MCCIA | Voting Awareness | मतदार जागृतीसाठी ‘एमसीसीआयए’चा पुढाकार ‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

MCCIA | Voting Awareness | मतदार जागृतीसाठी ‘एमसीसीआयए’चा पुढाकार

‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन

 

MCCIA | Voting Awareness – (The karbhari News service) –  मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला असून मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी संस्थेतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष मुकेश मल्होत्रा यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेऊन चेंबरकडून लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी घेण्यात येत असलेल्या पुढाकाराची माहिती दिली.

पुणे शहरातील मतदानाचे कमी प्रमाण लक्षात घेता शहरी भागात आणि विशेषत: औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमधील कामगारांना मतदान करण्यासाठी संस्थेने प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी व्यक्त केली.

‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून आणि औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्षात भेट घेवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मतदान टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे.

पुण्यातील नागरिकांना त्यांच्या नागरी हक्क आणि कर्तव्यांची सखोल जाणीव आहे. पुणे हे नागरी सहभागाच्या संस्कृतीचे वेगळेपण जपते आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिक मतदान करून ही परंपरा जोरकसपणे पुढे न्यायला हवी. त्यामुळे पुण्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रात मतदार जागृतीसाठी सुरू केलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढेल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचा मतदार जागृती उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल. पुणे जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रमुखांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Loksabha Election 2024 | राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली | लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Loksabha Election 2024 | राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली

| लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

 

Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – 
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे असणार आहेत.

2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या 98 हजार 114 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सर्वांत जास्त मतदान केंद्र पुण्यात तर सर्वांत कमी मतदान केंद्र सिंधुदुर्गात

सर्वांत जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. याची संख्या 8 हजार 382 आहे. यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 380 मतदान केंद्रे असणार आहेत. ठाण्यात 6 हजार 592, नाशिकमध्ये 4 हजार 800 आणि नागपूरमध्ये 4 हजार 510 मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये 918 आणि गडचिरोलीमध्ये 950 मतदान केंद्रे असणार आहेत.

3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात

3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात आहेत. अहमदनगरमध्ये 3 हजार 734,सोलापूरमध्ये 3 हजार 617, जळगावमध्ये 3 हजार 582, कोल्हापूरमध्ये 3 हजार 368, औरंगाबादमध्ये 3 हजार 085, नांदेडमध्ये 3 हजार 047 आणि सातारामध्ये 3 हजार 025 मतदान केंद्र असतील.

10 जिल्हयांत 2000 हून अधिक मतदान केंद्रे

2000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 10 जिल्हयात आहेत. रायगडमध्ये 2 हजार 719, अमरावतीमध्ये 2 हजार 672, यवतमाळमध्ये 2 हजार 532, मुंबई शहरमध्ये 2 हजार 517, सांगलीमध्ये 2 हजार 448, बीडमध्ये 2 हजार 355, बुलढाण्यामध्ये 2 हजार 266, पालघरमध्ये 2 हजार 263, लातूरमध्ये 2 हजार 102 आणि चंद्रपूरमध्ये 2 हजार 044 मतदान केंद्र असतील.

2000 पेक्षा कमी मतदान केंद्रे असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे – नंदुरबार 1 हजार 412, धुळे 1 हजार 704, अकोला 1 हजार 719, वाशिम 1 हजार 76, वर्धा 1 हजार 308, भंडारा 1 हजार 156, गोंदिया 1 हजार 288, हिंगोली 1 हजार 17, परभणी 1 हजार 587, जालना 1 हजार 719, उस्मानाबाद 1 हजार 503, रत्नागिरी 1 हजार 717 मतदान केंद्रे असतील.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

0000000

PMC Laigude Hospital Privatization | लायगुडे हॉस्पिटलच्या खासगीकरणाला शिवसेनेचा विरोध!

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

PMC Laigude Hospital Privatization | लायगुडे हॉस्पिटलच्या खासगीकरणाला शिवसेनेचा विरोध!

PMC Laigude Hospital Privatization – (The Karbhari news Service) – सिंहगड रोडवरील लायगुडे हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचा घाट पुणे मनपा (Pune Municipal Corporation (PMC)ने घातला आहे, असा आरोप शिवसेना खडकवासला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हे हॉस्पिटल खासगी संस्थेला देण्याच्या प्रयत्नाचा शिवसेना खडकवासला पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल समोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला व भविष्यात असा प्रयत्न केल्यास नागरिकांचे सहभागाने तिव्र आंदोलन कारण्याचा इशारा देण्यात आला. (PMC Health Department)

२०१९ सालापासून काही लोक यासाठी प्रयत्न करीत आहेत. या भागातील सर्वसामान्य नागरिकांना एकमेव या हॉस्पिटलचा आधार आहे. सर्वसामान्य लोकांना याठिकाणी मोफत उपचार मिळत आहेत. नवीन समाविष्ट गावातील खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड व धायरी या भागातील लोक उपचारासाठी या ठिकाणी येत असतात. कोविड काळात अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले व कोविड सेंटर देखील सुरु होते. त्याचा अनेक नागरिकांना उपयोग झाला.

दोन वर्षापासून  येथील ऑपरेशन थेटर साठी आलेली मशीनरी पडून आहे. ती उभारण्यात आलेली नाही. चांगल्या सुस्थितील साहित्य भंगारात काढण्यात येत आहे असा आरोप करण्यात आला.

या प्रसंगी उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले, नितीन वाघ, महेश पोकळे, महेश मते, बुवा खाटपे, तानाजी पवळे, सचिन पासलकर, मनीष जगदाळे,संतोष शेलार, राजू चव्हाण, अरुण घोगरे, अविनाश सरोदे,महेश विटे, विनायक नलावडे,नाना मरगळे, राज पायगुडे, शिवाभाऊ पासलकर, विजय कोल्हे, गोकुळ करंजावणे, तानाजी गाढवे, अमोल दांगट, केतन शिंदे, अमोल मराठे, अनिकेत देशमुख, गुरुदत्त हगवणे, कल्पेश वाजे, राजाभाऊ पोळेकर, मोहन गायकवाड,भाई ताम्हणकर, गौरव करंजावणे हे उपस्थित होते.

Electricity Price Hike | वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यातील रास्ता पेठेत सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन!

Categories
Breaking News Political social पुणे

Electricity Price Hike | वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यातील रास्ता पेठेत सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन!

Electricity Price Hike – (The Karbhari News Service) – राज्य सरकारने नुकतेच विजेच्या दरात वाढ केली आहे. याचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यातील रास्ता पेठेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

जगताप यांनी सांगितले कि, आर्थिक आघाडीवर सपशेल अयशस्वी ठरलेल्या, महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करणाऱ्या सरकारने आता स्वतःची तिजोरी भरण्यासाठी सामान्य जनतेच्या घरावर दरोडा टाकण्याची तयारी केली आहे. याचंच लक्षण म्हणजे नुकतीच झालेली वीज दरवाढ. जवळपास १५% दरवाढ करून सरकारने महागाईचे चटके सोसत असलेल्या सामान्य जनतेला शॉक दिला आहे. सरकारच्या या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ खा. सुप्रियाताई सुळे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

 

Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe | “हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले

Categories
Breaking News Political पुणे

Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe | “हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले

| महाविकास आघाडी एकमुखाने डॉ. कोल्हे यांच्या पाठीशी – बैठकीत निर्धार

 

Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe –
(The Karbhari News Service) – आगामी शिरूर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथील कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकमुखाने डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभा राहणार असून चांगल्या मताधिक्याने त्यांना निवडून आणणार असा विश्वास या बैठकीत सर्वपक्षीयांनी व्यक्त केला.

यावेळी खा.डॉ. अमोल कोल्हे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेस निरीक्षक गोपाळ तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, माजी उपमहापौर निलेश मगर,माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, संगीता ठोसर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, राष्ट्रवादी हडपसर अध्यक्ष प्रविण तुपे, काँग्रेस अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, सीमा सावंत, विद्या होडे, रुपाली शिंदे, महिला अध्यक्ष वंदना मोडक, कार्याध्यक्ष सविता मोरे, पल्लवी सुरसे, शितल शिंदे, सुशीला गुंजाळ, नितीन आरु आदींसह सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The Karbhari - Hadapsar mahavikas aghadi

गद्दारांची गद्दारी लोकसभा निवडणुकीत गाढली पाहिजे, महादेव बाबर व शिवसेनेने काम केले म्हणून मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले नंतर ते शिवसेना कार्यकर्त्यांना विसरले, यांना पाडण्यासाठी आता हडपसर मध्ये सर्वांनी काम करावे अशा शब्दात शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी चेतन तुपे यांचे नाव न घेता टीका केली.

हेवेदावे बाजूला ठेऊन भाजपला पराभूत करा, बजेट व महाविकास आघाडी समन्वय समिती जबाबदारी आमदारांची होती त्यांनी भूमिका बदलली, कार्यकर्ते नाराज झाले, हडपसर मध्ये समन्वय समिती स्थापन करून नियोजन केले जाईल. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. भाजपला सांगा रामाचे झाले आता कामाचे सांगा मोदी परिवार म्हणजे घोटाळे केलेले अन भाजप मध्ये गेले आहेत, मीडियावर दबाव आणला जात आहे, 400 खासदार आणून संविधान बदलण्याचा डाव आहे, हा डाव हणून पाडला पाहिजे असे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

तुतारी घराघरात पोहोचली पाहिजे आढळराव पाटील यांना 55 हजाराची आघाडी 2019 ला होती ते गद्दार झाले तेच समोर असतील डॉ.कोल्हे यांना तीच आघाडी देणार, हडपसर मध्ये सर्वात आधी महाविकास आघाडी करून हडपसला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आणला, हडपसर ची वाट लावली, कामे झाली नाहीत, अपमानस्पद वागणूक दिली, त्यांना त्यांची जागा दाखविणार या शब्दात माजी आमदार महादेव बाबर यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली.

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आपले मनोगत मांडले.
शिवसैनिक निखारा आहे, ही निवडणूक देशाच्या भविष्याची निवडणूक आहे, अबकी बार 400 पार हे केवळ कार्यकर्त्यांच मनोबल वाढविण्यासाठी आहे, राहुल गांधी यांच्या यात्रेने पायाखालची जागा सरकली, दक्षिण भारतात भाजप नाही, इंडिया आघाडी देशात येत आहे, शिरूर मध्ये तुतारी चिन्ह घराघरात पोहोचविले पाहिजे, या मतदारसंघात महायुतीला उमेदवार नाही, कार्यकर्त्यांमंध्ये अस्वस्थता आहे, देणारा दिल्लीत मागणारा झाला या शब्दात अजित दादांवर टीका केली, लोकशाही टिकविण्यासाठी भाजपला पराभूत करा असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.

Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार! | चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार!

|  चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Pune – (The Karbhari News Service) – लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एकदिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भांडारी, आ. माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, समन्वय समितीचे प्रमुख तथा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशेलकर, शहर प्रमुख प्रमोदनाना भागगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या सह मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय रहावा. प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत, त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता असावी यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बारामती, शिरुर, आणि पुणे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक झाली. या बैठकीत माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये एनडीएला ४०० पार करुन माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं, यावर सर्वांचच एकमत आहे. आजच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकीनंतर प्रत्येक पक्षाचे नेते विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संपर्क करणार आहेत.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम हटविण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बूथवर मिळणाऱ्या मतांमध्ये ३७० मते अधिक मिळाली पाहिजेत, अशी सूचना पक्ष श्रेष्ठींनी केली आहे. त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची मतांची संख्या काढली, ती देखील ४०० पार करतील, आणि लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री तथा शिवसेना नेते विजयबापू शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, यांच्या सह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम शेतकरी संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे लवकरच बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तालुकानिहाय दौरा करणार असून, याद्वारे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

National Science Day | वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाने लोक अंधश्रद्ध | विशाल विमल

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे

National Science Day | वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाने लोक अंधश्रद्ध | विशाल विमल

| महाराष्ट्र अंनिसच्या पुणे शहर शाखेचे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान

| दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी

National Science Day | आजची भौतिक प्रगती ही तार्किकता, सुसंगतपणा, चिकित्सा, वैज्ञानिक दृष्टिकोन या विज्ञानाच्या कसोट्यांमधून झाली आहे. लोक केवळ विज्ञानाच्या साधनांचा उपभोग घेत असून जीवनात विज्ञानाच्या कसोट्या उपयोगात आणत नाहीत. त्यामुळे लोक बुवाबाजी, अंधश्रद्धा, चमत्कार, ज्योतिष, भूतभानामती, करणी, कर्मकांड या गोष्टींना बळी पडत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष विशाल विमल (Vishal Vimal) यांनी केले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभियानात शहर आणि जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘जीवनाला समृद्ध करणारा वैज्ञानिक दृष्टिकोन सप्ताह ‘ आयोजित केला होता. प्रश्नमंजूषा, पोस्टर प्रदर्शन आणि व्याख्यानासह प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम झाले. मनोदय व्यसन्मुक्त संस्था पुणे, मुक्ता साळवे साळवे शाळा पर्वती, यशोदीप माध्यमिक विद्यालयात वारजे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी, युनिकॉर्न इंटरनॅशनल स्कुल पिंपरी सांडस, अहिल्यादेवी होळकर विद्यालय मिरवडी, न्यु इंग्लिश स्कुल शिरूर आदी ठिकाणी कार्यक्रम झाले. विशाल विमल यांच्यासह प्रवीण खुंटे, माधुरी गायकवाड, एकनाथ पाठक, लालचंद कुंवर, स्वप्नील भोसले, वैशाली कळसाईत, निशांत धाईंजे, रतन नामपल्ले, वैशाली सावित्री आदी कार्यकर्ते या अभियानात सहभागी होते. अंधश्रद्धा निर्मूलनासह वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार प्रचार महा. अंनिस सातत्यपणे करत आहे. विज्ञान दिनाच्या निमित्ताने अधिक भर देऊन अभियान राबविले जात आहे, असे विशाल विमल यांनी सांगितले.

आपल्याकडे तार्किक, सुसंगत, चिकित्सपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विचार व्यवहार करण्याची संस्कृती रुजविलेली नाही. अलिकडच्या काळात तर उलटा प्रवास सुरू आहे. समाजातील सर्वस्तरातील लोक धागेदोरे, अंगारे धुपारे, मंत्रतंत्र, पूजाअर्चा याच्या आधीन गेले आहेत. पाण्याचा दिवा पेटणे, अंगात संचार होणे, मंत्राने अग्नि प्रज्वलित होणे, बंद चिट्टीत लोकांनी लिहून ठेवलेले ओळखणे, पेटता कापुर खाणे, डोळे बंद असताना हलविलेली वस्तु ओळखने, मंत्राने पाणी गायब करणे आदी प्रयोग करून आजही लोकांना फसविले जाते. भोंदू लोक भौतिक क्रिया, हातचलाखी, रासायनिक अभिक्रिया, दिशाभूल करून प्रयोग सादर करतात. मात्र हे भोंदू लोक देवाधर्माचे नाव घेऊन अंगी सिद्धी असल्याने चमत्कार घडल्याचे सांगून लोकांना फसवितात. लोकही हजारोंच्या संख्येने भोंदूच्या मोहजालात फसत असल्याचे विशाल विमल यांनी सांगितले.
—–

 Poona Riverside Round Table India 105 Takes Nine Underprivileged Students on a Journey of Dreams in a maiden flight

Categories
Breaking News Education social पुणे

 Poona Riverside Round Table India 105 Takes Nine Underprivileged Students on a Journey of Dreams in a maiden flight

 

Pune | Poona Riverside Round Table India 105 (PRRT105) embarked on a heartwarming initiative called “Flight of Fantasy” on 25th February 2024, aimed at providing a life-changing experience to nine underprivileged students from Zilla Parishad School of Purandar, Pune.

The initiative, spearheaded by PRRT105, sought to offer these nine deserving students from Purandar their first-ever flight experience from Pune to Mumbai. Amidst excitement and anticipation, the students boarded the plane, their faces beaming with joy as they soared through the skies for the very first time.

Upon arrival in Mumbai, the students were greeted with warm hospitality and taken on a guided tour of the city’s iconic landmarks. From the majestic Gateway of India to the serene beauty of Girgaon Chowpaty beach, each stop on the itinerary left the students in awe of Mumbai’s vibrant culture and rich heritage.

Poona Riverside Round Table India 105

One of the highlights of the trip was the visit to K. Rustom’s, where the students indulged in the famous kesar pista ice cream, savoring every moment of the sweet treat by the sea. They also had the privilege of witnessing prominent landmarks such as T2 Mumbai International Airport, Maharashtra Police Headquarters, and the historic Taj Mahal Palace Hotel.

