Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी पुन्हा लांबणीवर! | नवीन सुनावणी आता 6 मे ला
State Election Commission – (The Karbhari News Service) – जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अॅपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे. या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होऊ शकेल.
दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९८,११४ मतदान केंद्रे आहेत. त्यांपैकी ९८,०३९ मतदान केंद्रांवर रॅम्पची आवश्यकता आहे. त्यांतील ९७,६६२ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ३७७ मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.
विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३१३ मतदान केंद्रांवर सर्व दिव्यांग मतदान अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अॅपवर आपले नाव कसे चिन्हांकित करावे, नव्याने मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदार चिठ्ठी, मतपत्रिका, मतदार मार्गदर्शक पुस्तिका हे अंध मतदारांना ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे. ही सुविधा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या घरी भेट देतील. प्रत्येक टप्प्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत पात्र ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांची गुप्त पध्दतीने मतदान प्रक्रिया त्यांच्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतदान-तारखेच्या एक दिवस आधी पूर्ण केली जाईल.
0000
Raireshwar fort | हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे औचित्य साधून बांबू स्वराज्य मोहीम, औषधी वनस्पती अभियान, शिवकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान आणि स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तसमी’ १६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली .या घटनेला एकुणात भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदवी स्वराज्याच्या शपथेमध्ये भारतीय स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही. २०२४ हे वर्ष ‘हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिना’ चे ३७९ वे वर्ष आहे. यावर्षीदेखील सालाबादप्रमाणे भरगच्च आणि अनोख्या उपक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र रायरेश्वर, रायरी, ता. भोर, जि. पुणे येथे केले आहे.
सदर दिनाचे औचित्य साधून रायरेश्वर ग्रामस्थ संस्था – रायरेश्वर, बायोस्फिअर्स, ग्रामपंचायत – रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषत: मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. चैत्र शु. सप्तमी तिथीनुसार ह्या वर्षी सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ ला हिंदवी स्वराज्य शपथ भूमी श्री रायरेश्वर मंदिर आणि परिसरात स. ६ ते दु. १.३० वा. पर्यंत अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन केले गेले जसे कि शंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक व दुग्धाभिषेक, गड आणि ध्वज पूजन, मशाल मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक व अभिषेक, ह.भ.प. श्री. राहुल महाराज पारठे यांचे विध्यार्थी मिरवणूक, बांबू स्वराज्य मोहीमेचे व बोधचिन्हाचे अनावरण, औषधी वनस्पतींचे वाटप, रोपण आणि मार्गदर्शन, श्री. गणेश मानकर लिखित ‘गाव तिथे रुद्राक्ष वृक्ष’ पुस्तिकेचे प्रकाशन, शिवकार्यात योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांचा सन्मान तसेच ग्रामस्थांकडून सरदार घराण्यांचा सन्मान, श्री. संदीप खाटपे यांचे शिव-व्याख्यान, देव वृक्ष म्हणून सुपरिचित असलेल्या अजानवृक्ष, रुद्राक्ष, सुवर्णपिंपळ यांचे रोपण असे विविध उपक्रम साजरे झाले. सदर उपक्रमात हिंदवी स्वराज्य शपथ घेताना छत्रपती शिवरायांसोबत त्याकाळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी, संत, अभ्यासक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कलाकार इ. मोठ्या संखेने उपस्थित होते.
स्वराज्याच्या या सोहळ्यात श्रीमंत छत्रपति दमयंतीराजे उदयनराजे भोसले (राणीसाहेब), श्री. महादेव मोहिते, उपवनसंरक्षक (प्रा.) पुणे, डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज, डॉ. सचिन अनिल पुणेकर, श्री. युवराज राजे जेधे, श्री. दत्तात्रय जंगम, डॉ. दिगंबर मोकाट, श्री. अशोक सातपुते, श्रीमती शीतल राठोड, श्री. रवींद्र कंक, श्री. मंगेश शिळीमकर श्री. रवींद्र जंगम यांच्या सन्माननीय उपस्थितीत वर नमूद उपक्रम संपन्न झाले.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंद्रजीत जेधे, महेंद्र देवघरे, समीर घोडेकर, गणेश मानकर, केदार कुलकर्णी, गणपत चोर, शैलेंद्र पटेल, अभिजित भसाळे, पराग शिळीमकर, सुनील चिकणे, सचिन देशमुख, नितीन कुडले, दीपक नवघणे, हरीश नवले, गणेश कोकाटे, संदीप जंगम, सखाराम जंगम, गणेश जंगम, मारुती जंगम, दशरथ जंगम, राजीव संत झाले यांचे मोलाचे योगदान मिळाले.
