Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग

: मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेण्यात आला तसेच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रीतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, समितीचे सदस्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसेच आदी संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी मराठा समाजासंदर्भातील निर्णयांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती व समाजाच्या, समन्वयकांच्या मागण्यांची माहिती दिली. या विषयांवर विचारविनिमय होऊन अनेक निर्णय घेण्यात आले. मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची लवकरच घोषणा होणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे केवळ ओबीसी प्रकरणांची हाताळणी असेल, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

मराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळेल.

व्यवस्थापकीय संचालकांची रिक्त पदे भरणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांची संचालक व व्यवस्थापकीय संचालकांची पदे रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ‘सारथी’ संस्थेच्या विभागीय उपकेंद्रांसाठी भूखंड देण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर झाले असून, त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले .

सारथीची पद भरती प्रक्रिया महिन्याभरात

‘सारथी’ संस्थेसाठी आवश्यक असलेल्या २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया महिन्याभरात केली  जाईल. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या १८ नागरिकांच्या वारसांना राज्य परिवहन मंडळात रुजू करून घेण्यात आले असून, उर्वरित प्रकरणांवरही तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.

इतर वसतिगृहेही सुरू करण्यासाठी प्रयत्न

डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजनेअंतर्गत ठाणे, पुणे, सातारा (कराड), सांगली (मिरज), कोल्हापूर, नाशिक व अहमदनगर येथील सात वसतिगृहे वापरासाठी सज्जे असून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी इतर जिल्ह्यांमध्येही वसतिगृहे कार्यरत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही या वेळी निश्चित करण्यात आले.

मराठा आंदोलनातील जे गुन्हे मागे घ्यायचे राहिले आहेत त्यांच्याबाबतीत महाधिवक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली गृह तसेच विधी व न्याय विभागाकडून न्यायालयाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील निर्णयांची माहिती राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करुन ती वेळोवेळी अद्यावत करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आऱक्षण रद्दबातल केल्यानंतर विविध नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांबाबत लवकरच आणखी एक बैठक होणार असून, त्यामध्ये विविध कायदेशीर मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे..

Shivjayanti: CM : शिवजयंती सोहळ्याच्या उपस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र

 

शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता

: शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

००००

Uddhav Thackeray : तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं : उद्धव ठाकरे 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं

: उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री कुठे आहेत? असा वारंवार सवाल करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज उत्तर दिलं आहे. “मी घराबाहेर पडलो नसलो तरी मी असमर्थ आहे असं नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय आहे. मुंबई महापालिकेच्यावतीनं उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन ऑनलाइन स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, यावेळी ते बोलत होते. (Although I am not out of the house it doesnt mean I am incapable says CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या काही काळामध्ये एका शस्त्रक्रियेला मला समोरं जावं लागलं. त्यानंतर मी अजूनही तसा घराबाहेर पडलेलो नाही पण असं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, मी बाहेर पडायला असमर्थ आहे. मी सुद्धा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. तलवार जरी माझ्या हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं आहे. त्यामुळं जेव्हा फिरवायची त्या योग्यवेळी ती फिरवत आलेलो आहेच आणि यापुढेही फिरवणार आहेच. शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईनं सर्व शिवसैनिक माझ्या आणि आदित्यच्या पाठिशी आहात त्यामुळं धन्यवाद”

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसादिनीच वीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं आहे. पुतळे बसवायला अनेक जागा आहेत पण नेमका आपण कोणाचा वारसा सांगत आहोत हे सांगण्याचं, आठवण देण्याचं काम तुम्ही केलं आहे. शिवाजी महाराज किंवा महाराणा प्रताप आपण होऊ शकत नाही पण त्यांचा घोडा म्हणजेच चेतक जरी आपण झालो तरी आपल्याकडून मोठ काम होईल. हा घोडा आपल्या धन्याचा निष्ठावान होता.

मुंबई महापालिकेच्यावतीनं महाराणा प्रताप चौकाच्या सुशोभिकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. यावेळी या चौकात महाराणा प्रताप यांचा भालाधारी १६ फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पार पडलं.