The students were accompanied by Chairman of PRRT105 Paresh Lodha and were hosted with unparalleled generosity by Mumbai’s tables, including BRT2, BNRT 19, MMRT 200, and MBRT 313, who provided delicious meals, arranged local transportation, and sponsored recreational activities such as boating.

“Flight of Fantasy” not only provided these students with a memorable day out but also instilled in them a sense of wonder and possibility. It was a testament to the power of community and the spirit of giving, as PRRT105 and its partners came together to create an experience that will be cherished by these students for years to come.

  Traffic in Mundhwa Chowk smooth!  | PMC Additional Commissioner Vikas Dhaknes Information

Categories
PMC social पुणे

  Traffic in Mundhwa Chowk smooth!  | PMC Additional Commissioner Vikas Dhaknes Information

 Mundhwa Chowk Widening |  Pune Municipal Corporation (PMC) is developing important roads to solve the traffic problems in the city.  Mundhwa Chowk traffic has been smoothed out. PMC Additional Commissioner Vikas Dhakane gave this information. Meanwhile Shiv Sena city chief Pramod Nana Bhangire was also continuously following up to solve the problem at this intersection. (Mundhwa Chowk Latest News)
 In this regard, Additional Commissioner Dhakne said that traffic problems were faced at the important Mundhwa Chowk on Kharadi-Hadapsar Road.  After many complaints, the municipal administration took action and cleared the road in two phases.  But Shri Kodre and 4 others were not in possession of total 5 properties.  Also, there was a lot of opposition and legal hurdles to its acquisition over the years.  However, the road department, legal department and property management department of the municipal corporation worked together to take over these places.  Land owners were given TDR in return.  It made working in the square easier.  Encroachments in the area were removed and the road widened.  Due to this, now the traffic in Mundhwa Chowk is smooth and the citizens have been spared.
 Meanwhile, Pramod Nana Bhangire also consistently pursued to solve the traffic problem in Mundhwa Chowk.  Protests were also held in the area.  Taking serious note of it, the administration has successfully resolved the problem in the square.

Mundhwa Chowk Widening | मुंढवा चौकातील वाहतूक सुरळीत! | PMC अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

Mundhwa Chowk Widening | मुंढवा चौकातील वाहतूक सुरळीत! | PMC अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

Mundhwa Chowk Widening | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महत्वाचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत. मात्र भूसंपादन अभावी रस्ते विकसनात अडथळे येत होते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून समस्या बनून राहिलेले मोठे अडथळे प्रशासनाने दूर केले आहेत. त्यामुळे मुंढवा चौकातील (Mundhwa Chowk pune) काम करून वाहतूक  सुरळीत झाली आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिली. दरम्यान या चौकातील समस्या सोडवण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) हे देखील सातत्याने पाठपुरावा करत होते. (Mundhwa Chowk Latest News)
the karbhari - mundhwa chowk news
मुंढवा चौकातील वाहतूक सुरळीत झाल्याचे दाखवताना महापालिका पथ विभागाचे अधिकारी
याबाबत अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सांगितले कि, खराडी ते हडपसर (Kharadi- Hadapsar Road) या रोडवरील महत्वाच्या मुंढवा चौकात वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. खूप तक्रारी वाढल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये मनपा प्रशासनाने कारवाई करून रस्ता मोकळा केला होता. परंतू श्री कोद्रे आणि इतर ४ अशा एकूण ५ मालमत्ता ताब्यात नव्हत्या. तसेच वर्षानुवर्षे त्या ताब्यात घेण्यास मोठा विरोध आणि कायदे विषयक अडथळे होते. मात्र महापालिकेच्या पथ विभाग, विधी विभाग आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाने एकत्रित काम करून या जागा ताब्यात घेतल्या. जागा मालकांना त्या बदल्यात टीडीआर देण्यात आला. त्यामुळे चौकात काम करणे सोपे झाले. परिसरात जे अतिक्रमण होते ते काढून टाकण्यात आले आणि रस्ता मोठा करण्यात आला. त्यामुळे आता मुंढवा चौकात वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचा त्रास वाचला आहे.
दरम्यान मुंढवा चौकातील वाहतुकीची अडचण सोडवण्यासाठी प्रमोद नाना भानगिरे यांनी देखील सातत्याने पाठपुरावा केला होता. परिसरात आंदोलने देखील करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकातील समस्या कामयस्वरूपी मिटवली आहे.