NCP – Sharadchandra Pawar Manifesto | देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे | शरद पवार यांची ‘शपथनामा’ मधून भाजप वर सडकून टीका 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP – Sharadchandra Pawar Manifesto | देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे | शरद पवार यांची ‘शपथनामा’ मधून भाजप वर सडकून टीका

 

NCP – Sharadchandra Pawar Manifesto – (The karbhari news service)  – राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज आपला जाहीरनामा सादर करण्यात आला. त्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले आहे. यात प्रस्तावनेच्या माध्यमातून पार्टी चे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप वर सडकून टीका केली आहे. देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राची सर्व आघाड्यांवर पीछेहाट होते आहे. हे चित्र पालटविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनतेच्या भावना समजून घेत, विकासाची दिशा काय असावी, याचे आमचे चिंतन सदैव सुरू असते, त्या विचारमंथनातूनच आलेला हा ‘शपथनामा’ आम्ही सादर करतो आहोत. असे पवार यांनी म्हटले आहे.

| शरद पवार यांची काय आहे प्रस्तावना?

प्रजासत्ताकाचा आत्मा जपताना संवादाची भूमिका हवी, भारतीय लोकशाही  कार्यपद्धतीत सामूहिक विचारविनिमयातूनच निर्णय झाले पाहिजेत, यावर आमचा विश्वास आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला देश सामोरा जात असतानाच गेल्या १० वर्षांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. गेल्या दहा वर्षांत चित्र असे आहे, की केंद्रातील सत्तारूढ पक्षाला संवाद नको आहे आणि कार्यपद्धती एकाधिकारशाहीची आहे.

लोकशाहीत प्रत्येक निर्णय चर्चा आणि संवादातून जन्माला येणे अपेक्षित असते. गेल्या दहा वर्षांत बहुमताच्या गुर्मीतून निर्णय लादण्याची सवंग कार्यपद्धती अनुसरली गेली, असे चित्र आहे. याचे तडाखे देशाच्या अर्थव्यवस्थेला, देशातील शेतकरीवर्गाला, कामगारवर्गाला, मध्यमवर्गाला
बसताना दिसत आहेत. या देशातील रचनेत आपल्याला किंमत नाही, अशी
भावना अल्पसंख्याकांमध्ये निर्माण झालेली आहे. सरकारी यंत्रणांचा वापर
हत्यारासारखा होतो आहे आणि राजकीय विरोध उभा राहूच द्यायचा नाही,
अशी मुजोरी सातत्याने दाखविली जाते आहे.

राज्यकारभार करताना सर्व मतप्रवाह विचारात घेऊन निर्णय अमलात
आले पाहिजेत, असे संविधानाला अपेक्षित आहे. संविधानाची ही चौकट
उखडून टाकण्याचे काम गेली दहा वर्षे अत्यंत बेमुर्वतपणे सुरू आहे. पंतप्रधान माध्यमांशी संवाद करीत नाहीत, सभागृह नेता या नात्याने सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत नाहीत, असे दारुण चित्र देश पाहतो आहे. संसदेला काडीमोल किंमत आपण देतो, असा संदेश पोहोचविला जातो आहे. राजकीय पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत, सूचनांचा स्वीकार करायचा नाही, अशा पद्धतीने संसदेत कारभार सुरू आहे. हे चित्र देशाच्या लोकशाहीच्या भवितव्यासाठी घातक आहे. संसदेला वजा करून, ‘मुखवटा लोकशाहीचा व राजवट एकाधिकारशाहीची’ हीच कार्यपद्धती रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या हितासाठीच सरकारच्या योजना राबविल्या जातात. आज या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना मतपेढी म्हणून वापरले जाते आहे. राज्यकारभार करीत असतानाच्या किळसवाण्या वृत्तीचे दर्शन यातून होते आहे. सत्तेचे केंद्रीकरण करण्याची ही कार्यपद्धती देशाच्या लोकशाहीला नख लावणारी ठरताना दिसते आहे.

शेतकरी या देशाचा कणा आहेत, त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याची भूमिका घेतली जाते आहे. विकासाचे धोरण आपल्यासाठी नव्हे, तर उद्योजकांसाठी राबविले जाते आहे, ही भावना सामान्य जनतेच्या मनात बळावत आहे. शेजारील राष्ट्रांचा विश्वास कमाविण्यात आपण कमी पडतो आहोत.
अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी जागतिक पातळीवर अनुकूल संधी असताना रोजगारविरहित विकासाचे धोरण राबविले जाते आहे. देशातील तरुणांमध्ये उन्मादाची भावना चेतविली जाते आहे. विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी राज्यपाल या संस्थेचा हरप्रकारे उपयोग केला जातो आहे.
इतिहासात जेव्हा जेव्हा आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा
महाराष्ट्राने आपली तलवार परजली आहे. विचारांची लढाई लढताना देशाला
मार्गदर्शन केले आहे. ही परंपरा चालविण्याची कधी नव्हे तेवढी आज गरज आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचायचे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात
स्थान असलेल्या नेत्यांना पांगळे करायचे, आर्थिकदृष्ट्या संपन्न महाराष्ट्राला
दुबळे बनवायचे, महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाला आपला बटीक
करायचे, असेच धोरण राबविले जाते आहे.
देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राची सर्व आघाड्यांवर पीछेहाट होते आहे. हे चित्र पालटविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनतेच्या भावना समजून घेत, विकासाची दिशा काय असावी, याचे आमचे चिंतन सदैव सुरू असते, त्या विचारमंथनातूनच आलेला हा ‘शपथनामा’ आम्ही सादर करतो आहोत.
——

नागरिकांना या गोष्टी मिळणार

Maharashtra Election commission | मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Maharashtra Election commission | मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

| पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

 

Maharashtra Election Commission – (The karbhari News Service) – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत. (Loksabha Election 2024)

समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, अभिनेत्री सान्वी जेठवानी, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना, सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, तृतीयपंथी प्रणीत हाटे, तृतीयपंथी झैनाब पटेल, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत, दिव्यांग कार्यकर्ती सोनल नवनगुल यांचा समावेश आहे.

आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सदिच्छादूत

प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. अहमदनगरसाठी पद्मश्री राहीबाई पोपरे, प्रणिता सोमण, शिवम लोहकरे, मिलिंद शिंदे, आरुष बेडेकर, वेदांत वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यात मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करणार आहेत. अकोल्यात पलक झांबरे आणि अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बीडमध्ये योगेश्वर घाटबंधे, मयुरी लुते, प्रमिला चांदेकर तर बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

औरंगाबादमध्ये नवेली देशमुख, उस्मानाबादमध्ये राहुल लखाडे, धुळेमध्ये वैष्णवी मोरे आणि पार्वती जोगी, गडचिरोलीमध्ये पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, गोंदियामध्ये मुनालाल यादव, जळगावमध्ये निलिमा मिश्रा, जालनामध्ये किशोर डांगे, डॉ. निकेश मदारे आणि निशा पुरी सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

कोल्हापूरमध्ये वीरधवल खाडे, लातूरमध्ये बसवराज पैके, मेघा पवार, सृष्टी जगताप, मुंबई शहरामध्ये दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीत, मुंबई उपनगरासाठी दिव्यांग कार्यकर्ती विराली मोदी हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. याशिवाय नागपूरसाठी जयंत दुबळे आणि ज्योती आमगे, नांदेडसाठी भाग्यश्री जाधव, सृष्टी जोगदंड, कपिल गुडसुरकर, नंदूरबारसाठी प्रतिक कदम, रिंकी पावरा आणि शिवाजीराव मोरे काम करणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी चिन्मय उद्गगीरकर, सागर बोडके, पालघरसाठी विक्रांत केणी, पूजा पाटील, शुभम वनमाळी, भाविका पाटील, पुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर , आर.जे. संग्राम खोपडे हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करतील.

रायगडसाठी तपस्वी गोंधळी, रत्नागिरीसाठी संकेत चाळके आणि पल्लवी माने, सांगलीमध्ये संकेत सरगर, सातारामध्ये आदिती स्वामी, सिंधुदुर्गमध्ये ओमकार अटारी, सोलापूरमध्ये तानाजी गालगुंडे, आनंद बनसोडे, प्रार्थना ठोंबरे तर ठाण्यात अशोक भोईर, वर्ध्यात निमिश मुळ्ये निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

यवतमाळमध्ये अंकुर वाढवे, आकाश चिकटे, चंद्रपूरमध्ये शेख गायसुद्दिन आणि हिंगोलीमध्ये महेश खुळखुळे काम करणार आहेत. परभणीमध्ये संकर्षण कऱ्हाडे, प्रशांत पाईकराव, शुभम म्हस्के, सुनील तुरुकमाने, डॉ. राजगोपाल कलानी निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

Loksabha Election Voting | मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Loksabha Election Voting | मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार

 

Loksabha Election Voting – (The Karbhari News Service) – राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. (Loksabha Election Voting Identity Proof)

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना माहिती- चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Dr Suhas Diwase IAS | निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी | डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Dr Suhas Diwase IAS | निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी | डॉ. सुहास दिवसे

 

Dr Suhas Diwase IAS – (The karbhari news service) –  लोकसभा निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करीत असून यापुढेही नियुक्त केलेल्या सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. (Loksabha Election 2024)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वयक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदार संघात स्वीप अंतर्गत कार्यक्रम घेऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांची शहरी भागातील मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यात यावी. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे. आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे.

