Shreemant Dagdusheth Halwai Ganpati | १३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास उशीर 

Categories
Breaking News cultural पुणे
Spread the love

१३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास उशीर

मानाचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर यंदाच्या प्रथमच विसर्जनासाठी उशीर झाला. मंडळाच्या १३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास दुसऱ्या दिवशीचे सकाळचे ११ वाजले.

दरवर्षी सकाळी साडेसात वाजता होणारे विसर्जन या वेळेस सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी झाले. मिरवणुकीत नियोजनाचा अभाव असल्याने अनेक मंडळे पुढे सरकत नव्हते. परिणामी श्रीमंत मानाचा दगडूशेठला बेलबाग चौकात येण्यासच दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. शनिवारी सकाळी साडेसात वाजता दगडूशेठ गणपती बेलबाग चौकात होता. त्यानंतर तो अलका चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

याबाबत महेश सूर्यवंशी म्हणाले, “पोलीस प्रशासनासोबत अनेक गणेश मंडळांच्या बैठका झालेल्या आहेत. आम्ही आमचा अनुभव त्यांना सांगितलेला आहे, त्यांनी देखील नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काही कमतरता नियोजनात निश्चितपणे राहिलेल्या दिसत आहेत, त्यामुळेच हा विलंब झाल्याचे दिसून येत आहे.”

याशिवाय, “यंदाचा गणेशोत्सव हा करोनाच्या दोन वर्षांच्या खडतर कालखंडानंतर झालेला आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आणि मंडळांमध्ये दिसून आला. नऊ दिवस अत्यंत आनंदात, उत्साहात आणि भक्तीभावात व श्रद्धेने पार पडले. आजचा जो विसर्जनचा दिवस आहे, त्या विसर्जनास आम्हाला विलंब झालेला आहे. तरीदेखील गणपती बाप्पांनी भक्तांना जो दर्शनाचा लाभ दिलेला आहे. बाप्पांचा रथ जसजसा पुढे जात होता, तसे भाविक अजिबात जागचे हलले नाहीत. किंबहुना संख्या अधिकच वाढत होती. भाविका आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर होते. खूप मोठ्याप्रमाणावर भाविकांनी गर्दी केली. ” असंही सूर्यवंशी म्हणाले.

“परंतु , १३० वर्षांच्या दगडूशेठ गणपतीच्या इतिहासात सर्वात विलंब झालेली ही विसर्जन मिरवणवुकीची वेळ आहे आणि याची खंत निश्चितच वाटते. काही त्रुटी नियोजनात निश्चितपणे राहिलेल्या आहेत. जबाबदारी ही सामूहिक असते, परंतु यामध्ये संवादाचा अभाव दिसतो. अनुभवाची थोडी कमतरता वाटते, कारण दोन वर्षांच्या कालखंडानंतर या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची थोडी कमतरता जाणवली. त्यामुळे कदाचित पोलीस प्रशासन नेमकं नियोजन करू शकलं नसेल. ” अशा शब्दांत सूर्यवंशी यांनी पोलीस प्रशासनाच्या नियोजनावर बोट ठेवले.

याचबरोबर, “शेवटी हा गणपती बाप्पांचा अत्यंत वैभवशाली विसर्जन मिरवणूक सोहळा आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलेलं असतं. आपल्या भारतीय संस्कृतीचा हा खऱ्या अर्थाने गौरव ठरतो. जरी विलंब झाला तरी भाविक मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आतूर होते. यावरून उशीर झाला ही गोष्ट भाविकांना अजिबात खटकलेली नाही. परंतु व्यवस्थेला निश्चितपणे पुढील वर्षी योग्य नियोजनाचा विचार करावा लागेल. ” असंही देखील महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं.