,५०० गुण आणि ग्रामपंचायतींसाठी ७,५०० गुण ठेवण्यात आले होते. (Majhi Vasundhara Abhiyan  News)

माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ३.० मधील लोकासंख्यानिहाय ११ गटातील विजेते तसेच, महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड
करण्यात आली आहे. याबाबतचा निकाल दिनांक ५ जून, २०२३ रोजी जाहिर करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation News)

गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे:-

अमृत गट (राज्यस्तर) :
१० लक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या गट :

1. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
2. नवी मुंबई महानगरपालिका
3. पुणे महानगरपालिका

—-
News Title | Majhi Vasundhara Abhiyan | Pune Municipal Corporation third place in Majhi Vasundhara campaign| The first number is Pimpri Chinchwad and the second is Navi Mumbai

World Environment Day | लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी राबविली दत्तक वृक्ष योजना

Categories
cultural social पुणे

लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी राबविली दत्तक वृक्ष योजना

५ जून ‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त नारायण हट शिक्षण संस्था, नारायण हट गृह संस्था, भूगोल फाउंडेशन भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने १०० देशी वृक्षांची लागवड केली . शिवाय  लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी दत्तक वृक्ष (वृक्षसंवर्धन पालकत्व ) योजना राबवली आहे.

पर्यावरण रासाचे परिणाम संपूर्ण जग अनुभवत असून त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. म्हणून झाडे लावणे व झाडे जगवणे पर्यावरण संरक्षणासाठी गरजेचे झाले आहे. यासाठी दिनांक ५ जून २०२२रोजी सकाळी ९:०० ते११:३० या वेळेत ‘जागतिक पर्यावरण दिनाच्या ‘औचित्य साधून१०० देशी वृक्षांची लागवड भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळा क्रीडांगण परिसरात करण्यात आली.
नारायण हट शिक्षण संस्था, भूगोल फाउंडेशन, नारायण हट सहकारी गृह संस्था, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


एकूण लागवड केलेल्या वृक्षांमध्ये फळझाडे, आयुर्वेदिक झाडे, पर्यावरण पूरक झाडे, लागवड करण्यात आली असून वड, पिंपळ, चिंच, उंबर, आंबा, फणस, पेरू, जांभूळ, सोनचाफा, अडुळसा, बकुळ, रामफळ, नारळ, कवट, सिताफळ, बोर, अर्जुन, कडूनिंब,या जातीच्या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहे.

केवळ झाडे लावून उपयोग नाही त्यांचे संगोपन पर्यावरणाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. यासाठी आजच्या उपक्रमात दत्तक वृक्ष(वृक्षसंवर्धन पालकत्व) ही संकल्पना स्वीकारण्यात आली असून त्यानुसार शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांनी झाडांचे संगोपन व सोसायटीतील सभासदांनी झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी वाटून घेतली आहे. प्रत्येकाने स्वतःलागवड केलेल्या एक झाडाचे संगोपन वर्षभर करून त्यांचा पुढील वर्षी वाढदिवस साजरा करण्याचे यानिमित्ताने ठरले आहे.

या कार्यक्रमासाठी सोसायटीचे सभासद, संचालक, शिक्षण संस्थेचे संचालक, भूगोल फाऊंडेशनचे सभासद, शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण७६ लोकांनी वृक्ष लागवडी मध्ये सहभाग घेतला.

वृक्षलागवड कार्यक्रमाचे संयोजन अंकुशराव गोरडे, रोहिदास गैंद,  शिवराम काळे, डॉ. वसंतराव गावडे, डॉ‌ बाळासाहेब माशेरे, विठ्ठल वाळुंज साहेब,  साहेब राव गावडे , कर्नल तानाजी अर्बुज, अनिल घाडगे, राजेंद्र ठाकूर, मनोज माकुडे, शशिकांत वाढते, एज अक्षय पोटे, अनिल पवार, ज्योतीताई दरंदले, शोभाताई फटागडे, शीलाताई इतके, मीनाताई आखाडे, ज्ञानेश्वर सावंत, श्री. यशवंत नेहरे, श्री. डॉ. सुरेश पवार, श्री. संजय सांगळे, सौ. शोभा आरुडे,सौ रोहिणी पवार, सौ. उज्वला थिटे, आणि भूगोल फाउंडेशन भोसरी यांनी  मोफत वृक्ष उपलब्ध करून दिले. तसेच शाळेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिचेपालक  नितीन बागुल यांनी शाळेसाठी खत स्वतः गोळा उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विठ्ठलशेठवाळुंज यांनी केले सूत्रसंचालन: प्रा डॉ बाळासाहेब माशेरे यांनी केले तर आभार संदीप बेंडुरे यांनी मानले.