सी-व्व्हिजील नियंत्रण कक्ष आणि एमसीएमसी समितीने त्यांचा दैनंदिन अहवाल प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावा. फेक न्यूज, वृत्तपत्रातील आक्षेपार्ह बातमी याचीही माहिती देण्यात यावी. आरोग्य विभागाने मतदारसंघनिहाय दिव्यांग मतदारांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी अगोदरच व्हीलचेअरचे नियोजन करावे.

अल्पसंख्याक समाजात पडदा वापरणाऱ्या महिलांची ओळख पटविण्यासाठी व शाई लावण्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात यावी. ‘तुमचे मतदान केंद्र ओळखा’ हे अभियान राबवून मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती देण्यात यावी. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्यावेळी आवश्यकता भासल्यास ईव्हीएममधील बिघाड दुरूस्‍त करण्यासाठी नियंत्रण कक्षात २ तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करावी.

लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असून सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मनुष्यबळ, प्रशिक्षण, वाहन, संगणक, स्वीप, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, ईव्हीएम, पोस्टल बॅलेट, मतदार यादी, मतदार मदत केंद्र, एक खिडकी योजना व दिव्यांग कक्ष व्यवस्थापन समन्व्यक अधिकाऱ्यांकडून निवडणूक माहिती घेतली.

Loksabha Election 2024 | राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली | लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Loksabha Election 2024 | राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली

| लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

 

Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – 
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे असणार आहेत.

2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या 98 हजार 114 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सर्वांत जास्त मतदान केंद्र पुण्यात तर सर्वांत कमी मतदान केंद्र सिंधुदुर्गात

सर्वांत जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. याची संख्या 8 हजार 382 आहे. यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 380 मतदान केंद्रे असणार आहेत. ठाण्यात 6 हजार 592, नाशिकमध्ये 4 हजार 800 आणि नागपूरमध्ये 4 हजार 510 मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये 918 आणि गडचिरोलीमध्ये 950 मतदान केंद्रे असणार आहेत.

3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात

3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात आहेत. अहमदनगरमध्ये 3 हजार 734,सोलापूरमध्ये 3 हजार 617, जळगावमध्ये 3 हजार 582, कोल्हापूरमध्ये 3 हजार 368, औरंगाबादमध्ये 3 हजार 085, नांदेडमध्ये 3 हजार 047 आणि सातारामध्ये 3 हजार 025 मतदान केंद्र असतील.

10 जिल्हयांत 2000 हून अधिक मतदान केंद्रे

2000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 10 जिल्हयात आहेत. रायगडमध्ये 2 हजार 719, अमरावतीमध्ये 2 हजार 672, यवतमाळमध्ये 2 हजार 532, मुंबई शहरमध्ये 2 हजार 517, सांगलीमध्ये 2 हजार 448, बीडमध्ये 2 हजार 355, बुलढाण्यामध्ये 2 हजार 266, पालघरमध्ये 2 हजार 263, लातूरमध्ये 2 हजार 102 आणि चंद्रपूरमध्ये 2 हजार 044 मतदान केंद्र असतील.

2000 पेक्षा कमी मतदान केंद्रे असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे – नंदुरबार 1 हजार 412, धुळे 1 हजार 704, अकोला 1 हजार 719, वाशिम 1 हजार 76, वर्धा 1 हजार 308, भंडारा 1 हजार 156, गोंदिया 1 हजार 288, हिंगोली 1 हजार 17, परभणी 1 हजार 587, जालना 1 हजार 719, उस्मानाबाद 1 हजार 503, रत्नागिरी 1 हजार 717 मतदान केंद्रे असतील.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

0000000

Loksabha Election 2024 | देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे | मूळ संकल्पना पुण्याची

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election 2024 | देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे | मूळ संकल्पना पुण्याची

| पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल २०२४ अशी आहे. बारामती मतदार संघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल आहे. पुणे, शिरुर आणि मावळ मतदार संघांची अधिसूचना प्रसिद्धी १८ एप्रिल रोजी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२४ अशी आहे.

आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४३ लाख २८ हजार ९५४ पुरूष, ३९ लाख ६३ हजार २६९ स्त्री तर ७२८ तृतीयपंथी अशा एकूण ८२ लाख ९२ हजार ९५१ मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. ६, आणि स्थलांतरणासाठी अर्ज क्र. ८ सादर करण्याची अद्यापही संधी असून बारामती मतदार संघात ९ एप्रिलपर्यंत तर अन्य तीन मतदार संघात १५ एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांवर निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. अंतिम मतदारसंख्या त्यावेळी निश्चित होईल.

सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आदी ठळक सुविधांसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी शहरी भागात प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्राची प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा आदी विभागांनी सुरक्षतेच्यादृष्टिने संयुक्त पाहणी केली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loksabha Election Divyang Employees | लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Loksabha Election Divyang Employees | लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

 

 

Loksabha Election Divyang Employees (The karbhari News Service) – येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. जळगावमध्ये २२, पुण्यामध्ये २१, ठाण्यामध्ये १८ आणि नाशिकमध्ये १५ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. अकोला, कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, रायगड अश्या ६ जिल्ह्यात प्रत्येकी १ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसेल.
या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण ६,०४,१४५ इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्केपेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस ६,०४,१४५ इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.

Loksabha Election Holiday | लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी | कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Holiday | लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी

| कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

 

Loksabha Election Holiday – (The Karbhari News Service) –  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ३५- बारामती लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी तर ३३- मावळ, ३४- पुणे आणि ३६- शिरूर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असल्याने त्या- त्या दिवशी मतदार संघात सुट्टी असणार आहे.

राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असणार आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर संस्था (प्रतिष्ठान) आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

cVIGIL App | ECI | आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा | भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र

cVIGIL App | ECI | आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा | भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

 

cVIGIL App – (The Karbhari News Servic) –  भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (General Election of India) तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता (Model code of conduct) लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप (cVIGIL App) विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य

सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा

एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा

या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

You can cast your vote even without Voter ID Card

Categories
Breaking News social देश/विदेश लाइफस्टाइल

You can cast your vote even without Voter ID Card

 The Karbhari News Service- The dates for Lok Sabha elections have been announced.  If you do not have Voter ID card then you can apply for it.  Apart from this, apart from Voter ID, you can also cast your vote using many other documents.
Cast Vote Without Voter ID: Lok Sabha election dates have been announced.  Voter ID card is a necessary document to cast vote in India.  After turning 18, this is issued by the Government of India.  This is an important document for voting.  This is also used as identity and address proof.  If you do not have Voter ID card then you can apply for it.  Apart from this, apart from Voter ID, you can also cast your vote using many other documents.

 You can cast your vote using these documents

 Even if you do not have a Voter ID card, you can still cast your vote using many government documents issued by the Government of India.
 Aadhar card
 Ration card
 MNREGA job card
 bank passbook
 insurance smart card
 driving license
 PAN card
 Passport
 pension document
 Smart card issued by National Population Register (NPR)
 How to apply for Voter ID card sitting at home
 If you do not have a Voter ID card, then you can apply from home by following the steps given below.

 Apply like this

 First of all go to the official website https://www.nvsp.in/.
 On the homepage you will see New registration for general electors, click on it.
 After this you will have to sign up.
 After this, enter all the details asked there.
 Now you will have to register by entering your mobile number, password, captcha and OTP.
 After this submit Form 6.

 What to do if you lose your voter ID

 If your Voter ID card is lost somewhere then you can download it by visiting the official website.

 Download Voter ID card like this

 First of all go to the official website https://www.nvsp.in/.
 There you will see the option of ‘Login’, click on it and enter mobile number, password and captcha.
 After this an OTP will come on your phone, click on ‘Verify & Login’ there.
 After this click on ‘E-EPIC Download’ tab.
 Here you have to enter your EPIC number and select your state.
 You will see the ID card on your screen.
 There the option of ‘Download e-EPIC’ will be visible on the home page.
 Download it.
 This way you can check the name in your list
 If you want to check whether your name is in the voter list or not, you can call the Election Commission website https://eci.gov.in/ or voter helpline 1950.  Apart from this you can call helpline number 1950.  Apart from this, to add your name in the Voter ID list or to make any kind of change, you can make changes by visiting https://eci.gov.in/.