या सोहळ्याच्या निमित्त श्रीमंत छत्रपति दमयंतीराजे उदयनराजे भोसले (राणीसाहेब) उपस्थितांना श्री क्षेत्र रायरेश्वर तसेच राज्याचा वारसा असलेले गडकोट संवर्धन, जतन व शाश्वत पर्यटनाबाबत सर्वांनी एकत्रित येवून शिवरायांना अपेक्षित असलेले सुराज्य निर्माण करण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व औषधी वनस्पती केंद्राचे प्रमुख डॉ. दिगंबर मोकाट यांनी स्थानिक औषधी वनस्पती व रोजगार निर्मिती याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी बांबू स्वराज्य मोहीम संकल्पना व मोहिमेची धेय्य-धोरणे बाबत संवाद साधला. या मोहिमेला पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक (प्रा.) श्री. महादेव मोहिते यांनी अनुमोदन दिले व शासनाच्या माध्यमातून बांबू स्वराज्य मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याची गरज व्यक्त केली.
Maharashtra Election Commission – (The karbhari News Service) – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत. (Loksabha Election 2024)
समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, अभिनेत्री सान्वी जेठवानी, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना, सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, तृतीयपंथी प्रणीत हाटे, तृतीयपंथी झैनाब पटेल, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत, दिव्यांग कार्यकर्ती सोनल नवनगुल यांचा समावेश आहे.
आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सदिच्छादूत
प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. अहमदनगरसाठी पद्मश्री राहीबाई पोपरे, प्रणिता सोमण, शिवम लोहकरे, मिलिंद शिंदे, आरुष बेडेकर, वेदांत वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यात मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करणार आहेत. अकोल्यात पलक झांबरे आणि अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बीडमध्ये योगेश्वर घाटबंधे, मयुरी लुते, प्रमिला चांदेकर तर बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.
औरंगाबादमध्ये नवेली देशमुख, उस्मानाबादमध्ये राहुल लखाडे, धुळेमध्ये वैष्णवी मोरे आणि पार्वती जोगी, गडचिरोलीमध्ये पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, गोंदियामध्ये मुनालाल यादव, जळगावमध्ये निलिमा मिश्रा, जालनामध्ये किशोर डांगे, डॉ. निकेश मदारे आणि निशा पुरी सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.
कोल्हापूरमध्ये वीरधवल खाडे, लातूरमध्ये बसवराज पैके, मेघा पवार, सृष्टी जगताप, मुंबई शहरामध्ये दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीत, मुंबई उपनगरासाठी दिव्यांग कार्यकर्ती विराली मोदी हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. याशिवाय नागपूरसाठी जयंत दुबळे आणि ज्योती आमगे, नांदेडसाठी भाग्यश्री जाधव, सृष्टी जोगदंड, कपिल गुडसुरकर, नंदूरबारसाठी प्रतिक कदम, रिंकी पावरा आणि शिवाजीराव मोरे काम करणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी चिन्मय उद्गगीरकर, सागर बोडके, पालघरसाठी विक्रांत केणी, पूजा पाटील, शुभम वनमाळी, भाविका पाटील, पुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर , आर.जे. संग्राम खोपडे हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करतील.
रायगडसाठी तपस्वी गोंधळी, रत्नागिरीसाठी संकेत चाळके आणि पल्लवी माने, सांगलीमध्ये संकेत सरगर, सातारामध्ये आदिती स्वामी, सिंधुदुर्गमध्ये ओमकार अटारी, सोलापूरमध्ये तानाजी गालगुंडे, आनंद बनसोडे, प्रार्थना ठोंबरे तर ठाण्यात अशोक भोईर, वर्ध्यात निमिश मुळ्ये निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.
यवतमाळमध्ये अंकुर वाढवे, आकाश चिकटे, चंद्रपूरमध्ये शेख गायसुद्दिन आणि हिंगोलीमध्ये महेश खुळखुळे काम करणार आहेत. परभणीमध्ये संकर्षण कऱ्हाडे, प्रशांत पाईकराव, शुभम म्हस्के, सुनील तुरुकमाने, डॉ. राजगोपाल कलानी निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.
RPI | Shirdi Loksabha – (The Karbhari News Service) – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुती कडे करण्यात आली आहे. (Republican Praty of India)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षते खाली आज पक्ष कार्यालया मध्ये पार पडली. या बैठकी मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे, पश्चिम महाराष्ट्राचे तसेच पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकी मध्ये मित्र पक्षा बद्दल कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त केली. बाबासाहेबांच्या विचारातील पक्षाला एक ही जागा देत नसतील तर युती काय कामाची? तसेच शिर्डीची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव सदर बैठकी मध्ये मांडण्यात आला. सदर ठरावाचे पत्र 28 मार्च ला पुणे शहरामध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारणीच्या बैठकी मध्ये देण्यात येणार आहे. अशी माहिती शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली.
या बैठकीला उपस्थित शहराध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, बसवराज गायकवाड, श्याम सदाफुले, वीरेन साठे, महादेव ददी हे उपस्थित होते.
Maharashtra Cabinet meeting decision – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर राज्य सरकारच्या वतीने विविध निर्णय घेतले आहेत. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात विविध योजनांची खैरात करण्यात आली आहे. या निर्णया विषयी जाणून घेऊया.
राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
( उद्योग विभाग)
तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार*
( वैद्यकीय शिक्षण विभाग)
मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
( गृह विभाग)
१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
( विधि व न्याय)
संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार
(सांस्कृतिक कार्य)
शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
(सांस्कृतिक कार्य)
विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
( इतर मागास)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
( पशुसंवर्धन विभाग)
हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली “मॅनहोलकडून मशीनहोल” कडे योजना
( सामाजिक न्याय विभाग)
संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
( गृह विभाग)
राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
( गृह विभाग)
ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
( परिवहन विभाग)
भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
( महसूल विभाग)
संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
( गृह विभाग)
वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
( सांस्कृतिक कार्य)
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर
( सामान्य प्रशासन विभाग)
श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
( महसूल व वन)
सरकारच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशत: अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्
Maharashtra Cabinet meeting Decisions – The Karbhari News Service – बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. यात राज्यभरातील विविध निर्णय घेण्यात आले. याविषयी सविस्तर जाणून घ्या.
मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर
( मराठी भाषा विभाग)
पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार
( गृह विभाग)
अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास मान्यता
( सामान्य प्रशासन विभाग)
केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता
( नगरविकास विभाग)
श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार
( सार्वजनिक बांधकाम विभाग)
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प
( मदत व पुनर्वसन)
भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज
( वित्त विभाग)
राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ
( आरोग्य विभाग)
महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार . नफ्यात आणणार
( दुग्धविकास विभाग)
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार
( जलसंपदा विभाग)
मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार
( जलसंधारण विभाग)
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना.
( महिला व बालविकास)
मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.
(वैद्यकीय शिक्षण)
आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.
( कौशल्य विकास)
कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
( ऊर्जा विभाग)
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता
( ऊर्जा विभाग)
पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार
(पशुसंवर्धन व दुग्धविकास)
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता
( महसूल विभाग)
म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन
( वैद्यकीय शिक्षण विभाग)
आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ
( सार्वजनिक आरोग्य विभाग)
मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार
( परिवहन विभाग)
मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार.
उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता
( नगरविकास विभाग)
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते
( ग्रामविकास विभाग)
भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार
महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन
( महसूल व वन विभाग)
जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता
( परिवहन विभाग)
दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना
( पशुसंवर्धन व दुग्धविकास)
(The Karbhari News Service) – Maharashtra government has decided to make it mandatory to include mother’s name in all government documents. This decision will be implemented from May 1, 2024.
The Maharashtra cabinet yesterday decided to make inclusion of mother’s name mandatory on all government documents like birth certificate, school documents, property documents, Aadhaar card and PAN card.
The Income Tax department had clarified in 2018 that it will not be mandatory to mention the father’s name in the PAN application in cases where the applicant’s mother is a single parent. Subsequently the Central Board of Direct Taxes (CBDT) had amended the rules which gave the applicant an option whether the mother was a single parent or not and whether the applicant wanted to state only the mother’s name.
—-
The first honor of implementation goes to ‘Ajit Ashatai Anantrao Pawar’
In the state’s fourth women’s policy announced on this year’s International Women’s Day (March 8), it was decided to make it mandatory to write the mother’s name in official government documents. Deputy Chief Minister and Minister of Finance and Planning Ajit Pawar has won the honor of immediate implementation of this decision, and outside his hall on the sixth floor of the Ministry, a sign saying ‘Ajit Ashatai Anantrao Pawar’ has been seen on the first office day after the holiday.
The offices of Chief Minister Eknathrao Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Ajit Pawar are located on the sixth floor of the Ministry. Therefore, the number of citizens coming to the sixth floor is the highest. This plaque has become a point of attraction and admiration for those visiting the sixth floor of the Ministry. Acting Deputy Chief Minister Ajit Pawar’s style of work for immediate implementation of the state’s women’s policy is being appreciated by all. The state’s fourth women’s policy was launched on March 8 on International Women’s Day. That day was Mahashivratri holiday. Then came the weekly holiday of Saturday and Sunday. For officials, employees and citizens who came to the Ministry after three consecutive days of vacation after March 8, the ‘Ajit Ashatai Anantrao Pawar’ plaque outside the Deputy Chief Minister’s office became a matter of surprise and admiration, reaffirming Ajit Pawar’s proactive work style.
——–